शहरं
Join us  
Trending Stories
1
बिहारचे माजी उपमुख्यमंत्री सुशील कुमार मोदी यांचे निधन, ७२ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
2
...तर राष्ट्रवादी आणि शिवसेना पक्ष फुटलेच नसते, अमित शाहांचा दावा 
3
"भाजपा 400 चा आकडा पार करू शकणार नाही...", निवडणूक निकालांबाबत ममता बॅनर्जीं केली मोठी भविष्यवाणी
4
"पंतप्रधान मोदी यांच्याशी चर्चा करण्यासाठी समोरची व्यक्ती त्या बरोबरीची असायला हवी"
5
Ghatkopar Hoarding Collapse Update: ८ जणांचा मृत्यू, ६६ जखमी; मृतांच्या नातेवाईकांना ५ लाखांची मदत जाहीर, मुख्यमंत्री Eknath Shinde यांची घोषणा
6
WhatsApp चा मोठा प्लॅन, स्क्रीनशॉट फीचर ब्लॉक होणार!
7
भारताचा इराणसोबत मोठा करार; चीन आणि पाकिस्तानला बसणार मोठा झटका
8
मिलॉर्ड... या दोन मुद्द्यांवर चूक झाली...; EVM-VVPAT प्रकरण पुन्हा सर्वोच्च न्यायालयात
9
KKR vs GT सामन्याचा फैसला झाला! प्ले ऑफच्या शर्यतीतून बाद होणारा तिसरा संघ मिळाला
10
सुप्रिया सुळे पक्षाला फार पुढे नेऊ शकत नसल्याची जाणीव झाल्यानेच शरद पवारांनी...; अमित शाह स्पष्टच बोलले
11
बारामतीत EVM मशिन्स ठेवलेल्या स्ट्राँगरुमशी छेडछाड? आरोपानंतर अधिकाऱ्यांकडून आले स्पष्टीकरण
12
मुंबईतील भीषण दुर्घटनेनंतर सीएम-डीसीएम 'ॲक्शन मोड'वर; उच्चस्तरीय चौकशीचे आदेश!
13
बापरे! मुंबईत पेट्रोल पंपावर कोसळलेल्या महाकाय होर्डिंगखाली अडकली ८० वाहने; ३५ जण जखमी
14
नेहरूंच्या चुकांसाठी काँग्रेस मोदींना जबाबदार धरतेय, चीनच्या मुद्द्यावरून जयशंकर यांचा टोला
15
'आप'कडून स्टार प्रचारकांची यादी जाहीर, तुरुंगात असलेल्या मनीष सिसोदियासह ४० जणांची नावे
16
मुंबईतील 'तो' महाकाय लोखंडी सांगाडा बेकायदेशीर; २ दिवसांपूर्वीच दिली होती होर्डिंग हटवण्याची नोटीस
17
CSK चा सामना करण्यापूर्वी RCB ची ताकद कमी झाली! दोन तगड्या खेळाडूंनी माघार घेतली 
18
तेजप्रताप यादवांचा संयम सुटला, आरजेडी कार्यकर्त्याला मंचावरून ढकलले
19
पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या मुंबईतील प्रचार सभेबद्दल सुनील तटकरे म्हणाले- "आता ती जबाबदारी..."
20
25 वर्षांचा रेकॉर्ड मोडला; कलम 370 हटवल्यानंतर पहिल्यांदाच श्रीनगरमध्ये सर्वाधिक मतदान...

हिंगोलीहून मुंबई गाठणे होणार सोयीचे; ‘जनशताब्दी’ला उद्या हिरवा झेंडा, जाणून घ्या वेळापत्रक

By रमेश वाबळे | Published: March 08, 2024 7:22 PM

हिंगोली- पूर्णा मार्गे मुंबईसाठी रेल्वेगाडीची मागणी मागील अनेक वर्षांपासून करण्यात येत होती.

हिंगोली : हिंगोली ते मुंबई जनशताब्दी एक्स्प्रेस रेल्वेगाडी शुभारंभाचा ७ मार्चचा मुहूर्त टळल्यानंतर आता ९ मार्च रोजी दुपारी ३ वाजता रेल्वे, कोळसा आणि खाण राज्यमंत्री रावसाहेब दानवे हिंगोली रेल्वेस्थानकावर हिरवा झेंडा दाखविणार आहेत. या अनुषंगाने रेल्वे प्रशासनाच्या वतीने तयारी करण्यात आली  आहे.

हिंगोली- पूर्णा मार्गे मुंबईसाठी रेल्वेगाडीची मागणी मागील अनेक वर्षांपासून करण्यात येत होती. त्यासाठी अनेक वेळा आंदोलनही करण्यात आली. तसेच रेल्वे राज्यमंत्र्यांसह केंद्रस्तरावर ही प्रयत्न झाले. अखेर या मागणीला यश आले असून, जनशताब्दीच्या हिंगोली पर्यंतच्या विस्ताराला रेल्वे विभागाने मंजुरी दिली. यामुळे हिंगोलीकरांना आता मुंबई सोयीचे होणार आहे. जनशताब्दी एक्स्प्रेस शुभारंभाचा मुहूर्त ७ मार्च रोजी ठेवण्यात आला होता. मात्र, हा मुहूर्त टळला. आता ९ मार्च रोजी दुपारी ३ वाजता रेल्वे, कोळसा व खाण राज्यमंत्री रावसाहेब दानवे या रेल्वेला हिरवा झेंडा दाखविणार आहेत. यावेळी पालकमंत्री अब्दुल सत्तार, खा. हेमंत पाटील, आ. तान्हाजी मुटकुळे, आ. संतोष बांगर, आ. चंद्रकांत नवघरे, आ. प्रज्ञाताई सातव आदींची उपस्थिती राहणार आहे. ही रेल्वे हिंगोली रेल्वे स्थानकाहून वसमत, पूर्णा, परभणी, जालना, छत्रपती संभाजीनगर मार्गे मुंबईच्या दिशेने धावणार आहे. जनशताब्दी एक्स्प्रेसला एकूण २२ बोगी असून त्यामध्ये १९ बोगी जनरल राहणार आहेत तर एक वातानुकूलित राहणार असल्याची माहिती रेल्वे विभागाने दिली.

१० मार्चपासून नियमित वेळापत्रकानुसार धावणार ‘जनशताब्दी’..जनशताब्दी एक्स्प्रेसचा विस्तार करण्यात आल्याने हिंगोलीकरांना दिलासा मिळाला असून, मुंबई गाठणे आता सोयीचे झाले आहे. ९ मार्च रोजी शुभारंभानंतर १० मार्चपासून ही एक्स्प्रेस रेल्वेगाडी नियमित वेळापत्रकानुसार धावणार आहे. हिंगोली रेल्वे स्थानकाहून पहाटे ४:२० वाजता निघणार असून, सकाळी ९ वाजता जालना येथे पोहोचणार आहे. तर दुपारी ४:५० वाजता सीएसटीएम (मुंबई) येथे पोहोचणार आहे. तर परतीच्या प्रवासात ही रेल्वे सीएसटीएम (मुंबई) येथून दुपारी १२:१० वाजता सुटणार असून, रात्री ७:५० वाजता ती जालना येथे पोहोचणार आहे. तर रात्री १२:३० वाजता हिंगोली रेल्वेस्थानकावर येणार आहे.

डिझेलवरच धावणार ‘जनशताब्दी एक्स्प्रेस’...रेल्वे विभागाच्या वतीने बहुतांश लोहमार्गाचे विद्युतीकरण करण्यात आले आहे. हिंगोली ते पूर्णा सिग्नलपर्यंत हे काम पूर्ण झाले असून, काही काम शिल्लक आहे. त्यामुळे शनिवारपासून सुरू होणारी जनशताब्दी एक्स्प्रेस ही पूर्णापर्यंत डिझेलच्या इंजिनवर धावेल आणि पूर्णापासून पुढे विजेवर चालणारे इंजिन जोडण्यात येईल, अशी शक्यता होती. मात्र, रेल्वे विभागाने दिलेल्या माहितीनुसार सध्यातरी हिंगोली ते मुंबई दरम्यान ही रेल्वेगाडी डिझेलवरील इंजिनवरच धावणार आहे. पूर्णा जवळील विद्युतीकरणाचे काम पूर्ण झाल्यानंतर जनशताब्दी रेल्वे विजेवर चालणाऱ्या इंजिनवर धावण्याची शक्यता आहे.

टॅग्स :Railway Passengerरेल्वे प्रवासीHingoliहिंगोलीMumbaiमुंबईAurangabadऔरंगाबादrailwayरेल्वे