शहरं
Join us  
Trending Stories
1
...तेव्हा राज ठाकरेंवर प्राणघातक हल्ला करण्याचा प्लॅन रचला होता; मनसे नेत्याचा मोठा दावा
2
Digvijaya Singh : "तुम्हाला निराश करणार नाही, ही माझी शेवटची..."; दिग्विजय सिंह निवडणूक लढवणार नाहीत?
3
भारत दौरा टाळून एलॉन मस्क पोहोचले थेट चीनमध्ये, चिनी पंतप्रधानांच्या भेटीनंतर दिले सूचक संकेत
4
उद्धवसेना, शिंदेसेना मुंबईत आज आमनेसामने! भव्य रॅलीत CM शिंदे vs आदित्य ठाकरे येणार, मोठा फौजफाटा
5
रत्नागिरीच्या सभेत मनसेची उद्धव ठाकरेंवर खोचक टीका; "ज्यांनी आयुष्यभर दुसऱ्याचं..."
6
कल्याण लोकसभा मतदारसंघात एकनाथ शिंदेंकडून काँग्रेसला धक्का, बड्या नेत्यासह माजी नगसेवक शिंदे गटात 
7
Israel-Hamas War : इस्त्रायलचा रफाह शहरावर हवाई हल्ला; १३ जणांचा मृत्यू, अनेक जखमी
8
भाजपा खासदार व्ही. श्रीनिवास प्रसाद यांचं निधन, चार दिवसांपासून ICUमध्ये घेत होते उपचार  
9
Blog : ऋतुराज गायकवाड T20 WC मध्ये का नको? डावा-उजवा असा खेळ बस्स करा...
10
"काय गं तुला खूप माज आलाय का?", जुई गडकरीला तरुणीकडून धमकी; अभिनेत्री म्हणाली, आता थेट पोलीस…
11
"अजून मी प्रचारालाही सुरुवात केली नाही, तोवर...; उज्ज्वल निकमांचा विरोधकांना टोला
12
पिकअप व्हॅन आणि कारचा भीषण अपघात, १० जणांचा मृत्यू, २३ जण जखमी   
13
काँग्रेसच्या झेंड्याला ठाकरेंच्या मताची काठी; तब्बल दहा वर्षानंतर लोकसभेसाठी काँग्रेसला मुंबईत खाते उघडण्याची संधी
14
पैशांच्या अवैध वाहतुकीवर तिसरा डोळा; निवडणूक आयोगाचे मुंबई आणि परिसरातील रेल्वे स्थानकांवर विशेष लक्ष
15
निवडणुकीत जातीपातीच्या जाणिवा टोकदार ; एकाच जातीचे उमेदवार; तिथे पाहतात पोटजात
16
देवेगौडांचा नातू ‘सेक्स स्कँडल’मध्ये; विदेशात पलायन? एसआयटी चौकशी
17
साताऱ्यातील प्रचारात मुंबई बाजार समितीतील भ्रष्टाचाराचा मुद्दा ‘हॉट’ ; उदयनराजे भोसले आणि शशिकांत शिंदे यांच्यात थेट लढत
18
भाजप अन् बीजेडीची ओडिशात मिलीभगत; निवडक लोकांसाठी काम : राहुल गांधी
19
मोटारीला चपलांचा हार आणि आरोप-प्रत्यारोपांचे प्रहार; जरांगे पाटलांनी केला आरोप
20
तरुणाई का संतापली? निराश तरुण मतदानाकडेच पाठ फिरवताना दिसताहेत

कळमनुरी तालुक्यात बोंडअळीच्या नुकसानीचे पंचनामे सादर न करणार्‍या कर्मचार्‍यांना नोटिसा

By ऑनलाइन लोकमत | Published: January 03, 2018 6:12 PM

कापूस पिकावरील बोंडअळीसह धान पिकावरील तुडतुडे रोगाच्या प्रादुर्भावामुळे नुकसान झालेल्या पिकांचे सर्वेक्षण अहवाल तहसील कार्यालयात सादर न केलेल्या कळमनुरी तालुक्यातील २५ तलाठी सज्जांमधील १०५ तलाठी, कृषी सहायक व ग्रामसेवकांना नोटिसा बजावण्यात आल्याची माहिती तहसीलदार डॉ. प्रतिभा गोरे यांनी दिली.

कळमनुरी (हिंगोली ) : कापूस पिकावरील बोंडअळीसह धान पिकावरील तुडतुडे रोगाच्या प्रादुर्भावामुळे नुकसान झालेल्या पिकांचे सर्वेक्षण अहवाल तहसील कार्यालयात सादर न केलेल्या कळमनुरी तालुक्यातील २५ तलाठी सज्जांमधील १०५ तलाठी, कृषी सहायक व ग्रामसेवकांना नोटिसा बजावण्यात आल्याची माहिती तहसीलदार डॉ. प्रतिभा गोरे यांनी दिली.

कळमनुरी तालुक्यातील कापूस पिकावरील बोंडअळीसह धान पिकावरील रोगांच्या प्रादुर्भावामुळे नुकसान झालेल्या पिकांचे पंचनामे करण्याचे आदेश १२ डिसेंबर रोजी तहसीलदारांनी दिले होते. त्यानंतर पिकांवरील नुकसानीच्या पंचनाम्याचे सर्वेक्षण करून हा अहवाल १० दिवसाच्या आत सादर करण्याच्या सूचना दिल्या होत्या. परंतु, २५ सज्जाच्या तलाठी, ग्रामसेवक व कृषी सहायकांनी अद्यापही अहवाल सादर केला नाही.

दरम्यान, २ जानेवारी रोजी तालुक्यातील मसोड, येहळेगाव (गवणी), घोडा, डोंगरगाव पुल, शेवाळा, वारंगा, शिवणी, कान्हेगाव, डोंगरकडा या १० दहा गावांचे अहवाल तहसील कार्यालयास प्राप्त झाले होते. संबंधित शेतकर्‍यांच्या शेतात जाऊन कापूस व धान पिकांचे सर्वेक्षण करण्याच्या सूचना देऊन संयुक्त स्वाक्षरीचा अहवाल सादर करण्याचे सांगण्यात आले होते. परंतु, आदेश देऊनही २० दिवसांचा कालावधी लोटला तरीही नुकसानींचे अहवाल सदर कार्यालयास प्राप्त झाले नाहीत. 

त्यानंतर आता तहसीलदार यांनी संबंधित कर्मचार्‍यांना २४ तासांच्या आत केलेल्या पंचनाम्याचे अहवाल सादर करण्याच्या सूचना नोटिसीद्वारे दिल्या असून विलंब झाल्यास प्रशासकीय कार्यवाही करण्यात येणार असल्याचे त्यात नमूद केले आहे.त्याचप्रमाणे वरिष्ठांच्या आदेशाचे पालन होत नाही, सदरची बाब ही गंभीर स्वरूपाची असून ही बाब खेदजनक असल्याचेही नोटिसीत नमूद केले आहे. दरम्यान, नुकसान झालेल्या ३१ गावांतील पंचनाम्याचे अहवाल तहसील कार्यालयात सादर करण्यात असून अजूनही बर्‍याच गावांतील पिकांचे पंचनामे करण्याची कामे सुरू असल्याची माहिती आहे.

पंचनामे तात्काळ सादर करावेतनुकसानीचे पंचनामे तात्काळ सादर करावेत, यासाठी तहसीलदारांनी १३ डिसेंबर रोजी तलाठी, ग्रामसेवक व कृषी सहायकांनी बैठक घेऊन चार दिवसांच्या आता १८ डिसेंबरपर्यंत नुकसानीचा सर्वे सादर करण्याच्या सूचना तहसीलदारांना दिल्या होत्या. परंतु, १८ डिसेंबर रोजी चार दिवसांचा कालावधी लोटूनही पंचनाम्याचे अहवाल सादर करण्यात आले नसल्याने संबंधितांना नोटिसा बजावण्यात आल्या आहेत.

नुकसानीचा सर्वे करताना सातबारावर त्या पिकांची नोंद असणे आवश्यक होते. ३३ टक्क्यांपेक्षा जास्त नुकसान व त्यापेक्षा कमी नुकसान तसेच क्षेत्र सर्व्हे नं. शेतकर्‍यांसह उभ्या पिकांचा फोटो शेतकर्‍यांची व पंचाची स्वाक्षरी तसेच तलाठी, कृषी सहायक, ग्रामसेवकाच्या संयुक्त स्वाक्षरीने नुकसानीचा सर्व्हे सादर करण्याच्य सूचना देण्यात आल्या होत्या. 

टॅग्स :cottonकापूसHingoliहिंगोलीFarmerशेतकरी