शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रीनगरमध्ये जप्त केलेल्या स्फोटकांचा स्फोट, ९ जणांचा मृत्यू; दिल्ली कनेक्शनच्या चौकशीदरम्यान ब्लास्ट
2
जप्त केलेली ३५० किलो स्फोटके कशी फुटली? स्टेशन बाहेरच्या 'त्या' कारवर संशय, अवयव ३०० फूटांवर फेकले गेले
3
“बिहारच्या निकालाचे श्रेय निवडणूक आयोग अन् मतचोरी, SIR मुळे NDAचा विजय”: हर्षवर्धन सपकाळ
4
आयसीएल फिनकॉर्पचा नवीन एनसीडी इश्यू १७ नोव्हेंबर २०२५ रोजी खुला होणार, १२.६२% पर्यंत परताव्याचा दावा
5
भाजप बनला सर्वांत मोठा पक्ष, तरी नितीश कुमार दहाव्यांदा मुख्यमंत्री? डावलणे अशक्य, हे आहे कारण
6
पैसा दुप्पट करण्याची मशीन बनली पोस्टाची ‘ही’ स्कीम; केवळ ₹१००० पासून सुरू करू शकता गुंतवणूक
7
एनडीएच्याच गळ्यात पुन्हा विजयाचा (बि)हार; अब की बार... २०० पार; महाआघाडीचा फ्लाॅप शो; भाजप प्रथमच नंबर १
8
लग्नाच्या वाढदिवशीच घरी लक्ष्मी आली! राजकुमार राव आणि पत्रलेखा झाले आईबाबा
9
'फर्स्ट पास्ट द पोस्ट'चा धक्का; राजदच्या मतांची टक्केवारी भाजपपेक्षा अधिक; पण पराभूत
10
आजचे राशीभविष्य,१५ नोव्हेंबर २०२५: मित्रांसाठी खर्च करावा लागण्याची शक्यता; शक्यतो आज बौद्धिक चर्चा टाळा
11
पाच मुद्द्यांमधून जाणून घ्या एनडीएचा विजय आणि महाआघाडीच्या पराजयाची कारणे...
12
मेगाब्लॉक, जम्बोब्लॉकमुळे रेल्वेच्या तिन्ही मार्गांवर उद्या होणार प्रवास खोळंबा
13
बीबीसीने मागितली अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची माफी
14
बिहारच्या विजयाने स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांत सत्ताधारी महायुतीला बळ ! मतचोरीचे आरोप चालले नाहीत
15
मुंबईत राहून मिळत आहे माथेरानच्या थंडीचा आनंद, पारा १८ अंशांवर; तापमान १६ अंशांवर उतरणार?
16
बिहारप्रमाणे पश्चिम बंगालमधील ‘जंगलराज’ हटवणारच, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केला निर्धार
17
लोका सांगे ब्रह्मज्ञान, स्वतः कोरडे पाषाण; प्रशांत किशोर यांच्या ‘जन सुराज’ला भोपळा
18
ऑफलाइनही भरता येणार उमेदवारी अर्ज
19
डाळी, भाज्या, इंधनामुळे येऊ लागले स्वस्ताईचे दिवस, घाऊक महागाई घटून उणे १.२१ टक्क्यावर; २७ महिन्यांचा गाठला नीचांक
20
दुर्बल लोकांविरुद्ध गुन्हा करणाऱ्यांना दया नाही, विशेष पॉक्सो न्यायालयाने सुनावले; तरुणाला १० वर्षांची शिक्षा
Daily Top 2Weekly Top 5

हिंगोली आगाराला मालवाहतुकीतून ५१८९० हजारांचे उत्पन्न

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 7, 2021 04:31 IST

गत दीड-दोन महिन्यांपासून कोरोनाने कहर माजविला आहे. रुग्णांनी दोनअंकी संख्या केव्हाच पार केली आहे. हे पाहून शासनाने २५ एप्रिलपासून ...

गत दीड-दोन महिन्यांपासून कोरोनाने कहर माजविला आहे. रुग्णांनी दोनअंकी संख्या केव्हाच पार केली आहे. हे पाहून शासनाने २५ एप्रिलपासून संचारबंदी लागू आहे. त्यामुळे जिल्हा प्रशासनाच्या आदेशान्वये प्रवासी वाहतूक बंद करण्यात आली आहे. २५ एप्रिलपासून आजपर्यत हिंगोली आगाराची एकही प्रवासी बस बाहेर सोडण्यात आली नाही. तसेच पर जिल्ह्यातीलही बसेस आगारात आलेल्या नाहीत. आजमितीस सर्व प्रवासी बसेस आगारात उभ्या केल्या आहेत. शासनाच्या आदेशानुसार २५ कर्मचारी सद्य:स्थितीत कामावर आहेत. ज्या कर्मचाऱ्यांना कामावर बोलाविले जाईल त्यांनीच कामावर यावे. इतरांनी मात्र बाहेर न पडता घरीच बसावे, असेही एस. टी. महामंडळाच्या वतीने सांगण्यात आले आहे. आगारातील बसेस दुरुस्तीसाठी चार ते पाच यंत्रकारागिरांनाच बोलाविण्यात येत आहे.

२६ एप्रिल रोजी हिंगोली ते परभणी मालवाहू बस सोडण्यात आली. या बसला भाड्यापोटी ३७५० उत्पन्न मिळाले. या बसमध्ये सरकीची वाहतूक करण्यात आली. २९ एप्रिल रोजी हिंगोली ते नांदेड (हळद वाहतूक, भाडे ४२५०), ३० एप्रिल रोजी हिंगोली ते अर्धापूर (हळद वाहतूक, भाडे ४१५०), १ मे रोजी हिंगोली ते बीड (अंगणवाडीचा खाऊ, भाडे ८३९०), २ मे रोजी हिंगोली ते नांदेड (हळद वाहतूक, भाडे ४१५०), हिंगोली ते नांदेड (हळद वाहतूक, भाडे ४१५०), ३ मे रोजी हिंगोली ते नांदेड (हळद वाहतूक, भाडे ४१५०), हिंगोली ते अकोला (हरभरा वाहतूक, भाडे ५५००), ५ मे रोजी हिंगोली ते नांदेड (हळद वाहतूक, भाडे ४१५०), ६ मे रोजी हिंगोली ते परभणी (सरकी ढेप, भाडे ३७५०), हिंगोली ते अकोला (हळद वाहतूक, भाडे ५५००) असे एकूण ५१ हजार ८९० रुपयांचे उत्पन्न महामंडळास मिळाले.

मास्क घालूनच कामावर यावेजिल्ह्यात कोरोना महामारीचे रुग्ण दिवसेंदिवस वाढतच आहेत. हे पाहून सर्व कर्मचाऱ्यांना मास्क घालणे बंधनकारक केले आहे. तशा सूचनाही दिल्या आहेत. आजमितीस सुचनेनुसार कर्मचारीही कमी संख्येने कर्तव्यावर आहेत. विशेष म्हणजे माल वाहतूक करणाऱ्या चालकालाही मास्क घालण्याची सूचनाही केली आहे. जिल्हा प्रशासनाने घालून दिलेल्या नियमांचे काटेकोरपणे पालन केले जात आहे. प्रशासनाने आदेश दिला तरच प्रवासी बसेस सुरु होतील. आजतरी मालवाहतूक बसेस तेवढ्या सुरु आहेत.

-प्रल्हादराव बरडे, वाहतूक निरीक्षक, हिंगोली आगार