शहरं
Join us  
Trending Stories
1
"वर्ष अखेरीस मेड इन इंडिया सेमीकंडक्टर बाजारात येणार, तसेच ६ जी..."; PM नरेंद्र मोदींची घोषणा
2
"मी मांसाहार खाल्लेलं माझ्या पांडुरंगाला चालतं, तुम्हाला काय प्रॉब्लेम..?"; सुप्रिया सुळेंच्या विधानानं नवा वाद
3
वन नेशन, वन इलेक्शन...! भाजपानं रणनीतीत केला बदल; विरोधकांना शह देण्यासाठी नवा 'मेगा प्लॅन'
4
दीड वर्षाच्या मुलाला मिठीत घेऊन BSF जवानानं मारली गंगा नदीत उडी; कारण ऐकून डोळ्यात पाणी येईल
5
अमेरिकन नागरिकांना १३० कोटींना गंडा घातला, ईडीने बनावट कॉल सेंटरचा पर्दाफाश केला; ८ आलिशान कार जप्त
6
सुरतमधून आणलं अन् मुंबईत हत्या; ट्रेनच्या टॉयलेटमध्ये सापडलेल्या पाच वर्षाच्या मुलाला मावशीच्या मुलानेच...
7
रोनाल्डोनं रचला नवा इतिहास! अशी कामगिरी करणारा फुटबॉल जगतातील ठरला पहिला खेळाडू
8
लग्नस्थळ पाहायला गेलेल्या पित्यासह दोघांचा बुडून मृत्यू; पिंपळनेरजवळ अपघात, कार कॅनॉलमध्ये उलटली
9
Video: थैलीत नवजात बाळाचा मृतदेह; बाप जिल्हाधिकाऱ्यांसमोर ढसा ढसा रडला; म्हणाला, 'डॉक्टरांनी...'
10
"बंद दाराआड जे घडलं ते...." श्रेयस अय्यरसंदर्भात एबी डिव्हिलियर्सनं मांडलं रोखठोक मत
11
भोग भोगावे लागतील, शेतकऱ्यांनी नुकसानीची सवय करून घ्यावी; भाजपा नेते पाशा पटेलांचा अजब सल्ला
12
पतीने केली मृत्यूची भविष्यवाणी, पत्नीनं खरी करून दाखवली; साडीच्या पदरानं गळा दाबून मारलं, मग...
13
नोटांचा ढीग, 12 कोटी कॅश, किलोमध्ये सोनं-चांदी, मर्सिडीज कार अन्...! ईडीच्या छाप्यात सापडलं घबाड; काँग्रेसच्या आमदाराला अटक
14
आधी बेदम मारहाण केली, मग बेशुद्ध पडल्यानंतर जिवंत जाळली; निक्कीच्या मृत्यूनंतर बहिणीचा आक्रोश
15
'माझ्याकडे मरण्याशिवाय काही पर्याय नाहीये'; उत्तराखंडच्या माजी मुख्यमंत्र्याच्या भाच्याचा व्हिडीओ व्हायरल
16
Duleep Trophy : सिराज-KL राहुलला संघात घ्या! BCCI नं जोर लावला; पण सिलेक्टर्संचा साफ नकार, कारण...
17
Tech: फोनमध्ये कॉल आणि डायलर सेटिंग अचानक बदलण्यामागे नेमके काय कारण? बदल शक्य आहे का?
18
Viral Video: भटक्या कुत्र्यांना खायला दिलं म्हणून महिलेला भररस्त्यात मारहाण; एका व्यक्तीला अटक
19
वर्धा: पत्नी माधुरीची हत्या करून घराशेजारच्या खड्ड्यात पुरला मृतदेह, पण, सुभाषची एक चुक अन् पोलिसांनी ठोकल्या बेड्या
20
इथं हिटमॅन रोहित लॅम्बोर्गिनीतून फिरतोय; तिकडं क्रिकेटच्या पंढरीत किंग कोहली प्रॅक्टिसमध्ये मग्न

Maharashtra Election 2019 : आधी माघार कोण घेणार? युतीतील बंडखोरीचे त्रांगडे कायम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 7, 2019 11:42 IST

आज दुपारपर्यंत अर्ज मागे घेण्याची मुदत

ठळक मुद्देरविवारी दिवसभर खल

औरंगाबाद : जिल्ह्यात फुलंब्री आणि गंगापूर वगळता शिवसेना-भाजप उमेदवारांच्या विरोधात नाराज झालेल्या बंडखोरांनी शुक्रवारी उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. यातील किती बंडखोर माघार घेणार हे सोमवारी दुपारपर्यंत स्पष्ट होईल; परंतु रविवारी दिवसभर बंडखोरांच्या मागे उमेदवारांचे ‘दूत’ धावत होते.

युतीतील बंडखोरांपैकी माघार कोणत्या पक्षाच्या बंडखोराने आधी घ्यावी, यावरून दिवसभर खल झाला. रात्री उशिरापर्यंत कोणताही निर्णय न झाल्यामुळे सोमवारी पुन्हा उमेदवारांसह पक्षातील वरिष्ठ नेत्यांना बंडखोरांची खुशामत करावी लागेल. 

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातून झालेली बंडखोरी थोपविण्यात यश आल्याची चर्चा रविवारी होती; परंतु जोपर्यंत अर्ज मागे घेण्यात येत नाही, तोपर्यंत काहीही होऊ शकते. 

पैठण आणि गंगापूरमधून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या उमेदवारांविरोधात बंडखोरी झाली आहे, तर सिल्लोड मतदारसंघात भाजप पदाधिकाऱ्यांनी राजीनामे दिले. शिवाय प्रचारातूनही अंग काढून घेतले आहे. त्यामुळे तेथे शिवेसना उमेदवाराची कोंडी झाली आहे. 

औरंगाबाद पूर्व मतदारसंघातून भाजपचे उमेदवार राज्यमंत्री अतुल सावे यांच्या विरोधात शिवसेनेचे राजू वैद्य यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. 

औरंगाबाद पश्चिम मतदारसंघात भाजपचे बाळासाहेब गायकवाड, राजू शिंदे यांनी शिवसेना उमेदवार आ. संजय शिरसाट यांच्या विरोधात अर्ज दाखल केला आहे. 

औरंगाबाद मध्य मतदारसंघात भाजपचे किशनचंद तनवाणी यांनी शिवसेना आ. प्रदीप जैस्वाल यांच्या विरोधात अर्ज दाखल केला आहे. 

वैजापूर मतदारसंघात शिवसेनेचे उमेदवार रमेश बोरनारे यांच्या विरोधात भाजपचे एकनाथ जाधव, दिनेश परदेशी यांनी बंडखोरी करीत अर्ज भरला       आहे. 

कन्नड मतदारसंघात भाजपचे संजय गव्हाणे यांनी शिवसेना उमेदवार उदय राजपूत यांच्या विरोधात बंडखोरी केली आहे. 

उमेदवार होते चिंतितबंडखोरांना थोपविण्यात दिवसभर यश आले नाही. मात्र, रात्री उशिरानंतर काही पर्यायांवर चर्चा करून बंडखोरांना थोपविण्यासाठी उमेदवारांनी तयारी केली होती. दिवसभर युतीचे उमेदवार चिंतित दिसत होते. बंडखोर माघार घेतील, असा दावा युतीतील उमेदवारांनी केला. पक्षप्रमुख, प्रदेशाध्यक्षांकडून आदेश आल्यानंतर किंवा एखादे लाभाचे पद देण्याच्या आश्वासनावर बंडखोर माघार घेतील, असा विश्वास उमेदवारांना आहे. 

दरम्यान, वैद्य, तनवाणी, शिंदे, गायकवाड, परदेशी यांनी उमेदवारी मागे घेण्याबाबत रविवारी काही निर्णय घेतला नाही. तनवाणी दिवसभर समर्थकांच्या बैठकीत होते. शिंदे यांना फुलंब्रीतून माघार घेण्यासाठी बोलावणे आले होते. दरम्यान, रमेश गायकवाड यांच्या अर्जाबाबत न्यायालयात काय सुनावणी होते, याकडे सर्वांचे लक्ष आहे. गायकवाड हे रविवारी दिवसभर भाजपमधील एका बंडखोर नातेवाईकाच्या संपर्कात होते.

टॅग्स :Maharashtra Assembly Election 2019महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019AurangabadऔरंगाबादBJPभाजपाcongressकाँग्रेसNCPराष्ट्रवादी काँग्रेस