शहरं
Join us  
Trending Stories
1
'आता चर्चा नाही, पाकिस्तानशी अखेरची लढाई...', पहलगाम हल्ल्यावरुन फारुख अब्दुल्ला संतापले
2
सीमेवरील तणावादरम्यान भारताचं मोठं पाऊल, राफेल-एम विमानांसाठी फ्रान्ससोबत करार, अशी आहेत वैशिष्ट्ये
3
ही खिंड आहे पाकिस्तानचं ‘चिकन नेक’, PoKमधील या एंट्री पॉईंटवर भारताने कब्जा केल्यास होईल जबर कोंडी, कारवायांना लागेल लगाम
4
मोठा खुलासा! पहलगाममध्ये हल्ल्यावेळी लष्कराचा मोठा अधिकारी तिथेच होता; गेटकडे धावणाऱ्या लोकांना रोखले...
5
दिल्ली बिहारपासून लांब आहे का? सर्वपक्षीय बैठकीला उपस्थित न राहिल्याने खरगेंचा PM मोदींवर निशाणा
6
पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेस नेत्यांच्या विधानांवर राहुल गांधी नाराज; मल्लिकार्जुन खरगे समज देणार
7
जसं त्याला कळलं, आम्ही हिंदू आहोत, त्याने...; लेफ्टिनंटच्या पत्नीचा पहिल्यांदाच खुलासा
8
मुकेश अंबानी यांच्या एका शेअरने मार्केट फिरवलं; बाजाराची जोरदार उसळी; कुठे सर्वाधिक वाढ?
9
पर्यटकांच्या सुरक्षेसाठी 'महाराष्ट्र पर्यटन सुरक्षा दल' स्थापना; राज्य सरकारचा निर्णय
10
Bank of Baroda मध्ये जमा करा १,००,००० रुपये आणि मिळेल ₹१६,१२२ चा फिक्स्ड रिटर्न, पाहा डिटेल्स
11
५०० रुपयांपेक्षा कमी वार्षिक प्रीमियमवर २ लाख रुपयांचा विमा मिळवा, कोण घेऊ शकतो लाभ?
12
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
13
यशस्वी जैस्वालकडे सर्वांचं लक्ष, गुजरातविरुद्ध मोलाचा पल्ला गाठणार
14
'धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला, मग...', अंजली दमानियांचे सरकारला दोन सवाल
15
मुंबई- लखनौ सामन्यानंतर जसप्रीत बुमराहच्या पत्नीला राग अनावर, नेमके काय घडलं?
16
LIC च्या 'या' पॉलिसीत एकदाच गुंतवणूक करा अन् दरमहा २० हजार पेन्शन मिळवा; किती गुंतवणूक करावी लागेल?
17
"काँग्रेस नेते दहशतवाद्यांना 'निर्दोष' ठरवण्याचा प्रयत्न करताहेत का?", बावनकुळे वडेट्टीवारांवर कडाडले
18
चीनला का पडतेय भारतीय कंपन्यांची गरज? 'या' कामासाठी मागताहेत मदत
19
तुम्ही होम लोन घेतलेलं असेल, तर पर्सनल लोन मिळू शकते का? जाणून घ्या
20
एकही युद्ध जिंकले नाही; मग पाकिस्तानी अधिकारी छातीवर पदके लावून का फिरतात? जाणून घ्या...

Maharashtra Election 2019 : आधी माघार कोण घेणार? युतीतील बंडखोरीचे त्रांगडे कायम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 7, 2019 11:42 IST

आज दुपारपर्यंत अर्ज मागे घेण्याची मुदत

ठळक मुद्देरविवारी दिवसभर खल

औरंगाबाद : जिल्ह्यात फुलंब्री आणि गंगापूर वगळता शिवसेना-भाजप उमेदवारांच्या विरोधात नाराज झालेल्या बंडखोरांनी शुक्रवारी उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. यातील किती बंडखोर माघार घेणार हे सोमवारी दुपारपर्यंत स्पष्ट होईल; परंतु रविवारी दिवसभर बंडखोरांच्या मागे उमेदवारांचे ‘दूत’ धावत होते.

युतीतील बंडखोरांपैकी माघार कोणत्या पक्षाच्या बंडखोराने आधी घ्यावी, यावरून दिवसभर खल झाला. रात्री उशिरापर्यंत कोणताही निर्णय न झाल्यामुळे सोमवारी पुन्हा उमेदवारांसह पक्षातील वरिष्ठ नेत्यांना बंडखोरांची खुशामत करावी लागेल. 

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातून झालेली बंडखोरी थोपविण्यात यश आल्याची चर्चा रविवारी होती; परंतु जोपर्यंत अर्ज मागे घेण्यात येत नाही, तोपर्यंत काहीही होऊ शकते. 

पैठण आणि गंगापूरमधून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या उमेदवारांविरोधात बंडखोरी झाली आहे, तर सिल्लोड मतदारसंघात भाजप पदाधिकाऱ्यांनी राजीनामे दिले. शिवाय प्रचारातूनही अंग काढून घेतले आहे. त्यामुळे तेथे शिवेसना उमेदवाराची कोंडी झाली आहे. 

औरंगाबाद पूर्व मतदारसंघातून भाजपचे उमेदवार राज्यमंत्री अतुल सावे यांच्या विरोधात शिवसेनेचे राजू वैद्य यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. 

औरंगाबाद पश्चिम मतदारसंघात भाजपचे बाळासाहेब गायकवाड, राजू शिंदे यांनी शिवसेना उमेदवार आ. संजय शिरसाट यांच्या विरोधात अर्ज दाखल केला आहे. 

औरंगाबाद मध्य मतदारसंघात भाजपचे किशनचंद तनवाणी यांनी शिवसेना आ. प्रदीप जैस्वाल यांच्या विरोधात अर्ज दाखल केला आहे. 

वैजापूर मतदारसंघात शिवसेनेचे उमेदवार रमेश बोरनारे यांच्या विरोधात भाजपचे एकनाथ जाधव, दिनेश परदेशी यांनी बंडखोरी करीत अर्ज भरला       आहे. 

कन्नड मतदारसंघात भाजपचे संजय गव्हाणे यांनी शिवसेना उमेदवार उदय राजपूत यांच्या विरोधात बंडखोरी केली आहे. 

उमेदवार होते चिंतितबंडखोरांना थोपविण्यात दिवसभर यश आले नाही. मात्र, रात्री उशिरानंतर काही पर्यायांवर चर्चा करून बंडखोरांना थोपविण्यासाठी उमेदवारांनी तयारी केली होती. दिवसभर युतीचे उमेदवार चिंतित दिसत होते. बंडखोर माघार घेतील, असा दावा युतीतील उमेदवारांनी केला. पक्षप्रमुख, प्रदेशाध्यक्षांकडून आदेश आल्यानंतर किंवा एखादे लाभाचे पद देण्याच्या आश्वासनावर बंडखोर माघार घेतील, असा विश्वास उमेदवारांना आहे. 

दरम्यान, वैद्य, तनवाणी, शिंदे, गायकवाड, परदेशी यांनी उमेदवारी मागे घेण्याबाबत रविवारी काही निर्णय घेतला नाही. तनवाणी दिवसभर समर्थकांच्या बैठकीत होते. शिंदे यांना फुलंब्रीतून माघार घेण्यासाठी बोलावणे आले होते. दरम्यान, रमेश गायकवाड यांच्या अर्जाबाबत न्यायालयात काय सुनावणी होते, याकडे सर्वांचे लक्ष आहे. गायकवाड हे रविवारी दिवसभर भाजपमधील एका बंडखोर नातेवाईकाच्या संपर्कात होते.

टॅग्स :Maharashtra Assembly Election 2019महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019AurangabadऔरंगाबादBJPभाजपाcongressकाँग्रेसNCPराष्ट्रवादी काँग्रेस