शहरं
Join us  
Trending Stories
1
बेस्ट निवडणुकीचा ‘निकाल’ लागताच राज ठाकरे-CM फडणवीस भेट; पाऊण तास चर्चा, तर्कांना उधाण
2
"आपलं टार्गेट चीन, तर भारताच्या रुपाने...!", निक्की हेली यांनी ट्रम्प प्रशासनाला फटकारलं; स्पष्टच बोलल्या
3
Coconut Oil : नारळ तेल बनलं VIP प्रोडक्ट; दोन वर्षांत तीन पटींनी वाढली किंमत
4
शाळेत मारल्याच्या रागातून नववीतील विद्यार्थ्याने शिक्षकावर झाडली गोळी, लंच बॉक्समधून आणला कट्टा आणि...  
5
भारत अमेरिकेला आणखी एक झटका देण्याच्या तयारीत; कच्च्या तेलानंतर रशियासोबत करू शकतो ‘ही’ डील
6
OMG! आर्यन खानची पहिलीच सीरिज आग लावणार, प्रीव्ह्यूच्या शेवटी 'त्या' डायलॉगने वेधलं लक्ष
7
अमेरिकेची 'मोस्ट वॉन्टेड' महिला अखेर भारतात सापडली, एफबीआयने केली मोठी कारवाई!
8
BEST Election Results: ठाकरे बंधूंच्या सपशेल पराभवावर CM फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले…
9
Stock Market Today: शेअर बाजाराची मजबूत सुरुवात, Nifty २५,१०० च्या वर; NBFCs, रियल्टी शेअर्समध्ये तेजी
10
डोनाल्ड ट्रम्प यांच्या टॅरिफवर रामबाण तोडगा सापडला, हे मित्र बनणार भारतासाठी ढाल
11
सत्काराच्या शालीने वकिलाचा न्यायालयातच गळफास; खिशात चिठ्ठी, पण पोलिसांनी माहिती दडवली
12
मृत्यूच्या खाईत सौंदर्याचा सशक्त आवाज; पॅलेस्टाइनची तरुणी यंदा 'मिस युनिव्हर्स'मध्ये...
13
अदानींनी परदेशी बँकांकडून घेतलं 24000000000 रुपयांचं कर्ज! जाणून घ्या, एवढ्या मोठ्या रकमेचं काय करणार? किती व्याज लागणार? 
14
शाहरुखचा लेक त्याचाच डुप्लिकेट! लूक अन् आवाज सगळंच सेम, पहिल्यांदाच आला प्रेक्षकांसमोर, म्हणाला...
15
तीन विधेयकांवरून तुफान गोंधळ; विराेधकांनी प्रती फाडल्या, विधेयके संयुक्त समितीकडे पाठविली
16
अक्षय कुमार, अर्शद वारसी हाजिर हो..! दिवाणी न्यायालयात प्रकरण दाखल; कारण काय?
17
'त्याला मीच मारलं पण तो कोण होता?'; दहावीच्या विद्यार्थ्याची हत्या करणाऱ्या मुलाची धक्कादायक चॅटिंग समोर
18
आजचे राशीभविष्य, २१ ऑगस्ट २०२५: स्वाभिमान दुखावला जाऊ शकतो; स्त्री वर्गाकडून विशेष लाभ
19
विशेष लेख: चोरी ती चोरीच आणि वरून शिरजोरी? निवडणूक आयोगाने किती सांगितले अन् किती लपवले...
20
“वराह जयंती साजरी करण्याची मागणी म्हणजे तरुणांचे लक्ष दुसरीकडे वळवण्याचा अजेंडा”: सपकाळ

मदत वाऱ्यावरच ; रिक्षाचालकांना दीड हजार रुपये कधी मिळणार ?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 8, 2021 04:30 IST

हिंगोली : कोरोना संसर्ग रोखण्यासाठी शासनाने संचारबंदी लागू केेली आहे. या काळात रिक्षाचालकांची गैरसोय होऊ नये यासाठी शासनाने रिक्षाचालकांना ...

हिंगोली : कोरोना संसर्ग रोखण्यासाठी शासनाने संचारबंदी लागू केेली आहे. या काळात रिक्षाचालकांची गैरसोय होऊ नये यासाठी शासनाने रिक्षाचालकांना प्रत्येकी दीड हजार रुपये देण्याचा निर्णय घेतला. मात्र, अद्याप ही मदत रिक्षाचालकांपर्यंत पोहोचली नसल्याने त्यांच्यावर उपासमारीची वेळ आली आहे.

कोरोना संसर्ग रोखण्यासाठी जिल्ह्यात संचारबंदी लागू केली आहे. सध्या दिवसाआड काही दुकाने सुरू करण्यास मुभा देण्यात आली असली तरी दोन महिन्यांपासून सर्व व्यवहार ठप्प झाले आहेत. यात रिक्षा वाहतुकीसही निर्बंध घालण्यात आले आहेत. त्यामुळे मागील दोन महिन्यांपासून रिक्षाचालकांवर उपासमारीची वेळ आली आहे. कडक संचारबंदी काळात रिक्षाचालकांची उपासमार होऊ नये यासाठी राज्य शासनाने रिक्षाचालकांना प्रत्येकी दीड हजार रुपये देण्याची घोषणा केली होती. घोषणा करून महिना होत आला तरी अद्याप रिक्षाचालकांना मदत मिळाली नाही. विशेष म्हणजे, मदतीसाठी नेमकी नोंदणी कशी करायची, कोणाकडे करायची, याचीच माहिती रिक्षाचालकांना नाही. त्याचबरोबर परवाना असलेल्या रिक्षाचालकांची संख्या २ हजार ३५० च्या वर असताना केवळ ८१९ चालकांनाच मदत देण्याचे नियोजन उपप्रादेशिक परिवहन अधिकारी कार्यालयाने केल्याचा आरोप जय भगवान ऑटो महासंघाने केला आहे. त्यात परवाना नसलेल्या रिक्षाचालकांचा विचारच करण्यात आला नसल्याचा आराेपही केला आहे. कोणताही भेदभाव न करता सरसकट रिक्षाचालकांना मदत द्यावी, अशी मागणी होत आहे.

शासनाने परवानाधारक रिक्षाचालकांना मदत देण्याची घोषणा केली. या निर्णयात परवाना नसलेल्या रिक्षाचालकांचा विचार करण्यात आला नाही. रिक्षा बंद असल्याने घर कसे चालवावे?

- अनिल गायकवाड,

संचारबंदीच्या काळात रिक्षाचालकांना मदत देण्याची घोषणा हवेतच विरली आहे. अद्याप रिक्षाचालकांना कसलीही मदत मिळाली नाही. त्यामुळे रिक्षाचालकांनी जगायचे कसे?

- संजय अंभोरे

शासनाने परवानाधारक व विनापरवानाधारक असा भेदभाव न करता सरसकट सर्व रिक्षाचालकांना मदत द्यावी, रिक्षा बंद असल्याने चालकांवर उपासमारीची वेळ आली आहे.

- भगवान बांगर, जिल्हाध्यक्ष, जय भगवान ऑटो महासंघ

परवानाधारक रिक्षाचालकांचे बँक खात्याला आधार लिंक असणे गरजेचे आहे. शासनाच्या नियमानुसार रिक्षाचालकांना मदत दिली जाणार आहे.

- अनंता जोशी, उपप्रादेशिक परिवहन अधिकारी, हिंगोली

जिल्ह्यातील परवानाधारकांची संख्या - ८१९

परवाना नसलेले रिक्षाचालक - २३५०