शहरं
Join us  
Trending Stories
1
बिहारमध्ये भाजपाचा डाव! नितीश कुमारांना मुख्यमंत्रीपद दिलं पण, गृहमंत्रीपद BJP कडे ठेवले, २० वर्षांनंतर गृह खाते सोडले
2
कर्नाटकच्या राजकारणात खळबळ! "सर्व १४० आमदार माझ्यासोबत", डी. के. शिवकुमार यांचे थेट विधान
3
तुम्हाला तुमची गाडी खूपच प्यारी आहे...! २० वर्षांहून जुन्या वाहनांच्या फिटनेस टेस्ट शुल्कात १५ पट वाढ
4
फेस्टीव्ह संपला नाही तोच...! फ्लिपकार्ट 'ब्लॅक फ्रायडे सेल २०२५' ची तारीख ठरली, अमेझॉन थांबतेय होय...
5
'G-20 मध्ये सामील होणार नाही', डोनाल्ड ट्रम्प दक्षिण आफ्रिकेच्या राष्ट्राध्यक्षांवर नाराज, कारण...
6
जॉब, इन्व्हेस्टमेंट, WFH च्या नावाने फ्रॉड; ऑपरेशन CyHawk अंतर्गत ४८ तासांत ८७७ जणांना अटक
7
Tejas Fighter Jet Crashed : भारताचे लढाऊ विमान तेजस कोसळले, पायलटचा मृत्यू; दुबई एअर शो दरम्यान मोठी दुर्घटना
8
भाजपा-शिंदे गटात वाद, चंद्रशेखर बावनकुळे थेट बोलले; म्हणाले, “कारवाई करू, आमचे संस्कार...”
9
Travel : अवघ्या ३ दिवसात फिरता येईल 'हा' सुंदर देश; भारताचे १०००० होतील तब्बल ५८०००! फिरण्यासाठी बेस्ट
10
"बँक खात्यात ५ लाख आले, तरीही म्हणाला आणखी पैसे लागतील"; डॉ. आदिलच्या whatsApp चॅटमध्ये काय काय?
11
केरळ, यूपीसह अनेक राज्यात SIR ला आव्हान; सर्वोच्च न्यायालयाने निवडणूक आयोगाला मागितले उत्तर...
12
मोठी बातमी! इस्रायलचे पंतप्रधान बेजामिन नेतान्याहून भारत दौऱ्यावर येणार, जुनी दोस्ती आणखी घट्ट होणार
13
Local Body ELection: दोंडाईचा नगरपालिका निवडणुकीत भाजपचा ऐतिहासिक विजय, नगराध्यक्ष आणि सर्वच २६ नगरसेवक बिनविरोध!
14
स्लीपर वंदे भारत देशभर फिरवली, ट्रायलनंतर परत पाठवली; ५ फॉल्ट समोर आले, लोकार्पण लांबणार?
15
रात्री लाईट ऑन करून झोपण्याची सवय असेल तर आताच बदला, आरोग्याचं होईल मोठं नुकसान
16
IND A vs BAN A 1st Semi Final : १२ चेंडूत ५० धावा! बांगलादेशनं भारतीय संघासमोर ठेवलं मोठं टार्गेट
17
ना थांबा, ना विश्रांती… गरुडाचा ६१०० किलोमीटर प्रवास थक्क करणारा; आशियातून आफ्रिकेत ६ दिवसांत पोहोचला
18
पाच वर्ष लपूनछपून डेटिंग, मग भरमैदानात प्रपोज... अशी फुलली स्मृती मंधाना-पलाशची Love Story
19
'माझ्याकडून हे SIR चे काम होणार नाही...' गुजरातमध्ये बीएलओ शिक्षकाने आयुष्य संपविले, देशातील आठवा...
20
BSNL ने किंमत न वाढवताही प्लॅन्स केले महाग; 'या' लोकप्रिय रिचार्ज प्लॅन्सची व्हॅलिडिटी घटवली!
Daily Top 2Weekly Top 5

Drought In Marathwada : दुष्काळी परिस्थितीमुळे शेतकऱ्यांचे ऊसतोडणीच्या कामासाठी कर्नाटकात स्थलांतर 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 2, 2018 13:07 IST

दुष्काळवाडा : दुष्काळ परिस्थिती निर्माण झाल्याने अख्खे गावच ऊसतोडणीसाठी कर्नाटक राज्यातील साखर कारखान्याकडे स्थलांतरित होत आहे. 

- दयाशील इंगोले, दुर्गसावंगी, ता., जि. हिंगोली

हिंगोली तालुक्यातील दुर्गसावंगी गावात काही दिवसांनी चिटपाखरू दिसणार नाही. दुष्काळ परिस्थिती निर्माण झाल्याने अख्खे गावच ऊसतोडणीसाठी कर्नाटक राज्यातील साखर कारखान्याकडे स्थलांतरित होणार आहे. 

पावसाने दडी मारल्याने येथील सोयाबीन, तूर, कापूस उडीद व मूग ही पिके बळीराजाच्या हातची गेली आहेत. शेतकऱ्यांच्या तोंडचा घासच निसर्गाने हिरावला. त्यामुळे दुर्गसावंगी गावातून मोठ्या प्रमाणात स्थलांतर होत आहे. गावातील सर्व मंडळी आता काम करण्यासाठी कर्नाटक, नारायणगाव तसेच परराज्यांत जात आहे. दरवर्षीच कामाच्या शोधात अर्धे गाव स्थलांतरित होते. परंतु यंदा तर हातची पिके गेल्याने शेतकरीही हवालदिल झाले आहेत.

विशेष म्हणजे अल्पभूधारक शेतकऱ्यांना तर आता गाव सोडून परराज्यांत कामाशिवाय पर्यायच उरला नाही. लहान मुलाबाळांसह शेतकरी घराबाहेर पडत आहेत. गावाची लोकसंख्या जेमतेम १८०० च्या जवळपास आहे. सर्वांचा मुख्य व्यवसाय शेतीच आहे. दुष्काळ  परिस्थितीमुळे अल्पभूधारक शेतकरी मात्र हतबल झाल्याचे चित्र दिसून आले. शेतकऱ्यांना परराज्यांत घेऊन जाण्यासाठी बुधवारी सकाळपासूनच मुकदम गावात आले होते. त्यांच्या वाहनांच्या रांगा गावात लागल्याचे पाहावयास मिळाले. दरवर्षी अर्धे गाव स्थलांतरित होते. परंतु यंदा दुष्काळ परिस्थितीमुळे नव्वद टक्के च्या वर स्थलांतर होणार आहे, असे गावकरी सांगत होते. गावातील अर्ध्या घरांना तर चक्ककुलूप दिसून आले. काही दिवसांपूर्वीच गावातून अनेक शेतकरी बाहेरील गावी गेल्याचे सांगितले. घर राखण करण्यासाठी वृद्ध माणसे मात्र दाराबाहेर दिसून आली. 

काही आकडेवारी : १७०० : गावाची लोकसंख्या ५१६ : हेक्टर भौगोलिक क्षेत्र४९९ : हेक्टर पेरणीयोग्य क्षेत्र ४०० : हेक्टर सोयाबीन ५३ : हेक्टर तूर१० : हेक्टर ज्वारी ०४ : हेक्टर कापूस ०९ : हेक्टर उडीद०८ : हेक्टर मूग८७२ : मि. मी. पर्जन्यमान ५५३ : मि. मी. पाऊस यंदा झाला

पिकांचे मोठे नुकसान झाले यावर्षी पर्जन्यमान कमी झाल्याने शेतातील पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. दुर्गसावंगी येथील शेतकऱ्यांचे स्थलांतरही वाढले आहे. गावातील शेतकऱ्यांनी कामाची मागणी केल्यास शासनाच्या विविध योजनेच्या माध्यमातून रोजगार उपलब्ध करून दिला जाईल.- एस. एम. सावंत, तालुका कृषी अधिकारी

बळीराजा काय म्हणतो?

- यंदा शेती भांडवलाचा खर्चही निघाला नाही. काही ठिकाणी ओलिताच्या जमिनी आहेत. परंतु वारंवार खंडित होणाऱ्या वीजपुरवठ्यामुळे पिकांना पाणी देता आले नाही. त्यामुळे येथील शेतकऱ्यांना स्थलांतराशिवाय पर्याय नाही. - माधवराव कवडे 

- शेतकऱ्यांची यंदा दयनीय अवस्था होणार आहे. शेतातील हातची पिके तर गेली अन् आता गावातून स्थलांतर वाढल्याने गाव ओस पडणार आहे. शेतकऱ्यांना शासनाकडून दुष्काळी मदत मिळाली पाहिजे. - दशरथ जमधाड 

- दोन एकरात कापूस व दोन एकरात सोयाबीन, तूर व उडीद अशी पिके घेतली. परंतु निसर्गाच्या लहरीपणामुळे इतर पिकांसह कापूसही जाग्यावरच जळून गेला. दोन एकरात किमान पाच क्विंटल कापूस होईल, अशी आशा होती. परंतु आता एक क्विंटल तरी कापूस होईल की नाही, याची हमी नाही. - नारायण ढोणे 

- यंदा निसर्गाच्या अवकृपेने सोयाबीनला चांगला उतारा नाही. गावात हाताला कामही मिळत नाही. त्यामुळे बाहेरगावी काम करून पोट भरल्याशिवाय पर्याय नाही. दरवर्षी गावातून ऊसतोडीसाठी स्थलांतर होते. परंतु यंदा चक्कगावच कर्नाटकला कामासाठी जाणार आहे. - गौतम साठे 

- गतवर्षीपेक्षा यावर्षी दुष्काळी परिस्थितीमुळे मोठ्या प्रमाणात गावातून स्थलांतर होत आहे. त्यामुळे गाव ओस पडणार आहे. आता दुकानात विक्रीसाठी भरलेले किराणा साहित्य कोण घेऊन जाणार? - शेख अखिल, दुकानचालक 

टॅग्स :droughtदुष्काळMarathwadaमराठवाडाFarmerशेतकरीagricultureशेतीAgriculture Sectorशेती क्षेत्र