शहरं
Join us  
Trending Stories
1
हिवाळी अधिवेशन ८ डिसेंबरपासूनच, दोन आठवड्यांचे कामकाज; २८ नोव्हेंबरपासून सचिवालय नागपुरात, पत्र आले
2
सरकार कुणालाही पाठीशी घालणार नाही, अहवालात जो दोषी आढळेल त्याच्यावर कारवाई, जमीन घोटाळ्यासंदर्भात मुख्यमंत्र्यांची स्पष्टोक्ती
3
पार्थ पवार भूखंड प्रकरणाचा व्यवहार रद्द; अजित पवार म्हणाले, "मी मुख्यमंत्री फडणवीसांना कॉल केला आणि..."
4
देशातील सर्वात मोठ्या विमानतळावर विमानांच्या उड्डाणाला ब्रेक! ATC मध्ये झाला तांत्रिक बिघाड, १००० विमानांना फटका
5
पाकिस्तानला बेकायदेशीर अणु कारवायांचा इतिहास, आम्ही ट्रम्प यांच्या विधानाची दखल घेतली: भारत सरकार
6
60 टक्क्यांहून अधिक मतदान म्हणजे NDA ची सत्ता परतणार; बिहारबाबत अमित शाहांचा दावा
7
माझ्या नवऱ्याला महिन्यापासून दारु पाजून जरांगेविरुद्ध षडयंत्र रचलं; अमोल खुणेंच्या कुटुंबीयांनी सगळंच सांगितलं
8
"त्या एक टक्केवाल्या पाटलाला पार्थ पवारने जमीन दिली असती का?"; अजित पवारांचा उल्लेख, दानवेंची मोठी मागणी
9
IPL 2026 : डेफिनेटली! MS धोनी पुन्हा मैदानात उतरण्यास तयार; CSK च्या ताफ्यातील आतली गोष्ट आली समोर
10
धोत्रे हत्या प्रकरण: अत्यंविधीला आला आणि पोलिसांनी पकडला, स्मशानभूमीत लावला होता सापळा
11
चार नाही, दहा लाख महिना पोटगी, मोहम्मद शमीच्या पत्नीच्या मागणीवर सर्वोच्च न्यायालयाने नोटीस बजावली
12
महाराष्ट्राचा अभिमान! स्मृती, जेमिमा अन् राधाचा मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते कोट्यवधींच्या बक्षीसासह सन्मान
13
बेळगावमध्ये ऊस आंदोलन पेटले! हत्तरगी टोल नाक्यावर शेतकऱ्यांकडून दगडफेक
14
Maharashtra Crime: तुकाराम स्वत:च लपून बसला आणि अपहरणाचा बनाव केला; पण असं का केलं?
15
"धन्या, तू आता पक्का अडकला"; धनंजय मुंडेंचा एकेरी उल्लेख, मनोज जरांगेंनी थेट ऑडिओ क्लिपच ऐकवली
16
AI Industry: 'एआय'चा फुगा फुटू लागला? अमेरिकेमध्ये १.५ लाख लोकांनी नोकऱ्या गमावल्या; गुंतवणूकदारही झाले अलर्ट
17
Aadhaar: आधार कार्डावरील एका चुकीमुळे मोफत राशन आणि पीएफचे पैसे मिळणार नाहीत!
18
भिवंडीत डाईंग कंपनीस भीषण आग; कल्याण, उल्हासनगर, ठाणे अग्निशामक दलाची घ्यावी लागली मदत
19
इंस्टाग्रामवर फॉलोअर्स वाढवायचेत? 'या' टिप्स येतील कामी; धडाधड वाढतील व्ह्यूज, प्रोफाईलही दिसेल वेगळे 
20
Parth Pawar Land Scam Pune: नवी माहिती! पार्थ पवारांनी सहीचे अधिकार दिले होते दिग्विजय पाटलांना, ठराव समोर आल्यानं वेगळं वळण

शेतात अचानक आग्यामोहळ उठले; हजारो मधमाशांच्या हल्ल्यात शेतकऱ्याचा मृत्यू, मुलगा जखमी

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 26, 2025 18:35 IST

सेनगाव तालुक्यातील बाभुळगाव शिवारातील घटना

हिंगोली : शेतात हरभऱ्याचे पीक गोळा करत असताना अचानक आग्यामोहोळाने हल्ला केला. यात एका शेतकऱ्याचा मृत्यू झाला तर त्यांचा मुलगा गंभीर जखमी झाला आहे. ही घटना सेनगाव तालुक्यातील बाभूळगाव शिवारात २६ फेब्रुवारी रोजी सकाळी १० वाजेच्या सुमारास घडली. 

जवळा (बु.) येथील शेतकरी भास्कर नाथराव खिल्लारे (वय ४५) यांचे शेत बाभूळगाव शिवारात आहे. २६ फेब्रुवारी रोजी ते मुलगा धनंजयसह शेतात काढून ठेवलेले हरभऱ्याचे पीक जमा करण्यासाठी गेले होते. सकाळी १० वाजेच्या सुमारास हरभरा जमा करत असताना अचानक आग्यामोहळाच्या मधमाश्यांनी त्यांच्यावर हल्ला केला. प्रारंभी पाच-दहा मधमाश्या भास्कर खिल्लारे यांच्या दिशेने आल्या आणि चावा घेण्यास सुरुवात केली. त्यावेळी भास्कर खिल्लारे आणि धनंजय खिल्लारे यांनी बचावासाठी पळ काढला. परंतु, काही क्षणातच आग्यामोहळाच्या हजारों मधमाश्या त्यांच्या दिशेने आल्या. वडील भास्कर यांना मधमाश्यांच्या तावडीतून वाचविण्यासाठी धनंजय यांने प्रयत्न केला. परंतु, त्याच्यावरही मधमाश्यांनी हल्ला केला. धनंजयने मदतीसाठी आरडाओरड करत गाव गाठले. 

हजारो मध्यमाशांनी घेतला चावात्यानंतर ग्रामस्थांनी शेतात धाव घेतली. तोपर्यंत मात्र भास्कर खिल्लारे बेशुद्ध झाले होते आणि हजारो मधमाश्या त्यांना चावा घेत होत्या. ग्रामस्थांनी आजूबाजूला धूर केला. तर काहींनी कपड्याच्या साहाय्याने मधमाश्या बाजूला करून भास्कर खिल्लारे यांची सुटका केली. गंभीर जखमी अवस्थेत त्यांना तातडीने हिंगोली येथील एका खासगी रुग्णालयात दाखल केले. परंतु, डाॅक्टरांनी तपासून भास्कर खिल्लारे यांना मृत घोषित केले. त्यांच्यावर सायंकाळी अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या पश्चात आई-वडील, पत्नी, दोन मुले, दोन मुली असा परिवार आहे. या घटनेमुळे जवळा (बु.) येथे शोककळा पसरली आहे. दरम्यान, आग्यामोहोळाच्या हल्ल्यात जखमी धनंजय यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार करण्यात आले.

टॅग्स :HingoliहिंगोलीFarmerशेतकरी