शहरं
Join us  
Trending Stories
1
गिलनं करून दाखवलं! जिथं पिढ्यानं-पिढ्या पराभव पाहिला तिथं टीम इंडियानं पहिला विजय मिळवला, अन्...
2
"...तर दुसऱ्याच दिवशी घर रिकामे करेन"; सुप्रीम कोर्टाच्या 'त्या' पत्राला माजी सरन्यायाधीशांनी दिले उत्तर
3
महापालिका निवडणुकांमध्ये काँग्रेसची स्वबळाची तयारी? पवार-ठाकरेंना धक्का देणार राहुल गांधी?
4
मध्य प्रदेशात लाडकी बहीण योजनेचा हफ्ता वाढला; आता महिन्याला किती मिळणार पैसे?
5
जिंकलंस भावा! 'पंजा' मारला अन् आकाश दीप पळत पळत जाऊन थेट बुमराहला भेटला
6
भीमा कोरेगाव प्रकरणाचा अहवाल लवकरच सादर होणार; युक्तीवाद पूर्ण, ८५ जणांची झाली उलटतपासणी
7
900 कोटींच्या लढाऊ विमानाची 'धक्का परेड', इंग्लंडचं F-35 ओढत हँगरमध्ये नेतानाचा व्हिडिओ व्हायरल!
8
BJP-JDU च्या अडचणी वाढणार; चिराग पासवान यांनी केली विधानसभा लढवण्याची घोषणा
9
“राज ठाकरे यांना जवळ करणे राजकीय सोय, ठाकरे गटाचे ७५ नगरसेवक शिंदेंकडे गेले”: चंद्रकांत पाटील
10
IND vs ENG : वॉशिंग्टनचा अतिसुंदर चेंडू! लंच आधी बेन स्टोक्स जाळ्यात फसला; DRS घेतला, पण...
11
लाल समुद्रात ब्रिटिश जहाजावर हल्ला, गोळीबार अन् रॉकेट डागले; हुथी बंडखोरांवर संशय
12
लढाई संपलेली नाही...; सरकारच्या डॉ. नरेंद्र जाधव समितीविरोधात आझाद मैदानात धरणे आंदोलन
13
समलैंगिक संबंधाचा भयानक अंत; मुंबईत कोल्ड्रिंक देऊन १६ वर्षाच्या मुलाची हत्या, आरोपीला अटक
14
पंढरपूर नगरीत भक्तीचा महापूर, वारकऱ्यांचा महासागर; दर्शनासाठी पाच किलोमीटरपर्यंत रांग...!
15
एवढा वेळ घेऊनही प्रवाशांच्या जीवाशी खेळ! पलावा पूल खुला, पण रस्त्याचा खुळखुळा; पाहा Video
16
आता १४ वर्षीय वैभव सूर्यंवशीला द्विशतक ठोकायचंय! वर्ल्ड रेकॉर्डनंतर मनात सेट केलंय हे टार्गेट
17
पाऊस थांबला! लगेच आकाश दीपचा 'हमला'! बॅक टू बॅक ओव्हरमध्ये दोन विकेट्स अन् इंग्लंडचा अर्धा संघ तंबूत (VIDEO)
18
मतदारयाद्यांतील गैरप्रकार रोखण्यास काँग्रेसची समिती; अध्यक्ष पृथ्वीराज चव्हाण अहवाल देणार
19
अंत्यसंस्कारासाठी मृतदेह घेऊन निघाले अन् घरी जिवंत सापडली 'ती' व्यक्ती; जळगावातील प्रकार
20
४० वर्षीय रणवीरचा २० वर्षीय अभिनेत्रीसोबत रोमान्स; धुरंधरमध्ये झळकलेली सारा अर्जुन कोण?

मदत वाऱ्यावरच ; रिक्षाचालकांना दीड हजार रुपये कधी मिळणार ?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 8, 2021 04:30 IST

हिंगोली : कोरोना संसर्ग रोखण्यासाठी शासनाने संचारबंदी लागू केेली आहे. या काळात रिक्षाचालकांची गैरसोय होऊ नये यासाठी शासनाने रिक्षाचालकांना ...

हिंगोली : कोरोना संसर्ग रोखण्यासाठी शासनाने संचारबंदी लागू केेली आहे. या काळात रिक्षाचालकांची गैरसोय होऊ नये यासाठी शासनाने रिक्षाचालकांना प्रत्येकी दीड हजार रुपये देण्याचा निर्णय घेतला. मात्र, अद्याप ही मदत रिक्षाचालकांपर्यंत पोहोचली नसल्याने त्यांच्यावर उपासमारीची वेळ आली आहे.

कोरोना संसर्ग रोखण्यासाठी जिल्ह्यात संचारबंदी लागू केली आहे. सध्या दिवसाआड काही दुकाने सुरू करण्यास मुभा देण्यात आली असली तरी दोन महिन्यांपासून सर्व व्यवहार ठप्प झाले आहेत. यात रिक्षा वाहतुकीसही निर्बंध घालण्यात आले आहेत. त्यामुळे मागील दोन महिन्यांपासून रिक्षाचालकांवर उपासमारीची वेळ आली आहे. कडक संचारबंदी काळात रिक्षाचालकांची उपासमार होऊ नये यासाठी राज्य शासनाने रिक्षाचालकांना प्रत्येकी दीड हजार रुपये देण्याची घोषणा केली होती. घोषणा करून महिना होत आला तरी अद्याप रिक्षाचालकांना मदत मिळाली नाही. विशेष म्हणजे, मदतीसाठी नेमकी नोंदणी कशी करायची, कोणाकडे करायची, याचीच माहिती रिक्षाचालकांना नाही. त्याचबरोबर परवाना असलेल्या रिक्षाचालकांची संख्या २ हजार ३५० च्या वर असताना केवळ ८१९ चालकांनाच मदत देण्याचे नियोजन उपप्रादेशिक परिवहन अधिकारी कार्यालयाने केल्याचा आरोप जय भगवान ऑटो महासंघाने केला आहे. त्यात परवाना नसलेल्या रिक्षाचालकांचा विचारच करण्यात आला नसल्याचा आराेपही केला आहे. कोणताही भेदभाव न करता सरसकट रिक्षाचालकांना मदत द्यावी, अशी मागणी होत आहे.

शासनाने परवानाधारक रिक्षाचालकांना मदत देण्याची घोषणा केली. या निर्णयात परवाना नसलेल्या रिक्षाचालकांचा विचार करण्यात आला नाही. रिक्षा बंद असल्याने घर कसे चालवावे?

- अनिल गायकवाड,

संचारबंदीच्या काळात रिक्षाचालकांना मदत देण्याची घोषणा हवेतच विरली आहे. अद्याप रिक्षाचालकांना कसलीही मदत मिळाली नाही. त्यामुळे रिक्षाचालकांनी जगायचे कसे?

- संजय अंभोरे

शासनाने परवानाधारक व विनापरवानाधारक असा भेदभाव न करता सरसकट सर्व रिक्षाचालकांना मदत द्यावी, रिक्षा बंद असल्याने चालकांवर उपासमारीची वेळ आली आहे.

- भगवान बांगर, जिल्हाध्यक्ष, जय भगवान ऑटो महासंघ

परवानाधारक रिक्षाचालकांचे बँक खात्याला आधार लिंक असणे गरजेचे आहे. शासनाच्या नियमानुसार रिक्षाचालकांना मदत दिली जाणार आहे.

- अनंता जोशी, उपप्रादेशिक परिवहन अधिकारी, हिंगोली

जिल्ह्यातील परवानाधारकांची संख्या - ८१९

परवाना नसलेले रिक्षाचालक - २३५०