शहरं
Join us  
Trending Stories
1
काँग्रेसच्या झेंड्याला ठाकरेंच्या मताची काठी; तब्बल दहा वर्षानंतर लोकसभेसाठी काँग्रेसला मुंबईत खाते उघडण्याची संधी
2
पैशांच्या अवैध वाहतुकीवर तिसरा डोळा; निवडणूक आयोगाचे मुंबई आणि परिसरातील रेल्वे स्थानकांवर विशेष लक्ष
3
भर समुद्रात पाकच्या बोटीवरून ६०० कोटींचे ड्रग्ज जप्त; भारतीय तटरक्षक दल, एटीएस व एनसीबीची मोठी कारवाई
4
निवडणुकीत जातीपातीच्या जाणिवा टोकदार ; एकाच जातीचे उमेदवार; तिथे पाहतात पोटजात
5
ठाण्यातील ‘त्या’ सव्वातीन लाख मतांचे मालक कोण? अजित की शरद पवार?
6
देवेगौडांचा नातू ‘सेक्स स्कँडल’मध्ये; विदेशात पलायन? एसआयटी चौकशी
7
साताऱ्यातील प्रचारात मुंबई बाजार समितीतील भ्रष्टाचाराचा मुद्दा ‘हॉट’ ; उदयनराजे भोसले आणि शशिकांत शिंदे यांच्यात थेट लढत
8
1 मे ध्वजारोहण : उमेदवार मंत्री वगळले, पण नातलग ?
9
राष्ट्रीय स्वयंसेवक संघ नेहमीच आरक्षणाचा समर्थक राहिला : मोहन भागवत
10
मोटारीला चपलांचा हार आणि आरोप-प्रत्यारोपांचे प्रहार; जरांगे पाटलांनी केला आरोप
11
यापूर्वीही आरक्षणाला संघाचा विरोध : राहुल गांधी
12
तरुणाई का संतापली? निराश तरुण मतदानाकडेच पाठ फिरवताना दिसताहेत
13
निवडणूक आहे, जिभेला लगाम घाला !
14
दुबईत साकारतेय जगातील सर्वात मोठे विमानतळ; प्रथमच नवीन विमान वाहतूक तंत्रज्ञानाचा होणार वापर
15
त्यांच्या कारकिर्दीत ‘ते’ म्हणतील ते सगळं केलं, आता भावनिक व्हायच नाही; अजित पवारांचा वार
16
IPL 2024 GT vs RCB: RCB चा 'विराट' शो! विल जॅक्सचे ४१ चेंडूत शतक; ४ ओव्हर राखून विजय
17
बारामती, शिरुरमध्ये पोलिसी बळाचा वापर, मतदारांना धमक्या; संजय राऊतांचा गंभीर आरोप
18
"मुस्लीम लोक सर्वाधिक कंडोम वापरतात..."; ओवेसींनी दिला केंद्राच्या डेटाचा हवाला, PM मोदींवर पलटवार
19
बीडमध्ये पंकजा मुंडे, मनोज जरांगे एकाच व्यासपीठावर; दोघांचाही एकमेकांना नमस्कार
20
BANW vs INDW: भारताची विजयी सलामी! बांगलादेश त्यांच्याच घरात ढेर; पाहुण्यांची सांघिक खेळी

कयाधू नदीचा पूर पाहण्याची हौस बेतली जीवावर; प्रसंगावधान राखून आठ जणांची ग्रामस्थांनी केली सुटका 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 21, 2018 4:05 PM

कयाधू नदीला आलेला पूर पाहण्यासाठी आज सकाळी खास रिक्षा करून शेवाळा येथील पुलावर आलेले आठजण पुरात अडकले.

आखाडा बाळापूर (हिंगोली ) : कयाधू नदीला आलेला पूर पाहण्यासाठी आज सकाळी खास रिक्षा करून शेवाळा येथील पुलावर आलेले आठजण पुरात अडकले. मात्र, प्रसंगावधान राखून कवडी येथील ग्रामस्थांनी त्यांना सुखरूप बाहेर काढत त्यांचा जीव वाचवला. 

हदगाव तालुक्यातील नेवरी गावातील विलास इंगळे, बालाजी शिंदे ,संतोष सुर्यवंशी ,किशोर खिल्लारे ,श्रीकांत वानखेडे, उत्तमराव खिल्लारे, रामदास शिंदे, अाबाराव काळे हे आज सकाळी पूर पाहण्यासाठी कयाधू नदी काठावर खास रिक्षा करून आले. शेवाळा जवळ रिक्षा थांबवून ते जवळच्या पुलावर गेले. मात्र येथे उभे असताना अचानक पुराच्या पाण्याची पातळी वाढली. बघता बघता पाणी कंबरेपर्यंत आले. यामुळे या आठही जण घाबरली, मदतीसाठी त्यांनी आरडाओरडा सुरु केला. परंतु,  पाण्याचा प्रवाह मोठा असल्याने शेवाळा गावच्या बाजूने त्यांना वाचवण्यासाठी कोणीही जाऊ शकले नाही. तर दुसऱ्या बाजूस कोणीच उपस्थित नव्हते. 

दरम्यान, बाळापुर पोलीस व महसूल प्रशासनाच्या अधिकाऱ्यांनी कवडी गावचे उपसरपंच दयानंद पतंगे यांना फोन करून ही माहिती दिली. माहिती मिळताच उपसरपंच पतंगे यांनी संदीप गावंडे व राजू पतंगे यांच्यासह शेवाळा पुलाकडे धाव घेतली. येथे हातांची साखळी करत त्यांनी आठही जणांना प्रयत्नपूर्वक सुखरूप बाहेर काढले. यानंतर आठही जण नेवरी गावास परतले. 

 

टॅग्स :riverनदीfloodपूरHingoliहिंगोली