शहरं
Join us  
Trending Stories
1
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
2
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
3
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
4
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
5
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
6
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
7
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
8
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
9
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
10
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
11
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
12
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
13
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
14
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
15
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
16
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
17
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
18
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
19
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
20
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
Daily Top 2Weekly Top 5

'आम्ही मुंबईत येऊ नये म्हणून सरकार दंगल घडवून आणणार असेल, तर...'; मनोज जरांगे भडकले

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 16, 2025 17:35 IST

मनोज जरांगे यांनी मुंबईत आंदोलन करण्याची घोषणा केली आहे. या आंदोलनासंदर्भात ते ठिकठिकाणी बैठका घेत असून, मराठा आंदोलक मुंबईत येऊ नये म्हणून सरकार दंगल घडवण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप त्यांनी केला.

हिंगोली : मराठा समाज मागील अनेक वर्षांपासून आरक्षणाची मागणी करीत आहे. परंतु, आजपर्यंत समाजाला न्याय देण्यात आलेला नाही. अनेकवेळा चर्चा झाल्या आहेत. त्यामुळे आता चर्चेला संधी नसून, २९ ऑगस्टला मराठा समाज सरसकट ओबीसीतून आरक्षणच घेणार असल्याचे मराठा आरक्षण योद्धा मनोज जरांगे पाटील यांनी सांगितले. त्याचबरोबर मराठा बांधव मुंबईत येऊ नये म्हणून सरकार दंगल घडवून आणत असेल, तर आम्ही तसे होऊ देणार नाही, असेही ते म्हणाले. 

'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!

मराठा समाजाच्या आरक्षणासाठी २९ ऑगस्टपासून मुंबईत आंदोलन होणार आहे. या पार्श्वभूमीवर मनोज जरांगे पाटील यांनी १५ ऑगस्ट रोजी हिंगोलीत आले होते. त्यांनी १६ ऑगस्ट रोजी माध्यमाशी संवाद साधला.

मग, आणखी चर्चा कशासाठी? जरांगेंचा सवाल

मनोज जरांगे म्हणाले, 'ओबीसी समाज बांधवांनाही मराठा समाजाला आरक्षण मिळावे, असे वाटते. परंतु, काही राजकीय नेतेमंडळी ओबीसीच्या जीवावर राजकरण करू पाहत आहेत. मराठा कुणबीच्या ५८ लाख नोंदी सापडल्या असून, त्याचा अहवाल सरकारकडे आहे. मग, आणखी चर्चा कशासाठी?', असा सवाल त्यांनी उपस्थित केला. 

'मराठा आरक्षणाची मागील अनेक वर्षांपासूनची मागणी आहे, तर दोन वर्षांपासून सातत्याने आंदोलन सुरू आहेत. परंतु, अजूनही समाज आरक्षणाच्या प्रतीक्षेत आहे', अशी खंत मनोज जरांगेंनी व्यक्त केली.

जरांगे म्हणाले, 'सरकार दंगल घडवून आणणार असेल, तर...'

'मराठा बांधव मुंबईत येऊ नये म्हणून सरकार दंगल घडवून आणणार असेल तरी आम्ही तसे होऊ देणार नाही. मुंबईत पण जाणार आहे आणि अतिशय शांततेत जाणार आहोत. आम्हाला मुंबईत आमच्या मागण्यांसाठी जाण्याचा अधिकार आहे', अशी भूमिका जरांगे यांनी मांडली. 

'२७ ऑगस्टला अंतरवालीतून निघणार असून, २९ ऑगस्ट रोजी मुंबईत पोहोचणार आहोत. जर मराठा समाजबांधवास त्रास देण्याचा प्रयत्न केला तर महाराष्ट्रात एकाही नेत्याला फिरू देणार नाही', असा इशारा जरांगे पाटील यांनी दिला. यावेळेस आरक्षणाचा गुलाल उधळूनच परत येणार असल्याचेही जरांगे यांनी यावेळी सांगितले.

'सरकारने मराठा समाजाचा अंत पाहू नये. आरक्षण तर ओबीसीमधूनच घेणार असून, त्यासाठी मराठा समाज सक्षम आहे. संयम ढळला तर हा समाज कुणालाच ऐकणारा नाही, हे सरकारने लक्षात घ्यावे आणि समाजाला तातडीने आरक्षण द्यावे. आम्ही न्याय मागतो अन् सरकारने जाणिवपूर्वक अन्याय चालविला आहे. परंतु, आता टोलवाटोलवी सरकारला महागात पडेल', असे जरांगे पाटील म्हणाले. यादरम्यान त्यांनी मुख्यमंत्री फडणवीस यांच्यावर टिका केली.

समाजाला साथ द्या; अन्यथा बाजार उठवू...

'मराठा समाजाच्या जीवावर नेतेमंडळी निवडून आले, मोठे झाले आहेत. गोरगरीब मराठा समाजबांधवांच्या लेकराबाळांच्या भविष्यासाठी या नेते मंडळींनी खंबीरपणे साथ देणे अपेक्षीत आहे. परंतु, जर तुम्हीच जर समाजाला साथ देत नसाल तर समाजानेही तुमच्या पाठीशी काय म्हणून उभे रहायचे. अजूनही वेळ गेलेली नसून, नेतेमंडळींनी मराठा समाजाला साथ द्यावी. अन्यथा हा समाज नेतेमंडळींचा बाजार उठविल्याशिवाय राहणार नाही', असा इशारा मनोज जरांगे पाटील यांनी दिला.

टॅग्स :Manoj Jarange Patilमनोज जरांगे-पाटीलMaratha Reservationमराठा आरक्षणMumbaiमुंबईMahayutiमहायुतीreservationआरक्षण