शहरं
Join us  
Trending Stories
1
'सर्व भारतीयांचा DNA एकच; हिंदू राष्ट्र म्हणजे...', RSS प्रमुख मोहन भागवतांचे मोठे विधान
2
डोनाल्ड ट्रम्प यांचा ४ वेळा फोन, पण PM मोदींचा बोलण्यास नकार; जर्मन वृत्तपत्राचा दावा
3
डीएचएलसह अनेक कंपन्यांनी अमेरिकेकडे पाठवणारे पार्सल थांबवले! डोनाल्ड ट्रम्प यांच्यामुळे उडाला गोंधळ
4
सिंहगडावर 'त्या' ५ दिवसांत काय काय घडलं? बेपत्ता झालेल्या गौतम गायकवाडने सांगितला थरार
5
काश्मीर खोऱ्यातील तीन मंडळांना गणेश मूर्ती प्रदान; पुनीत बालन यांच्यासह मानाच्या गणेश मंडळाचा स्तुत्य उपक्रम!
6
वैष्णोदेवी यात्रा मार्गावर मोठा अपघात; भूस्खलनामुळे ५ भाविकांचा मृत्यू, १४ जखमी
7
Vidarbha Weather Alert: पावसाचा विदर्भाकडे मोर्चा; अनेक ठिकाणी मुसळधार कोसळणार; कोणत्या जिल्ह्यांना अलर्ट?
8
आणखी एक 'निक्की', हुंड्याने घेतला संजूचा जीव; मुलीसह स्वतःला पेटवलं, चिठ्ठीत म्हणाली...
9
किचनमधील 'या' वस्तूंमुळे दुप्पट वाढतो कॅन्सरचा धोका; डॉक्टर म्हणाले, आताच उचला अन् बाहेर फेका
10
७ मुलांची आई २२ वर्षांच्या भाच्याच्या प्रेमात पडली, पळून जायचा प्लॅन केला अन् पतीचे तीन लाखही केले लांपास!
11
बदल्याची आग! लव्ह मॅरेजनंतर पहिल्यांदा गावी आलं कपल; कुटुंब झालं हैवान, केली जावयाची हत्या
12
"मुंबईत येणारच, न्यायदेवता नक्कीच न्याय देईल", हायकोर्टाच्या निर्णयानंतरही मनोज जरांगे ठाम
13
पाकिस्तानला आसिम मुनीर यांचं किती कौतुक! 'ऑपरेशन सिंदूर'मध्ये आपटल्यानंतरही सरकारने दिलं मोठ बक्षीस
14
दक्षिण कोरियाचे राष्ट्राध्यक्ष ली व्हाईट हाऊसमध्ये, ट्रम्प यांची घेतली भेट! चर्चेत झाला किम जोंग उनचा उल्लेख
15
झाली का गणपती पूजेची तयारी? काय राहिलं, काय घेतलं? झटपट तपासून घ्या पूजा साहित्य 
16
Nikki Murder Case : "न्यायाच्या बदल्यात न्याय, रक्ताच्या बदल्यात रक्त, आम्ही मुलगी गमावली"; निक्कीच्या आईचा टाहो
17
संधी मिळताच मोलकरणीने मारला डल्ला, घरातून ३५ लाखांचे दागिने, १० लाखांची रक्कम लंपास
18
Yavatmal: 'ती' गोष्ट लपवण्यासाठी रात्रीस 'खेळ'?; ग्रामसभेच्या आदल्या दिवशीच फोडले ग्रामपंचायत कार्यालय अन्...
19
गणपती आगमनाला पाऊस येणं हे तर शुभ लक्षण; यंदाही मुसळधार कोसळण्याची शक्यता 
20
भारताला 'मृत अर्थव्यवस्था' म्हणणाऱ्या ट्रम्प यांची मोठी गुंतवणूक; दरमहा होते कोट्यवधीची कमाई...

2.96 लाख शेतकऱ्यांना 50 टक्के मदत वितरित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 8, 2021 05:37 IST

हिंगोली : जिल्ह्यात यंदाही शेतकऱ्यांना सुरुवातीपासूनच अतिवृष्टीचा फटका बसला. त्यातच ऐन काढणीत यंदा पुन्हा शेतकऱ्यांची गाळण उडाल्याने मोठे नुकसान ...

हिंगोली : जिल्ह्यात यंदाही शेतकऱ्यांना सुरुवातीपासूनच अतिवृष्टीचा फटका बसला. त्यातच ऐन काढणीत यंदा पुन्हा शेतकऱ्यांची गाळण उडाल्याने मोठे नुकसान झाले असून त्यामुळे जिल्ह्यातील सर्वच शेतकऱ्यांना अतिवृष्टीची मदत मिळत असून यात पहिल्या टप्प्यात ५० टक्के निधीचे वितरण झाले आहे. आणखी तेवढाच निधी लागणार आहे.

हिंगोली जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे नुकसान झाल्याने सर्व भागांतील शेतकऱ्यांकडून ओला दुष्काळ जाहीर करण्याची मागणी होत होती. त्यात शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात निवेदने दिली होती. त्यातच पालकमंत्री, खासदार, आमदारांनीही विविध भागांत दाैरे करून शेतकऱ्यांच्या नुकसानीची पाहणी केली होती. प्रशासनानेही या सर्व बाबींची दखल घेत तात्काळ पंचनामे केले. त्यात मोठ्या प्रमाणात नुकसान असल्याचे समोर आले. त्यामुळे तसा अहवालही शासनाला पाठविण्यात आला होता. त्याचा परिणाम म्हणून जिल्ह्यात सरसकट दुष्काळ घोषित झाला. शेतकऱ्यांना भरपाईही जाहीर झाली. नवीन निकषानुसार तसेच राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापनच्या नियमानुसार मदत जाहीर झाली आहे.

यात पहिल्या टप्प्यात शेतकऱ्यांना मदत देण्यासाठी दिवाळीपूर्वी ११४ कोटी रुपयांचा पहिला हप्ता मिळाला होता. त्याचे वितरण करण्यासाठी तो लागलीच तहसील कार्यालयांना प्रदान करण्यात आला होता. मात्र, प्रत्येक शेतकऱ्याचे खातेक्रमांक, क्षेत्रफळ आदी बाबींनुसार तो विभागून खात्यावर टाकण्यासाठी जवळपास एक ते दीड महिन्याचा कालावधी लोटला. आता सर्वच शेतकऱ्यांच्या खात्यावर अनुदानाच्या ५० टक्के रक्कम जमा झाली आहे. तर उर्वरित मदतीसाठी शासनाकडे मागणी करण्यात आली आहे. तो आल्यावर वितरित केला जाईल.

उरलेली रक्कम कधीपर्यंत मिळणार

अतिवृष्टीतील अनुदान दिवाळीपूर्वी देण्याचे आश्वासन शासनाने दिले होते. मात्र, दिवाळीनंतर खात्यावर अर्धी रक्कम जमा झाली आहे. आता उरलेली रक्कम कधी मिळणार, हा प्रश्नच आहे.

- संजय गायकवाड

शेतकरी

शासनाकडे उर्वरित रक्कमेची मागणी

यंदाच्या अतिवृष्टीत नुकसान झालेल्या सर्व शेतकऱ्यांच्या खात्यावर शासनाकडून प्राप्त अनुदानातून ५० टक्के रक्कम जमा झाली आहे. उरलेले अनुदान आल्यानंतर पुन्हा ५० टक्के रक्कम खात्यावर जमा होईल.

- रुचेश जयवंशी,

जिल्हाधिकारी