शहरं
Join us  
Trending Stories
1
पुण्यात आणखी हुंडाबळी, गरोदर पूजाने उचलले टोकाचे पाऊल; महाळुंगे येथील घटना
2
'जोपर्यंत हिंदू स्वतः मजबूत होत नाही, तोपर्यंत...', RSS प्रमुख मोहन भागवत यांची स्पष्टोक्ती
3
Narendra Modi : "ऑपरेशन सिंदूर हे फक्त मिशन नाही, बदलत्या भारताचं चित्र"; पंतप्रधान मोदींनी केलं सैन्याचं कौतुक
4
शनि जयंती: तुमची रास कोणती? राशीनुसार ‘हे’ उपाय करा, शनिच्या अशुभ प्रभावातून मुक्तता मिळवा!
5
महाराष्ट्राचे नवे EV धोरण लागू! २०३० पर्यंत या महामार्गांवर टोल फ्री; इमारतींमध्ये चार्जिंग पॉईंट बंधनकारक...
6
Vaishnavi Hagawane Death Case : फरार निलेश चव्हाणसाठी पिंपरी चिंचवड पोलिसांची लुक आऊट नोटीस जारी
7
जगातल्या 'या' ७ देशांमध्ये राहत नाही एकही भारतीय; तिसऱ्या देशाचं नाव ऐकून व्हाल हैराण
8
ऑपरेशन सिंदूरमधून भारतालाही मिळाला धडा, या बाबींमध्ये कराव्या लागणार सुधारणा, संरक्षण तज्ज्ञांनी केली सूचना
9
वैष्णवी मृत्यू प्रकरण : फरार असताना राजेंद्र अन् सुशील हगवणेंनी वापरलेली गाडी जप्त
10
तुमच्या घरातील सोनं झालं अजून महाग! एकाच दिवसात मोठी वाढ, आजचे दर ऐकून बसेल धक्का!
11
Jyoti Malhotra : ज्योती मल्होत्राचे दहशतवाद्यांशी थेट संबंध होते का? पोलिसांनी दिली महत्त्वाची माहिती
12
'कभी खुशी कभी गम' फेम अभिनेत्री होणार आई, सोशल मीडियावर फोटो शेअर करत दिली गुड न्यूज
13
Baba Vanga: दोन महिन्यांत जगभरात हाहाकार माजणार! काय आहे बाबा वेंगाची भविष्यवाणी? जाणून घ्या
14
"जे अमेरिकेने सहन केले, ते आम्हीही सहन करत आहोत", शशी थरूर यांनी पाकिस्तानला थेट सुनावले!
15
'ऑपरेशन सिंदूर' करून घरी परतलेल्या जवानाचा दुर्दैवी मृत्यू; काकाचं श्राद्ध करतानाच आला हृदयविकाराचा झटका  
16
गुंतवणुकीची सुवर्णसंधी! 'या' आठवड्यात ९ कंपन्यांचे IPO बाजारात, तुमच्यासाठी 'कोणता' ठरणार फायदेशीर?
17
"वाचल्यावर सर्व कळेल..!"; परेश रावल यांनी 'हेरा फेरी ३'च्या मेकर्सला दिलं कायदेशीर उत्तर, काय म्हणाले?
18
जंगल, गाव-खेडे सोडून हत्ती शहरात आले; गडचिरोलीत नागरिकांची उडाली घाबरगुंडी
19
VIDEO: अनुष्का शर्मा-विराट कोहली अयोध्यात, रामलल्ला आणि हनुमान गढी येथे बजरंगबलीचं घेतलं दर्शन!
20
मोठी बातमी! भारताने जपानला मागे टाकले; जगातील चौथी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनला

2.96 लाख शेतकऱ्यांना 50 टक्के मदत वितरित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 8, 2021 05:37 IST

हिंगोली : जिल्ह्यात यंदाही शेतकऱ्यांना सुरुवातीपासूनच अतिवृष्टीचा फटका बसला. त्यातच ऐन काढणीत यंदा पुन्हा शेतकऱ्यांची गाळण उडाल्याने मोठे नुकसान ...

हिंगोली : जिल्ह्यात यंदाही शेतकऱ्यांना सुरुवातीपासूनच अतिवृष्टीचा फटका बसला. त्यातच ऐन काढणीत यंदा पुन्हा शेतकऱ्यांची गाळण उडाल्याने मोठे नुकसान झाले असून त्यामुळे जिल्ह्यातील सर्वच शेतकऱ्यांना अतिवृष्टीची मदत मिळत असून यात पहिल्या टप्प्यात ५० टक्के निधीचे वितरण झाले आहे. आणखी तेवढाच निधी लागणार आहे.

हिंगोली जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे नुकसान झाल्याने सर्व भागांतील शेतकऱ्यांकडून ओला दुष्काळ जाहीर करण्याची मागणी होत होती. त्यात शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात निवेदने दिली होती. त्यातच पालकमंत्री, खासदार, आमदारांनीही विविध भागांत दाैरे करून शेतकऱ्यांच्या नुकसानीची पाहणी केली होती. प्रशासनानेही या सर्व बाबींची दखल घेत तात्काळ पंचनामे केले. त्यात मोठ्या प्रमाणात नुकसान असल्याचे समोर आले. त्यामुळे तसा अहवालही शासनाला पाठविण्यात आला होता. त्याचा परिणाम म्हणून जिल्ह्यात सरसकट दुष्काळ घोषित झाला. शेतकऱ्यांना भरपाईही जाहीर झाली. नवीन निकषानुसार तसेच राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापनच्या नियमानुसार मदत जाहीर झाली आहे.

यात पहिल्या टप्प्यात शेतकऱ्यांना मदत देण्यासाठी दिवाळीपूर्वी ११४ कोटी रुपयांचा पहिला हप्ता मिळाला होता. त्याचे वितरण करण्यासाठी तो लागलीच तहसील कार्यालयांना प्रदान करण्यात आला होता. मात्र, प्रत्येक शेतकऱ्याचे खातेक्रमांक, क्षेत्रफळ आदी बाबींनुसार तो विभागून खात्यावर टाकण्यासाठी जवळपास एक ते दीड महिन्याचा कालावधी लोटला. आता सर्वच शेतकऱ्यांच्या खात्यावर अनुदानाच्या ५० टक्के रक्कम जमा झाली आहे. तर उर्वरित मदतीसाठी शासनाकडे मागणी करण्यात आली आहे. तो आल्यावर वितरित केला जाईल.

उरलेली रक्कम कधीपर्यंत मिळणार

अतिवृष्टीतील अनुदान दिवाळीपूर्वी देण्याचे आश्वासन शासनाने दिले होते. मात्र, दिवाळीनंतर खात्यावर अर्धी रक्कम जमा झाली आहे. आता उरलेली रक्कम कधी मिळणार, हा प्रश्नच आहे.

- संजय गायकवाड

शेतकरी

शासनाकडे उर्वरित रक्कमेची मागणी

यंदाच्या अतिवृष्टीत नुकसान झालेल्या सर्व शेतकऱ्यांच्या खात्यावर शासनाकडून प्राप्त अनुदानातून ५० टक्के रक्कम जमा झाली आहे. उरलेले अनुदान आल्यानंतर पुन्हा ५० टक्के रक्कम खात्यावर जमा होईल.

- रुचेश जयवंशी,

जिल्हाधिकारी