शहरं
Join us  
Trending Stories
1
अटारी जोधपूरपासून ९०० किमी दूर, ४८ तासांत कसे जाणार? पाकिस्तानात दिलेल्या महिला भारतात माहेरी आलेल्या
2
स्वामी पुण्यतिथी शिवरात्रि एकाच दिवशी: शिवकृपा, गुरुबळ लाभण्याची सुवर्ण संधी; ‘असे’ करा व्रत
3
पाकिस्तानविरोधात भारताची मोठी कारवाई! गृहमंत्री अमित शाहांचे सर्व मुख्यमंत्र्यांना 'हे' निर्देश...
4
'ते पुन्हा एकत्र येण्याची सध्या कुठलीही परिस्थिती नाही'; CM फडणवीसांचं पवार, ठाकरे बंधूंबद्दल राजकीय भाष्य
5
अमेरिका, ब्रिटनसाठी गेली ३० वर्षे पाकिस्तान दहशतवाद पोसतोय; पाकिस्तानी संरक्षण मंत्र्यांचा गौप्यस्फोट
6
पहलगाम हल्ल्याचा बाजारावरही परिणाम; ९ लाख कोटींचे नुकसान, अदानी पोर्टसह 'हे' शेअर्स आपटले
7
पीएसएलमध्ये काम करणाऱ्या सर्व भारतीयांना ४८ तासांत पाकिस्तान सोडण्याचे आदेश!
8
स्मरण दिन: स्वामींचे स्वप्नात दर्शन झाले? काय असू शकतात संकेत? जाणून घ्या नेमका अर्थ...
9
१ वर्ष एटीएम कार्ड वापरण्यासाठी बँक किती चार्ज घेते? 'या' कार्डवर द्यावे लागत नाही पैसे
10
अमित शाहांची सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांसोबत बैठक, पाकिस्तानी नागरिकांबद्दल दिला महत्त्वाचा आदेश
11
"निर्लज्ज पाकिस्तान", दहशतवाद्यांना 'स्वातंत्र्य सैनिक' म्हटल्यावर पाक क्रिकेटर प्रचंड संतापला
12
गुंतवणुकीत 'ही' काळजी घेतली, तर होऊ शकता मालामाल! कोणत्या गोष्टी लक्षात ठेवायच्या?
13
पंचग्रही ३ राजयोगात स्वामींची पुण्यतिथी: १० राशींना वरदान, लाभच लाभ; बक्कळ पैसा, असीम कृपा!
14
१९७१ च्या युद्धात भारताने पश्चिम पाकिस्तानमधील या भागांवर केला होता कब्जा, नंतर दिले होते परत, कारण काय?
15
धक्कादायक! लग्नातील जेवणामुळे उलट्या; ३७ मुलांसह ५१ जणांना अन्नातून विषबाधा
16
'बाभळीचं झाड सोडून आंब्याच्या झाडाखाली या'; ठाकरेंच्या आमदाराला भाजपच्या मंत्र्याकडून ऑफर
17
घटस्फोटानंतर फळफळलं धनश्री वर्माचं नशीब, या चित्रपटामधून करणार सिनेसृष्टीत पदार्पण
18
सोन्याच्या किमतीत पाकिस्तान भारताच्या ३ पाऊल पुढे; किंमत ऐकून ग्राहक जातायेत पळून
19
पोलिसाच्या घरातच चोरी; सोन्याचे मंगळसूत्र, २ मोबाईलसह मौल्यवान वस्तू घेऊन चोर फरार!
20
जिंकलंस भावा! मजुराचा मुलगा कष्टाने झाला IPS; देशाची सेवा करण्याचं स्वप्न होणार साकार

कॉंग्रेसचे नुकसान करण्यासाठी आधी वंचित आता बीआरएस; अशोक चव्हाणांचा इशारा

By विजय पाटील | Updated: June 22, 2023 17:57 IST

राज्य सरकारचे काम काहीच नाही, नुसत्या जाहिरातींवर कोट्यावधींचा खर्च

हिंगोली : सरकार काम काहीच करीत नाही. फक्त जाहिरातींवर ४०० ते ५०० कोटी रुपयांचा खर्च करून गवागवा करीत आहे. राज्यावर पाच लाख कोटी रुपयांच्या कर्जाचा डोंगर केला आहे. राज्याची विस्कटलेली ही घडी बसविणे मतदारांच्या हाती आहे. वंचितमुळेच काँग्रेसचे नुकसान झाल्याचा आरोपही त्यांनी केला. तर आता बीआरएसच्या माध्यमातून पुन्हा तेच करण्याचा प्रयत्न होत आहे. गटतट विसरून काँग्रेसचे हात बळकट करण्याचे आवाहन माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण यांनी हिंगोली येथील कार्यकर्ता मेळाव्यात केले.

या कार्यक्रमास आ.प्रज्ञा सातव, माजी आ.भाऊराव पाटील गोरेगावकर, माजी आ. अमर राजूरकर, डॉ.अंकुश देवसकर, सचिन नाईक, दिलीपराव देसाई, श्रावण रॅपनवाड आदींची उपस्थिती होती. चव्हाण म्हणाले, येथील गर्दी पाहून हिंगोली लोकसभा लढण्याचा आपला निर्धार पक्का दिसत आहे. हीच उमेद व एकजूट ठेवली तर नांदेडपेक्षा जास्त काम येथे करून ही जागा खेचून आणू. देशात भाजपविरोधी पक्षांना एकत्र आणून वज्रमूठ आवळली आहे. विभाजनामुळे कुणाचा फायदा होतो, हे मतदारांच्या लक्षात आणून दिले पाहिजे. हिंगोली लोकसभा, विधानसभेतील जुन्या आकडेवारीचा दाखला देत त्यांनी हे सांगितले. चव्हाण यांनी भाजपवर आरोप करताना म्हटले की, बेरोजगारी वाढली, महागाई वाढली, शेतकरी आत्महत्या वाढल्या. कर्जमाफी, प्रोत्साहन अनुदान शेतकऱ्यांना मिळाले नाही. मराठवाड्याची तर पार वासलात लावली. केंद्र सरकार तर शेतकरी विरोधी आहे.

म्हणून घडवताहेत दंगलीदेशात हवा बदलत आहे. त्यामुळे भाजप हैराण आहे. याचा परिणाम म्हणून ही मंडळी दंगली घडवत आहे. महाराष्ट्रातील सरकारही केवळ भुलभुलैय्या आहे. तिजोरी खाली आहे. नुसत्या घोषणा आहेत. केंद्र व राज्य सरकारचे इंजीन बंद पडल्याने यांना डबल इंजीन लागत असल्याची खिल्लीही चव्हाण यांनी उडविली.

टॅग्स :Ashok Chavanअशोक चव्हाणHingoliहिंगोलीcongressकाँग्रेसK Chandrashekar Raoके चंद्रशेखर रावPrakash Ambedkarप्रकाश आंबेडकर