शहरं
Join us  
Trending Stories
1
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
2
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
3
मनसेकडून प्रतिसभागृह, आदित्य ठाकरेंना निमंत्रण; भाजपा नाराज, सहभागी होण्यास नकार
4
काळजी घ्या! कारमध्ये ठेवलेल्या बाटलीमुळे आग लागू शकते; कारणे जाणून घ्या
5
सोड्याचीच 'हवा', पेप्सी-कोला 'फुस्स'! तब्बल १५०० कोटींची सोडा विक्री, 'या' ब्रँडने बाजी मारली!
6
बदलापूर रेल्वे स्थानकातून येऊ शकते चेंगराचेंगरीची बातमी; 'हा' व्हिडीओ बघून काळजात होईल धस्स!
7
दिल्ली-मुंबई महामार्गावर थरकाप उडवणारा अपघात; स्वच्छता कर्मचाऱ्यांना चिरडले, ६ ठार, ५ गंभीर जखमी
8
Chaitra Amavasya 2025: चैत्र अमावस्येपासून दर अमावास्येला सुरू करा अग्निहोत्र; होतील अपार लाभ!
9
देशातील पहिला टेस्ला सायबर ट्रक गुजरातमध्ये पोहोचला, सुरतच्या हीरा व्यापाऱ्याची मोठी खरेदी, कोण आहे ती व्यक्ती?
10
“...तर भेटी घेण्यात काही गैर नाही”; शिंदेसेनेत प्रवेशाच्या चर्चा, चंद्रहार पाटील थेट बोलले
11
आयपीएलचा अर्धा हंगाम संपला, प्लेऑफसह ऑरेंज आणि पर्पल कॅपची शर्यतही झाली रंगतादार, कोण आघाडीवर? वाचा  
12
Gensol विरोधात इरेडानं दाखल केली तक्रार; दोन्ही कंपन्यांच्या शेअर्समध्ये भूकंप, तुमच्याकडे आहे का?
13
महाराष्ट्रातले पोलीस अकार्यक्षम; शिंदेसेनेच्या आमदाराचा महायुती सरकारलाच घरचा आहेर
14
“चिमुकल्यांना हृदयरोग, १ कोटी खर्च, भारतात उपचार घेऊ द्या”; पाकमधील पालकांचे सरकारला साकडे
15
एकीकडे युद्धाचे सावट, त्यात पाकिस्तानमधील लाहोर विमानतळावर भीषण आग, उड्डाणं रद्द, प्रवासी अडकले
16
ती माझी मैत्रीण! दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेल्या विनय नरवाल यांच्या पत्नीबाबत एल्विश यादवचा खुलासा, म्हणाला- "तो फोटो पाहिल्यानंतर..."
17
अमेरिकेच्या बाजारात विकणार केवळ मेड इन इंडिया आयफोन; चीनला जोरदार झटका
18
कधीही, कुठेही, मोहिमेसाठी तयार! भारतीय नौदलाचा पाकिस्तानला संदेश
19
"जर सिंधु नदीचं पाणी रोखलं तर...": पाकिस्तानी PM शहबाज शरीफ यांची भारताला पोकळ धमकी
20
Vastu Shastra: वास्तुशास्त्रानुसार तव्यावरच्या पहिल्या पोळीवर हक्क कुणाचा? वाचा आणि कृती करा!

कार्यकुशलतेच्या जोरावर राष्ट्रीय राजकारणात छाप पाडणारा नेता : खा. राजीव सातव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 17, 2021 04:28 IST

हिंगोली : जिल्ह्याने पंचायत समिती सदस्यत्वापासून खासदारकीपर्यंत झेप घेतलेला व काँग्रेससारख्या राजकारणात महासागर मानल्या जाणाऱ्या पक्षात युवक काँग्रेसचे राष्ट्रीय ...

हिंगोली : जिल्ह्याने पंचायत समिती सदस्यत्वापासून खासदारकीपर्यंत झेप घेतलेला व काँग्रेससारख्या राजकारणात महासागर मानल्या जाणाऱ्या पक्षात युवक काँग्रेसचे राष्ट्रीय स्तरावर नेतृत्व करून छाप सोडणारा नेता आज गमावला आहे. सातव यांनी सोनिया गांधी, राहुल गांधी यांच्याशी बाळगलेल्या एकनिष्ठता व संघटन कौशल्यामुळे त्यांना पंजाब, गुजराथ, दीव व दमण या राज्याचे प्रभारी म्हणून काम करण्याची संधी मिळाली. त्यात त्यांनी पक्षाच्या कामगिरीचा आलेखही उंचावला.

खा. राजीव सातव हे मूळचे कळमनुरी तालुक्यातील मसोड या गावचे. त्यांच्या मातोश्री रजनीताई सातव या कळमनुरीच्या आमदार, विधान परिषदेवर तसेच मंत्री म्हणूनही राज्याच्या मंत्रिमंडळात राहिल्या. त्यांनीच राजकारणाचे बाळकडू राजीव यांना दिले. मात्र तरीही पंचायत समितीपासून त्यांनी आपल्या राजकीय कारकीर्दीला सुरुवात केली. २००२ मध्ये ते पहिल्यांदा पंचायत समितीवर निवडून आले. पाच वर्षे तेथे काम केल्यावर त्यांनी २००७ मध्ये जि.प.ची निवडणूक खरवड सर्कलमधून जिंकली. त्यावेळी ते कृषी सभापती झाले.

युवक काँग्रसचे प्रदेशाध्यक्षपद

जि.प.चे कृषी सभापती असतानाच त्यांना युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्षपद मिळाले. थेट राहुल गांधी यांनीच त्यांची मुलाखत घेतली होती. त्यावेळी त्यांना राहुल गांधी यांनी तुम्हाला आवडणारा नेता कोण? असा प्रश्न केला असता राष्ट्रवादीचे नेते शरद पवार यांचे नाव त्यांनी सांगितले. पक्षनेता म्हणून नाव न घेता जे खरेच मनातून आले ते त्यांनी सांगितले. यातून सातव यांचे वेगळेपण गांधी यांनी हेरले. ते प्रदेशाध्यक्ष झाले.

२००९ मध्ये विधानसभेला गवसणी

राजीव सातव यांनी जि.प.च्या कृषी सभापतीपदी विराजमान असतानाच विधानसभेची तयारी चालविली होती. सलग दोनदा विधानसभेवर गेलेल्या गजानन घुगे यांना मात देत त्यांनी २००९ मध्ये कळमनुरी विधानसभेवर मोठ्या मताधिक्याने विजय मिळविला. त्यावेळी राहुल गांधी स्वत: त्यांच्या प्रचाराला कळमनुरीत आले होते. आमदार झाल्यावर त्यांना पक्षाने युवक काँग्रेसच्या राष्ट्रीय अध्यक्ष पदाची जबाबदारी दिली. त्यामुळे राहुल गांधी यांच्याशी त्यांची अधिकच जवळीकता निर्माण झाली. त्यांना राष्ट्रीय राजकारणाचे वेध लागले होते. राहुल गांधी यांच्या अत्यंत जवळ असतानाही त्यांनी राज्याच्या राजकारणात आमदार असूनही पदाची अपेक्षा न ठेवता काम केले.

मोदी लाटेतही २०१४ ला खासदार

२०१४ मध्ये देशात मोदी लाट आली. या लाटेतही महाराष्ट्रातून दोनच खासदार निवडून आले. त्यात अशोकराव चव्हाण हे तर माजी मुख्यमंत्री होते. मात्र दुसरा चेहरा होता, तो खा. राजीव सातव यांचा. त्यामुळे पक्षामध्ये त्यांचे वजन आणखीच वाढले. सामान्यांशी असलेली नाळ व कार्यकर्त्यांच्या खांद्यावर हात ठेवून त्यांच्याशी अगदी आपुलकीने संवाद साधून ते मन जिंकायचे. अगदी कौटुंबिक सदस्यासारखा त्यांचा हा सहवास असायचा.

चारवेळा संसदरत्न पुरस्कार

राजीव सातव यांनी लोकसभेत ८१ टक्के उपस्थिती अन् १०७५ प्रश्‍न विचारून आपल्या अभ्यासूवृत्तीची छाप त्यांनी पाडली होती. पाच वर्षांच्या काळात त्यांना चार वेळेस संसदरत्न पुरस्कार मिळाला होता. याशिवाय राज्यसभेत त्यांनी अर्थसंकल्पावर विश्‍लेषणात्मक भाषणदेखील केले होते. शेतकरी, शेतमजुरांचे प्रश्न, शैक्षणिक विषयावरील प्रश्न ते पोटतिडकीने मांडायचे. याशिवाय त्यांना लोकमतच्या महाराष्ट्रीयन ऑफ दी इयर २०१६ हा पुरस्कारही मिळाला.

सातव यांनी आतापर्यंत भूषविलेली पदे

मसोड पंचायत समिती गणाचे सदस्य, हिंगोली जिल्हा परिषद सदस्य, कळमनुरी विधानसभा आमदार, युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष, अखिल भारतीय युवक काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष, हिंगोली लोकसभेचे खासदार, राज्यसभा सदस्य, प्रभारी पंजाब, गुजरात, दीव व दमण काँग्रेस.

प्रभारी म्हणूनही उमटविला ठसा

सातव यांनी एनडीएमध्ये मुलींना प्रवेश द्यावा, ही अग्रही मागणी लोकसभेत मांडली होती. त्यांच्या मागणीला यशही आले होते. शिवाय, गुजरात, पंजाब या राज्यांच्या निवडणुकांमध्ये त्यांनी काँग्रेस उमेदवारांचा प्रचार केला. यात, गुजरात विधानसभा निवडणुकीत सौराष्ट्राची जबाबदारी अंगावर घेऊन सर्वात जास्त २८ उमेदवार विजयी करण्यात त्यांचा सिंहाचा वाटा होता. पंजाबमध्येही सत्तेच्या सोपानापर्यंत पक्षाला घेऊन जाण्यात त्यांचा सिंहाचा वाटा आहे.

जिल्ह्याच्या विकासावरही होते लक्ष

देश पातळीवर राजकारण करताना त्यांचे जिल्ह्याच्या विकासाकडेही लक्ष होते. आदिवासी विकास प्रकल्प, जिल्हा रुग्णालय, उपजिल्हा रुग्णालय कळमनुरी, सशस्त्र सीमा बल कळमनुरी हे त्यांच्या प्रयत्नांचे फळ आहे. शिवाय देशातील एकमेव मोठा प्रकल्प असलेला औंढा तालुक्यातील लिगोचा प्रकल्प होण्यासाठी पंतप्रधान मनमोहनसिंग यांच्याकडे पाठपुरावा त्यांनीच केला होता. त्याला हिरवी झेंडी मिळाली होती. त्यावेळी ते खासदार नव्हते. ते खासदार झाल्यानंतर देशात सत्तापालट झाला असताना या प्रकल्पाला मंजुरी मिळाली. इतरही शेकडो विकास कामांमध्ये त्यांचा मोठा वाटा आहे.

शैक्षणिक क्षेत्रात कामगिरी

कळमनुरीसारख्या मागसलेल्या तालुक्यात विद्यार्थ्यांना शिक्षणाचे दरवाजे खुले करण्यासाठी त्यांनी प्रियदर्शनी सेवा संस्थेच्या माध्यमातून शंकरराव सातव महाविद्यालय सुरू केले. या शिवाय डीएड, बीएड अभ्यासक्रम देखील सुरू केले. मागील काही दिवसांत हिंगोलीत वैद्यकीय महाविद्यालय स्थापन व्हावे यासाठी त्यांनी प्रयत्न करत होते. त्यानुसार राज्य शासनाने हालचाली सुरू केल्या.

कौटुंबिक पार्श्वभूमी

राजीव सातव यांच्या आई रजनी सातव माजी मंत्री राहिल्या आहेत. आईशिवाय कुटुंबात पत्नी डॉ. प्रज्ञा सातव, मुलगा पुष्कराज सातव, मुलगी युवराज्ञी सातव आहेत. राजकारणामुळे त्यांना आपल्या कुटुंबाला जास्त वेळ देता आला नाही; पण कुटुंबानेही याबाबत कधीच खंत बोलून दाखवली नाही. मागील काही दिवसांपासून प्रियदर्शनी सेवा संस्थेचा कारभार रजनीताई व डॉ. प्रज्ञा सातव पाहत आहेत. याशिवाय स्थानिक कार्यकर्त्यांना त्यांचा मोठा आधार आहे.