शहरं
Join us  
Trending Stories
1
"धरणासंदर्भात केलेल्या 'त्या' वाक्यामुळं माझं वाटोळं झालं"! अजित दादांनी 'तो' किस्सा जसाच्या तसा सांगितला
2
आता लोकसभा निवडणुकीत 'लव्ह जिहाद'ची एन्ट्री? काँग्रेस नगरसेवकाच्या मुलीच्या हत्येवरून PM मोदी बरसले
3
...तेव्हा आम्ही पाठीशी उभे राहिलो; मोहिते पाटलांच्या पक्षांतरानंतर फडणवीसांचा पहिल्यांदाच हल्लाबोल
4
IPL 2024 CSK vs SRH : मराठमोळा तुषार लै 'हुश्शार'! CSK चा मोठा विजय; SRH चा दारूण पराभव
5
'परीक्षेत जय श्री राम लिहितात अन् 50 % मार्क्स मिळतात', ओवेसींचा मोदी-शहांवर निशाणा
6
चेन्नईच्या फलंदाजाची स्फोटक खेळी! इरफान म्हणाला, याला वर्ल्ड कपच्या संघात घ्यायलाच हवं...
7
त्यांच्या कारकिर्दीत ‘ते’ म्हणतील ते सगळं केलं, आता भावनिक व्हायच नाही; अजित पवारांचा वार
8
IPL 2024 GT vs RCB: RCB चा 'विराट' शो! विल जॅक्सचे ४१ चेंडूत शतक; ४ ओव्हर राखून विजय
9
बारामती, शिरुरमध्ये पोलिसी बळाचा वापर, मतदारांना धमक्या; संजय राऊतांचा गंभीर आरोप
10
"मुस्लीम लोक सर्वाधिक कंडोम वापरतात..."; ओवेसींनी दिला केंद्राच्या डेटाचा हवाला, PM मोदींवर पलटवार
11
बीडमध्ये पंकजा मुंडे, मनोज जरांगे एकाच व्यासपीठावर; दोघांचाही एकमेकांना नमस्कार
12
BANW vs INDW: भारताची विजयी सलामी! बांगलादेश त्यांच्याच घरात ढेर; पाहुण्यांची सांघिक खेळी
13
माजी पंतप्रधानांच्या नातवाचे अश्लिल व्हिडीओ व्हायरल; निवडणूक होताच खासदार देशातून फरार
14
'अरे! तुमचं डोकं फुटलंय की सिलिंडर...'; बेंगलोर ब्लास्टवरून पंतप्रधान मोदी काँग्रेसवर बरसले 
15
माढ्याचा खासदार प्रत्येक वेळी नवा; आता कोण? परंपरा टिकणार की बदलणार?
16
IPL 2024 GT vs RCB : साई 'सु'दर्शन! शाहरूखही चमकला; युवा भारतीय खेळाडूंनी RCB ला धू धू धुतले
17
अनेक तासांचा प्रवास आता मिनिटांत! 'वंदे भारत' मेट्रोच्या रुपात येणार, कधी सुरू होणार? पाहा...
18
IPL 2024 GT vs RCB : "विराटच्या स्लो स्ट्राईक रेटबद्दल बोललं जातं पण...", इरफानची 'मन की बात'!
19
IPL 2024 CSK vs SRH : ऋतु'राज'! मराठमोळ्या गायकवाडचे शतक थोडक्यात हुकले; CSK ने धावांचा डोंगर उभारला
20
Narendra Modi : "राम मंदिर बांधण्याचा निर्णय देशाच्या स्वातंत्र्याच्या दुसऱ्याच दिवशी घ्यायला हवा होता"

वन विभागाचाच पाणवठा कोरडा; इतरांचे काय?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 22, 2018 12:19 AM

सध्या तापमानात मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. वाढत्या तापमानामुळे बहुतांश जंगलातील पानवठे कोरडेठाक झाले आहेत. त्यामुळे वन्यप्राणी पाण्याच्या शोधात भटकत आहेत. मात्र अजूनही जंगलामध्ये पाणी असल्याचा अंदाज लावत वन विभागात म्हणे १ एप्रिल पासून पानवठ्यात पाणी टकाण्यास सुरुवात करणार आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कहिंगोली : सध्या तापमानात मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. वाढत्या तापमानामुळे बहुतांश जंगलातील पानवठे कोरडेठाक झाले आहेत. त्यामुळे वन्यप्राणी पाण्याच्या शोधात भटकत आहेत. मात्र अजूनही जंगलामध्ये पाणी असल्याचा अंदाज लावत वन विभागात म्हणे १ एप्रिल पासून पानवठ्यात पाणी टकाण्यास सुरुवात करणार आहे.हिंगोली येथील रेल्वेस्थानक रोडवरील वन विभाग कार्यालयात तयार केलेल्या पानवठ्यातही पाण्याचा एकही थेंब टाकलेला नसेल तर जंगली भागातील पानवठ्याची काय स्थिती असेल? हे यावरुनच लक्षात येते. सध्या एवढे ऊन तापत आहे. दुपारनंतर पाण्याने जिवाची लाही-लाही होत आहे. जंगलात वन्यप्राण्यांना पाणीच नसल्याने पाण्याच्या शोधात भटकंतीशिवाय पर्यायच नाही. अन् एकीकडे मात्र वन विभाग जंगलात पाणी असल्याचे सांगत सुटला आहे. वास्तविक पाहता पाण्यासाठी भटकंती करणारे अनेक प्राणी कोरड्या विहिरीत तर कधी पाण्याने भरलेल्या विहिरीत पडल्याच्याही घटना घडल्या आहेत. विशेष करुन रोहि हा प्राणी अनेकदा विहिरीत पडल्याच्या घटनाही घडलेल्या आहेत. तर रस्त्यावरही अनेकदा वाहनाला धडकला आहे. त्यामुळे जंगली भागात वन्य प्राण्यांसाठी पाण्याची व्यवस्था करुन ठेवणे नितांत गरजेचे असतानाही वन विभागाकडून तसे मात्र अजिबात होत नाही. त्यातच जिल्ह्यात मध्ये विविध ठिकाणी असलेल्या मोठ- मोठ्या तलावातून रात्री - अपरात्री पाणी उपसा सुरु असल्याने त्याही तलावाची पाणीपातळी मोठ्या प्रमाणात खालावत चालली आहे. तेथे पाणी पिण्यासाठी गेलेले वन्यप्राणी गाळात रुतून मृत पावत आहेत.सध्यास्थितीत जंगली भागातील पानवठे पूर्णत: कोरडे झाल्याने पाण्याच्या शोधात भटकंती करणारे प्राणी कधी अपघातात तर कधी विहिरीत पडून मृत झाले आहेत. शिवाय, रस्ता ओलांडताना अनेकदा दुचाकीची धडक वन्य प्राण्यांना बसत आहेत. त्यामुळे वनविभागाने पाण्याची व्यवस्था करण्याची मागणी वन्यप्रेमीतून होत आहे. तर यासंदर्भात विभागीय वन अधिकारी केशव वाबळे यांच्याशी संपर्क साधला असता ते म्हणाले, सध्या तरी जंगली भागातील पाणीसाठे कोरडे झालेले नाहीत. आम्ही नियमित पाहणी करत आहोत. मात्र १ एप्रिलपासून पानवठ्यात पाणी सोडले जाणार आहे.

टॅग्स :forest departmentवनविभागWaterपाणीTemperatureतापमान