शहरं
Join us  
Trending Stories
1
“मी माझ्या पक्षाचा पर्मनंट चिफ, कुणी बायपास करणार नाही, तसा प्रयत्न झाला तर…”: रामदास आठवले
2
"पंडित नेहरूंची पत्रे अजूनही सोनिया गांधींकडेच"; केंद्राचा खळबळजनक दावा; म्हणाले, 'हा देशाचा वारसा'
3
IND vs SA 4th T20I : शुभमन गिल 'आउट'; टॉसला उशीर! जाणून घ्या त्यामागचं कारण
4
"मला कधीच वाटलं नव्हतं की इतकी पर्सनल..."; MMS लीक प्रकरणावर Payal Gaming चे स्पष्टीकरण
5
“माणिकराव कोकाटेंना वाचवण्याचा सरकारकडून प्रयत्न, २४ तास झाले अद्याप अटक का नाही?”: सपकाळ
6
गुरुवारी मार्गशीर्ष शिवरात्रि २०२५: ‘असे’ करा व्रत, शिवाचे विशेष पूजन; काही कमी पडणार नाही!
7
वांद्रे-वरळी सी लिंकवर २५२ किमी प्रतितास वेगाने पळवली लॅम्बॉर्गिनी, पोलिसांनी केली अशी कारवाई  
8
आवळा कँडी ते च्यवनप्राश... आरोग्यासाठी ठरू शकतं घातक; न्यूट्रिशनिस्टने सांगितले साइड इफेक्ट
9
"शिक्षा देण्यापेक्षा माफ करण्यातच कायद्याचा मोठेपणा"; बूट फेक प्रकरणावर माजी सरन्यायाधीश गवईंचे रोखठोक भाष्य
10
Maruti Suzuki ने लॉन्च केली नवीन WagonR; वृद्ध आणि दिव्यांगांसाठी मिळणार खास 'स्विव्हल सीट'
11
प्रियंका आणि राहुल गांधी यांच्यात वाद, कुटुंबीयांशी भांडून परदेशात गेले; केंद्रीय मंत्र्याचा मोठा दावा
12
“SIR प्रक्रिया निरर्थक, ५०० परदेशींसाठी ८ कोटी लोकांचा छळ”; माजी निवडणूक आयुक्त थेट बोलले
13
९९६६ धावा आणि ७०५ विकेट्स…तरीही तो अनसोल्ड! देशांतर्गत क्रिकेटमधील ‘कपिल देव’ची अनटोल्ड स्टोरी
14
"दिल्लीत प्रदूषण वाढवण्यासाठी ठिकठिकाणी कचरा जाळतेय AAP"; पर्यावरण मंत्र्यांचा गंभीर आरोप
15
गडकिल्ल्यांवरील अतिक्रमण हटवण्यासाठी समिती; नितेश राणेंची माहिती, सरकारचा महत्त्वाचा निर्णय
16
भारतात टीशर्टवर राहणाऱ्या राहुल गांधींना जर्मनीत भरली 'हुडहुडी'! स्वेटरवर दिसले
17
आई-वडिलांचा केला खून, मृतदेहांचे तुकडे करून गोणीत भरले, अन् नदीत फेकले, मुलाचं धक्कादायक कृत्य 
18
‘महाराष्ट्रात येणाऱ्या सर्व विमानांमध्ये मराठी भाषेत उद्घोषणा करा’, नाना पटोले यांची मागणी 
19
हृदयद्रावक! 'तो' सेल्फी ठरला अखेरचा; लग्नाच्या वाढदिवशी पतीसमोर पत्नीचा पाय घसरला अन्...
20
कसा आहे 'अवतार: फायर अँड ॲश'? सर्वात आधी चित्रपट पाहून राजामौली म्हणाले "थिएटरमध्ये बसलेल्या लहान मु
Daily Top 2Weekly Top 5

कॉंग्रेसचे नुकसान करण्यासाठी आधी वंचित आता बीआरएस; अशोक चव्हाणांचा इशारा

By विजय पाटील | Updated: June 22, 2023 17:57 IST

राज्य सरकारचे काम काहीच नाही, नुसत्या जाहिरातींवर कोट्यावधींचा खर्च

हिंगोली : सरकार काम काहीच करीत नाही. फक्त जाहिरातींवर ४०० ते ५०० कोटी रुपयांचा खर्च करून गवागवा करीत आहे. राज्यावर पाच लाख कोटी रुपयांच्या कर्जाचा डोंगर केला आहे. राज्याची विस्कटलेली ही घडी बसविणे मतदारांच्या हाती आहे. वंचितमुळेच काँग्रेसचे नुकसान झाल्याचा आरोपही त्यांनी केला. तर आता बीआरएसच्या माध्यमातून पुन्हा तेच करण्याचा प्रयत्न होत आहे. गटतट विसरून काँग्रेसचे हात बळकट करण्याचे आवाहन माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण यांनी हिंगोली येथील कार्यकर्ता मेळाव्यात केले.

या कार्यक्रमास आ.प्रज्ञा सातव, माजी आ.भाऊराव पाटील गोरेगावकर, माजी आ. अमर राजूरकर, डॉ.अंकुश देवसकर, सचिन नाईक, दिलीपराव देसाई, श्रावण रॅपनवाड आदींची उपस्थिती होती. चव्हाण म्हणाले, येथील गर्दी पाहून हिंगोली लोकसभा लढण्याचा आपला निर्धार पक्का दिसत आहे. हीच उमेद व एकजूट ठेवली तर नांदेडपेक्षा जास्त काम येथे करून ही जागा खेचून आणू. देशात भाजपविरोधी पक्षांना एकत्र आणून वज्रमूठ आवळली आहे. विभाजनामुळे कुणाचा फायदा होतो, हे मतदारांच्या लक्षात आणून दिले पाहिजे. हिंगोली लोकसभा, विधानसभेतील जुन्या आकडेवारीचा दाखला देत त्यांनी हे सांगितले. चव्हाण यांनी भाजपवर आरोप करताना म्हटले की, बेरोजगारी वाढली, महागाई वाढली, शेतकरी आत्महत्या वाढल्या. कर्जमाफी, प्रोत्साहन अनुदान शेतकऱ्यांना मिळाले नाही. मराठवाड्याची तर पार वासलात लावली. केंद्र सरकार तर शेतकरी विरोधी आहे.

म्हणून घडवताहेत दंगलीदेशात हवा बदलत आहे. त्यामुळे भाजप हैराण आहे. याचा परिणाम म्हणून ही मंडळी दंगली घडवत आहे. महाराष्ट्रातील सरकारही केवळ भुलभुलैय्या आहे. तिजोरी खाली आहे. नुसत्या घोषणा आहेत. केंद्र व राज्य सरकारचे इंजीन बंद पडल्याने यांना डबल इंजीन लागत असल्याची खिल्लीही चव्हाण यांनी उडविली.

टॅग्स :Ashok Chavanअशोक चव्हाणHingoliहिंगोलीcongressकाँग्रेसK Chandrashekar Raoके चंद्रशेखर रावPrakash Ambedkarप्रकाश आंबेडकर