शहरं
Join us  
Trending Stories
1
लाजीरवाण्या पराभवानंतर LSG चे मालक संतापले; कॅप्टन KL Rahul ला झापताना दिसले, Video
2
Fact Check: भारतात ३०० दहशतवादी घुसणार असल्याचे भाजपा अध्यक्ष जेपी नड्डा खरंच बोलले? जाणून घ्या सत्य
3
नागपूर मेडिकलच्या अधिष्ठात्यांसह ११ डॉक्टरांविरोधात गुन्हा, निष्काळजीपणाचा ठपका!
4
"मी विरोध केला नाही, 'त्या' पोझिशनमध्ये केवळ छताकडे बघत राहिले अन् डोनाल्ड ट्रम्प..."; पॉर्न स्टारचे खळबळजनक खुलासे
5
ना कोहली... ना रोहित...; ब्रायन लाराला वाटतं, हा युवा फलंदाज मोडू शकतो त्याचा 400 धावांचा रेकॉर्ड
6
Chandrayaan-3 नं इतिहास रचला; आता चंद्रासंदर्भात आली आणखी एक आनंदाची बातमी! जाणून घ्या, काय सापडलं?
7
सनरायझर्स हैदराबादने ९.४ षटकांत कुटल्या विजयी १६७ धावा, Mumbai Indians चे आव्हान संपुष्टात आणले
8
१६७ धावा, ९.४ षटकं, १६ चौकार, १४ षटकार! SRH चा चमत्कार, अभिषेक-ट्रॅव्हिस यांनी मोडला १६ वर्षांपूर्वीचा विक्रम
9
शरद पवारांकडे पक्ष विलिनीकरणाशिवाय पर्याय नाही; चंद्रशेखर बावनकुळे यांची खरमरीत टीका
10
माझे शब्दच हरवले आहेत, ही काल्पनिक फलंदाजी; बेक्कार हरल्यानंतर KL Rahul ला काहीच सूचेना
11
आमदाराच्या स्वीय्य सहाय्यकाच्या अपघाती मृत्यू प्रकरणी ट्रकचालकास अटक व सुटका
12
भारतीय अर्थव्यवस्था 8% दराने वाढणार; देशाच्या मुख्य आर्थिक सल्लागारांनी व्यक्त केला विश्वास
13
'इंडिया' आघाडी भ्रष्टाचारी; भाजपकडे नेता, नीती अन् विकासाचा कार्यक्रम तयार: अमित शाह
14
ट्रॅव्हिड हेडने कुटल्या १२ चेंडूंत ५८ धावा! अभिषेक शर्मासह ३६ चेंडूंत फलकावर चढवल्या १०७ धावा
15
महा-बीसीए, बीबीए, एमसीए, एमबीए CET प्रवेश परीक्षा २९ मे रोजी; सुधारित वेळापत्रक जाहीर
16
भारताच्या लोकसंख्येत हिंदू 6 टक्क्यांनी घटले, मुस्लीम समाजाचा टक्का वाढला; सरकारी पॅनलनं केला 65 वर्षांचा अभ्यास
17
Air India ने 80 उड्डाणे रद्द केल्याबद्दल मागितली प्रवाशांची माफी; तिकीटाचे पैसेही परत करणार...
18
काँग्रेसची धुळधाण हीच खरी देशभक्ती; एकनाथ शिंदेंची संगमनेरात जोरदार टीका
19
मी दक्षिण भारतातील असून भारतीय दिसते; अभिनेत्रीचं सॅम पित्रोदांना चोख प्रत्युत्तर
20
इंडिया पोस्ट पेमेंट्स बँकेत नोकरीची संधी, 'या' तारखेपूर्वी उमेदवार करू शकतात अर्ज

बँकांनी मारले, मिरचीने तारले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 18, 2018 1:00 AM

शेतकऱ्यांना दिलासा : सिल्लोड तालुक्यात विक्रमी लागवड; ४ हजार पोत्यांची आवक

श्यामकुमार पुरेसिल्लोड : सिल्लोड तालुक्यात यावर्षी मिरचीची विक्रमी लागवड करण्यात आली असून सुरुवातीलाच ३८०० ते ४ हजार रुपये क्विंटलचा भाव मिळत असल्याने शेतकरी आनंदात आहेत.शिवना, गोळेगाव, आमठाणा, पानवडोद या मिरचीच्या बाजारपेठेत दररोज तब्बल ४ हजार पोत्यांची आवक येत आहे. पुढील आठवड्यात हीच आवक ८ हजार पोते होईल. गरजेच्या वेळी बँकांनी शेतकºयांना मारले असले तरी मिरचीने तारले आहे. खत, औषधी, मजुरीसाठी शेतकºयांचा हात यामुळे मोकळा झाला आहे. मिरचीने एक प्रकारे शेतकºयांना दिलासा दिल्याचे चित्र दिसत आहे.तालुक्यातील बºयाच शेतकºयांना अजून पीक कर्ज मिळाले नाही, बोंडअळी, पीक विमा मिळाला नाही. अशा संकटाच्या स्थितीत मिरचीने शेतकºयांना दिलासा दिला आहे. नगदी पैसे शेतकºयांना मिळत आहेत. पण हाच भाव स्थिर राहावा, अशी आशा शेतकरी करीत आहेत.नगदी पीक म्हणून ओळख असणाºया सिल्लोड तालुक्यातील तेजा फोर, ईश्वरी, तेजस्विनी या मिरचीला वाशी, मुंबई, कोलकत्ता, नागपूर बाजारपेठेत मागणी आहे. तेजा फोरला सध्या ३८०० रुपये तर ईश्वरी, तेजस्वीला ४२०० ते ४३०० रुपये भाव मिळत असल्याची माहिती शिवना येथील व्यापारी सुनील काळे यांनी दिली.ज्या शेतकºयांनी एप्रिल ते मे दरम्यान मिरची लागवड केली. त्यांची मिरची आता निघणे सुरू झाली आहे. पहिला तोडा आधी कमी येतो त्यानंतर दुसरा तोडा दुपटीने वाढतो. मिरची तोडणीसाठी ४ रुपये किलो मजुरी द्यावी लागत आहे. या शिवाय वाशीचे भाडे मिळून १० ते ११ रुपये खर्च येतो. तरीही शेतकºयांच्या हातात २८०० ते ३२०० रुपये पडतात.मिरचीचे लागवडक्षेत्र वाढू लागलेसिल्लोड तालुक्यात सध्या नगदी पीक म्हणून शेतकरी मिरचीकडे वळले आहेत. २०१३ मध्ये सिल्लोड तालुक्यात केवळ ५ हेक्टर मिरचीची लागवड झाली होती. त्या तुलनेत २०१४ मध्ये २४६ हेक्टर, २०१५-१७४ हेक्टर, २०१६ -२३८४ हेक्टर, २०१७ मध्ये १७७३ हेक्टर लागवड झाली. यावर्षी तब्बल २६७२ हेक्टर क्षेत्रावर मिरचीची लागवड करण्यात आली आहे. मागील वर्षीच्या तुलनेत यंदा ८९९ हेक्टरने क्षेत्र वाढले आहे.पाणी कमी पडलेअनेक शेतकºयांना मिरचीसाठी पाणी कमी पडले आहे. विहिरीची पाणीपातळी कमी झाली आहे. जोरदार पाऊस न झाल्याने विहिरींना पाझर फुटला नाही. मल्चिंगवर मिरची लागवड केल्याने पावसाचे पाणी बेडवरून खाली वाहून जाते. यामुळे ठिबकनेच पाणी घ्यावे लागते. यामुळे मोठा पाऊस होईल व विहिरीत पाणी येईल, अशी आशा शेतकºयांना आहे. ज्यांनी मल्चिंग लावली नाही, त्यांना सध्या पडत असलेल्या पावसाचा फायदा होत आहे.४ मुख्य बाजारपेठासिल्लोड तालुक्यात मिरची खरेदीच्या चार मुख्य बाजारपेठा आहेत. त्यात मोठी बाजारपेठ म्हणून शिवन्याची ओळख होती. पण यावर्षी शिवना मागे पडले आहे. शिवन्यात दररोज केवळ २५० ते ३०० पोते आवक होत आहे. त्या तुलनेत आमठाणा येथे २ हजार पोते, गोळेगाव येथे ५०० पोते, पानवडोद येथे १ हजार पोते मिरचीची आवक येत आहे. एक पोत्यात ५० ते ५५ किलो मिरची बसते.

टॅग्स :agricultureशेतीFarmerशेतकरी