शहरं
Join us  
Trending Stories
1
तुटलेल्या विद्युत वाहिनीच्या स्पर्शाने दोन शेतकऱ्यांचा मृत्यू; महावितरण विरोधात चिकलठाण्यात रास्ता रोको
2
इस्रायलकडून इराणी टीव्ही स्टुडिओवर क्षेपणास्त्र हल्ला, लाईव्ह बुलेटीन सोडून अँकरने काढला पळ!
3
खुल्लम खुल्ला रोमान्स पडला महागात! बाईकच्या टाकीवर गर्लफ्रेंडला बसवणाऱ्या तरुणाला 'इतका' दंड
4
रांचीला जाणारे एअर इंडियाचे विमान टेक ऑफनंतर दिल्लीला परतले! नेमके झाले तरी काय?
5
आमच्या मागणीपुढे PM मोदींना झुकावे लागले...जनगणनेच्या अधिसूचनेवरुन काँग्रेसचा निशाणा
6
सोनमच्याही एक पाऊल पुढे निघाली गुलफाशा; प्रियकरासोबत मिळून लग्नाच्या एक दिवस आधीच पतीला संपवलं!
7
आर्थिक मदतीशिवाय हल्ला होऊ शकत नाही; पहलगाम हल्ल्यावरुन FATF ने पाकिस्तानला फटकारले
8
सायप्रसच्या महिला खासदाराने PM मोदींचे चरणस्पर्श केले, पंतप्रधानांनी डोक्यावर हात ठेवत दिला आशीर्वाद
9
दहा कोटी वृक्ष लावगडीचे उद्दिष्ट; वन विभाग ‘साइट ट्रॅक’वर, रेशीमला झुकते माप
10
आता पाकिस्तान अणुबॉम्बची धमकी देण्यापूर्वी शंभर वेळा विचार करेल...! SIPRI च्या अहवालात भारताच्या अण्वस्त्रांसंदर्भात मोठा दावा
11
Viral Video : रीलसाठी जीवाशी खेळ; धबधब्यावर उभी राहिली तरुणी, पुढे जे झालं ते बघून चुकेल काळजाचा ठोका
12
"माझाही राजा रघुवंशी झाला असता"; गोव्याला जाताना पत्नीसमोर मारहाण, पतीने सांगितली आपबिती
13
बाप म्हणाला चिंता आहे, मुलगी म्हणाली मी आहे! ३ एकरांत सोयाबीन लावून मुलीची बापाला साथ
14
वृद्ध व्यक्तीला डिजिटल अरेस्ट करून नकली कोर्टात हजर केलं; घातला 'इतक्या' कोटींचा गंडा!
15
इराणचा अमेरिकेच्या दुतावासावर हल्ला अन् अमेरिकेची २८ टँकर विमाने एकाचवेळी झेपावली...
16
NPT मधून बाहेर पडण्याच्या तयारीत इराण, इस्रायलसोबत सुरू असलेल्या युद्धादरम्यान खामेनेई यांचं मोठं प्लॅनिंग?
17
कच्चे तेल ३०० डॉलरवर जाण्याची शक्यता; इराकच्या मंत्र्यांनी जर्मनीच्या कानावर घातला मोठा धोका...
18
"...तर पाकिस्तानकडे युद्धाशिवाय दुसरा पर्याय उरणार नाही!"; पाणी बंद झाल्याने बिलावल बिथरले, दिली अशी धमकी
19
माजी आमदार बच्चू कडू यांना मोठा राजकीय धक्का; जिल्हा बँकेचे अध्यक्ष म्हणून अपात्र
20
प्रेमानेच केला घात! राजावर पाठीमागून केला वार, हत्येसाठी वापरलेला चाकू पोलिसांना सापडला...

अपघातात वर्षभरात १२२१५ जणांचा मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 21, 2018 00:41 IST

परिणामी अपघाताच्या घटनांत वाढ होत असून अनेकांना जीव गमवावा लागत आहे. डिसेंबर २०१७ अखेर अपघातात राज्यात मृत्यू झालेल्यांची संख्या १२ हजार २१५ आहे. तर हिंगोली जिल्ह्यात अपघातात जीव गमावलेल्यांचा आकडा ११८ आहे.

ठळक मुद्देहिंगोली : रस्त्यावरील अपघात टाळण्यासाठी प्रयत्न

दयाशिल इंगोले ।हिंगोली : दिवसेंदिवस अपघाताचा आकडा फुगत चालला आहे. रस्त्यावरील अपघात कमी करण्यासाठी विविध उपाय-योजना केल्या जातात. मात्र वाहतूक नियमांचे सर्रासपणे उल्लंघन केले जाते. परिणामी अपघाताच्या घटनांत वाढ होत असून अनेकांना जीव गमवावा लागत आहे. डिसेंबर २०१७ अखेर अपघातात राज्यात मृत्यू झालेल्यांची संख्या १२ हजार २१५ आहे. तर हिंगोली जिल्ह्यात अपघातात जीव गमावलेल्यांचा आकडा ११८ आहे.हिंगोली जिल्ह्यात माहे डिसेंबर २०१७ अखेर एकूण २९४ अपघाताच्या घटना घडल्या आहेत. या अपघातात ११८ जणांचा मृत्यू झाला. तर माहे सप्टेंबर २०१८ मध्ये रस्त्यावरील २२५ अपघातात ८६ जणांचा मृत्यू झाला आहे.रस्ते अपघात कमी करण्यासाठी उप-प्रादेशिक परिवहन कार्यालयाच्या वायुवेग पथकामार्फत माहे नोव्हेंबर २०१८ या महिन्यात वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्या ६५ वाहनांवर कारवाई करून २ लाख ५७ हजार ५०० रूपये दंड वसूल केला आहे. वाहन चालविताना वाहतूक नियमांचे पालन केले जात नाही. शिवाय रस्तेही खराब असल्याने अपघाताच्या घटनांत दिवसेंदिवस वाढ होत चालली आहे. उप-प्रादेशिक परिवहन विभाग कार्यालयाच्या वायुवेग पथकाने धडक कारवाई करून वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाºयांना दंड ठोठावला आहे.यामध्ये हेल्मेट न वापराणाºया ३२ चालकांवर कारवाई करून ८ हजार रूपये दंड वसूल केला. तर सिटबेल्टचा वापर न करणाºया दोघांकडून १ हजार रूपये, ईन्शुरन्स नसलेल्या १५ वाहनांवर कारवाई करून ३० हजार ५०० रूपये, माल वाहतूक व प्रवासी वाहतूक दोघांकडून १५ हजार ४०० रूपये, अतिरिक्त भार असलेल्या १४ वाहनांवर कारवाई करून २ लाख २ हजार ६०० रूपये एकूण २ लाख ५७ हजार ५०० रूपयांचा दंड वसूल केला आहे.मागील चार वर्षांतील अपघाताची आकडेवारीमागील चार वर्षांत जिल्ह्यात २०१४ मध्ये अपघाताच्या २७७ घटना घडल्या असून या अपघातात १०२ जणांचा मृत्यू झाला. तर ४७८ जण जखमी झाले होते. २०१५ मध्ये अपघाताच्या २८८ घटना असून १०९ जणांचा मृत्यू, तर ११६ जखमी. २०१६ मध्ये ३१६ अपघाताच्या घटना घडल्या. तर १२२ जणांचा मृत्यू झाला असून ३३५ जखमी झाले होते. २०१७ या वर्षांत २९४ अपघाताच्या घटना घडल्या होत्या. यामध्ये ११८ जणांचा मृत्यू झाला तर ३४२ जण जखमी झाले होते. सदर आकडेवारी उप-प्रादेशिक परिवहन अधिकारी कार्यालयातून प्राप्त आहे.उपप्रादेशिक परिवहन अधिका-यांचे आवाहन...दुचाकी चालविताना हेल्मेटचा वापर करावा. कार चालविताना सीटबेल्ट वापरावा. दारू पिऊन तसेच विनापरवाना व विमाविना वाहने चालवू नयेत. दोषी आढळल्यास चालकाचे लायसन ९० दिवसांसाठी निलंबित केले जाईल. त्यामुळे वाहतूक नियमांचे पालन करण्याचे आवाहन आरटीओ अशोक पवार यांनी केले.७० वाहनचालकांचे परवाने केले निलंबितउप प्रादेशिक परिवहन विभागाने माहे आॅक्टोबर व नोव्हेंबर २०१८ मध्ये कारवाई करून वाहन चालविताना दोषी आढळलेल्या ७० वाहन चालकांचे परवाने निलंबित केले आहेत. आक्टोबर महिन्यात ५२ तर नोव्हेंबर महिन्यात १८ एकूण ७० वाहनचालक वाहने चालविताना दोषी आढळून आले होते.

टॅग्स :HingoliहिंगोलीAccidentअपघातDeathमृत्यू