शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
2
होर्मुजच्या समुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
3
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
4
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
5
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
6
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
7
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
8
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
9
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
10
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
11
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
12
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
13
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
14
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
15
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
16
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
17
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
18
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
19
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
Daily Top 2Weekly Top 5

'कापूस सुकून गेलाय', वाळलेल्या कापसावर आदित्य ठाकरेंची प्रतिक्रिया ऐकून शेतकरी अवाक्

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 16, 2019 17:19 IST

युवा सेनेचे प्रमुख आदित्य ठाकरे तीन दिवसाच्या दुष्काळी दौऱ्यावर मराठवाड्यात आले आहेत.

ठळक मुद्दे आदित्य ठाकरे मराठवाड्यातील दुष्काळग्रस्त गावांच्या दौऱ्यावर  येणार होते १ वाजता, पोहोचले ४ वाजताशेतकरी बसले ताटकळत

आखाडा बाळापूर (जि. हिंगोली) : युवासेनेचे प्रमुख आदित्य ठाकरे मराठवाड्यातील दुष्काळग्रस्त दौऱ्यावर आले आहेत. ते गावात येणार म्हणून सकाळपासून शेतकरी वाट बघत बसले. पण, १ वाजता येणारे आदित्य ठाकरे प्रत्यक्षात पोहोचले ४ वाजता. त्यात शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी केलेल्या संवादात आदित्य ठाकरे यांनी वाळून गेलेल्या कापसाला सुकून गेलाय असे म्हणताच, उपस्थित शेतकरी अवाक् झाले आणि हसलेही ! 

युवा सेनेचे प्रमुख आदित्य ठाकरे तीन दिवसाच्या दुष्काळी दौऱ्यावर मराठवाड्यात आले आहेत. मंगळवारी दुपारी १ वाजता ते कळमनुरी तालुक्यातील दुष्काळग्रस्त गावांना भेट देणार होते. परंतु त्यांना कळमनुरीत येण्यासाठी चार वाजले. दरम्यान, सकाळपासून शेतकरी ताटकळत बसले होते. कळमनुरी तालुक्यातील साळवा या गावाला आदित्य यांनी भेट दिली. साळव्यातील श्रीपतराव बाबाराव कदम, विठ्ठल किशनराव माखणे, सुभाष सखाराम करंडे, तुकाराम केरबा करंडे, श्रीधर भाऊराव टोपरे या शेतकऱ्यांना प्रातिनिधीक स्वरुपात पशुखाद्याचे वाटप केले. त्यानंतर कांडली गावातील एकनाथ भारती यांच्या शेतातील कापसाच्या वाळलेल्या शेतीची पाहणी केली. तसेच प्रशासनाकडून काही मदत केली का? अशी चौकशीही केली. त्यानंतर हरिभाऊ सोनटक्के या शेतकऱ्याला पशुखाद्याचे वाटप केले. 

कांडली येथे शेतकऱ्यांशी संवाद साधताना आदित्य म्हणाले, आत्महत्या करू नका. खचून जाऊ नका. शिवसेना तुमच्या पाठीशी आहे. तुम्हाला कुठलीही अडचण आल्यास शिवसैनिकाला हाक मारा. तुम्हाला मदत मिळेल, असा धीर त्यांनी दिला. पण, वाळलेल्या कापसाच्या शेतीला आदित्य यांनी ‘कापूस सुकून गेला’ असे म्हणताच गोंधळून गेलेल्या शेतकऱ्यांमध्ये खसखस पिकली. यानंतर तोंडापूर येथेही त्यांच्या हस्ते पशुखाद्याचे वाटप करण्यात आले. दौऱ्यात त्यांच्यासमवेत आ.डॉ.जयप्रकाश मुंदडा, आ. हेमंत पाटील, आ. विप्लव बाजोरिया, जिल्हाप्रमुख संतोष बांगर, जि.प. अध्यक्षा शिवराणी नरवाडे,  जिल्हा संपर्कप्रमुख आनंद जाधव, युवा जिल्हाप्रमुख दिलीप घुगे, भिसेंसह शिवसैनिक उपस्थित होते. 

शेतकऱ्यांची निराशाकांडली व साळवा गावात आदित्य ठाकरे येणार असल्याने शेतकऱ्यांना १० वाजताच बोलविण्यात आले होते. पण, आदित्य ४ वाजता आले. त्यामुळे शेतकऱ्यांना ताटकळत बसावे लागले. तीनही ठिकाणी अवघ्या दहा-दहा मिनिटांत कार्यक्रम उरकून ते रवाना झाले. त्यांच्या या मॅरेथॉन दौऱ्यात नाममात्र संवाद साधून गेले. त्यामुळे शेतकऱ्यांची निराशा झाली.

टॅग्स :Aditya Thackreyआदित्य ठाकरेdroughtदुष्काळFarmerशेतकरीcottonकापूस