शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसांत दाेनदा प्रवासी लटकले; सीएसएमटी ते वडाळ्यापर्यंत वाहतूक कोलमडली
2
आजचे राशीभविष्य - २ मे २०२४; व्यापारासाठी दिवस उत्तम, आर्थिक बाबी मार्गी लागतील
3
२८-१५-५ महायुतीचा फॉर्म्युला; नाशिक, ठाणे शिंदेसेनेला, पालघर भाजपकडे
4
पहिल्या दोन टप्प्यांतील मतदानाची अंतिम टक्केवारी जाहीर; ३ टक्क्यांची वाढ
5
राज ठाकरे सभा घेऊन कोणाच्या वरातीत नाचणार? सभेसाठी मनसेच्या अर्जावर उद्धवसेनेची टीका
6
भाजप-उद्धवसेना फक्त एका ठिकाणी समोरासमोर; गळ्यात गळे घालून फिरणारे शिवसैनिक एकमेकांच्या विरोधात
7
मुंबईत षटकार मारणार, राज्यात १५ जागा जिंकणार; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना विश्वास
8
लॉकअपमधल्या चादरीच्या पट्टीने गळफास घेत बिश्नोई गँगच्या आरोपीची आत्महत्या
9
देशाच्या विकासात काँग्रेस अडथळा; ‘फॅमिली फर्स्ट’मुळे भारताचे नुकसान, योगी आदित्यनाथ यांचे टीकास्त्र
10
ठाण्यात दोघा माजी महापौरांमध्ये पुन्हा लढत; २०१४ मध्ये राजन विचारे विरुद्ध संजीव नाईक झाली होती लढत
11
प्रज्वल रेवण्णा उद्या बंगळुरूत येणार; आरोप तथ्यहीन असल्याचा दावा
12
पंतप्रधानांच्या पत्रात दडला निवडणुकीचा अजेंडा; उमेदवारांच्या माध्यमातून मतदारांना संदेश
13
श्रीकांत यांच्या कल्याणसाठी म्हस्केंना उमेदवारी देऊन विचारेंना बाय ? राजन विचारे यांना निवडणूक सोपी जाणार अशी चर्चा सुरू
14
शिंदेंना चढावी लागणार ‘व्हाइट हाउस’ची पायरी; गणेश नाईक यांचा नवी मुंबईसह आगरी मतांवर प्रभाव
15
मराठी पाट्यांचे रडगाणे; ९८ टक्के आस्थापनांनी न्यायालयाच्या आदेशाचे पालन केले
16
दगडफेकीपर्यंतचा प्रचार कोणत्या दिशेने जाणार?
17
MS Dhoni ने केला डॅरिल मिचेलचा अपमान? खवळला इरफान पठाण, Video Viral 
18
100 शाळा अन् 143 कॉल…; बॉम्बच्या धमकीनंतर दिल्ली सरकार अ‍ॅक्शन मोडवर, अ‍ॅडव्हायजरी जारी
19
जय श्रीराम! राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू अयोध्येत; रामलला चरणी नतमस्तक, शरयू नदीचे केले पूजन
20
शरद पवारांनंतर उद्धव ठाकरेंनी भरसभेत मागितली माफी; PM मोदींवर केली टीका, म्हणाले...

टंचाईग्रस्त भागातील विद्यार्थ्यांना शुल्कमाफी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 10, 2019 12:12 AM

राज्यातील टंचाईग्रस्त भागातील इयत्ता दहावी-बारावीतील विद्यार्थ्यांच्या शुल्कमाफीसाठी शासनाकडून खर्च करण्यासाठी प्रशासकीय मान्यता मिळाली आहे. त्या अनुषंगाने जिल्ह्यातील टंचाईग्रस्त भागातील विद्यार्थ्यांची परीक्षा शुल्क माफ करण्यात येणार आहे.

ठळक मुद्देशिक्षण विभाग : शासनाकडून निधीस मंजुरी

हिंगोली : राज्यातील टंचाईग्रस्त भागातील इयत्ता दहावी-बारावीतील विद्यार्थ्यांच्या शुल्कमाफीसाठी शासनाकडून खर्च करण्यासाठी प्रशासकीय मान्यता मिळाली आहे. त्या अनुषंगाने जिल्ह्यातील टंचाईग्रस्त भागातील विद्यार्थ्यांची परीक्षा शुल्क माफ करण्यात येणार आहे.यावर्षी दुष्काळजन्य परिस्थिती निर्माण झाल्याने शेतकरी हतबल झाला आहे. त्यामुळे शासनाने दुष्काळ जाहिर केला असून टंचाईग्रस्त भागातील विद्यार्थ्यांच्या परीक्षा शुल्कमाफीचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे या निर्णयामुळे विद्यार्थ्यांना फायदा होणार आहे.दहावी बारावतील विद्यार्थ्यांची परीक्षा शुल्कमाफीचा निर्णय शासनाने घेतला आहे. त्यामुळे जिल्ह्यातील टंचाईग्रस्त गावांची यादीनुसार तेथील विद्यार्थ्यांचे शुल्क माफ केले जाणार आहेत. शासनाकडून याबाबत शिक्षण विभागास तशा सूचनाही देण्यात आल्या आहेत. सद्यस्थितीत राज्यमंडळाकडे एकूण ८ कोटीं ३२ लाख ६८ हजार ९०५ एवढा निधी शिल्लक आहे. या शिल्लक निधीतून राज्यमंडळाने सन २०१७-१८ व २०१८-१९ मधील महसूल व वन विभागाने घोषीत केलेल्या राज्यभरातील टंचाईग्रस्त भागातील दहावी-बारावीतील विद्यार्थ्यांची परीक्षा शुल्क माफ करण्याच्या सूचना दिल्या आहेत. शिवाय त्यानंतरही तरतूद कमी पडल्यास सन २०१८-१९ या वर्षाकरीता ३८०७.३ हजार उपलब्ध तरतूदीमधून शुल्क माफी करण्याच्या सूचनाही दिल्या आहेत. परंतु सदर प्रक्रियेस जिल्ह्यात अद्याप सुरूवात करण्यात आली नाही. टंचाईग्रस्त भागातील विद्यार्थ्यांची आकडेवारी जुळवणीचे कामे सुरू असल्याचे सांगण्यात आले. परंतु प्रत्येक्षात मात्र कामास अद्याप सुरूवातच झालेली नाही.एका महिन्यात कार्यवाही कराशालेय शिक्षण क्रिडा विभागाच्या १८ आॅक्टोबर १९९३ च्या शासननिर्णयानुसार टंचाईग्रस्त भागातील इयत्ता दहावी व बारावीच्या विद्यार्थ्यांचे परीक्षा शुल्क माफ करण्यात येते. त्या अनुषंगाने जिल्ह्यातील दुष्काळ जाहिर केलेल्या टंचाईग्रस्त गावातील विद्यार्थ्यांचे परीक्षा शुल्क माफ करण्यात येणार आहेत. सदर प्रक्रीया एका महिन्यात पुर्ण करावी अशाही शासनाकडून सूचना देण्यात आल्या आहेत. शिक्षण विभागातर्फे नियोजन सुरू असल्याचे सांग्ण्यात आले. शिवाय टंचाईग्रस्त गावांच्या संख्येनुसार तेथीलविद्यार्थ्यांना लाभ दिला जाईल.

टॅग्स :HingoliहिंगोलीStudentविद्यार्थीEducationशिक्षण