शहरं
Join us  
Trending Stories
1
KKR चे चार्टर्ड विमान अचानक कोलकाताऐवजी गुवाहाटीकडे वळवावे लागले; वाचा नेमके काय घडले
2
१८ चेंडू, ५ धावा अन् ३ विकेट्स! पॅट कमिन्स, भुवनेश्वर कुमार यांनी मुंबई इंडियन्सला रडवले 
3
भारतीय वंशाच्या सुनीता विल्यम्स इतिहास रचणार, 12 वर्षांनंतर तिसऱ्यांदा अंतराळात जाणार...
4
राहुल गांधींनी काँग्रेस कार्यकर्त्यांकडं काय मागितलं? निवडणुकीच्या धामधुमीत लिहिलं भावनिक पत्र!
5
ठाणे लोकसभा मतदारसंघासाठी 24 उमेदवार रिंगणात; चिन्हे झाली जाहीर, पाहा कुणाला काय?
6
सभांमध्ये वेगळेच विषय गाजले, पण 'वहिनीं'च्या कार्यकर्त्यांनी गावचे मुद्दे मांडले; प्रचारतंत्र 'पवारफुल्ल' ठरेल?
7
नवी मुंबईत यापुढे सबकुछ गणेश नाईक! फडणवीसांच्या आश्वासनावरच शांत झाले भाजपा कार्यकर्ते
8
मुंबई विद्यापीठाचा बी. कॉम सत्र ६ चा निकाल जाहीर; परीक्षेत १६,६३६ विद्यार्थी उत्तीर्ण
9
आव्हान संपल्यावर मुंबई इंडियन्सला सूर गवसला; T20 वर्ल्ड कपपूर्वी हार्दिक पांड्याही फॉर्मात आला
10
काँग्रेसच्या विजय वडेट्टीवारांविरोधात भाजपाची मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांकडे तक्रार; 'त्या' विधानावरून भाजपा आक्रमक
11
नवी मुंबई आंतराष्ट्रीय विमानतळावर दिबांच्याच नावाची घोषणा होणार- देवेंद्र फडणवीस
12
बाबांना चिअर करण्यासाठी वानखेडेवर आला अंगद! जसप्रीत बुमराहच्या लेकाची झलक  
13
CM अरविंद केजरीवालांचा पाय आणखी खोलात; नायब राज्यपालांनी केली NIA चौकशीची मागणी
14
'काँग्रेस तुमचे पैसे वाटेल...' मल्लिकार्जुन खरगेंचे अपूर्ण विधान खोट्या दाव्यासह व्हायरल
15
भारतीय संघाच्या ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेच्या जर्सीचं हटके लॉचिंग! Video Viral 
16
माढ्यात धैर्यशील मोहिते पाटलांची ताकद वाढली! भालके गटाचा पाठिंबा जाहीर; समीकरणे बदलणार?
17
"भाजपा खूप दिवसांपासून दिवास्वप्न पाहतेय..."; नवीन पटनायक यांचा पंतप्रधान मोदींवर पलटवार
18
बिहार: २७ वर्षीय महिलेने एकाच वेळी ५ मुलींना दिला जन्म; डॉक्टरही अवाक्, सर्वजण सुखरूप
19
Mumbai Indians च्या खांद्यावर आठ संघांचा भार! SRH विरुद्धच्या लढतीत सर्वांना हवेत MI चे उपकार
20
“भारताचे परराष्ट्र धोरण अपयशी ठरलेय, अनेक देशांशी संबंध बिघडलेत”; प्रकाश आंबेडकरांची टीका

हिंगोलीत जोरदार पावसाची हजेरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 21, 2019 12:11 AM

जिल्हभरात २० सप्टेंबर रोजी ढगाळ वातावरण होते. तर कोठे रिमझीम पाऊस होता. रात्री ९ वाजेच्या सुमारास हिंगोली शहरासह जिल्हाभरात पावसाने हजेरी लावली.

लोकमत न्यूज नेटवर्कहिंगोली : जिल्हभरात २० सप्टेंबर रोजी ढगाळ वातावरण होते. तर कोठे रिमझीम पाऊस होता. रात्री ९ वाजेच्या सुमारास हिंगोली शहरासह जिल्हाभरात पावसाने हजेरी लावली.परतीच्या पावसाने तारलेकौठा : वसमत तालुक्यातील कौठा व परिसरात याहीवर्षी पावसाच्या लहरीपणाने खरीपाच्या हंगामाची सुरवात संकटाने झाली. त्यात पुन्हा पाऊस गायब झाल्याने परिस्थिती दुष्काळसदृश्य झाल्याने पिण्याच्या पाण्याचीही मारामार सुरू होती. परंतु परतीच्या पावसाने मात्र थोडासा दिलासा मिळाला आहे. १९ आणि २० सप्टेंबरच्या रात्री दमदार पाऊस झाल्याने समाधान व्यक्त होतआहे.कौठा परिसरात पाऊस रीमझिमच होता. दमदार पावसाची प्रतिक्षा होती. २० सप्टेंबर रोजी दमदार पाऊस झाल्याने आसना नदीचे पात्र दुथडी भरून वाहत असून ओढे व नाल्यांनाही पहिल्यांदाच पाणी आले आहे. सोयाबीन, कापूस, हळद आदी पिकांना या पावसाने पुन्हा नवी संजीवनी मिळाली असून पाणी पातळीत ही वाढ होणार असल्याने समाधान व्यक्त होत आहे.वसमत परिसरात पाऊसवसमत : तालुकाभरासह वसमत परिसरात गुरुवारी मध्यरात्रीनंतर पावसाने दमदार हजेरी लावल्याने शेतकरी वर्गात प्रसन्नतेचे वातावरण झाले असून शुक्रवारी देखील दिवसभराच्या विश्रांतीनंतर मध्यम पावसाला सुरुवात झाली. हा पाऊस शेतीतील सर्व पिकांसाठी आणि जलसाठ्यासह भूजल पातळी वाढविण्यासाठी उपयुक्त ठरणार असल्याने सर्वत्र आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे. काल रात्रीपासून पडणाऱ्या पावसाने जमिनीची पूर्ण तहान भागवून शेतातील पिकातून पाणी वाहत असल्याने नदी-नाल्यांना देखील पाणी वाहू लागले आहे.पिके बहरलीकळमनुरी : मागील दोन ते तीन दिवसांपासून तालुक्यात जोरदार पाऊस पडत आहे. या पावसामुळे पीके बहरली असून जलस्त्रोतांना बºयापैकी पाणी आले आहे. १९ व २० सप्टेंबर या दोन दिवसात दमदार पाऊस पडल्याने या पावसामुळे सोयाबीन, कापूस, ज्वारी, तूर ही पीके बहरली आहेत.कळमनुरी तालुक्यातील काही भागात मूग तोडणीचे काम सुरू आहे. या पावसामुळे नाले, विहीरी, हातपंपांना पाणी आले आहे. एकुणच जलस्तर वाढलेला आहे. तालुक्यात सगळीकडे दमदार पाऊस पडत आहे. आतापर्यंत तालुक्यात सगळीकडे दमदार पाऊस पडत आहे. ४९३.८ टक्के पाऊस पडला आहे. या पावसामुळे इसापूर धरणाची पाणीपातळी वाढत चालली आहे. या पाण्यामुळे शेतकरीही सुखावला आहेकनेरगावातही पाऊसकनेरगाव नाका : येथे २० सप्टेंबर रोजी रात्री ८ वाजल्यापासून ढगाळ वातावरण व विजेच्या लखलखाटात रिमझीम पावसाला सुरवात झाली असून पाऊस जास्त जोरात पडण्याची शक्यता दिसत आहे. थंड वारे सुटले आहे. त्यात पावसाची रीपरीप सुरू आहे.तलाव ओसंडलाऔंढा नागनाथ : येथे गुरुवारी रात्री साडेबाराच्या सुमारास मुसळधार पावसाने हजेरी लावली होती. या पावसामुळे काठावर असलेल्या औंढा नागनाथ तलाव हा ओसंडून वाहत आहे. या तलावाच्या सांडव्यातून आता पाणी ओवर फुल होऊन वाहत आहे.दिवसभर उघडल्यानंतर रात्री सातच्या सुमारास रिमझिम पावसाला सुरुवात झाली. हा पाऊस रात्र भर पडण्याची शक्यता आहे.

टॅग्स :RainपाऊसNatureनिसर्ग