शहरं
Join us  
Trending Stories
1
तेल कंपन्यांना 30,000 कोटींचे अनुदान, उज्ज्वला योजनेसाठी...; केंद्र सरकारने घेतले पाच मोठे निर्णय
2
सरकारने आयकर विधेयक २०२५ मागे घेतले; टॅक्स स्लॅबमध्ये काय बदल होणार? जाणून घ्या...
3
ज्या आदित्य श्रीवास्तवचं नाव घेऊन राहुल गांधींनी ECI ला घेरले; तोच आता समोर आला, सांगितलं 'सत्य'
4
Eknath Shinde : ज्यांनी स्वाभिमान गुंडाळून ठेवला, त्यांचं....; उद्धव ठाकरेंना मागची जागा दिल्यावरून एकनाथ शिंदेंचा टोला
5
राहुल गांधींच्या आरोपानंतर काँग्रेस आक्रमक; दादरमध्ये रास्ता रोको, भाजपाविरोधात घोषणाबाजी
6
NASA : नासाचा मोठा निर्णय! इंटरनॅशनल स्पेस स्टेशन समुद्रात पाडणार! कारण ऐकून धक्का बसेल
7
अतुल परचुरेंच्या आठवणीत भावुक झाले दिलीप प्रभावळकर; म्हणाले, "डॉक्टरांनी त्याला..."
8
IND vs AUS: टीम इंडियाविरुद्ध ऑस्ट्रेलियाचा संघ जाहीर, भारतीय वंशाच्या दोन खेळाडूंना संधी!
9
हृदयस्पर्शी! "तुम्ही माझ्यासाठी श्रीकृष्णासारखे..."; महिलेने साडी फाडून मुख्यमंत्र्यांना बांधली राखी
10
Donald Trump Tariff News : अमेरिकाच टॅरिफबाबत गंडली! ट्रम्प यांची भारताबद्दल कडक भूमिका, पण परराष्ट्र मंत्रालय करतंय कौतुक
11
२ तासांचा हायव्हॉल्टेज ड्रामा, गर्लफ्रेंडच्या मिठीत सापडला नेता; पत्नीला पाहून पती पळाला, पण...
12
आकाश 'वाणी'! वैभव सूर्यवंशीमुळे स्टार विकेट किपर बॅटर संजूवर आलीये संघ सोडण्याची वेळ!
13
भारतीयांसाठी कॅनडा ठरतोय मृत्युचं घर; गेल्या ५ वर्षातील आकडे चिंताजनक!
14
प्राजक्ता माळीने वाढदिवशी घेतलं भीमाशंकरचं दर्शन; म्हणाली, "१२ ज्योतिर्लिंग यात्रा पूर्ण..."
15
चालत्या बसवर झाड कोसळलं, ५ जणांचा मृत्यू; महिला म्हणते, "आयुष्याचा प्रश्न, तुम्ही Video बनवताय"
16
BCCI: बीसीसीआय नव्या प्रशिक्षकाच्या शोधात, अर्जही मागवले! जाणून घ्या पात्रता
17
धनंजय मुंडेंनी मंत्रिपद स्वप्नातही पाहू नये, पुन्हा घेतले तर अजितदादांचा पक्ष संपेल: जरांगे
18
Video: हृदयस्पर्शी! हत्तीच्या पिंजऱ्यात पडला चिमुकला; गजराजाने जे केले त्यानं सर्वांचीच मने जिंकली
19
काय आहे युनिव्हर्सल बँकिंग? ११ वर्षांत पहिल्यांदाच RBI नं कोणत्या बँकेला दिला असा लायसन्स
20
Donald Trump Tariff News : ज्याची भीती होती तेच घडले! वॉलमार्ट अन् अमेझॉनसह अनेक कंपन्यांनी भारतातील ऑर्डर्स रोखून ठेवल्या

हिंगोलीत असना नदीचे उग्ररुप; कुरुंदा, कौठा गावांना पुराचा तडाखा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 18, 2020 10:36 IST

कुरुंदा येथे साडेतीन तासात तब्बल ९२ मिमी पावसाची नोंद

ठळक मुद्देकापूस,सोयाबीन, हळद या उत्पादकांचे अतोनात नुकसानघरात पाणी शिरल्याने नागरिकांची तारांबळ

हिंगोली : कुरुंदा येथे शुक्रवारी रात्री 2 ते सकाळी 5.30वाजेपर्यंत झालेल्या अतिवृष्टीमुळे जलेशवर (असना)नदीचे पात्र ओलांडून गावात महापूर आला. अनेक घरात पाणी घरात पाणी शिरल्याने पुराचा तडाखा नागरिकांना बसला आहे. नदी ,नाल्याकाठचे शेताची खरडाखरडी झाल्याने कापुस, सोयाबीन या पीकांचे अतोनात नुकसान झाले आहे.

कुरुंदा येथे जवळपास 3.30 तास सलग पाऊस झाल्याने या भागातील कुरुंदा, डोनवाडा, सुकळी, कोठारी, कुरुंदवाडी गावातील नदी ,नाले दुथडी भरून शेतांनी पाणी वाहत होते.शुक्रवारी रात्री 92 मिमी पाऊस झाल्याची नोंद असून या पावसाळ्यात हा या भागात सर्वात मोठा पाऊस होता.

कुरुंदा नदीचे पात्र ओलांडून रस्त्याने गुडघ्याऐवळे पाणी वाहत होते.गावातील पाणी बाहेर जाण्यासाठी मार्ग नसल्याने हे पाणी चक्क अनेक वस्तीतील घरात शिरले.गणेश नगर,आरामशिन भाग,लवहुजी नगर ,श्रीवस्ती नगर,साईबाबा गल्ली,संत तुकाराम महाराज गल्ली, रायगड नगर,दर्गा मोहल्ला या वस्तीतील शेकडो घरात पाणी शिरले होते.त्यामुळे संसारउपयोगी साहित्याचे अतोनात नुकसान झाले परंतु जीवितहानी झाली नाही.रात्री पासून घरात पाणी शिरू लागल्याने काहीनी पत्रावर तर काहीनी उंच ठिकाणी, शेजारच्या इमारतीत थांबण्याची वेळ नागरिकावर आली होती. गावातील पाणी थेट नदीत जाण्यासाठी कोणताच नाला नसून ग्रा प गाळेच्या  पाठीमागचे पाणी बाहेर जाण्यासाठी कोणतीच ठोस उपायोजना नाही त्याकडे ग्रा.प. दुर्लक्ष दिसते. 

दरवर्षी महापुरचा फटका बसला परंतु ठोस उपाययोजना आखल्या जात नाही.अनेक वस्तीसह गावातील दुर्गामाता मंदीराला पाण्याने वेढले होते.नदी ,नाल्याचे पाणी शेतात वाहत असल्याने कापूस,सोयाबीन, हळद या उत्पादकांचे अतोनात नुकसान झाल्याचे चित्र दिसते.या पुराचा शेतीला मोठा तडाखा बसला आहे.कुरुंदयासह कोठारी,डोणवडा,सुकळी, कुरुंदवाडी, या गावातील शेतीचे नुकसान झाले आहे.2016 मध्ये 29 जून रोजी ढगफुटी झाली होती तेव्हा 144 मिमी सर्वाधिक पाऊस झाला होता.पुरात झालेल्या नुकसानाची पाहणी करिता एकही वरीष्ठ अधिकारी कुरुंदयाकडे फिरकला नाही.

कौठा गावालाही तडाखा 

कौठ्यात ही असना नदीचा प्रकोप झाला असून प्रचंड महापूर आलेला आहे, नदीकाठचा पूर्ण परिसर जलमय झालेला असून  सकाळी ३ ते ५ दरम्यान ढगफुटी सारखा पाऊस झाला असून अजूनही आभाळ भरून आहे,नदीकाठची शेती खरडून गेली असून वसमत कौठा कुरुंदा मार्गावरील तोंडपुसी ओढ्याला ही पुरामुळे शेतीचे नुकसान झाले आहे

टॅग्स :Hingoliहिंगोलीfloodपूरriverनदी