शहरं
Join us  
Trending Stories
1
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
2
लाडात वाढवलं, खूप शिकवलं, पण मुलीनं पळून जाऊन लग्न केलं, संतप्त कुटुंबानं जिवंतपणी काढली अंत्ययात्रा 
3
अंगठी घातल्याने अथवा नाव बदलल्याने नशीब बदलतं का? प्रेमानंद महाराजांनी दिलं असं उत्तर
4
NCP नेत्यांची अजितदादांसोबत बैठक, CM फडणवीसांशीही चर्चा अपेक्षित; २९ मनपात महायुती म्हणून…
5
U19 Asia Cup 2025 : ठरलं! आशिया कप स्पर्धेत पुन्हा भारत-पाक यांच्यात रंगणार फायनल!
6
“भगवान ऋषभदेवांचे विचार भारताच्या प्राचीन व महान संस्कृतीचे प्रतीक”: CM देवेंद्र फडणवीस
7
सावधान! तुम्हीही घाईघाईत जेवताय? आताच बदला सवय; स्वत:च देताय अनेक आजारांना आमंत्रण
8
IPL 2026: प्रिती झिंटाचा मास्टरस्ट्रोक! लिलावात बोली लावली, तिकडे पठ्ठ्याने केली तुफानी खेळी
9
"मी हरियाणामध्ये हिंदू महिलेचे 'घूंघट' खेचले असते तर...", नीतीश कुमारांच्या हिजाब वादावर काय म्हणाले उमर अब्दुल्ला?
10
७१ व्या वर्षी रेखा यांनी केलं लग्न? भर कार्यक्रमात स्वतःच केला मोठा खुलासा; म्हणाल्या, "प्रेम आहे तर..."
11
प्यारवाली लव्हस्टोरी! ब्रेकअपनंतर शोधला डिजिटल पार्टनर; चक्क AI बॉयफ्रेंडसोबत बांधली लग्नगाठ
12
ED: बेटिंग ॲप प्रकरणी युवराज सिंग, रॉबिन उथप्पा यांची मालमत्ता जप्त; ईडीची मोठी कारवाई
13
“सत्य लपून राहत नाही, आता दुसरा मंत्रीही राजीनामा देणार”; उद्धव ठाकरेंचा रोख कुणाकडे?
14
'सेबीची कारवाई म्हणजे आर्थिक मृत्यूदंड' अवधूत साठेंच्या वकिलांचा 'सॅट'मध्ये युक्तिवाद; काय दिला निर्णय?
15
Anurag Dwivedi : २०० रुपयांपासून सुरुवात, आता कोट्यवधींची कमाई; ९ वर्षांत युट्यूबर अनुराग द्विवेदी कसा बनला धनकुबेर?
16
IND vs SL, U19 Asia Cup Semi Final 1 : वनडेत टी-२० ट्विस्ट! श्रीलंकेनं टीम इंडियासमोर ठेवलं १३९ धावांच लक्ष्य
17
राज ठाकरे एक्शन मोडवर! मनपा निवडणुकीपूर्वी शाखा भेटींवर जोर; २ दिवस मुंबई शहर पिंजून काढणार
18
राज आणि उद्धव ठाकरे मुंबईतील 'या' ११३ जागांवर विशेष लक्ष देणार, जागावाटपात ‘MaMu’ फॉर्म्युला वापरणार  
19
बाजारात पुन्हा 'बुल्स'चे पुनरागमन! सलग ४ दिवसांच्या घसरणीला ब्रेक; 'हे' शेअर्स ठरले टॉप गेनर्स
20
Viral Video: धैर्य आणि प्रसंगावधान! अचानक केसांनी पेट घेतला तरी शाळकरी मुलगी डगमगली नाही...
Daily Top 2Weekly Top 5

गोवर-रूबेला लसीकरण मोहिमेस उद्यापासून प्रारंभ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 26, 2018 00:12 IST

जिल्ह्यात २७ नोव्हेंबर पासून गोवर- रूबेला लसीकरण मोहीम राबविण्यात येणार आहे. ९ ते १५ वयोगटातील बालकांना ही लस देण्यात येणार असून यासाठी आरोग्य विभागाने कंबर कसली आहे. जवळपास दीड महिना ही मोहीम सुरू राहणार आहे. ३ लाख १८ हजार २३० बालकांना लस देण्याचे उदिष्ट आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कहिंगोली : जिल्ह्यात २७ नोव्हेंबर पासून गोवर- रूबेला लसीकरण मोहीम राबविण्यात येणार आहे. ९ ते १५ वयोगटातील बालकांना ही लस देण्यात येणार असून यासाठी आरोग्य विभागाने कंबर कसली आहे. जवळपास दीड महिना ही मोहीम सुरू राहणार आहे. ३ लाख १८ हजार २३० बालकांना लस देण्याचे उदिष्ट आहे.गोवर हा अत्यंत संक्रामक आणि घातक आजार आहे. जो मुख्यत: मुलांना होतो. गोवर आजारामुळे भारतामध्ये दरवर्षी ५० हजार रूग्ण मृत्युमुखी पडतात. रुबेला या आजाराचा संसर्ग गरोदर मातांना झाल्यास गर्भपात किंवा जन्मजात दोष निर्माण होऊ शकतात. यात बहिरेपणा आणि हृदयविकृती होऊ शकते. त्यामुळे गोवर, रूबेला ही लस दिली जाणार आहे. आरोग्य विभागाकडे २ लाख १६ हजार डोस उपलब्ध आहेत.भारत सरकारने २०२० पर्यंत गोवर आजाराचे निर्मुलन व रुबेला या आजाराचे नियंत्रणाचे उद्दिष्ट ठेवले आहे. त्यानुसार २७ नोव्हेंबरपासून जिल्ह्यात गोवर-रुबेला लसीकरण मोहिम राबविण्यात येणार आहे. मोहीमेअंतर्गत ९ महिने ते १५ वर्ष वयोगटातील जवळपास ३ लाख १८ हजार २३० बालकांना लस देण्यात येणार आहे. जवळपास दिड महीना ही मोहीम राबविली जाणार आहे. सदर मोहिम शिक्षण विभाग, महिला व बाल कल्याणच्या संयुक्त विद्यमानाने राबविण्यात येणार आहे.जनजागृती : जागतिक आरोग्य संघटनेतर्फे पाहणीआरोग्य विभागाने जिल्हाभरात कार्यशाळा, यात्रोत्सव व मेळावे घेऊन तसेच बॅनर, पोस्टर, शाळेतील विद्यार्थ्यांची प्रभातफेरी, पथनाट्य, सांस्कृतिक कार्यक्रम, भजन व किर्तन शाळेत विविध स्पर्धांचे आयोजन करून जनजागृती केली. विशेष म्हणजे जागतिक आरोग्य संघटनेचे प्रतिनिधी डॉ. दिलीप देशमुख हे २९ ते ३० आॅक्टोबर दरम्यान गोवर-रुबेला लसीकरण तपासणीसाठी हिंगोली जिल्हा दौऱ्यावर आले होते. त्यांनी अनेक गावांना भेटी देऊन अंगणवाडी, आशा स्वयंसेविका, व मातांच्या भेटी घेत गोवर रुबेला लसीकरणा बाबत माहितीही विचारली होती. यावेळी त्यांना समाधानकार उत्तरेही मिळाली होती.गोवर आणि रूबेला नेमका कोणता आजार आहे?४गोवर हा प्राणघातक व संसर्गजन्य रोग आहे. बालकांमधील अपंगत्व तसेच मृत्यूच्या प्रमुख कारणांपैकी आहे. या रोगामाध्ये रूग्णाला ताप येणे, सर्दी, वारंवार खोकला, पुरळ येणे, डोळे लाल होणे, इत्यादी लक्षणे आढळतात. हा रोग रूग्णांच्या खोकल्याद्वारे पसरतो. रूबेला रोगाचे गर्भवती महिलेला गर्भावस्थेत सुरवातीच्या काळात संसर्ग झाला तर त्याचा परिणाम सीआरएस मध्ये होऊ शकतो. त्याचा परिणाम गर्भ आणि नवजात शिशुसाठी गंभीर आहे. रूबेला संसर्ग झालेल्या मातांनी जन्म दिलेल्या बालकांना विकृतीची संभावना असते परंतु हे दोन्ही रोग लसीकरणामुळे टाळता येतात. अशी माहिती जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. शिवाजी पवार यांनी दिली.गोवर, रूबेला लस जिल्हा आरोग्य विभागाकडे उपलब्ध झाली आहे. लसीकरण मोहीम राबविण्यात येणारी यंत्रणाही सज्ज असून ९ ते १५ वयोगटातील मुला, मुलींना लस देण्याचे आवाहन आरोग्य विभागातर्फे करण्यात आले आहे. शाळा अंगणवाडी व प्राथमिक आरोग्य केंद्र, जिल्हा, उपजिल्हा व ग्रामीण रूग्णालयांत प्रशिक्षित २९८ कर्मचाºयांद्वारे ही लस दिली जाणार असल्याचे जिल्हा विस्तार व माध्यम अधिकारी प्रशांत तुपकरी यांनी ‘लोकमत’ शी बोलताना सांगितले.

टॅग्स :SchoolशाळाHealthआरोग्य