शहरं
Join us  
Trending Stories
1
ते कुणालाच नको होते; एकनाथ शिंदेंच्या मुख्यमंत्रीपदाबाबत संजय राऊत यांचा नवा दावा
2
नॅचरल आईस्क्रीमचे संस्थापक रघुनंदन श्रीनिवास कामथ यांचे निधन; वयाच्या ७० व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास 
3
MS Dhoniचा मैदानाबाहेर मारलेला षटकार ठरला CSKच्या पराभवाचे कारण? RCBला मॅच जिंकण्यासाठी झाली मदत
4
"प्रेक्षकांचा आवडता संघ नेहमी जिंकेलच असं नाही पण लोकशाहीत...", सचिनचं मतदारांना आवाहन
5
पुण्यात आलिशान पोर्शे कारने दोघांना चिरडले; तरुण-तरुणी जागीच ठार
6
तुमको मिरची लगी तो मैं क्या करू? ठाण्यासाठी ‘करो या मरो’च्या लढाईला सिद्ध व्हा - देवेंद्र फडणवीस 
7
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते प्रतापराव भोसले यांचे निधन
8
४० कोटींची रोकड सापडली, मोजणी अजूनही पूर्ण नाही... बुटांच्या व्यापाऱ्यांची अफाट संपत्ती
9
राष्ट्रवादीकडे त्यावेळी मुख्यमंत्रीपदासाठी योग्य उमेदवार नव्हता; शरद पवारांनी सगळंच सांगितलं
10
भाजप आरएसएसला संपवायला निघालाय, उद्धव ठाकरे यांचा मुंबईत संयुक्त पत्रकार परिषदेत आरोप
11
मतदानाची टक्केवारी अचानक कशी वाढते? निवडणूक आयोगाने स्पष्ट केली बाजू
12
'छगन भुजबळांना मुख्यमंत्रिपद दिले असते तर पक्ष...'; शरद पवारांचा मोठा गौप्यस्फोट
13
पतंजलीची सोन पापडी गुणवत्ता चाचणीत फेल, सहाय्यक व्यवस्थापकासह तिघांवर कारवाई
14
आनंदवार्ता : यंदा धो-धो बरसणार; मान्सून आज अंदमानात तर ३१ मे रोजी केरळात धडकणार
15
गॅसच्या टँकरचा भीषण स्फोट, आगीत घरे व वाहने भक्ष्यस्थानी; शेलपिंपळगावातील घटना
16
काश्मीरमध्ये निवडणुकीपूर्वी दुहेरी हल्ला; भाजपच्या माजी सरपंचाची गोळ्या झाडून हत्या
17
दिल्लीत महाभ्रष्टाचाऱ्याला इंडी आघाडीने स्वीकारले; काँग्रेसला ४ जागाही लढवता आल्या नाहीत, मोदींचा हल्लाबोल 
18
आजचे राशीभविष्य - १९ मे २०२४, अचानक धनलाभाची शक्यता,व्यावसायिक क्षेत्रात लाभ होतील
19
'हार मानणार नाही..'; कार्तिक आर्यनच्या 'चंदू चँपियन'चा ट्रेलर, मराठमोळ्या हेमांगी कवीने वेधलं लक्ष
20
मविआ राज्यात ४६ जागा जिंकणार; काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी व्यक्त केला विश्वास

बोगस बियाणे विक्री प्रकरणात इंदूर येथील कंपनीवर गुन्हा दाखल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 20, 2020 5:29 PM

वसमत तालुक्यात १२८ शेतकऱ्यांनी सोयाबीनचे बियाणे उगवलेच नाही, अशी तक्रार कृषी विभागाकडे केली.

ठळक मुद्देतक्रारी करण्याचे शेतकऱ्यांना आवाहन शेतकऱ्यांनी सोयाबीन बियाणाचे एस ३३५ वाण खरेदी

वसमत (जि. हिंगोली) : सोयाबीनचे बोगस बियाणे विकून १२ शेतकऱ्यांची १ लाख ३० हजार रुपयांची आर्थिक फसवणूक केल्याप्रकरणी इंदूर येथील बियाणे कंपनी चालकाविरोधात पंचायत समितीचे कृषी अधिकारी गोविंद दहीवडे यांच्या तक्रारीवरून वसमत शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

वसमत तालुक्यात १२८ शेतकऱ्यांनी सोयाबीनचे बियाणे उगवलेच नाही, अशी तक्रार कृषी विभागाकडे केली. तक्रारी देणाऱ्या बहुतेक शेतकऱ्यांनी सोयाबीन बियाणाचे एस ३३५ वाण खरेदी करून वापरल्याची तक्रार होती़ वाढत्या तक्रारी पाहता कृती विभागाच्या वतीने बाजारातील कृषी केंद्रावरून सदर बियाणांचे नमुने घेतले व तपासणीसाठी प्रयोगशाळेत पाठविले़ प्रयोगशाळेने उगवणक्षमता कमी असल्याचा अहवाल दिला़ त्यामुळे सदोष व उगवणक्षमता नसलेले बियाणे विक्री व वितरण करणाऱ्या मे. एशियन सीड्स प्रा़ लि़ कंपनी इंदोरचे संचालक आऱ एम़ पाटीदार यांच्याविरोधात गुन्हा नोंदविला आहे़ 

तक्रारी करण्याचे शेतकऱ्यांना आवाहनहजारो शेतकऱ्यांना बोगस बियाणाचा फटका बसल्याची शक्यता आहे़ त्यामुळे बोगस बियाण्यासंदर्भात शेतकऱ्यांनी वसमत शहर पोलीस ठाण्यात तक्रार करावी, असे आवाहन सपोनि. तपासिक अंमलदार पी.सी. बोधनापोड यांनी केले आहे़

जिल्ह्यात सातवा गुन्हायापूर्वी जिल्ह्यात सहा तक्रारी दाखल झाल्या होत्या. वसमत येथे दाखल झालेल्या या गुन्ह्यानंतर एकूण तक्रारींची संख्या सात झाली आहे. अजूनही काही कंपन्या कृषी विभागाच्या रडारवर आहेत. मात्र, त्यात इतर प्रक्रिया गुंतागुंतीच्या असल्याने वेळ जात आहे. मात्र, काही ठिकाणी कृषी विभाग वेळकाढूपणा करीत असल्याचा आरोप होत आहे.

टॅग्स :agricultureशेतीFarmerशेतकरीCrime Newsगुन्हेगारी