शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! छगन भुजबळांची महायुती सरकारमध्ये घरवापसी! सकाळी दहा वाजता मंत्रि‍पदाचा शपथविधी
2
ज्योती मल्होत्राच्या मोबाईलममध्ये ISI च्या शाकिरचा नंबर कोणत्या नावाने? पाकिस्तानमध्ये भेटलेले ते दोन अधिकारी कोण?
3
MI vs DC : वानखेडेचं मैदान मारा अन् Playoffs चं तिकीट मिळवा! मुंबई इंडियन्स फक्त एक पाऊल दूर, पण...
4
SRH नं पंतच्या LSG चा खेळ केला खल्लास! आता MI अन् DC मध्ये प्लेऑफ्सची चुरस
5
शस्त्रसंधीची चर्चा भारत-पाकिस्तानमध्येच, डोनाल्ड ट्रम्प यांचा काहीही संबंध नाही; विक्रम मिस्रींनी संसदीय समितीला सगळं सांगितलं
6
IPL 2025 : भर मैदानात अभिषेक अन् दिग्वेश यांच्यात वाजलं; नेमकं काय घडलं? (VIDEO)
7
'काश्मीरला जा आणि लष्कराच्या छावणीचे फोटो घेऊन ये"; ISI एजंटने भारतातील गुप्तहेराला कोणते काम दिले होते?
8
साताऱ्यात चीड आणणारी घटना! चुलत भावाकडून १३ वर्षीय बहिणीवर अनेकदा बलात्कार
9
राष्ट्रवादी काँग्रेसमधील नेतृत्वात लवकरच बदल दिसेल; रोहित पवारांचं विधान
10
कॅपिटल गेन टॅक्स काय असतो, कोणत्या प्रकारे आणि किती द्यावा लागतो? सगळं गणित समजून घ्या
11
लातूर : पाठीमागून येणाऱ्या दुचाकीची भयंकर धडक; आई, मुलासह जावयाचा मृत्यू
12
'मीदेखील या गोष्टीला बळी पडलोय', सरन्यायाधीश प्रोटोकॉल प्रकरणावर उपराष्ट्रपतींची प्रतिक्रिया
13
निक्की आधी बॅटिंगला येऊन पंतचा पुन्हा फ्लॉप शो! Sanjiv Goenka यांनी असा काढला राग
14
'ऑपरेशन सिंदूर' आधी पाकिस्तानला दिली होती माहिती?; परराष्ट्र सचिवांनी संसदीय समितीत केला खुलासा
15
IPL 2025 : विदर्भकराचं स्वप्न झालं साकार! पण विकेटमागे इशान किशननं घोळ घातला, नाहीतर...
16
Rain update: साताऱ्यात धडाम् धूम! वळवाची दमदार हजेरी, शहरातील वीजपुरवठा खंडित
17
ट्रॅक्टर-ऑटोचा भीषण अपघात, तीन जागीच ठार; लातूर-बार्शी महामार्गावरील घटना
18
Shocking: व्हिडीओ कॉलसमोर प्रेमीयुगुलानं केलं विषप्राशन; प्रेयसीचा मृत्यू, प्रियकर आयसीयूमध्ये!
19
Jalana: कामाहून परतणाऱ्या तीन कष्टकरी मित्रांवर वीज कोसळली; दोघांचा मृत्यू
20
भुईमूग बाजारात नेला अन् पावसामुळे वाहून गेला; महाराष्ट्रातील शेतकऱ्याला थेट केंद्रीय कृषिमंत्र्याचा कॉल; म्हणाले...

मदत वाऱ्यावरच ; रिक्षाचालकांना दीड हजार रुपये कधी मिळणार ?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 8, 2021 04:30 IST

हिंगोली : कोरोना संसर्ग रोखण्यासाठी शासनाने संचारबंदी लागू केेली आहे. या काळात रिक्षाचालकांची गैरसोय होऊ नये यासाठी शासनाने रिक्षाचालकांना ...

हिंगोली : कोरोना संसर्ग रोखण्यासाठी शासनाने संचारबंदी लागू केेली आहे. या काळात रिक्षाचालकांची गैरसोय होऊ नये यासाठी शासनाने रिक्षाचालकांना प्रत्येकी दीड हजार रुपये देण्याचा निर्णय घेतला. मात्र, अद्याप ही मदत रिक्षाचालकांपर्यंत पोहोचली नसल्याने त्यांच्यावर उपासमारीची वेळ आली आहे.

कोरोना संसर्ग रोखण्यासाठी जिल्ह्यात संचारबंदी लागू केली आहे. सध्या दिवसाआड काही दुकाने सुरू करण्यास मुभा देण्यात आली असली तरी दोन महिन्यांपासून सर्व व्यवहार ठप्प झाले आहेत. यात रिक्षा वाहतुकीसही निर्बंध घालण्यात आले आहेत. त्यामुळे मागील दोन महिन्यांपासून रिक्षाचालकांवर उपासमारीची वेळ आली आहे. कडक संचारबंदी काळात रिक्षाचालकांची उपासमार होऊ नये यासाठी राज्य शासनाने रिक्षाचालकांना प्रत्येकी दीड हजार रुपये देण्याची घोषणा केली होती. घोषणा करून महिना होत आला तरी अद्याप रिक्षाचालकांना मदत मिळाली नाही. विशेष म्हणजे, मदतीसाठी नेमकी नोंदणी कशी करायची, कोणाकडे करायची, याचीच माहिती रिक्षाचालकांना नाही. त्याचबरोबर परवाना असलेल्या रिक्षाचालकांची संख्या २ हजार ३५० च्या वर असताना केवळ ८१९ चालकांनाच मदत देण्याचे नियोजन उपप्रादेशिक परिवहन अधिकारी कार्यालयाने केल्याचा आरोप जय भगवान ऑटो महासंघाने केला आहे. त्यात परवाना नसलेल्या रिक्षाचालकांचा विचारच करण्यात आला नसल्याचा आराेपही केला आहे. कोणताही भेदभाव न करता सरसकट रिक्षाचालकांना मदत द्यावी, अशी मागणी होत आहे.

शासनाने परवानाधारक रिक्षाचालकांना मदत देण्याची घोषणा केली. या निर्णयात परवाना नसलेल्या रिक्षाचालकांचा विचार करण्यात आला नाही. रिक्षा बंद असल्याने घर कसे चालवावे?

- अनिल गायकवाड,

संचारबंदीच्या काळात रिक्षाचालकांना मदत देण्याची घोषणा हवेतच विरली आहे. अद्याप रिक्षाचालकांना कसलीही मदत मिळाली नाही. त्यामुळे रिक्षाचालकांनी जगायचे कसे?

- संजय अंभोरे

शासनाने परवानाधारक व विनापरवानाधारक असा भेदभाव न करता सरसकट सर्व रिक्षाचालकांना मदत द्यावी, रिक्षा बंद असल्याने चालकांवर उपासमारीची वेळ आली आहे.

- भगवान बांगर, जिल्हाध्यक्ष, जय भगवान ऑटो महासंघ

परवानाधारक रिक्षाचालकांचे बँक खात्याला आधार लिंक असणे गरजेचे आहे. शासनाच्या नियमानुसार रिक्षाचालकांना मदत दिली जाणार आहे.

- अनंता जोशी, उपप्रादेशिक परिवहन अधिकारी, हिंगोली

जिल्ह्यातील परवानाधारकांची संख्या - ८१९

परवाना नसलेले रिक्षाचालक - २३५०