शहरं
Join us  
Trending Stories
1
“बेस्ट निवडणुकीत हसे करून घेतले, ब्रँडचा बँड वाजला”; CM फडणवीसांची ठाकरे बंधूंवर बोचरी टीका
2
“लिहून घ्या, काही झाले तरी आता मुंबईत...”; CM फडणवीसांनी मुंबई मनपा निवडणुकीचे रणशिंग फुंकले
3
Asia Cup 2025 : बांगलादेशनं मॅच जिंकली; अफगाणिस्तानला अजूनही स्वबळावर बाजी पलटण्याची संधी, पण...
4
'आपण दहशतवादी नाही… पाकिस्तानसाठी लढलो'; काय म्हणाला जैश कमांडर? भारताविरुद्धही ओकली गरळ
5
West Indies Squad For India Test Series : दिग्गजाच्या पोराला संधी; माजी कर्णधाराचा पत्ता कट
6
लाखो लोकांची फसवणूक, दीड वर्षांपासून फरार; अखेर ‘ज्ञानराधा’च्या अर्चना कुटे यांना अटक
7
७ तास चालली चर्चा, भारतावर लादलेला ट्रम्प टॅरिफ अमेरिका कमी करणार? पाहा, बैठकीत काय झाले...
8
दोन मुंबईकरांसोबत नेट प्रॅक्टिस करताना दिसला हिटमॅन रोहित शर्मा; फोटो व्हायरल
9
“सध्याचे वातावरण सरकारला पोषक नाही, पराजयाच्या भीतीने निवडणुका पुढे ढकलल्या”: विजय वडेट्टीवार
10
BAN vs AFG : 'चमत्कारी' खानचा हिट शो! भुवीचा विक्रम मोडला; हार्दिक पांड्यालाही संधी, पण...
11
म्युच्युअल फंड असावा तर असा...! ₹10000 ची SIP गुंतवणूक ₹1.79 कोटींवर पोहोचली, गुंतवणूकदारांना केलं मालामाल
12
इस्रायलचा येमेनच्या बंदरावर मोठा हवाई हल्ला, हुथी बंडखोरांचा दावा!
13
‘भारताने अमेरिकेच्या मध्यस्थीचा प्रस्ताव नाकारला’, पाकिस्तानने केली ट्रम्प यांच्या दाव्याची पोलखोल
14
IND vs PAK मॅचनंतर वातावरण तापलंय! बॉयकॉटची धमकी देणाऱ्या पाक संघानं घेतला हा निर्णय
15
जीएसटीत कपात अन् बँकांत गर्दी...! लोक कार लोन रद्द करू लागले, काय आहे कारण...
16
'या' मुस्लीम देशावर मोठा हल्ला करण्याच्या तयारीत इस्रायल, दिला बंदरं रिकामी करण्याचा अल्टीमेटम!
17
कोराडी परिसरात पर्यावरण पर्यटन प्रकल्पाला प्रतिवर्ष १ रूपये भाडे तत्वावर जमीन मंजूर
18
“सत्तेत नसूनही काँग्रेसकडून तरुणांच्या हाताला काम, प्रत्येक जिल्ह्यात रोजगार मेळावा”: सपकाळ
19
मालेगाव ब्लास्ट प्रकरण : साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर यांच्यासह ७ जणांच्या निर्दोष मुक्ततेविरोधात उच्च न्यायालयात सुनावणी, आली मोठी अपडेट
20
केवळ ₹11,000 मध्ये आपली बनवा 'ही' नवी ढासू SUV, 52 भाषांसह AI असिस्टंन्ट अन् बरंच काही;  कंपनीनं सुरू केली बुकिंग

"फडणवीसांच्या डोक्याला आयुष्यभर गुलाल लागू देणार नाही"; जरांगे पुन्हा कडाडले

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 12, 2024 13:49 IST

महायुती सरकारने मराठा समाजाला दिलेलं १० टक्के आरक्षण कायद्याच्या चौकटीत टिकणारं नाही.

हिंगोली - देशाती लोकसभा निवडणुकांची घोषणा अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपली असल्याने राजकीय नेते युती व आघाडीच्या जागावाटपात व्यस्त आहेत. दुसरीकडे उपोषणकर्ते मनोज जरांगे यांनी पुन्हा एकदा विराट सभा घेणार असल्याचे सांगत, दौरा सुरू आहे. हिंगोली येथील दौऱ्यात जरांगेंनी पुन्हा एकदा गृहमंत्री देवेंद्र फडणवीसांवर निशाणा साधला. एसआयटी चौकशी नेमल्यावरुन संताप व्यक्त करत, मराठे तुमच्या डोक्याला आयुष्यभर गुलाल लागू देणार नाहीत, अशा शब्दात जरांगेंनी फडणवीसांवर टीका केली. तर, बीडमधील जाळपोळीच्या घटनेवरही त्यांनी भाष्य केलं.  

महायुती सरकारने मराठा समाजाला दिलेलं १० टक्के आरक्षण कायद्याच्या चौकटीत टिकणारं नाही. त्यामुळे सरकारने सगेसोयरे अधिसूचनेची अंमलबजावणी करून मराठ्यांना ओबीसीतून आरक्षण द्यावं, अशी मागणी मनोज जरांगेंनी केली आहे. लोकसभा निवडणुकांपूर्वी पुन्हा एकदा मराठा समाजाची विराट सभा होणार असून त्यासाठी ९०० एअरची जागा पाहण्याचं काम सुरू असल्याचंही जरांगेंनी बीडमध्ये सांगितलं होतं. त्यानंतर, आता हिंगोली दौऱ्यात असताना जरांगेंनी पुन्हा एकदा फडणवीसांना लक्ष्य केलं. 

राज्य सरकारने नेमलेल्या एसआयटी चौकशीवर बोलताना, दूध का दूध, पाणी का पाणी होऊ द्या, पण तसं होणार नाही. बारा बलुतेदार असू द्या, गोरगरीब जनता असू द्या, सगळे गुतणार. पण, मराठे भीतच नाहीत गुतायला. तुम्ही एसआयटी नेमलीय ना, आता राज्यात दुषित वातावरण झालंय. नाराजीची प्रचंड लाट आली आहे, तुम्हाला भावनिक लाट काय असते, आणि आयुष्यात केलेली चूक किती महागात पडेल हे फडणवीसांच्या लक्षात येणार आहे, असे म्हणत जरांगे पाटील यांनी पुन्हा एकदा फडणवीसांना लक्ष्य केलं आहे. तसेच, कायम राजकीय आयुष्यातून बरबाद होणार, तुम्ही किती खुनशी आहात हे आम्हाला माहिती आहे. पण, मराठे एवढे खुनशी आहेत की, आयुष्यभर तुमच्या डोक्याला गुलाल नाही लागू देणार, असेही जरांगे यांनी म्हटलं आहे. 

बीडमधील ते लोकं कुठं गेली? - जरांगे

तुम्हीच आमच्या विरोधात आंदोलनं बसवली, त्याला पैसेही पुरवले आहेत. बीडमधील हॉटेल कुणी जाळलंय, त्या हॉटेलमधून पडलेले लोकं कोणत्या दवाखान्यात गेले आहेत, आत्तापर्यंत त्यांचा मेळ नाही. हॉटेल जाळणारे लगेच पडले, तिथे अॅम्ब्युलन्स होती, त्यातून ते रुग्णालयातही गेले, मग ते तिथून कुठं गेले, असा सवाल मनोज जरांगे यांनी उपस्थित केला आहे. 

 

टॅग्स :Manoj Jarange Patilमनोज जरांगे-पाटीलDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसBJPभाजपाMaratha Reservationमराठा आरक्षणmarathaमराठा