शहरं
Join us  
Trending Stories
1
“आपला पक्ष मुंबईत सर्वांत जास्त बलवान आहे, यंदा महापालिकेत मनसेचीच सत्ता येणार”: राज ठाकरे
2
पंतप्रधान मोदींनंतर चार तासांनी अमित शाह राष्ट्रपतींना भेटले; ५ ऑगस्टला काहीतरी मोठे घडणार....
3
IND vs ENG :मियाँ मॅजिक! बॅक टू बॅक ओव्हरमध्ये विकट; KL राहुलनं एक कॅच सोडला
4
१७,००० कोटींचा घोटाळा! अनिल अंबानींच्या डोकेदुखीत वाढ, ED आता 'या' लोकांची चौकशी करणार
5
Post Office ची ५० वर्ष जुनी सेवा होणार बंद, तुमच्यावर काय परिणाम होणार?
6
नव्या प्रभाग रचनेला आव्हान देणाऱ्या याचिका सुप्रीम कोर्टाने फेटाळल्या; स्थानिक निवडणुकांना हिरवा कंदील
7
६ ऑगस्टला बच्चू कडू राज ठाकरेंची भेट घेण्याची शक्यता; शेतकरी आंदोलनाला मनसेचं पाठबळ मिळणार?
8
लॉटरी लागली! टाटांच्या 'या' शेअरचे होणार १० तुकडे, १०० शेअर्सचे थेट १००० होणार, रेकॉर्ड डेट कधी?
9
मैत्रिणीचा संसार मोडला, नंतर तिच्याच नवऱ्याशी केलं लग्न; आता ३ वर्षांतच अभिनेत्रीवर घटस्फोट घेण्याची वेळ
10
Nagpur: नागपुरात मद्यधुंद अवस्थेत कार चालवणाऱ्या जवानानं ३० जणांना उडवलं, व्हिडीओ व्हायरल!
11
बदल्याची आग! आईने वडिलांना फसवून दुसरं लग्न केलं, संतापलेल्या मुलाने तिला कारने चिरडलं
12
"मराठीच्या आधी हिंदी भाषेला राजभाषेचा दर्जा मिळाला, तेव्हा महाराष्ट्रही अस्तित्वात नव्हता"
13
कैदी नंबर १५,५२८, प्रज्वल रेवण्णाचा तुरुंगातील दिनक्रम आला समोर, दररोज करावं लागेल एवढं काम   
14
Putrada Ekadashi 2025: पुत्रदा एकादशीला 'हे' नियम पाळले तरच होतो संतानसुखाचा लाभ!
15
एकनाथ शिंदेंनी केला करेक्ट कार्यक्रम, बेळगावात पक्ष बळकट होणार; अनेक मठाधिपती शिवसेनेत
16
४० व्या वर्षीही करू शकता गुंतवणुकीचा श्रीगणेशा; रिटायरमेंटच्या वेळी होऊ शकता कोट्यधीश, महिन्याला किती कराल गुंतवणूक
17
'किमान माणसासारखी तरी वागणूक...' IT अभियंता तरुणीची पोस्ट व्हायरल, म्हणाले मॅनेजरसमोरच मी...
18
Mumbai: बलात्कारानंतर गर्भवती राहिलेल्या अल्पवयीन मेहुणीची घरीच प्रसूती; भाऊजींसह बहिणीलाही अटक
19
“हिंदूंना बदनाम करण्याच्या आव्हाडांच्या आरोपांशी उद्धव ठाकरे सहमत आहेत का?”; भाजपाचा सवाल

'कापूस सुकून गेलाय', वाळलेल्या कापसावर आदित्य ठाकरेंची प्रतिक्रिया ऐकून शेतकरी अवाक्

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 16, 2019 17:19 IST

युवा सेनेचे प्रमुख आदित्य ठाकरे तीन दिवसाच्या दुष्काळी दौऱ्यावर मराठवाड्यात आले आहेत.

ठळक मुद्दे आदित्य ठाकरे मराठवाड्यातील दुष्काळग्रस्त गावांच्या दौऱ्यावर  येणार होते १ वाजता, पोहोचले ४ वाजताशेतकरी बसले ताटकळत

आखाडा बाळापूर (जि. हिंगोली) : युवासेनेचे प्रमुख आदित्य ठाकरे मराठवाड्यातील दुष्काळग्रस्त दौऱ्यावर आले आहेत. ते गावात येणार म्हणून सकाळपासून शेतकरी वाट बघत बसले. पण, १ वाजता येणारे आदित्य ठाकरे प्रत्यक्षात पोहोचले ४ वाजता. त्यात शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी केलेल्या संवादात आदित्य ठाकरे यांनी वाळून गेलेल्या कापसाला सुकून गेलाय असे म्हणताच, उपस्थित शेतकरी अवाक् झाले आणि हसलेही ! 

युवा सेनेचे प्रमुख आदित्य ठाकरे तीन दिवसाच्या दुष्काळी दौऱ्यावर मराठवाड्यात आले आहेत. मंगळवारी दुपारी १ वाजता ते कळमनुरी तालुक्यातील दुष्काळग्रस्त गावांना भेट देणार होते. परंतु त्यांना कळमनुरीत येण्यासाठी चार वाजले. दरम्यान, सकाळपासून शेतकरी ताटकळत बसले होते. कळमनुरी तालुक्यातील साळवा या गावाला आदित्य यांनी भेट दिली. साळव्यातील श्रीपतराव बाबाराव कदम, विठ्ठल किशनराव माखणे, सुभाष सखाराम करंडे, तुकाराम केरबा करंडे, श्रीधर भाऊराव टोपरे या शेतकऱ्यांना प्रातिनिधीक स्वरुपात पशुखाद्याचे वाटप केले. त्यानंतर कांडली गावातील एकनाथ भारती यांच्या शेतातील कापसाच्या वाळलेल्या शेतीची पाहणी केली. तसेच प्रशासनाकडून काही मदत केली का? अशी चौकशीही केली. त्यानंतर हरिभाऊ सोनटक्के या शेतकऱ्याला पशुखाद्याचे वाटप केले. 

कांडली येथे शेतकऱ्यांशी संवाद साधताना आदित्य म्हणाले, आत्महत्या करू नका. खचून जाऊ नका. शिवसेना तुमच्या पाठीशी आहे. तुम्हाला कुठलीही अडचण आल्यास शिवसैनिकाला हाक मारा. तुम्हाला मदत मिळेल, असा धीर त्यांनी दिला. पण, वाळलेल्या कापसाच्या शेतीला आदित्य यांनी ‘कापूस सुकून गेला’ असे म्हणताच गोंधळून गेलेल्या शेतकऱ्यांमध्ये खसखस पिकली. यानंतर तोंडापूर येथेही त्यांच्या हस्ते पशुखाद्याचे वाटप करण्यात आले. दौऱ्यात त्यांच्यासमवेत आ.डॉ.जयप्रकाश मुंदडा, आ. हेमंत पाटील, आ. विप्लव बाजोरिया, जिल्हाप्रमुख संतोष बांगर, जि.प. अध्यक्षा शिवराणी नरवाडे,  जिल्हा संपर्कप्रमुख आनंद जाधव, युवा जिल्हाप्रमुख दिलीप घुगे, भिसेंसह शिवसैनिक उपस्थित होते. 

शेतकऱ्यांची निराशाकांडली व साळवा गावात आदित्य ठाकरे येणार असल्याने शेतकऱ्यांना १० वाजताच बोलविण्यात आले होते. पण, आदित्य ४ वाजता आले. त्यामुळे शेतकऱ्यांना ताटकळत बसावे लागले. तीनही ठिकाणी अवघ्या दहा-दहा मिनिटांत कार्यक्रम उरकून ते रवाना झाले. त्यांच्या या मॅरेथॉन दौऱ्यात नाममात्र संवाद साधून गेले. त्यामुळे शेतकऱ्यांची निराशा झाली.

टॅग्स :Aditya Thackreyआदित्य ठाकरेdroughtदुष्काळFarmerशेतकरीcottonकापूस