शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताच्या कारवाईने पाकिस्तानची 'हवा टाईट'! मिसाइल चाचणीची केली घोषणा, सर्वत्र 'हाय अलर्ट'
2
बीएसएफ एका आदेशाची वाट पाहतेय, सुर्यास्तापूर्वी आला तर ठीक...; वाघा-अटारी बॉर्डरवर काय घडतेय...
3
"हिंदू हिंदू काय करताय?", पहलगाम हल्ल्यावर बोलताना शत्रुघ्न सिन्हांनी थेट पंतप्रधान मोदींवर साधला निशाणा
4
'देवाला घाबरलं पाहिजे, आता तुम्ही शून्याच्याही खाली जाणार'; पाकिस्तानी प्राध्यापकाची स्वतःच्याच देशावर टीका
5
संकटात कंपनी, गुंतवणकदार झाले कंगाल; ₹११२५ वरुन ₹९५ वर आला शेअर, सातत्यानं लोअर सर्किट
6
भारत आणि पाकिस्तानमध्ये युद्ध पेटले तर कोणता देश कोणाला पाठिंबा देईल? पाहा...
7
Pahalgam attack latest: पर्यटकांची हत्या करणाऱ्या तीन दहशतवाद्यांची ओळख पटली, 'या' दहशतवादी संघटनेशी कनेक्शन
8
सिंधू पाणी करार रद्द केल्यानंतर भारताचा थेट पाकच्या अर्थव्यवस्थेलाच धक्का! ३००० कोटींचे होणार नुकसान
9
पाकिस्तानचा गळा कापण्याची वेळ, इस्रायलसारखा बदला घ्यावा; अमेरिकेतून दिला गेला सल्ला
10
नवरी जोमात, नवरा कोमात! रसगुल्ला खाल्ला, हात धुण्याच्या बहाण्याने बॉयफ्रेंडसोबत गेली पळून
11
'पीएम मोदी 1 तासही देऊ शकत नाहीत?', सर्वपक्षीय बैठकीत न बोलवल्याने ओवेसी नाराज...
12
Varuthini Ekadashi 2025: भयंकर राग येतो? त्याक्षणी म्हणा 'हा' मंत्र, क्षणात शांत व्हाल आणि वाद मिटेल! 
13
'दहशतवाद्यांनी कल्पनाही केली नसेल त्यापेक्षा कठोर शिक्षा देणार'; बिहारमधून PM मोदींचा इशारा - Video पहा
14
गजकेसरी योगात स्वामी स्मरण दिन: ११ राशींना सर्वोत्तम, सुख-समृद्धी; स्वामींचे पाठबळ, शुभ-लाभ
15
Zim vs Ban test: झिम्बाब्वेचा चार वर्षांनी कसोटी विजय! बांगलादेशला पाजलं पराभवाचं पाणी
16
Pahalgam Terror Attack: "आम्ही जिवंत आहोत..."; पहलगाममधील 'तो' Video विनय नरवालचा नाही, जाणून घ्या 'सत्य'
17
नशीब बलवत्तर! फ्राईड राईसमध्ये जास्त पडलेल्या मीठानं जीव वाचवला; घटनास्थळापासून १५ मिनिटांवर होतं कुटुंब
18
पाकिस्तानी नागरिकांनी ४८ तासांत भारत न सोडल्यास काय कारवाई होणार? असा आहे गुप्तचर यंत्रणांचा ॲक्शन प्लॅन   
19
कधीपर्यंत धर्म सांगून गोळ्या खात राहायच्या?; पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर शंकराचार्य स्वामी अविमुक्तेश्वरानंद काय बोलले?
20
पत्नीच्या नावे Post Office मध्ये ₹१,००,००० ची FD केल्यास २ वर्षांनी किती परतावा मिळेल, पाहा कॅलक्युलेशन

मोठी बातमी! एकापाठोपाठ तीन विद्यार्थिनींच्या धावत्या ऑटोतून उड्या; एकीचा मृत्यू

By चंद्रमुनी बाबूराव बलखंडे | Updated: January 31, 2025 17:02 IST

ऑटोतून उडी मारल्याने एका विद्यार्थीनीचा मृत्यू झाला असून दोघीवर उपचार सुरू आहेत

हिंगोली : धावत्या ऑटोरिक्षातून पडलेल्या तीन विद्यार्थिनींपैकी एकीचा मृत्यू झाला असून, अन्य दोन विद्यार्थिनी जखमी झाल्या आहेत. ही घटना राहोली पाटी शिवारात ३१ जानेवारी रोजी घडली. अंजना तुकाराम कऱ्हाळे (१७, रा.पार्डी ता. कळमनुरी ) असे मयत विद्यार्थिनीचे नाव आहे.

हिंगोली शहरात शिक्षण घेणाऱ्या तीन विद्यार्थिनी शुक्रवारी दुपारी ऑटोरिक्षातून नर्सी नामदेवकडे जात होत्या. राहोली पाटी शिवारात ऑटोरिक्षातून खाली पडल्याने तिन्ही विद्यार्थिनी जखमी झाल्या. घटनेनंतर तिघींनाही हिंगोली जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. मात्र जखमी अंजना कऱ्हाळे या विद्यार्थिनीचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले. इतर दोन विद्यार्थिनींवर उपचार सुरु आहेत. हिंगोली ग्रामीण पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक शामराव डोंगरे, जमादार सुधीर ढेंबरे,अस्लम गारवे आदींनी घटनास्थळी भेट दिली. दरम्यान, गंभीर जखमी असलेल्या एका विद्यार्थिनीस दुपारीच नांदेड येथे रेफर करण्यात आले. तर सायंकाळच्या सुमारास दुसऱ्या विद्यार्थिनीलाही पुढील उपचारासाठी नांदेडला रेफर करण्याचा सल्ला दिल्या आहे, अशी माहिती पोलिसांनी दिली. दरम्यान, ग्रामीण पोलिस ठाण्यात रात्री उशिरापर्यंत घटनेची नोंद झाली नव्हती.

विद्यार्थिनी पडल्या की उडी घेतली?ही घटना नेमकी कशी घडली? याबाबत ठोस माहिती अजून पुढे आली नाही. सुरुवातीला विद्यार्थिनीने ऑटोतून उड्या घेतल्याची चर्चा होती. त्यानंतर एक विद्यार्थिनी ऑटोरिक्षातून पडत असल्याने तिला वाचविताना इतर दोघीही ऑटोरिक्षातून पडल्या, असेही सांगितले जात आहे. जखमी विद्यार्थिनींच्या जबाबानंतरच नेमकी घटना कशी घडली, हे स्पष्ट होईल, असे पोलिसांनी सांगितले.

टॅग्स :HingoliहिंगोलीAccidentअपघातCrime Newsगुन्हेगारीauto rickshawऑटो रिक्षा