शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्यात दुष्काळामुळे स्थिती गंभीर: शरद पवारांनी राज्य सरकारकडे केल्या ७ महत्त्वाच्या मागण्या!
2
पुणे पोर्शे कार अपघात: फडणवीसांनी विरोधकांना सुनावले, “प्रत्येक गोष्टीत राजकारण योग्य नाही”
3
निवडणूक संपताच शिंदे गटात वादाचे फटाके; "गजानन किर्तीकरांवर कारवाई झाली तर..."
4
चालताना नेमकं काय लक्षात ठेवायचं... वेळ, पावलं की अंतर?; वजन लवकर होईल कमी
5
लैला खान हत्या प्रकरणात सावत्र वडिलांना फाशीची शिक्षा, १३ वर्षांनी अभिनेत्रीला मिळाला न्याय
6
विधान परिषदेच्या निवडणुकीची नवी तारीख जाहीर; शिक्षक, पदवीधर मतदारसंघांसाठी या दिवशी मतदान
7
"सांगली जिल्हाप्रमुखाचं विधान उबाठाला मार्ग दाखवणारं, जर..."; संजय शिरसाटांचा निशाणा
8
१ वर ३ फ्री शेअर देतेय ही एनर्जी कंपनी, रेकॉर्ड डेट दरम्यान शेअरवर गुंतवणूकदारांच्या उड्या
9
"ब्राह्मण-बनिया समाजातही गरीब लोक, त्यांना आरक्षण मिळू नये का?" मोदींचा काँग्रेसवर घणाघात
10
“याचिकेची वेळ चुकली, आता निवडणुका झाल्यावर सुनावणी”; सुप्रीम कोर्टाचा दिलासा देण्यास नकार
11
Inflation Calculator: २० आणि २५ वर्षांनंतर किती असेल १ कोटी रुपयांचं मूल्य? गणित समूजन करा गुंतवणुकीचं प्लॅनिंग
12
कडक उन्हातून घरी आल्यावर किती वेळानंतर पाणी प्यावं?; जाणून घ्या हेल्थ एक्सपर्टचा सल्ला
13
Narendra Modi : "काँग्रेसच्या काळात पाकिस्तान डोक्यावर नाचायचा, आज त्याची काय अवस्था..."; मोदी कडाडले
14
IPL 2024: दिनेश कार्तिक पाठोपाठ टीम इंडियाच्या आणखी एका स्टार खेळाडूचे निवृत्तीचे संकेत
15
Rituals: मंदिरात घंटा का बांधतात? नवस फेडण्यासाठीही घंटेचा वापर का केला जातो ते जाणून घ्या!
16
प्रिटी वुमन! प्रिती झिंटानेही Cannes मध्ये लावली हजेरी, व्हाईट आऊटफिटमध्ये दिसली परी!
17
कोण कोणाला वाचवतेय! बाळाला पोर्शे कारची चावी कोणी दिली? बिल्डर बाप अन् आजोबा दोघेही म्हणतायत 'मी-मी'
18
"जिथं स्फोट झाला तिथे बॉयलर नव्हताच..."; डोंबिवलीतील स्फोटामागचं खरं कारण काय?
19
अशोक सराफ आणि रोहिणी हट्टंगडी यांना मराठी नाट्य परिषदेचा जीवनगौरव पुरस्कार जाहीर
20
“लोकसभा निवडणूक ग्रामपंचायतसारखी केली, PM मोदींनी लक्ष्मणरेषा ओलांडली”: प्रकाश आंबेडकर

हिंगोली जिल्ह्यात जोरदार पाऊस; सिद्धेश्वर धरणाचे आठ दरवाजे उघडले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 17, 2020 7:18 PM

परभणी व हिंगोली जिल्ह्यातील नदीकाठच्या 27 गावांना  सतर्कतेचा इशारा

ठळक मुद्देपावसाचा जोर कायम राहिल्यास विसर्ग वाढविण्याचे संकेत

औंढा नागनाथ : तालुक्यातील सिद्धेश्वर धरणाच्या पाणलोट क्षेत्रात येलदरी धरणातील पाण्याची मोठ्या प्रमाणात आवक होत आहे. या सोबतच सर्वदूर संततधार पाऊस होत असल्याने धरणाची पाणी पातळी वाढली आहे. यामुळे धरणाचे आठ दरवाजे उघडण्यात आले आहेत. धरणातून  पूर्णा नदी पात्रात मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग करण्यात आल्याने हिंगोली व परभणी जिल्ह्यातील नदी काठच्या  27 गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. 

जोरदार पाऊस सुरु असल्याने येलदरी धरणातून 10 गेटच्या माध्यमातून ३० हजार घनफुट प्रति सेकंद प्रमाणे पाणी सोडण्यात येत आहे. तसेच सिद्धेश्वर धरणाच्या पाणलोट क्षेत्रात पावसाचा जोर वाढल्याने पाणी पातळीत मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. यामुळे धरणाचे 8 दरवाजे  वक्रद्वार 5  फूट उचलून 34  हजार  600 क्यूसेक्स पाणी पूर्णा  नदीपत्रात सोडण्यात आले आहे. पावसाचा जोर कायम राहिल्यास विसर्ग वाढविण्याचे संकेत पाटबंधारे विभागाचे अभियंता वसीउल्ला खान व अंकित तिवारी यांनी दिले आहे. मोठ्या प्रमाणातील विसर्गामुळे पूर्णा नदी दुधडी भरून वाहत असल्याने पूर परिस्थिती उदभवण्याची शक्यता आहे. यामुळे नदी काठच्या  27 गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.  

टॅग्स :WaterपाणीHingoliहिंगोलीRainपाऊस