शहरं
Join us  
Trending Stories
1
लाडकी बहीण अन् काय काय...! वर्षात १२ राज्यांनी महिलांना वाटले तब्बल १.६८ लाख कोटी रुपये
2
राहुल गांधींच्या 'हायड्रोजन बॉम्ब'ला निवडणूक आयोगाचे प्रत्युत्तर; 15 मुद्दे मांडत सर्व आरोप फेटाळले
3
देशविरोधी शक्तींसोबत मिळून भारतात षडयंत्र रचलं जातंय; भाजपाचा राहुल गांधींवर गंभीर आरोप
4
सोनाराच्या दुकानात ४ वर्ष काम केलं, रोज थोडं थोडं करून २.५ कोटींचं सोनं गायब केलं! कशी पकडली गेली चोरी?
5
पाकिस्तानातील सर्वात श्रीमंत महिला क्रिकेटर, जिचं नाव कायम चर्चेत; किती संपत्तीची आहे मालकीण?
6
१०० हून अधिक देशांमध्ये २०,००० स्टोअर्स, जागतिक विक्रीत २ टक्के वाढ; तरी का काढलंय विकायला?
7
अमेरिकेतील महापौर भारतातील महापौरापेक्षा किती पावरफुल असतो? जगभर इतकी चर्चा का होते?
8
"मी तेजश्रीच्या लग्नासाठी उत्सुक...", सुबोध भावे असं म्हणताच अभिनेत्री काय म्हणाली?
9
“उद्धव ठाकरेंचा निवडणुकीसाठी दौरा, CM असताना शेतकऱ्यांना काय दिले?”; शिंदे गटाचा पलटवार
10
Bigg Boss 19: 'बिग बॉस हिंदी'कडून मराठमोळ्या प्रणित मोरेवर अन्याय? शोसाठी मिळालं सगळ्यांपेक्षा कमी मानधन
11
Moto G67 Power: ७०००mAh बॅटरी आणि चार कॅमेरे; मोटो जी६७ पॉवर भारतात लॉन्च!
12
भारत, चीन, तुर्कस्तान... तीन देशांनी घेतला असा निर्णय की रशियाला होतंय नुकसान, ट्रम्प यांच्यामुळे नाईलाज
13
"अभी नहीं तो कभी नहीं!" अभिषेक शर्माला किंग कोहलीच्या ऑल टाइम रेकॉर्डची बरोबरी करण्याची शेवटची संधी
14
परदेशी सहल बजेटमध्ये! 'या' ५ देशांमध्ये भारतीय रुपया आहे मजबूत; कमी खर्चात करा परदेशवारी
15
महिला 'वर्ल्ड कप' पराभवानंतर कर्णधाराकडून खेळाडूंना मारहाण; वरिष्ठ खेळाडूच्या आरोपाने क्रिकेटविश्व हादरले
16
बिहारमध्ये एनडीएला मोठा धक्का! मतदानाच्या तोंडावर भाजप आमदाराने राजदमध्ये प्रवेश केला; नाराज का झाला...
17
देव दिवाळीच्या मुहुर्तावर सोनं पुन्हा स्वस्त...! पटापट चेक करा तुमच्या शहरातील लेटेस्ट रेट
18
चिंताजनक! शेजारच्या देशात जीवघेण्या आजाराचं थैमान; २९२ जणांचा मृत्यू, भारतासाठी धोक्याची घंटा
19
ढाका पोहोचण्याआधीच जाकिर नाईकला मोठा 'झटका'! भारताच्या दबावापुढे बांगलादेश झुकला?
20
राहुल गांधीचा हायड्रोजन बॉम्ब! 'एका महिलेचे 223 वेळा नाव; हरियाणात 25 लाख मतांची चोरी'

वीज सुरळीत, कर्मचारी मात्र संपावर; प्रवेशद्वारावर जोरदार घोषणाबाजी

By विजय पाटील | Updated: January 4, 2023 14:01 IST

वीज कंपनीच्या कर्मचाऱ्यांनी राज्यभर संपाची हाक दिली आहे.

हिंगोली : जिल्ह्यात वीज वितरण कंपनीतील अधिकारी व कर्मचारी संपावर गेले असले तरीही वीजपुरवठा सध्या सुरळीत आहे. मात्र कार्यालयात रिकाम्या खुर्च्या दिसत असून कर्मचारी प्रवेशद्वारावर घोषणा देत आहेत.

वीज कंपनीच्या कर्मचाऱ्यांनी राज्यभर संपाची हाक दिली आहे. वीज कंपनीचे खाजगीकरण करण्याचा घाट केंद्र व राज्य सरकारकडून घातला जात असल्याचा आरोप करून महावितरणच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांनी महाराष्ट्र राज्य वीज कर्मचारी, अधिकारी व अभियंता संघर्ष समितीच्या माध्यमातून या आंदोलनात उडी घेतली आहे. जिल्ह्यात कालपासूनच या संपाबाबत समाजमाध्यमांवर विविध संदेश फिरत होते. यात वीज खंडित होण्याची भीती व्यक्त केली होती. सलग चार दिवस संप असल्याने अधिकारी व कर्मचाऱ्यांशिवाय ही सेवा कोलमडून पडण्याची भीती व्यक्त करणारे हे संदेश होते.

बुधवारी सकाळी १० च्या सुमारास हिंगोली येथील अधीक्षक अभियंता, कार्यकारी अभियंता, उपकार्यकारी अभियंता कार्यालयात कोणीही फिरकले नाही. त्यानंतर कर्मचारी हळूहळू प्रवेशद्वारावर जमत होते. त्यांनी तेथेच आपल्या विविध मागण्यांचे बॅनर लावून घोषणा दिल्या. केंद्र व राज्य शासनाच्या निषेधार्थ हल्लाबोलच्या घोषणा देण्यात येत होत्या. .याआंदोलनात उपकार्यकारी अभियंता दिनकर पिसे, उपकार्यकारी अभियंता विनय शिंदे, संतोष भंडारवार, अजय लोखंडे, पी.एस.घुगे, ए.आर.खिराडे, व्ही.सी.बनसोडे, ए.एस.बांगर, विलास चव्हाण, यांच्यासह मोठ्या संख्येने अधिकारी, अभियंता व कर्मचारी सहभागी झाले आहेत.

या आहेत मागण्यामहावितरण, महानिर्मिती व महापारेषण कंपन्यांतील खाजगीकरण धोरण बंद करा, महावितरणमध्ये अदानी व इतर कोणत्याही कंपनीला समांतर वीज वितरणाचा परवाना देवू नका, सर्व कंत्राटी-आऊटसोर्सिंग व सुरक्षा रक्षक कामगारांना कायम करा, तिन्ही कंपन्यांतील रिक्त जागा भरा, इम्पॅनलमेंट पद्धतीचे कंत्राटीकरण रद्द करा, महावितरणमधील २०१९ नंतरची उपकेंद्रे कंपनीमार्फत चालवा व उपकेंद्रांमध्ये कायम कर्मचाऱ्यांची पदस्थापना करा आदी मागण्यांसाठी ६ जानेवारीपर्यंत हा संप आहे.

कार्यालयात झगमगाट; खुर्च्या रिकाम्यामहावितरणच्या कार्यालयात एरवीपेक्षा जरा जास्तच झगमगाट दिसून येत होता. सर्व बल्ब, ट्यूबलाईट सुरू असले तरीही एकाही खुर्चीत अधिकारी व कर्मचारी दिसत नव्हता. कुणीतरी अभ्यागत तरीही आतमध्ये जावून आपल्या कामासाठी कुणी भेटेल काय? हे पहात होता.

वीजसेवा सुरळीतकाल काही वरिष्ठ अधिकाऱ्यांनी वीज कंत्राटदारांची बैठक घेतली होती. या कंत्राटदारांकडून मनुष्यबळ पुरविण्यासाठी विनंती केली जात होती. संपाच्या काळातही वीज सुरळीत ठेवण्यासाठी हा प्रयत्न होता. मात्र त्यात यश आल्याचे दिसून येत आहे. वीजपुरवठा सुरळीत असल्याने नागरिकांना मात्र नाहक त्रास सोसावा लागला नाही.

टॅग्स :Hingoliहिंगोलीmahavitaranमहावितरणagitationआंदोलन