शहरं
Join us  
Trending Stories
1
"शरद पवारांनी जाणीवपूर्वक 'ते' वक्तव्य केले"; पहलगामबाबतच्या 'त्या' विधानावरुन भुजबळांचे स्पष्टीकरण
2
MI vs LSG : बॅटिंग-बॉलिंग सगळ्यात भारी! पुन्हा दिसतोय MI चा चॅम्पियनवाला तोरा
3
पाकिस्तानात भीतीचे वातावरण; लष्कर प्रमुखानंतर बिलावल भुट्टोचे कुटुंबीय देश सोडून पळाले
4
मध्य प्रदेशात भीषण अपघात; भरधाव कार विहिरीत कोसळली, 12 जणांचा मृत्यू
5
जसप्रीत बुमराहची रेकॉर्ड ब्रेक इनिंग; मुंबई इंडियन्सकडून 'अशी' कामगिरी करणारा पहिलाच!
6
IPL 2025: गगनचुंबी षटकार तोही बुमराहला; बिश्नोईचा आनंद गगनात मावेना! पंतची रिॲक्शनही व्हायरल (VIDEO)
7
सीमेवर तणाव वाढताच पाकिस्तानने चीनकडे मागितले १.४ बिलियन डॉलर
8
Suryakumar Yadav : ...अन् सूर्या भाऊ ठरला IPL मध्ये सर्वात कमी चेंडूत ४००० धावा करणारा भारतीय
9
"लाडक्या बहि‍णी १५०० मध्ये खूष, २१०० रुपये देऊ असं कुणीच म्हटलं नाही"; नरहरी झिरवाळांचे विधान
10
व्हाईट बॉल क्रिकेटमध्ये स्मृती मानधनाची ऐतिहासिक कामगिरी, मेग लॅनिंगचाही विक्रम मोडला!
11
"पहलगाममधील मृतांच्या कुटुंबीयांना नागरी शौर्य पुरस्कार द्या"; सुप्रिया सुळेंचे CM फडणवीसांना पत्र
12
सूर्यकुमार अन् रायनचा झंझावात, नमन धिरनेही चोपले; लखनौसमोर 216 धावांचे आव्हान...
13
दहशतवादी हल्ल्यानंतर अतुल कुलकर्णी पोहोचले काश्मीरला, म्हणाले- "इथे सध्या सुरक्षित असून..."
14
"हिंमत असेल बोलून दाखवा की भारतीय सैन्यात..."; शहीद सैनिकाला निरोप देताना भावाचे अंगावर काटा आणणारे भाषण
15
मदरसे, मशिदी तीन दिवसांत ओस पडल्या! स्ट्राईक होणार या शक्यतेने दहशतवादी पळाले
16
लंकेत टीम इंडियाचा डंका! आधी स्नेह राणाचा जलवा! मग सृती, हरलीनसह प्रतिकानं लुटली मैफिल
17
BRICS ची महत्वपूर्ण बैठक; परराष्ट्र मंत्री अन् राष्ट्रीय सुरक्षा सल्लागारांची अनुपस्थिती, कारण काय...
18
राणा सांगा वाद! सपा खासदार रामजीलाल सुमन यांच्या ताफ्यावर हल्ला; अनेक वाहनांचे नुकसान...
19
आले किती, गेले किती...! एकट्या दिल्लीत ५००० पाकिस्तानी, IB ने यादी सोपविली; पुढे काय...
20
खळबळजनक! भाजी बनवण्यासाठी मोठा बटाटा घेतला म्हणून पत्नीची कुऱ्हाडीने हत्या

गुराढोरांसह ग्रामस्थ उतरले रस्त्यावर; उपासमारीमुळे सरकारचा निषेध

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 22, 2019 02:29 IST

मुख्यमंत्री कार्यालयाचे आदेश धाब्यावर

सेनगाव (जि. हिंगोली) : दुष्काळ, नापिकी, कर्जबाजारीपणामुळे उपासमारीची वेळ आलेल्या ग्रामस्थांनी ताकतोडा गाव विक्रीला काढल्याची सरकारी पातळीवर पुरेशा गांभीर्याने दखल घेतली न गेल्याने अखेर ग्रामस्थ गुराढोरांसह रस्त्यावर उतरले आहेत.

शासकीय योजनांचा लाभ मिळत नसलेल्या ताकतोडा गावाची व्यथा लोकमतने मांडल्यानंतर मुख्यमंत्री कार्यालयाने त्याची दखल घेतली. गावकऱ्यांच्या समस्या सोडविण्याचे पालकमंत्र्यांनी निर्देश दिले. जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी यांनी तहसीलदारांना गावात जाऊन दोन दिवसांत सविस्तर अहवाल देण्याच्या सूचना दिल्या. मात्र तहसीलदार व स्थानिक अधिकाऱ्यांनी ग्रामस्थांना केवळ आश्वासने दिली. त्याच्या निषेधार्थ ग्रामस्थांनी रविवारी ग्रामपंचायतीच्या कार्यालयासमोर गुराढोरांसह दिवसभर आंदोलन केले.

फसवी कर्जमाफी, पीकविम्याचा लाभ न मिळाल्याने शेतकºयांनी इच्छामरणाची परवानगी मागितली आहे. तीन दिवसांपासून शासनाच्या विरोधात सुरू असलेले आंदोलन रविवारी कायम होते. जबाबदार व्यक्ती मागण्या मान्य करेपर्यंत ग्रामस्थांचे आंदोलन सुरूच राहणार आहे.

स्थानिक अधिकाºयांची आश्वासने फसवीस्थानिक अधिकाºयांची आश्वासने फसवीतहसीलदार जीवककुमार कांबळे यांनी प्रत्यक्ष गावात जाऊन ग्रामस्थांशी चर्चा केली. ग्रामस्थांनी पीकविमा, कर्जमाफी या प्रमुख मुद्द्यांसह पीककर्ज देण्याची मागणी केली. मात्र, पीकविमा व कर्जमाफी हे शासन स्तरावरील मुद्दे असल्याने ते शासनाकडे पाठवू, असे तहसीलदारांनी सांगितले. त्यामुळे ग्रामस्थांचे समाधान झालेले नाही. आश्वासने फसवी असल्याचे त्यांचे म्हणणे आहे.

टॅग्स :Chief Ministerमुख्यमंत्री