शहरं
Join us  
Trending Stories
1
काँग्रेसच्या झेंड्याला ठाकरेंच्या मताची काठी; तब्बल दहा वर्षानंतर लोकसभेसाठी काँग्रेसला मुंबईत खाते उघडण्याची संधी
2
पैशांच्या अवैध वाहतुकीवर तिसरा डोळा; निवडणूक आयोगाचे मुंबई आणि परिसरातील रेल्वे स्थानकांवर विशेष लक्ष
3
भर समुद्रात पाकच्या बोटीवरून ६०० कोटींचे ड्रग्ज जप्त; भारतीय तटरक्षक दल, एटीएस व एनसीबीची मोठी कारवाई
4
निवडणुकीत जातीपातीच्या जाणिवा टोकदार ; एकाच जातीचे उमेदवार; तिथे पाहतात पोटजात
5
ठाण्यातील ‘त्या’ सव्वातीन लाख मतांचे मालक कोण? अजित की शरद पवार?
6
देवेगौडांचा नातू ‘सेक्स स्कँडल’मध्ये; विदेशात पलायन? एसआयटी चौकशी
7
साताऱ्यातील प्रचारात मुंबई बाजार समितीतील भ्रष्टाचाराचा मुद्दा ‘हॉट’ ; उदयनराजे भोसले आणि शशिकांत शिंदे यांच्यात थेट लढत
8
एक-एक वर्षासाठी पंतप्रधानपदाचे वाटप ; ‘इंडिया’चे हेच समीकरण : पंतप्रधान मोदी
9
भाजप अन् बीजेडीची ओडिशात मिलीभगत; निवडक लोकांसाठी काम : राहुल गांधी
10
राष्ट्रीय स्वयंसेवक संघ नेहमीच आरक्षणाचा समर्थक राहिला : मोहन भागवत
11
1 मे ध्वजारोहण : उमेदवार मंत्री वगळले, पण नातलग ?
12
मोटारीला चपलांचा हार आणि आरोप-प्रत्यारोपांचे प्रहार; जरांगे पाटलांनी केला आरोप
13
यापूर्वीही आरक्षणाला संघाचा विरोध : राहुल गांधी
14
तरुणाई का संतापली? निराश तरुण मतदानाकडेच पाठ फिरवताना दिसताहेत
15
निवडणूक आहे, जिभेला लगाम घाला !
16
दुबईत साकारतेय जगातील सर्वात मोठे विमानतळ; प्रथमच नवीन विमान वाहतूक तंत्रज्ञानाचा होणार वापर
17
त्यांच्या कारकिर्दीत ‘ते’ म्हणतील ते सगळं केलं, आता भावनिक व्हायच नाही; अजित पवारांचा वार
18
IPL 2024 GT vs RCB: RCB चा 'विराट' शो! विल जॅक्सचे ४१ चेंडूत शतक; ४ ओव्हर राखून विजय
19
बारामती, शिरुरमध्ये पोलिसी बळाचा वापर, मतदारांना धमक्या; संजय राऊतांचा गंभीर आरोप
20
"मुस्लीम लोक सर्वाधिक कंडोम वापरतात..."; ओवेसींनी दिला केंद्राच्या डेटाचा हवाला, PM मोदींवर पलटवार

पाण्याविना रूग्णांचे बेहाल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 24, 2018 12:32 AM

जिल्हा रुग्णालयात पाण्याची टंचाई जाणवत असल्याने रुग्णांसह नातेवाइकांचे बेहाल होत आहेत. पिण्याचे पाणी रूग्णालयाबाहेरून आणावे लागत आहे. त्यामुळे गरिब रूग्णांना आर्थिक भूर्दंड सोसावा लागत आहे. तसेच विविध वार्डमधील स्वच्छतागृहांतही पाणी नसल्यामुळे रूग्णांची गैरसोय होत असून इतर आजार बळावण्याची शक्यता नाकारत येत नाही.

लोकमत न्यूज नेटवर्कहिंगोली : जिल्हा रुग्णालयात पाण्याची टंचाई जाणवत असल्याने रुग्णांसह नातेवाइकांचे बेहाल होत आहेत. पिण्याचे पाणी रूग्णालयाबाहेरून आणावे लागत आहे. त्यामुळे गरिब रूग्णांना आर्थिक भूर्दंड सोसावा लागत आहे. तसेच विविध वार्डमधील स्वच्छतागृहांतही पाणी नसल्यामुळे रूग्णांची गैरसोय होत असून इतर आजार बळावण्याची शक्यता नाकारत येत नाही.दिवसेंदिवस जिल्हा रूग्णालयातील समस्या वाढतच चालल्या आहेत. कर्तव्यदक्ष वैद्यकीय अधिकारीही रूग्णालयातील समस्या व सुविधेकडे लक्ष देण्यास तयार नाहीत. त्यामुळे उपचारासाठी आलेल्या रूग्णांसह नातेवाईकांची गैरसोय होत आहे. सध्या जिल्हा रूग्णालयात प्रचंड पाण्याचा तुटवडा आहे. परंतु नेहमीचच ही समस्या असल्याने याचे आता गांभीर्य राहिले नाही, अशी अवस्था झाली आहे. जिल्हा रूग्णालयाच्या मध्यभागी एकच वॉटरकूलरची व्यवस्था आहे. रूगालयाच्या वरच्या नवीन इमारतीत स्थलांतरित झालेल्या वार्डांतही पाण्याची बोंब आहे. विशेष म्हणजे रुगालयाच्या बाहेर पाच रूपयाला फिल्टर झालेले पाणी मिळते. त्यामुळे विकतचे पाणी घेतल्याशिवाय पर्याय नाही. या प्रकारामुळे मात्र रूग्ण व नातेवाईकांचे हाल होत आहेत.जिल्हा रूग्णालय : एकाच वॉटर कूलरवर भिस्तजिल्हा रूग्णालयात रूग्णांना पिण्याच्या पाण्यासाठी केवळ एकच वॉटर कूलर बसविण्यात आले आहे. संपूर्ण रूग्णालयाची भिस्त एकाच वॉटरकुलर आहे. जिल्हा रूग्णालयात शहरासह ग्रामीण भागातून उपचारासाठी दिवसाकाठी २०० च्या जवळपास रूग्ण येतात. त्यामुळे पाण्याविना रूग्ण व नातेवाईकांना भटकंतील करावी लागत असल्याचे चित्र आहे. मागील अनेक वर्षांपासून रूग्णालयातील पाण्याचा प्रश्न कायमचा सुटला नाही. शिवाय रूग्णांच्या नातेवाईकांनी अनेकदा पाण्याच्या समस्येबाबत वरिष्ठांकडे मागणीही केली होती.जिल्हा रूग्णलयातील सीटीस्कॅन कक्षासमोरील वॉटरकुलरच्या नळाला तोटीच नसल्याचे बुधवारी दिसून आले. त्यामुळे पाण्याचा अपव्यय होताना दिसून आला. याकडे मात्र कोणीही लक्ष देत नव्हते, हे विशेष.

टॅग्स :HingoliहिंगोलीHealthआरोग्य