शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
7
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
8
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
9
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
10
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
11
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
12
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
13
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
14
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
15
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
16
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
17
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
18
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
19
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
20
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार

मराठवाडा मुक्तिसंग्राम स्मृतीस्तंभाचा औंढा नगरपंचायतला विसर; फुलविक्रेत्यांनी सजावट करून केले अभिवादन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 17, 2019 19:03 IST

स्वातंत्र्यसैनिकांच्या नातेवाईकांतून नाराजी व्यक्त केली जात आहे.

ठळक मुद्दे प्रशासनाने उडवा-उडवीची उत्तरे दिली.

औंढा नागनाथ (जि.हिंगोली): येथील मराठवाडा मुक्ती संग्रामात सहभाग घेऊन हुतात्मा झालेल्या २१ स्वातंत्र्यसैनिकांच्या स्मृती स्तंभास १७ सप्टेंबर रोजी अभिवादन करण्याऐवजी त्यांचा सन्मान केला नसल्याची तक्रार हुतात्म्याचे नातेवाईकांनी करून संताप व्यक्त केला आहे. या उलट या स्तंभास फुलविक्री करणाऱ्यांनीच फुले वाहून अभिवादन केल्याचा प्रकार मंगळवारी सकाळी घडला आहे.

स्मृतीस्तंभास स्वातंत्र्यदिनी, प्रजासत्ताक दिनी व मराठवाडा मुक्तिसंग्राम या दिवशी अभिवादन केले जाते; परंतु सध्या औंढा येथील स्मृतिस्तंभाचा नगरपंचायत प्रशासनास मागील दोन वर्षांपासून विसर पडला असून १७ सप्टेंबर रोजी श्रद्धांजली वाहण्यात आली नाही. हा स्मृती स्तंभ औंढा- हिंगोली या महामार्ग लगतच्या मुख्य रस्त्यावर आहे. काही वर्षांपूर्वी याच ठिकाणी श्रद्धांजली अर्पण करून हौतात्म्य पत्करलेल्या २१ कुटुंबियांचा ग्रामपंचायतकडून सत्कारही केला जात असे; परंतु आता नगरपंचायत झाली अन् पूर्वीसारखा सत्कार समारंभ होत नाही. त्यामुळे स्वातंत्र्यसैनिकांच्या नातेवाईकांतून नाराजी व्यक्त केली जात आहे. याबाबत हुतात्मा गणपत ऋषी यांचे नातू कृष्णा ऋषी यांनी नगरपंचायत गाठून जाब विचारला आहे; परंतु प्रशासनाने उडवा-उडवीची उत्तरे दिली. नगराध्यक्षा व मुख्याधिकारी यांच्यामध्ये समन्वय राहिला नसल्याचे दिसून येत आहे. नगरपंचायतीकडून स्मृतीस्तंभाच्या ठिकाणी श्रद्धांजली वाहिली नसल्याची चर्चा आहे. 

फुलविक्रेत्यांनीच केली स्तंभाची सजावट  विशेष म्हणजे स्तंभ परिसरात फुलांची विक्री करणाऱ्या मुस्लिम समाजातील फुल विक्रेत्यांनी हा स्तंभ फुलांनी सजवून अभिवादन केले. आज १७ सप्टेंबरच्या दिवशी त्यांनी हौतात्म्यांचे स्मरण केले. मुख्याधिकारी म्हणतात आम्हीही केलं अभिवादन याबाबत नगरपंचायतचे मुख्याधिकारी निशिकांत प्रचंडराव यांना विचारले असता त्यांनी हुतात्म्यांना अभिवादन करण्याची सर्वच यंत्रणेची जबाबदारी आहे. आम्ही व नगराध्यक्ष सविता चौंढेकर यांनी सकाळी  जाऊन या स्तंभाला अभिवादन केले आहे. मात्र या स्तंभाच्या रंगरंगोटीचे काम सार्वजनिक बांधकाम विभाग करते. त्यामुळे त्यांनी रंगरंगोटी का केली नाही, हे सांगता येणार नाही.

टॅग्स :HingoliहिंगोलीMarathwadaमराठवाडा