शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईसह उपनगराला पावसाने झोडपले! गोरेगाव, मालाडमध्ये तुफान पाऊस, अंधेरी भुयारी मार्ग बंद
2
Kalyan Building Collapses: कल्याण दुर्घटनेतील मृतांच्या नातेवाईकांसाठी राज्य सरकारची मोठी घोषणा
3
पाकिस्तानने असीम मुनीरचे केले प्रमोशन, लष्करात फील्ड मार्शल रँक किती महत्त्वाची?
4
IPL 2025 : १४ वर्षीय वैभव सूर्यंवशीची 'परिपक्व' खेळी; सिक्सर मारत साजरी केली फिफ्टी!
5
'मीर जाफर vs एक बिर्याणी देशावर भारी'; भाजप-काँग्रेसमध्ये पोस्टर वॉर! का वाढला वाद?
6
आयुष म्हात्रेनं २०० च्या स्ट्राइक रेटनं कुटल्या धावा; माफाकानं बेस्ट कॅचसह साधला विकेटचा डाव
7
सातारा: जेवणाचा डब्बाच डोक्यात मारला, प्रेमसंबंधास अडथळा ठरत असल्याने तरुणाचा खून
8
क्षुल्लक मुद्द्याला जास्त महत्व देऊ नका, हे प्रकरण इथेच थांबवा; सरन्यायाधीश गवई यांचे आवाहन
9
पाकिस्तानची पोलखोल करण्यासाठी भारताचे शिष्टमंडळ तयार; कोण कुठे जाणार? पाहा...
10
Viral Video: आधी देवाला हात जोडले, नंतर मंदिरातील दानपेटी नेली चोरून
11
पाकिस्तानी लष्करप्रमुख असीम मुनीरचे प्रमोशन; पराभूत जनरलला सरकारने बनवले 'फील्ड मार्शल'
12
छगन भुजबळांच्या मंत्रिमंडळात एन्ट्रीने नाशिकचा दबदबा, पण पालकमंत्रिपदाचा पेचही वाढला?
13
IPL 2025: आता पाऊस पडल्यानंतरही सामने रद्द होणार नाहीत, आयपीएलमध्ये नवा नियम लागू!
14
"पती नेत्यांना पुरवतो २० वर्षांच्या मुली, मला…’’, महिलेच्या आरोपांनी या राज्यातील राजकारण तापले   
15
Thane: कल्याणमध्ये चार मजली इमारतीत स्लॅब कोसळून भयंकर दुर्घटना, चार जणांचा मृत्यू 
16
ठरलं ! जगातील सर्वात मोठ्या स्टेडियमवर रंगणार IPL फायनल; या मैदानात होणार प्लेऑफ्सचे २ सामने
17
पाकिस्तानने आपल्याच नागरिकांवर केला ड्रोन हल्ला, चार मुलांचा मृत्यू
18
"सरन्यायाधीश गवई यांच्या महाराष्ट्र दौऱ्यात प्रोटोकॉलचा भंग करणाऱ्यांवर करावाई करा’’, काँग्रेसचं राष्ट्रपतींना पत्र  
19
पहलगाम हल्ल्यानंतर भारतासमोर नवे आव्हान; दहशतवाद्यांकडून इंडियन आर्मी युनिफॉर्मचा वापर
20
"...तेव्हाच आम्ही हस्तक्षेप करू’’, वक्फ सुधारणा कायद्यावरील सुनावणीवेळी सरन्यायाधीशांनी केलं स्पष्ट 

हिंगोली आगाराला मालवाहतुकीतून ५१८९० हजारांचे उत्पन्न

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 7, 2021 04:31 IST

गत दीड-दोन महिन्यांपासून कोरोनाने कहर माजविला आहे. रुग्णांनी दोनअंकी संख्या केव्हाच पार केली आहे. हे पाहून शासनाने २५ एप्रिलपासून ...

गत दीड-दोन महिन्यांपासून कोरोनाने कहर माजविला आहे. रुग्णांनी दोनअंकी संख्या केव्हाच पार केली आहे. हे पाहून शासनाने २५ एप्रिलपासून संचारबंदी लागू आहे. त्यामुळे जिल्हा प्रशासनाच्या आदेशान्वये प्रवासी वाहतूक बंद करण्यात आली आहे. २५ एप्रिलपासून आजपर्यत हिंगोली आगाराची एकही प्रवासी बस बाहेर सोडण्यात आली नाही. तसेच पर जिल्ह्यातीलही बसेस आगारात आलेल्या नाहीत. आजमितीस सर्व प्रवासी बसेस आगारात उभ्या केल्या आहेत. शासनाच्या आदेशानुसार २५ कर्मचारी सद्य:स्थितीत कामावर आहेत. ज्या कर्मचाऱ्यांना कामावर बोलाविले जाईल त्यांनीच कामावर यावे. इतरांनी मात्र बाहेर न पडता घरीच बसावे, असेही एस. टी. महामंडळाच्या वतीने सांगण्यात आले आहे. आगारातील बसेस दुरुस्तीसाठी चार ते पाच यंत्रकारागिरांनाच बोलाविण्यात येत आहे.

२६ एप्रिल रोजी हिंगोली ते परभणी मालवाहू बस सोडण्यात आली. या बसला भाड्यापोटी ३७५० उत्पन्न मिळाले. या बसमध्ये सरकीची वाहतूक करण्यात आली. २९ एप्रिल रोजी हिंगोली ते नांदेड (हळद वाहतूक, भाडे ४२५०), ३० एप्रिल रोजी हिंगोली ते अर्धापूर (हळद वाहतूक, भाडे ४१५०), १ मे रोजी हिंगोली ते बीड (अंगणवाडीचा खाऊ, भाडे ८३९०), २ मे रोजी हिंगोली ते नांदेड (हळद वाहतूक, भाडे ४१५०), हिंगोली ते नांदेड (हळद वाहतूक, भाडे ४१५०), ३ मे रोजी हिंगोली ते नांदेड (हळद वाहतूक, भाडे ४१५०), हिंगोली ते अकोला (हरभरा वाहतूक, भाडे ५५००), ५ मे रोजी हिंगोली ते नांदेड (हळद वाहतूक, भाडे ४१५०), ६ मे रोजी हिंगोली ते परभणी (सरकी ढेप, भाडे ३७५०), हिंगोली ते अकोला (हळद वाहतूक, भाडे ५५००) असे एकूण ५१ हजार ८९० रुपयांचे उत्पन्न महामंडळास मिळाले.

मास्क घालूनच कामावर यावेजिल्ह्यात कोरोना महामारीचे रुग्ण दिवसेंदिवस वाढतच आहेत. हे पाहून सर्व कर्मचाऱ्यांना मास्क घालणे बंधनकारक केले आहे. तशा सूचनाही दिल्या आहेत. आजमितीस सुचनेनुसार कर्मचारीही कमी संख्येने कर्तव्यावर आहेत. विशेष म्हणजे माल वाहतूक करणाऱ्या चालकालाही मास्क घालण्याची सूचनाही केली आहे. जिल्हा प्रशासनाने घालून दिलेल्या नियमांचे काटेकोरपणे पालन केले जात आहे. प्रशासनाने आदेश दिला तरच प्रवासी बसेस सुरु होतील. आजतरी मालवाहतूक बसेस तेवढ्या सुरु आहेत.

-प्रल्हादराव बरडे, वाहतूक निरीक्षक, हिंगोली आगार