शहरं
Join us  
Trending Stories
1
२६/११ चा उल्लेख करत प्रियंका गांधींचे अमित शाहांवर टीकास्त्र; म्हणाल्या, तेव्हा मुख्यमंत्री आणि गृहमंत्र्यांनी...
2
Pakistan Water : पाकिस्तानमध्ये पाण्याचं संकट वाढलं! भारतासोबतचा संघर्ष महागात पडला
3
शेअर बाजारात NSDL ची होणार CDSL शी टक्कर; ग्रे मार्केटमध्ये काय संकेत, किती गुंतवणूक करावी लागणार?
4
सरकारी कर्मचाऱ्यांसाठी सोशल मीडिया वापराबाबत नवे नियम; उल्लंघन केल्यास नोकरी गमवाल!
5
प्रियंका गांधी म्हणाल्या, 'मी शिवस्तोत्र म्हणून आलेय'; लोकसभेत नेमकं काय घडलं?
6
३ दिवसांच्या घसरणीला ब्रेक, टाटा-रिलायन्ससह 'या' शेअर्समुळे गुंतवणूकदारांना दिलासा! तुमच्या पोर्टफोलिओचं काय झालं?
7
आमिर खानने घेतला मोठा निर्णय, अभिनेत्याने सुरू केलं 'जनता का थिएटर'
8
"ऑपरेशन महादेव कालच का झालं?"; अखिलेश यादवांनी सरकारला घेरलं, पुलवामा हल्ल्यातील 'त्या' गाडीबद्दल काय बोलले?
9
शैलेश जेजुरीकर बनले 'या' अमेरिकन कंपनीचे CEO! मायक्रोसॉफ्ट, गुगलनंतर आता P&G लाही मिळणार 'भारतीय' नेतृत्व!
10
Tripti Dimri : "मी ३० वर्षांपासून गप्प...", तृप्ती डिमरीने खूप काही केलंय सहन, का नाही उठवला आवाज?
11
Russia Ukraine War: "हल्ले थांबवा अन्यथा..."; रशिया-युक्रेन युद्धादरम्यान डोनाल्ड ट्रम्पकडून पुतिन यांना इशारा!
12
BCCI च्या ऑफिसमध्ये चोरी; सुरक्षा रक्षकाने लाखोंच्या IPL जर्सी चोरुन हरयाणात विकल्या
13
"कलंकित मंत्र्यांचा राजीनामा न घेणाऱ्या सरकारने गोमूत्र शिंपडून त्यांना पवित्र करून घ्यावे", विजय वडेट्टीवार यांची टीका
14
चीनमध्ये Apple ला मोठा झटका! एका रिटेल स्टोअरवर लावले टाळे, पण भारतासाठी आहे 'खुशखबर'!
15
हिंजवडीतील रस्ते अपुरे का पडू लागले? यावर काही उपाय आहेत का, की काहीच नाहीत... करणार कोण?
16
Asia Cup 2025 : रिषभ पंतच्या जागी अकोल्याच्या पठ्ठ्याची होऊ शकते टीम इंडियात एन्ट्री
17
हर्षवर्धनचा नवा कारनामा; Reliance च्या नावाने उघडल्या ५ बनावट कंपन्या, तपास अधिकारी चक्रावले
18
Priyanka Gandhi : "लोक सरकारवर विश्वास ठेवून पहलगामला गेले, पण सरकारने लोकांना देवाच्या भरवश्यावर सोडलं"
19
'तुमचा वेळ वाया घालवू नका, काळजी घ्या'; आईवडिलांसाठी चिठ्ठी अन् पुण्यात इंजिनिअर तरुणाने स्वतःला संपवले
20
समुद्राचे पाणी पिण्यायोग्य होणार; मुंबई महानगरपालिकेने हाती घेतला महत्त्वाचा प्रकल्प!

कॉंग्रेसचे नुकसान करण्यासाठी आधी वंचित आता बीआरएस; अशोक चव्हाणांचा इशारा

By विजय पाटील | Updated: June 22, 2023 17:57 IST

राज्य सरकारचे काम काहीच नाही, नुसत्या जाहिरातींवर कोट्यावधींचा खर्च

हिंगोली : सरकार काम काहीच करीत नाही. फक्त जाहिरातींवर ४०० ते ५०० कोटी रुपयांचा खर्च करून गवागवा करीत आहे. राज्यावर पाच लाख कोटी रुपयांच्या कर्जाचा डोंगर केला आहे. राज्याची विस्कटलेली ही घडी बसविणे मतदारांच्या हाती आहे. वंचितमुळेच काँग्रेसचे नुकसान झाल्याचा आरोपही त्यांनी केला. तर आता बीआरएसच्या माध्यमातून पुन्हा तेच करण्याचा प्रयत्न होत आहे. गटतट विसरून काँग्रेसचे हात बळकट करण्याचे आवाहन माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण यांनी हिंगोली येथील कार्यकर्ता मेळाव्यात केले.

या कार्यक्रमास आ.प्रज्ञा सातव, माजी आ.भाऊराव पाटील गोरेगावकर, माजी आ. अमर राजूरकर, डॉ.अंकुश देवसकर, सचिन नाईक, दिलीपराव देसाई, श्रावण रॅपनवाड आदींची उपस्थिती होती. चव्हाण म्हणाले, येथील गर्दी पाहून हिंगोली लोकसभा लढण्याचा आपला निर्धार पक्का दिसत आहे. हीच उमेद व एकजूट ठेवली तर नांदेडपेक्षा जास्त काम येथे करून ही जागा खेचून आणू. देशात भाजपविरोधी पक्षांना एकत्र आणून वज्रमूठ आवळली आहे. विभाजनामुळे कुणाचा फायदा होतो, हे मतदारांच्या लक्षात आणून दिले पाहिजे. हिंगोली लोकसभा, विधानसभेतील जुन्या आकडेवारीचा दाखला देत त्यांनी हे सांगितले. चव्हाण यांनी भाजपवर आरोप करताना म्हटले की, बेरोजगारी वाढली, महागाई वाढली, शेतकरी आत्महत्या वाढल्या. कर्जमाफी, प्रोत्साहन अनुदान शेतकऱ्यांना मिळाले नाही. मराठवाड्याची तर पार वासलात लावली. केंद्र सरकार तर शेतकरी विरोधी आहे.

म्हणून घडवताहेत दंगलीदेशात हवा बदलत आहे. त्यामुळे भाजप हैराण आहे. याचा परिणाम म्हणून ही मंडळी दंगली घडवत आहे. महाराष्ट्रातील सरकारही केवळ भुलभुलैय्या आहे. तिजोरी खाली आहे. नुसत्या घोषणा आहेत. केंद्र व राज्य सरकारचे इंजीन बंद पडल्याने यांना डबल इंजीन लागत असल्याची खिल्लीही चव्हाण यांनी उडविली.

टॅग्स :Ashok Chavanअशोक चव्हाणHingoliहिंगोलीcongressकाँग्रेसK Chandrashekar Raoके चंद्रशेखर रावPrakash Ambedkarप्रकाश आंबेडकर