शहरं
Join us  
Trending Stories
1
पहिल्या दोन टप्प्यांतील मतदान पाहून नेत्यांचं वाढलं टेन्शन; सभांना होते गर्दी, मात्र मत देताना लोकांचा हात आखडता
2
सहा देशांमध्ये ९९ हजार टन लाल कांद्याच्या निर्यातीस परवानगी; निर्णय नवा की जुनाच?, याची चर्चा
3
महायुतीची डोकेदुखी वाढली, पाच जागांचा तिढा कायम; आपसांतच रस्सीखेच
4
आजचे राशीभविष्य - २८ एप्रिल २०२४, सार्वजनिक जीवनात मान-प्रतिष्ठा वाढेल
5
ऐन निवडणुकीत बाजारातील पैसा गायब; अंगडियाचे दर भडकले !
6
पूनम महाजन यांना डावलून निकमांना संधी; मुंबई उत्तर-मध्य मतदारसंघात चुरस वाढली
7
लढाई हट्टाची आणि अस्तित्वाची, नेत्यांची कसोटी; 'एकास एक' लढतीचे प्रयत्न फसले
8
अब की बार, देश में जनता की सरकार; महाराष्ट्रात करोडो रुपयांना आमदारांची खरेदी, पक्षांतराचा पायंडा पाडला : प्रियंका गांधी
9
काँग्रेसची सत्ता आली तर ओबींसीचे आरक्षण धर्माच्या नावावर वाटणार : पंतप्रधान मोदी
10
राज्यात सात खासदारांची तिकिटे भाजपने कापली; राजधानी मुंबईतील तिघांनाही बसविले घरी
11
राज्यात पारा चाळिशी पार; मुंबई ३६, तर ठाणे ४१, उष्माघाताच्या रुग्णांची संख्या १८४ वर
12
या झोपडीत राहतो लोकसभेचा उमेदवार, रावेरमधून लढणार; लोकांनी वर्गणी काढून भरले डिपॉझिट
13
राजस्थान रॉयल्सची प्ले ऑफमधील जागा निश्चित! संजू सॅमसन, ध्रुव जुरेल यांची मॅच विनिंग खेळी 
14
“मोदींनी १० वर्षांत एकही पत्रकार परिषद घेतली नाही, मनमोहन सिंग यांनी १११ घेतल्या”: शरद पवार
15
“पंतप्रधान मोदींना भारतरत्न द्या अन् प्रायश्चित करायला हिमालयात पाठवा”: मार्कंडेय काटजू
16
“देशाचे संविधान, कायदा अन् सुरक्षेलाच प्राधान्य देणार”; उज्ज्वल निकम यांची पहिली प्रतिक्रिया
17
इरफान पठाणने दाखवली MI ची मोठी चूक; हार्दिक पांड्या पराभवाचं भलतंच कारण सांगतोय... 
18
मत द्यायचे असेल तर कोणाला देऊ ? हा प्रश्न, कोणी कुठेही...; महेश मांजरेकरांचे राजकारणावर भाष्य
19
'मुंबईकरांचे योद्धे' संसदेत जाणार, उज्ज्वल निकमांचा विक्रमी मतांनी विजय होणार - शेलार
20
मुंबई इंडियन्स प्ले ऑफच्या शर्यतीतून बाद? दिल्ली कॅपिटल्सच्या विजयाने Point Table बदलले

उपोषणकर्त्यांच्या गर्दीने गजबजली जिल्हा कचेरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 15, 2018 12:34 AM

स्वातंत्र्य दिनाच्या पूर्व संध्येला १४ आॅगस्ट रोजी जिल्ह्यातील शासकीय कार्यालये उपोषणकर्त्यांच्या गर्दीने गजबजून गेली आहेत. विविध प्रलंबित मागण्या, शेतीचे वाद, यासह अनेक समस्यांचे निवेदन जिल्हाधिकाऱ्यांना देऊन उपोषण केले जात आहे. दरवर्षीप्रमाणे यावर्षीही जिल्हा कचेरी व इतर शासकीय कार्यालयापुढे मंडप टाकून उपोषण व आंदोलन सुरू आहेत.

लोकमत न्यूज नेटवर्कहिंगोली : स्वातंत्र्य दिनाच्या पूर्व संध्येला १४ आॅगस्ट रोजी जिल्ह्यातील शासकीय कार्यालये उपोषणकर्त्यांच्या गर्दीने गजबजून गेली आहेत. विविध प्रलंबित मागण्या, शेतीचे वाद, यासह अनेक समस्यांचे निवेदन जिल्हाधिकाऱ्यांना देऊन उपोषण केले जात आहे. दरवर्षीप्रमाणे यावर्षीही जिल्हा कचेरी व इतर शासकीय कार्यालयापुढे मंडप टाकून उपोषण व आंदोलन सुरू आहेत.हिंगोली शहरातील विभागीय वन अधिकारी कार्यालयासमोर कळमनुरी तालुक्यातील शिवनी बु. येथील पंडित गंगाराम भालेराव हे कुटुंबियासमवेत उपोषणास बसले आहेत. पंडित यांचा वन विभागाने सागवान पासचा माल जप्त केला तो परत द्यावा, तसेच संबंधित वनरक्षकास निलंबित करून एका खाजगी इसमाविरूद्ध कडक कारवाईच्या मागणीसाठी मंगळवारपासून पंडित कुटुंबिय लेकराबाळांसह उपोषणास बसले आहेत.तसेच वसमत तालुक्यातील पळसगाव येथील सांभा नारायण डुकरे व नितीन टिकाराम सूर्यवंशी हे शाळेत हजर होऊनही संबंधित संस्थाचालक हजेरीपटावर सह्या करू देत नसल्यामुळे जिल्हा कचेरीसमोर उपोषणास बसले आहेत. शाळेवर आल्यास शासकीय कामात अडथळा केल्याप्रकरणी कारवाई करा, अशीही संस्थाचालक धमकी देत असल्याचे जिल्हाधिकाºयांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे.वसमत तालुक्यातील पांगरा शिंदे येथे जलसंधारण विभगामार्फत बांधण्यात आलेल्या पाच बंधाºयांपैकी तीन बंधाºयांच्या कामाची चौकशी करावी. रोही, रानडुकरे व वानरे वन्य जिवांमुळे शेतकºयांचे होणारे नुकसान टाळावे यासह विविध मागण्या शासनाला कळवूनही प्रशासनास दुर्लक्ष करत आहे. त्यामुळे कॉ. बालासाहेब शेषराव शिंदे हे जिल्हा कचेरीसमोर उपोषणास बसले आहेत.सेनगाव तालुक्यातील सावरखेडा येथील देवराव किसन भुरके अपंग असून विहिरीची सामायिक हिश्श्यामध्ये नोंद करण्याची त्यांची मागणी आहे. परंतु याकडे दुर्लक्ष केले जात असल्यामुळे ते उपोषणास बसले.हिंगोली तालुक्यातील घोटादेवी येथील गोदावरी शिंदे जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयासमोर मंगळवारपासून उपोषणास बसल्या आहेत. पोलिसांनी संरक्षण देण्याचे आश्वासन दिले होते. परंतु अद्याप कार्यवाही नाही. विरोधकांनी त्यांच्या हळद पिकाची नासधूस केली आहे.मोंढ्यातील महिला कामगारांचा प्रश्न बनला गंभीर४मागील ४० वर्षांपासून कृषी उत्पन्न बाजार समिती हिंगोली येथील मोंढ्यात काम करणाºया महिलांना अचानक कामावरून काढून टाकण्यात आले. त्यामुळे महिला कामगारांचा उदरनिर्वाहाचा प्रश्न गंभीर बनला आहे. त्यामुळे मोंढ्यात परत काम करण्याची परवानगी द्यावी, या मागणीसाठी जवळपास ४५ महिलां गटा-गटाने जिल्हाधिकारी कार्यालय, जिल्हा सरकारी कामगार अधिकारी कार्यालय, कृषी उत्पन्न बाजार समिती, जिल्हा उपनिबंधक कार्यालय तसेच नागरी हक्क संरक्षण विभाग कार्यालयासमोर उपोषणास बसल्या आहेत. समितीचे पदाधिकारीही आमच्या मागणीकडे लक्ष देण्यास तयार नाहीत. त्यामुळे पालकमंत्री दिलीप कांबळे यांनीच यावर काही तोडगा काढून कामावर पूर्ववत करून घ्यावे, अशी मागणी महिला कामगारांनी ‘लोकमत’ शी बोलताना केली.

टॅग्स :HingoliहिंगोलीMorchaमोर्चा