शहरं
Join us  
Trending Stories
1
SRH चा फलंदाज दुर्दैवीरित्या बाद झाला, मैदानाबाहेर जाताच जिन्यावर बसून ढसाढसा रडला 
2
‘ अज्ञान, आळस आणि अहंकार,या आहेत काँग्रेसच्या तीन मुख्य समस्या’, प्रशांत किशोर यांनी ठेवलं वर्मावर बोट
3
मिचेल स्टार्कचा भेदक मारा, राहुल त्रिपाठी लढला! KKR समोर SRH २० षटकंही नाही टिकला
4
पुणे अपघात प्रकरणात राजकारण करणं किंवा पोलिसांना दोषी धरणं चुकीचं: देवेंद्र फडणवीस
5
समोर दिसतोय राहुल त्रिपाठी OUT आहे, अम्पायरने नाबाद दिले; मिचेल स्टार्कच्या चुकीने वाढले संकट 
6
Kangana Ranaut : “जनतेचे पैसे खाण्यासाठी सत्ता हवी”; कंगना राणौतचा विक्रमादित्य सिंह यांच्यावर हल्लाबोल
7
"हा एक दिवस नेहमीच...", सचिन तेंडुलकरने रतन टाटांसोबतच्या भेटीनंतर लिहिल्या खास ओळी
8
जिद्दीला सलाम! हात नसलेल्या गौसने पायाने पेपर लिहित ७८ टक्के मिळविले, आता स्वप्न 'IAS'चे
9
21 एप्रिलला लग्न, 21 मे रोजी निघाली अंत्ययात्रा; नवऱ्याने महिन्याभरात केली बायकोची हत्या
10
रुग्णाचा झाला होता मृत्यू, डॉक्टरांनी सांगितलं बाहेरून ब्लड टेस्ट आणि सिटी स्कॅन करून घ्या, त्यानंतर...
11
लातूरची 'लेक'! जिद्द ना सोडली झेप घेतली आकाशी; प्रतीक्षा काळे यांचा प्रेरणादायी प्रवास
12
“काँग्रेसवर खूप दबाव, उद्धव ठाकरेंमुळे पक्ष सोडावा लागला”; मिलिंद देवरांचा मोठा गौप्यस्फोट
13
महिलांसाठी धोक्याची घंटा; तुमची ‘ही’ सवय ठरू शकते हार्ट अटॅकचं कारण, वेळीच व्हा सावध
14
पुणे अपघात: आमदाराने पोलिसांवर दबाव आणल्याचा आरोप, ३ दिवसांनंतर अजित पवार ॲक्शन मोडवर!
15
"क्रिकेटनं खूप काही दिलंय म्हणून...", टीम इंडियाच्या प्रशिक्षक पदासाठी हरभजन इच्छुक
16
नरेंद्र मोदी यांचा राजकीय उत्तराधिकारी कोण असेल? चर्चांना पंतप्रधानांनी दिला पूर्णविराम; म्हणाले...
17
"मी स्वबळावर राजकारणात येईन…", रॉबर्ट वाड्रा यांचं मोठं विधान
18
खळबळजनक! ‘या’ शहरातून गायब होताहेत लोकांच्या बायका अन्...; 23 दिवसांत 14 जण बेपत्ता
19
IPL 2024 Playoffs Qualifier 1 KKR vs SRH: क्वालिफायर सामन्याआधी उडाली खळबळ, स्टेडियमच्या आत-बाहेर सुरक्षा व्यवस्थेत वाढ, प्रकरण काय?
20
हेमंत सोरेन अन् अरविंद केजरीवाल यांची प्रकरणे वेगवेगळी; ईडीचा सुप्रीम कोर्टात जामिनाला विरोध

अचानक आलेल्या वादळाने झोपडीवरील पत्रे उडाली, गारपीटीच्या तडाख्याने शेतकऱ्याचा मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Published: April 10, 2024 11:59 AM

कळमनुरीत वादळी वाऱ्यासह गारपिट झाल्याने पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे

कळमनुरी ( जि.हिंगोली): कळमनुरी शहरासह परिसरास मंगळवारी रात्री साडेसात ते आठ वाजेच्या दरम्यान वादळी वारा व गारपिटीचा तडाखा बसला. यात तालुक्यातील जटाळवाडी येथील एका शेतकऱ्याचा मृत्यू झाला. तर शेतीचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले.

मंगळवारी रात्री अचानक वातावरणात बदल झाला आणि तालुक्यात वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसास सुरुवात झाली. काही ठिकाणी गारपीट देखील झाल्याने मोठ्या प्रमाणावर शेतीचे नुकसान झाले आहे. दरम्यान, जटाळवाडी येथे वादळी वाऱ्यासह गाराचा पाऊस सुरू झाल्याने देवराव रुद्राजी बाभळे ( 65) यांनी शेतातील झोपडीचा सहारा घेतला. मात्र, वादळाने झोपडीवरील टीनपत्रे उडून गेली. यातच गारपीटीचा मारा वाढला. थंडी, पाऊस आणि गारपीटीच्या मर्याने हृदयविकाराचा झटका येऊन बाभळे यांचा मृत्यू झाला, अशी माहिती नायब तहसीलदार आनंदराव सुळे यांनी दिली. 

यासोबतच कनका येथेही वादळ वारा व गारांच्या पावसामुळे बापूराव जाधव यांच्या चार शेळ्या, एका गाईचा मृत्यू झाला. तसेच वादळी वाऱ्याने टीनपत्रे उडून दगडाने चार जण जखमी झाले आहेत. कळमनुरी शहरासह मुंढळ, रामवाडी, वाकोडी, आसोलवाडी, मसोड, जटाळवाडी ,कनका, राजुरा ,शिवणी( खुर्द) या परिसरात बागायती पिके पपई, करडई, आंबे, कांद्याच्या बिया व संत्रा आदी पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. 

वादळी वाऱ्यामुळे अनेकांच्या घरावरील टीन पत्रे उडून घरांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. तर झाडेही ऊनमडून पडली आहेत. महावितरणचे विजेचे पोल व तारांचेही मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले. गारपीटीने नुकसान झालेल्या भागाची पाहणी करून  अहवाल सादर करण्याच्या सूचना तहसीलदार सुरेखा नांदे यांनी तलाठ्यांना दिल्या आहेत.

टॅग्स :RainपाऊसAgricultural Science Centerकृषी विज्ञान केंद्रHailstormगारपीटHingoliहिंगोली