शहरं
Join us  
Trending Stories
1
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
2
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
3
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
4
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
5
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
6
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
7
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
8
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
9
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
10
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
11
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
12
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
13
मुंबई: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
14
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
15
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
16
मनसेकडून प्रतिसभागृह, आदित्य ठाकरेंना निमंत्रण; भाजपा नाराज, सहभागी होण्यास नकार
17
काळजी घ्या! कारमध्ये ठेवलेल्या बाटलीमुळे आग लागू शकते; कारणे जाणून घ्या
18
वडील विनोद खन्ना यांच्यासोबत काम का करायचं नव्हतं? 'छावा' फेम अक्षय खन्नाने सांगितलेलं हैराण करणारं कारण
19
Airtel नं लाँच केला जबरदस्त प्लान; हाय स्पीड डेटासह मिळणार 'इतके' फायदे, जाणून घ्या
20
बदलापूर रेल्वे स्थानकातून येऊ शकते चेंगराचेंगरीची बातमी; 'हा' व्हिडीओ बघून काळजात होईल धस्स!

'कापूस सुकून गेलाय', वाळलेल्या कापसावर आदित्य ठाकरेंची प्रतिक्रिया ऐकून शेतकरी अवाक्

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 16, 2019 17:19 IST

युवा सेनेचे प्रमुख आदित्य ठाकरे तीन दिवसाच्या दुष्काळी दौऱ्यावर मराठवाड्यात आले आहेत.

ठळक मुद्दे आदित्य ठाकरे मराठवाड्यातील दुष्काळग्रस्त गावांच्या दौऱ्यावर  येणार होते १ वाजता, पोहोचले ४ वाजताशेतकरी बसले ताटकळत

आखाडा बाळापूर (जि. हिंगोली) : युवासेनेचे प्रमुख आदित्य ठाकरे मराठवाड्यातील दुष्काळग्रस्त दौऱ्यावर आले आहेत. ते गावात येणार म्हणून सकाळपासून शेतकरी वाट बघत बसले. पण, १ वाजता येणारे आदित्य ठाकरे प्रत्यक्षात पोहोचले ४ वाजता. त्यात शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी केलेल्या संवादात आदित्य ठाकरे यांनी वाळून गेलेल्या कापसाला सुकून गेलाय असे म्हणताच, उपस्थित शेतकरी अवाक् झाले आणि हसलेही ! 

युवा सेनेचे प्रमुख आदित्य ठाकरे तीन दिवसाच्या दुष्काळी दौऱ्यावर मराठवाड्यात आले आहेत. मंगळवारी दुपारी १ वाजता ते कळमनुरी तालुक्यातील दुष्काळग्रस्त गावांना भेट देणार होते. परंतु त्यांना कळमनुरीत येण्यासाठी चार वाजले. दरम्यान, सकाळपासून शेतकरी ताटकळत बसले होते. कळमनुरी तालुक्यातील साळवा या गावाला आदित्य यांनी भेट दिली. साळव्यातील श्रीपतराव बाबाराव कदम, विठ्ठल किशनराव माखणे, सुभाष सखाराम करंडे, तुकाराम केरबा करंडे, श्रीधर भाऊराव टोपरे या शेतकऱ्यांना प्रातिनिधीक स्वरुपात पशुखाद्याचे वाटप केले. त्यानंतर कांडली गावातील एकनाथ भारती यांच्या शेतातील कापसाच्या वाळलेल्या शेतीची पाहणी केली. तसेच प्रशासनाकडून काही मदत केली का? अशी चौकशीही केली. त्यानंतर हरिभाऊ सोनटक्के या शेतकऱ्याला पशुखाद्याचे वाटप केले. 

कांडली येथे शेतकऱ्यांशी संवाद साधताना आदित्य म्हणाले, आत्महत्या करू नका. खचून जाऊ नका. शिवसेना तुमच्या पाठीशी आहे. तुम्हाला कुठलीही अडचण आल्यास शिवसैनिकाला हाक मारा. तुम्हाला मदत मिळेल, असा धीर त्यांनी दिला. पण, वाळलेल्या कापसाच्या शेतीला आदित्य यांनी ‘कापूस सुकून गेला’ असे म्हणताच गोंधळून गेलेल्या शेतकऱ्यांमध्ये खसखस पिकली. यानंतर तोंडापूर येथेही त्यांच्या हस्ते पशुखाद्याचे वाटप करण्यात आले. दौऱ्यात त्यांच्यासमवेत आ.डॉ.जयप्रकाश मुंदडा, आ. हेमंत पाटील, आ. विप्लव बाजोरिया, जिल्हाप्रमुख संतोष बांगर, जि.प. अध्यक्षा शिवराणी नरवाडे,  जिल्हा संपर्कप्रमुख आनंद जाधव, युवा जिल्हाप्रमुख दिलीप घुगे, भिसेंसह शिवसैनिक उपस्थित होते. 

शेतकऱ्यांची निराशाकांडली व साळवा गावात आदित्य ठाकरे येणार असल्याने शेतकऱ्यांना १० वाजताच बोलविण्यात आले होते. पण, आदित्य ४ वाजता आले. त्यामुळे शेतकऱ्यांना ताटकळत बसावे लागले. तीनही ठिकाणी अवघ्या दहा-दहा मिनिटांत कार्यक्रम उरकून ते रवाना झाले. त्यांच्या या मॅरेथॉन दौऱ्यात नाममात्र संवाद साधून गेले. त्यामुळे शेतकऱ्यांची निराशा झाली.

टॅग्स :Aditya Thackreyआदित्य ठाकरेdroughtदुष्काळFarmerशेतकरीcottonकापूस