शहरं
Join us  
Trending Stories
1
ICC Womens World Cup 2025 : टीम इंडियाची विजयी सलामी! दीप्ती-अमनजोतसह राणाचा अष्टपैलू बाणा
2
"हमासकडे शेवटचे ३-४ दिवस शिल्लक, जर त्यांनी ऐकलं नाही तर..."; डोनाल्ड ट्रम्प यांची थेट धमकी
3
वर्ल्ड कपच्या पहिल्याच सामन्यात दीप्ती शर्मानं रचला इतिहास; अशी कामगिरी करणारी ठरली पहिली भारतीय
4
धनगर आरक्षणासाठी तरूणाने स्वतःची कार जाळून केला सरकारचा तीव्र निषेध; जालना तालुक्यातील घटना
5
World Cup की सौंदर्य स्पर्धा... 'या' ८ महिला क्रिकेटर्सना बघून म्हणाल- हिरोईन दिसते हिरोईन!
6
शिर्डीत ५६ भिक्षेकरी पोलिसांच्या ताब्यात; महाराष्ट्रासह ७ राज्यांतील भिक्षेकऱ्यांचा समावेश
7
आमची ट्रॉफी, मेडल्स आम्हाला परत द्या... BCCI चा मोहसीन नक्वी यांना इशारा, ACC बैठकीत राडा
8
ग्राहक न्यायालयाच्या लाचखाेर लिपिकास एक वर्षाच्या सश्रम कारावासाची शिक्षा; ठाण्यातील प्रकरण
9
कापूस खरेदीस ‘पणन’ला परवानगी; लवकरच सीसीआयसोबत करार; आर्थिक मदतीची मागणी
10
मोहसीन नक्वी यांनी अखेर टीम इंडियापुढे गुडघे टेकले... भारताचा मोठा विजय! बैठकीत काय घडलं?
11
'मला मंगळसूत्र चोर म्हणता, कितव्या बायकोचं मंगळसूत्र चोरलं ते सांगा'; पडळकरांची जयंत पाटील यांच्यावर टीका
12
ऑक्टोबर महिन्यात पाऊस आणखी झोडपणार, हवामान खात्याने दिली धडकी भरवणारी माहिती 
13
‘राहुल गांधींना जिवे मारण्याची धमकी देणाऱ्यास कठोर शिक्षा करा, त्यांच्या सुरक्षेत वाढ करा’, काँग्रेसचं लोकसभा अध्यक्षांना पत्र  
14
ट्रम्प यांच्या निर्णयाचा भारताला फायदा; अमेरिकन कंपन्या भारतात शिफ्ट होण्याच्या तयारीत
15
ठाकरे बंधूंच्या युतीसंदर्भात संजय राऊतांचं सूचक विधान, दसऱ्याला...! स्पष्टच बोलले
16
पहलगाम हल्ल्यानंतर १६० दिवसांनी काश्मीरमधील 'ही' १२ पर्यटनस्थळे पुन्हा पर्यटकांसाठी खुली
17
सचिन तेंडुलकरसारखी मॅचविनर खेळी करून रायगड जिल्हयात पक्षाला बळ देऊ- सुनिल तटकरे
18
नागपूरमधील प्रकल्प इतर राज्यांकडे वळण्याच्या प्रयत्नात ? ८८४४ कोटींचे प्रकल्प जमिनीअभावी अडकले !
19
Maharashtra Flood: "ओला दुष्काळ जाहीर करण्याची मागणी होतेय, पण..."; CM फडणवीसांनी सांगितली निर्णय घेण्यातील अडचण
20
फायदाच फायदा...! गाजाच्या निर्मितीत भारताला मोठी संधी! पार पाडू शकतो महत्वाची भूमिका, असा आहे इस्रायलचा संपूर्ण प्लॅन?

'आम्ही मुंबईत येऊ नये म्हणून सरकार दंगल घडवून आणणार असेल, तर...'; मनोज जरांगे भडकले

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 16, 2025 17:35 IST

मनोज जरांगे यांनी मुंबईत आंदोलन करण्याची घोषणा केली आहे. या आंदोलनासंदर्भात ते ठिकठिकाणी बैठका घेत असून, मराठा आंदोलक मुंबईत येऊ नये म्हणून सरकार दंगल घडवण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप त्यांनी केला.

हिंगोली : मराठा समाज मागील अनेक वर्षांपासून आरक्षणाची मागणी करीत आहे. परंतु, आजपर्यंत समाजाला न्याय देण्यात आलेला नाही. अनेकवेळा चर्चा झाल्या आहेत. त्यामुळे आता चर्चेला संधी नसून, २९ ऑगस्टला मराठा समाज सरसकट ओबीसीतून आरक्षणच घेणार असल्याचे मराठा आरक्षण योद्धा मनोज जरांगे पाटील यांनी सांगितले. त्याचबरोबर मराठा बांधव मुंबईत येऊ नये म्हणून सरकार दंगल घडवून आणत असेल, तर आम्ही तसे होऊ देणार नाही, असेही ते म्हणाले. 

'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!

मराठा समाजाच्या आरक्षणासाठी २९ ऑगस्टपासून मुंबईत आंदोलन होणार आहे. या पार्श्वभूमीवर मनोज जरांगे पाटील यांनी १५ ऑगस्ट रोजी हिंगोलीत आले होते. त्यांनी १६ ऑगस्ट रोजी माध्यमाशी संवाद साधला.

मग, आणखी चर्चा कशासाठी? जरांगेंचा सवाल

मनोज जरांगे म्हणाले, 'ओबीसी समाज बांधवांनाही मराठा समाजाला आरक्षण मिळावे, असे वाटते. परंतु, काही राजकीय नेतेमंडळी ओबीसीच्या जीवावर राजकरण करू पाहत आहेत. मराठा कुणबीच्या ५८ लाख नोंदी सापडल्या असून, त्याचा अहवाल सरकारकडे आहे. मग, आणखी चर्चा कशासाठी?', असा सवाल त्यांनी उपस्थित केला. 

'मराठा आरक्षणाची मागील अनेक वर्षांपासूनची मागणी आहे, तर दोन वर्षांपासून सातत्याने आंदोलन सुरू आहेत. परंतु, अजूनही समाज आरक्षणाच्या प्रतीक्षेत आहे', अशी खंत मनोज जरांगेंनी व्यक्त केली.

जरांगे म्हणाले, 'सरकार दंगल घडवून आणणार असेल, तर...'

'मराठा बांधव मुंबईत येऊ नये म्हणून सरकार दंगल घडवून आणणार असेल तरी आम्ही तसे होऊ देणार नाही. मुंबईत पण जाणार आहे आणि अतिशय शांततेत जाणार आहोत. आम्हाला मुंबईत आमच्या मागण्यांसाठी जाण्याचा अधिकार आहे', अशी भूमिका जरांगे यांनी मांडली. 

'२७ ऑगस्टला अंतरवालीतून निघणार असून, २९ ऑगस्ट रोजी मुंबईत पोहोचणार आहोत. जर मराठा समाजबांधवास त्रास देण्याचा प्रयत्न केला तर महाराष्ट्रात एकाही नेत्याला फिरू देणार नाही', असा इशारा जरांगे पाटील यांनी दिला. यावेळेस आरक्षणाचा गुलाल उधळूनच परत येणार असल्याचेही जरांगे यांनी यावेळी सांगितले.

'सरकारने मराठा समाजाचा अंत पाहू नये. आरक्षण तर ओबीसीमधूनच घेणार असून, त्यासाठी मराठा समाज सक्षम आहे. संयम ढळला तर हा समाज कुणालाच ऐकणारा नाही, हे सरकारने लक्षात घ्यावे आणि समाजाला तातडीने आरक्षण द्यावे. आम्ही न्याय मागतो अन् सरकारने जाणिवपूर्वक अन्याय चालविला आहे. परंतु, आता टोलवाटोलवी सरकारला महागात पडेल', असे जरांगे पाटील म्हणाले. यादरम्यान त्यांनी मुख्यमंत्री फडणवीस यांच्यावर टिका केली.

समाजाला साथ द्या; अन्यथा बाजार उठवू...

'मराठा समाजाच्या जीवावर नेतेमंडळी निवडून आले, मोठे झाले आहेत. गोरगरीब मराठा समाजबांधवांच्या लेकराबाळांच्या भविष्यासाठी या नेते मंडळींनी खंबीरपणे साथ देणे अपेक्षीत आहे. परंतु, जर तुम्हीच जर समाजाला साथ देत नसाल तर समाजानेही तुमच्या पाठीशी काय म्हणून उभे रहायचे. अजूनही वेळ गेलेली नसून, नेतेमंडळींनी मराठा समाजाला साथ द्यावी. अन्यथा हा समाज नेतेमंडळींचा बाजार उठविल्याशिवाय राहणार नाही', असा इशारा मनोज जरांगे पाटील यांनी दिला.

टॅग्स :Manoj Jarange Patilमनोज जरांगे-पाटीलMaratha Reservationमराठा आरक्षणMumbaiमुंबईMahayutiमहायुतीreservationआरक्षण