शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी: दहशतवादी हल्ल्यातील मृतांच्या कुटुंबीयांना ५० लाखांची मदत; राज्य सरकारचा निर्णय
2
कॅनडाचा निवडणूक निकाल भारतासाठी आहे खास; खलिस्तानी धुपले, पक्षाची मान्यताच गेली
3
छत्रपती संभाजीनगरचा जन्म, 'ही' मराठमोळी मुलगी थेट विजय देवरकोंडासोबत झळकणार
4
पाकिस्तानसोबत युद्ध झाल्यास भारताचा पराभव निश्चित; काँग्रेस नेत्याच्या पोस्टनं नवा वाद
5
'अल्लाह हू अकबर' म्हणणारा व्यक्ती एनआयएच्या रडारवर; व्हिडीओ समोर आल्यानंतर पाठवले समन्स
6
आयपीएलमध्ये विक्रमी शतक झळकावणाऱ्या वैभव सूर्यवंशीला राज्य सरकारकडून मोठं बक्षीस!
7
टाटा मिठाची कहाणी: छोट्या व्यवसायात का उतरले रतन टाटा? पैसा कामावणं नाही तर, 'हे' होतं कारण
8
सोलापूर पुन्हा हादरले! हात अन् गळा चिरून प्रशिक्षणार्थी डॉक्टरने केली आत्महत्या
9
क्रेडिट कार्ड UPI शी लिंक केल्यास मिळतात 'हे' फायदे; प्रत्येकवेळी खिशात बाळगण्याची गरज नाही
10
आयपीएलमध्ये विक्रमी शतक ठोकणारा वैभव सूर्यवंशी कितवीत शिकतो? कुठल्या शाळेत जातो? जाणून घ्या
11
"कारगिलमध्ये हरवलं होतं, जरा डोकं लावा..."; धवनने आफ्रिदीला सुनावले; अपमानाची करुन दिली आठवण
12
२६ निष्पाप लोकांना मारणारा हाशिम मुसा निघाला स्पेशल पॅरा कमांडो; हल्ल्यात पाकिस्तानी लष्कराचा सहभाग असल्याची शंका
13
भारताच्या प्रतिका रावलने एकदिवसीय क्रिकेटमध्ये रचला इतिहास, केली 'अशी' कामगिरी!
14
CMF Phone 2 Pro लाँच, किंमत एवढी स्वस्त की...; या रेंजमध्ये पहिल्यांदाच टेलिफोटो कॅमेरा सेटअप...
15
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला करतात चैत्र गौरीची पाठवणी; पण कशी? जाणून घ्या!
16
मोफत रेशनचा लाभ घेणाऱ्यांसाठी शेवटची संधी? हे काम आजच करा अन्यथा कार्डवरुन नाव वगळणार
17
प्रत्येक भारतीयाला संताप, संसदेचं विशेष अधिवेशन बोलवा; राहुल गांधी, खरगेंची मोदींकडे मागणी
18
मराठमोळ्या अभिनेत्रीने अमेरिकेत बनवलं पापड आणि कुरडई, व्हिडीओ केला शेअर
19
मुकेश अंबानींनी जगातील अब्जाधीशांना टाकलं मागे, एका दिवसात कमावले ₹४४,२९३ कोटी रुपये
20
Vaibhav Suryavanshi : "आई ३ तास ​​झोपायची, वडिलांनी नोकरी सोडली...", वैभव सूर्यवंशीने सांगितला IPL पर्यंतचा प्रवास

हिंगोलीत राडा, शेतकऱ्यांनी फोडले पिकविमा कंपनीचे कार्यालय

By विजय पाटील | Updated: October 13, 2022 14:43 IST

नुकसानीच्या बनावट सर्व्हेवरून शेतकरी संतापले

हिंगोली:  जिल्ह्यात आयसीआयसीआय लोम्बार्ड पिक विमा कंपनीच्या वतीने शेतकऱ्यांच्या परस्परच नुकसानीचा सर्वे करून बनावट स्वाक्षऱ्याद्वारे पंचनामे सादर केले जात असल्याचा आरोप करीत शेतकऱ्यांनी कंपनीच्या कार्यालयात तोडफोड केली. आमदार संतोष बांगर यांनीही शेतकऱ्यांसमवेत अधिकाऱ्यांशी चर्चा करून जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेतली.

जिल्ह्यातील तीन लाख 48 हजार शेतकऱ्यांनी पिक विमा भरला आहे. शेतकऱ्यांचे 24 कोटी व शासनाचे मिळून 150 कोटींपेक्षा जास्त रक्कम पिक विमा कंपनीला प्रीमियम म्हणून मिळणार आहे. मात्र शेतकऱ्यांना भरपाई देण्यासाठी पिक विमा कंपनीची टाळाटाळ असल्याचा प्रकार समोर येत आहे. शेतकऱ्यांच्या शेतात न जाता थेट शेतकऱ्यांच्या बनावट सह्या करून पंचनामे केले जात आहेत. कृषी व महसुली विभागाचे संयुक्त पथक पाहणी साठी जात नाही. या सर्व तक्रारीनंतर आमदार संतोष बांगर यांनी कृषी व पिक विमा कंपनीची बैठक बोलावली होती. यात कृषी विभागाचे अधिकारी आले मात्र पिक विमा कंपनीच्या अधिकाऱ्यांनी टाळाटाळ केली. त्यामुळे संतप्त शेतकरी आमदार संतोष बांगर यांच्या नेतृत्वात पिक विमा कंपनीचा कार्यालयावर धडकले काही शेतकऱ्यांनी संतापाच्या भरात कंपनीचे कार्यालय फोडले सर्व साहित्याची नासधूस केली.

कंपनीवर गुन्हा दाखल व्हावापिक विमा कंपनीने शेतकऱ्यांच्या बनावट सह्या करून फसवणूक केल्याने कृषी विभागामार्फत या कंपनीवर गुन्हा दाखल करण्यात यावा, अशी मागणी आमदार संतोष बांगर यांनी केली. या ठिकाणी उपस्थित कृषी अधिकारी शिवराज घोरपडे यांना गुन्हा दाखल करावा असे आदेशित केले.

शासनाचे पंचनामे ग्राह्य धरले पाहिजेआमदार संतोष बांगर यांनी जिल्हाधिकाऱ्यांचीही शेतकऱ्यांसह भेट घेतली. त्यांच्या कानावर घडला प्रकार घातला. त्यानंतर जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर म्हणाले, या तक्रारी आमच्याही कानावर आले आहेत. याबाबत चौकशी लावली आहे संबंधितावर निश्चित कारवाई होईल. तसेच शेतकऱ्यांच्या नुकसानीबाबतचे शासनाकडून करण्यात आलेले पंचनामे ग्राह्य धरण्यास कंपनीला भाग पाडण्याचा प्रयत्न केला जाईल. शासनाकडे तसा प्रस्ताव पाठविला जाईल.

टॅग्स :HingoliहिंगोलीFarmerशेतकरीCrime Newsगुन्हेगारी