शहरं
Join us  
Trending Stories
1
मी २०२९ सालापर्यंत महाराष्ट्रातच राहणार; दिल्लीला जाण्याची शक्यता फडणवीस यांनी फेटाळली!
2
पाकिस्तानी लष्करानेच केली होती शस्त्रसंधीसाठी विनंती; भारताने सुनावले खडेबोल!
3
तामिळनाडूत अभिनेता विजय यांच्या सभेत चेंगराचेंगरी; ३६ जणांचा मृत्यू!
4
लेह हिंसाचार प्रकरण: वांगचूक जोधपूर तुरुंगात; पोलिसांकडून कसून चौकशी
5
आज पुन्हा युद्ध; आशिया चषक फायनलमध्ये भारत-पाक भिडणार!
6
टिकटॉक अमेरिकेत सुरूच राहणार, काय झाली डील?
7
आधीच पुराने बेजार, त्यात आज पुन्हा 'मुसळधार'; मुंबई, ठाण्यात रेड अलर्ट
8
‘फुलराणी’ म्हणते, सध्या मी खेळणंच सोडून दिलंय..! सायना नेहवाल नेमकं काय म्हणाली?
9
‘बीएसएनएल’ची स्वदेशी ४जी सेवा कार्यान्वित, पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते उद्घाटन; स्वयंपूर्णतेकडे वाटचाल
10
अमेरिकेत १६ राज्यांचे ट्रम्प प्रशासनाविरुद्ध खटले;  लिंगाधारित अभ्यासक्र, निधी रोखण्याचा सरकारचा इशारा
11
'मी थरथर कापतोय कारण...'; चेंगराचेंगरीत ३६ जणांच्या मृत्यूनंतर अभिनेता विजयने सोडलं शहर
12
९ वर्षांच्या बेपत्ता मुलीला शोधायला लागले अन्... चेंगराचेंगरीचे कारण समोर, पाण्याच्या बाटल्या फेकत होता विजय
13
ओल्या संकटावर पुन्हा धो-धो प्रहार; मराठवाड्यात २,८८० गावांना तडाखा, विदर्भ, पश्चिम महाराष्ट्रालाही झोडपले
14
शेतकऱ्यांना मदत कधीपर्यंत मिळणार? DCM एकनाथ शिंदेंनी दिली आनंदाची बातमी; बळीराजाची दिवाळी गोड होणार!
15
'दारुल इस्लाम'वर विश्वास ठेवणाऱ्यांना आधी 'जहन्नुम'मध्ये जावे लागेल, मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचा इशारा
16
"ठाकरेंना हात जोडून विनंती की...!" उद्धव ठाकरे यांच्या शेतकऱ्यांसंदर्भातील 'त्या' विधानावर गुलाबराव पाटलांची एका वाक्यात प्रतिक्रिया
17
पनवेलकडे जात असताना बाईक बेलापूर खाडीत कोसळली; एकाचा शोध लागला, दुसरा तरुण बेपत्ता
18
Asia Cup Final 2025: भारत की पाकिस्तान, कोण जिंकणार? ग्रहांची साथ कुणाला? मोठी भविष्यवाणी...
19
प्रेरणादायी! सामान्य भाजी विक्रेत्याचे असामान्य दान; पूरग्रस्तांसाठी दिले १ लाख, माणुसकी जपली
20
तामिळनाडूत सुपरस्टार विजयच्या रॅलीत चेंगराचेंगरी, महिला आणि मुलांसह 31 जणांचा मृत्यू, अनेक जखमी 

हिंगोली आगाराला मालवाहतुकीतून ५१८९० हजारांचे उत्पन्न

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 7, 2021 04:31 IST

गत दीड-दोन महिन्यांपासून कोरोनाने कहर माजविला आहे. रुग्णांनी दोनअंकी संख्या केव्हाच पार केली आहे. हे पाहून शासनाने २५ एप्रिलपासून ...

गत दीड-दोन महिन्यांपासून कोरोनाने कहर माजविला आहे. रुग्णांनी दोनअंकी संख्या केव्हाच पार केली आहे. हे पाहून शासनाने २५ एप्रिलपासून संचारबंदी लागू आहे. त्यामुळे जिल्हा प्रशासनाच्या आदेशान्वये प्रवासी वाहतूक बंद करण्यात आली आहे. २५ एप्रिलपासून आजपर्यत हिंगोली आगाराची एकही प्रवासी बस बाहेर सोडण्यात आली नाही. तसेच पर जिल्ह्यातीलही बसेस आगारात आलेल्या नाहीत. आजमितीस सर्व प्रवासी बसेस आगारात उभ्या केल्या आहेत. शासनाच्या आदेशानुसार २५ कर्मचारी सद्य:स्थितीत कामावर आहेत. ज्या कर्मचाऱ्यांना कामावर बोलाविले जाईल त्यांनीच कामावर यावे. इतरांनी मात्र बाहेर न पडता घरीच बसावे, असेही एस. टी. महामंडळाच्या वतीने सांगण्यात आले आहे. आगारातील बसेस दुरुस्तीसाठी चार ते पाच यंत्रकारागिरांनाच बोलाविण्यात येत आहे.

२६ एप्रिल रोजी हिंगोली ते परभणी मालवाहू बस सोडण्यात आली. या बसला भाड्यापोटी ३७५० उत्पन्न मिळाले. या बसमध्ये सरकीची वाहतूक करण्यात आली. २९ एप्रिल रोजी हिंगोली ते नांदेड (हळद वाहतूक, भाडे ४२५०), ३० एप्रिल रोजी हिंगोली ते अर्धापूर (हळद वाहतूक, भाडे ४१५०), १ मे रोजी हिंगोली ते बीड (अंगणवाडीचा खाऊ, भाडे ८३९०), २ मे रोजी हिंगोली ते नांदेड (हळद वाहतूक, भाडे ४१५०), हिंगोली ते नांदेड (हळद वाहतूक, भाडे ४१५०), ३ मे रोजी हिंगोली ते नांदेड (हळद वाहतूक, भाडे ४१५०), हिंगोली ते अकोला (हरभरा वाहतूक, भाडे ५५००), ५ मे रोजी हिंगोली ते नांदेड (हळद वाहतूक, भाडे ४१५०), ६ मे रोजी हिंगोली ते परभणी (सरकी ढेप, भाडे ३७५०), हिंगोली ते अकोला (हळद वाहतूक, भाडे ५५००) असे एकूण ५१ हजार ८९० रुपयांचे उत्पन्न महामंडळास मिळाले.

मास्क घालूनच कामावर यावेजिल्ह्यात कोरोना महामारीचे रुग्ण दिवसेंदिवस वाढतच आहेत. हे पाहून सर्व कर्मचाऱ्यांना मास्क घालणे बंधनकारक केले आहे. तशा सूचनाही दिल्या आहेत. आजमितीस सुचनेनुसार कर्मचारीही कमी संख्येने कर्तव्यावर आहेत. विशेष म्हणजे माल वाहतूक करणाऱ्या चालकालाही मास्क घालण्याची सूचनाही केली आहे. जिल्हा प्रशासनाने घालून दिलेल्या नियमांचे काटेकोरपणे पालन केले जात आहे. प्रशासनाने आदेश दिला तरच प्रवासी बसेस सुरु होतील. आजतरी मालवाहतूक बसेस तेवढ्या सुरु आहेत.

-प्रल्हादराव बरडे, वाहतूक निरीक्षक, हिंगोली आगार