शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्र दिनी राज ठाकरेंची हुतात्मा स्मारकाबाबत पोस्ट; मराठी माणसाला आवाहन, सरकारवर टीका
2
महाराष्ट्रदिनी PM मोदी यांचे CM फडणवीस यांना खास पत्र, नेमकं काय म्हटलंय? वाचा
3
३ देशांतून तातडीने बाहेर पडा! UAEची नागरिकांना सूचना; सावधगिरीची इशारा की युद्धात उडी?
4
‘मिसिंग लिंक’ नाही, मग आता काय म्हणायचे?; विशेष मार्गिकेला CM फडणवीसांनी दिले नवीन नाव
5
“महाराष्ट्राचे राजकीय महत्त्व कमी करायचा प्रयत्न, सरकारने आत्मपरीक्षण करावे”: हर्षवर्धन सपकाळ
6
माणुसकीला काळिमा! १२ वर्ष सिगरेटचे चटके, मग घटस्फोट देऊन घराबाहेर काढलं; हैवान पतीचा क्रूर चेहरा समोर
7
“महाविकास आघाडीने विकासाची लिंक मिस केली, आम्ही ती वेगाने कनेक्ट केली”: DCM एकनाथ शिंदे
8
लग्नाचे विधी सुरू होणार तोच पथक दारात! परभणीत बालविवाह रोखला; अल्पवयीन मुलीची बाल कल्याण समितीकडे रवानगी
9
कृणाल पांड्याला गोलंदाजी का दिली नाही? भुवीने सांगितलं अजब कारण; पाहा तुम्हाला तरी पटतंय का?
10
मी माफी मागतो...! एक्स्प्रेस वेवरील वाहतूक कोंडीबद्दल मुख्यमंत्र्यांची दिलगिरी; सुप्रिया सुळेंना दिला खास संदेश
11
सुट्ट्यांचा आनंद महामार्गावरच 'जाम'! खेड शिवापूर ते साताऱ्यापर्यंत वाहनांच्या लांबच लांब रांगा; प्रवासी हतबल
12
धावत्या बसचे चाक बाहेर निघाले, साकोली जवळ मोठा अपघात टळला!
13
भोंदू खरातने परिसाची शक्ती प्राप्त करण्याचे सांगून फिर्यादीच्या पैशातून केला २१ देशांचा परदेश दौरा!
14
बंगालचा निकाल काय लागणार? एक्झिट पोलवर दादाची 'गुगली'! हसत हसत म्हणाला, 'याची भविष्यवाणी तर..." 
15
टेबलाखालून स्पर्श अन् प्रमोशनसाठी शरीरसंबंधांची सक्ती; महिला बॉसवर आरोप करणारे चिरायु राणा कोण?
16
परतूरचा 'विकासपुरूष' हरपला! माजी आमदार सुरेशकुमार जेथलिया यांचे हृदयविकाराच्या धक्क्याने निधन
17
Top Marathi News LIVE Updates: महाराष्ट्र दिनानिमित्त पंतप्रधान मोदींचे मुख्यमंत्री फडणवीसांना खास पत्र
18
एकच प्याला मृत्यूचा! वाढदिवसाच्या पार्टीच्या बहाण्याने जावयाला सासरी बोलावले, अन्..., असं फुटलं पत्नी अन् सासऱ्याचं बिंग    
19
Adani Group मध्ये मोठा फेरबदल! काय-काय बदलणार; गौतम अदानींचा प्लॅन काय?
20
प्रेयसीने नाकारलं, टी-शर्टवर तिचा फोटो अन् टॅटू काढलेला तरुण थेट विजेच्या खांबावर चढला अन्...
Daily Top 2Weekly Top 5

हिंगोलीत सर्वसाधारण वजनांचीच बाळे : जिल्ह्यात लठ्ठ बाळ जन्माला येण्याचे प्रमाण कमीच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 6, 2021 04:29 IST

हिंगोली : सर्वसाधरण ४ किलोपेक्षा जास्त वजनाचे बाळ जन्मला आल्यास, असे बाळ लठ्ठ समजले जाते. लठ्ठ बाळ जन्माला येण्याचे ...

हिंगोली : सर्वसाधरण ४ किलोपेक्षा जास्त वजनाचे बाळ जन्मला आल्यास, असे बाळ लठ्ठ समजले जाते. लठ्ठ बाळ जन्माला येण्याचे प्रमाण मोठ्या शहरात जास्त असले तरी हिंगोलीसारख्या भागात सरासरी २.५० ते ३.५० किलो वजनाचीच बाळे जन्माला येतात. ४ किलोपेक्षा जास्त वजनाचे बाळ जन्माला येण्याचे प्रमाण अत्यंत कमी असल्याची माहिती जिल्हा रुग्णालयातून देण्यात आली.

सरासरी २.५० ते ३.५० किलो वजनाचे बाळ जन्माला येते. मात्र, मागील काही वर्षांत लठ्ठ बाळ जन्माला येण्याचे प्रमाण वाढत आहे. त्यातही मोठ्या शहरांमध्ये ४ व त्यापेक्षा जास्त वजनाची बाळे जन्माला येत आहेत. येथील जिल्हा सामान्य रुग्णालयात मागील दोन वर्षांत ९ हजार ३७० बाळे जन्माला आली आहेत. यात ४ किलो वजनाच्या केवळ एक-दोन बाळांचाच समावेश आहे. २.५० किलो वजनापेक्षा कमी वजनाचे बाळ जन्मल्यास अशा बाळाला डॉक्टरांच्या निगराणीखाली ठेवले जाते. अशक्त माता, हिमोग्लोबिनचे प्रमाण कमी यामुळे कमी वजनाचे बाळ जन्माला येऊ शकते, तसेच जास्त वजनाचे बाळ जन्माला आल्यासही अशा बाळासह मातेला डॉक्टरांच्या निगराणीखाली ठेवले जात असल्याची माहिती जिल्हा रुग्णालयातून देण्यात आली. ग्रामीण भागात जास्त वजनाचे बाळ जन्माला आल्यास, असे बाळ सुदृढ बाळ समजले जाते. मात्र, मातेला शुगरसह इतर काही आजार असल्यास ४ किंवा त्यापेक्षा जास्त वजनाचे बाळ जन्माला येण्याची शक्यता असल्याचेही डॉक्टरांनी सांगितले.

पाच किलोपेक्षा जास्त वजनाच्या बाळाचे प्रमाण शून्य

जिल्ह्यात सरासरी २.५० ते ३.५० किलो वजनाचीच बाळे जन्माला आली आहेत. वर्षभरात केवळ एकाच बाळाचे वजन ४ किलो भरले आहे. त्यानंतर ३ किलो ९०० ग्रॅम वजनाचे बाळ जन्माला आलेले आहे. मोठ्या शहरात ५ किलो वजनाचे बाळ जन्माला येण्याचे प्रमाण असले तरी हिंगोलीसारख्या भागात जास्तीत जास्त ४ किलोपर्यंत बाळाचे वजन भरत आहे. ५ किलो वजनाचे बाळ जन्माला येण्याचे प्रमाण शून्य आहे.

कारण काय

एखाद्या मातेला शुगर व इतर आजार असतील, तर अशा मातेच्या नवजात बाळाचे वजन जास्त असते, तसेच एखाद्या मातेची अकाली प्रसूती, शरीरात हिमोग्लोबिनचे प्रमाण कमी असल्यास, अशा मातेच्या नवजात बाळाचे वजन शक्यतो कमी भरते. जास्त वजन व कमी वजनाच्या बाळावर लक्ष ठेवावे लागते.

-डॉ. दीपक मोरे,

नवजात शिशू व बालरोगतज्ज्ञ, जिल्हा रुग्णालय हिंगोली