शहरं
Join us  
Trending Stories
1
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
2
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
3
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
4
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
5
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
6
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
7
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
8
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
9
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
10
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
11
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
12
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
13
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
14
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
15
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
16
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
17
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
18
Mumbai Fire: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
19
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
20
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'

शेतकऱ्यासह ग्रामस्थांचे प्रयत्न अपुरे पडले; डोळ्यादेखत होरपळून दहा जनावरे दगावले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 12, 2021 12:41 IST

ग्रामस्थांनी आग विझविण्यासाठी शर्यतीचे प्रयत्न केले. मात्र, आगीची तीव्रता जास्त असल्याने जवळ जाणे देखील शक्य नव्हते.

सेनगाव (हिंगोली ) : तालुक्यातील पानकनेरगाव शिवारात गुरुवारी रात्री शेतातील गोठ्याला लागलेल्या आगीत दहा जनावरांचा होरपळून मृत्यू झाल्याची घटना घडली. या भीषण आगीचे कारण मात्र स्पष्ट झाले नसून शेतकऱ्याचे जवळपास दहा लाख रुपयांचे नुकसान झाले आहे.

सचिन बोलावार यांचे पानकनेरगाव शिवारात शेत आहे. येथे जनावरांसाठी गोठा आहे. गुरुवारी रात्री गोठ्याला अचानक भीषण आग लागली. आगीची माहिती मिळताच ग्रामस्थांनी त्यांचे शेताकडे धाव घेतली. ग्रामस्थांनी आग विझविण्यासाठी शर्यतीचे प्रयत्न केले. मात्र, आगीची तीव्रता जास्त असल्याने जवळ जाणे देखील शक्य नव्हते. यामुळे आग आटोक्यात येईपर्यंत चार म्हशी, दोन गिरगाय, दोन बैल, दोन वासरु, एक कुत्रा यांचा होरपळून मृत्यू झाला. तसेच गोठ्यातील शेती उपयोगी साहित्य व सोयाबीनची पोते देखील आगीत भस्मसात झाली. 

आगीत जवळपास दहा लाख रुपये नुकसान झाल्याची माहिती शेतकरी बोलावार यांनी दिली. याप्रकरणी सेनगाव पोलीस ठाण्यात अज्ञात व्यक्तीविरुद्ध पोलीस तक्रार देण्यात आली आहे. घटनास्थळी सेनगावचे पोलीस निरीक्षक रणजित भोईटे यांनी भेट देवून पाहणी केली.  

टॅग्स :Deathमृत्यूHingoliहिंगोलीfireआग