शहरं
Join us  
Trending Stories
1
कैमूरमध्ये मतमोजणीदरम्यान मोठा हिंसाचार; पोलिसांचा लाठीचार्ज, दगडफेकीत ३ पोलीस जखमी, स्कॉर्पिओ जाळली
2
कोपरगावजवळ भीषण अपघात; लक्झरी बसच्या धडकेत कार जळून खाक, चालकाचा जागीच मृत्यू
3
बिहारचा निकाल खरोखरच धक्कादायक; पराभवाची सखोल समीक्षा करणार: राहुल गांधी
4
२०१५ ते २०२५.... संघ सक्रियतेनंतर बिहारमध्ये भाजपचा ‘ग्राफ’ वर!
5
दिल्ली स्फोट: लष्कराने डॉ. उमर नबीचे घर आयईडी बॉम्बस्फोट करून उडवून दिले; ६ डिसेंबरसाठी ३२ कार तयार होत्या...
6
कर्ज फेडण्यासाठी इंजिनिअरच्या मुलानेच रचले स्वतःच्या अपहरणाचे नाटक; ५० लाखांची खंडणी मागितली अन्... 
7
बिहारमध्ये NOTA ला किती मतदान झाले? २०२० च्या तुलनेत किती टक्के वाढ झाली?
8
वैभव सूर्यवंशीचा दणका, ३२ चेंडूत केला 'शतकी धमाका'! लगावले १५ षटकार; टी२० मध्ये 'अशी' कामगिरी करणारा एकमेव खेळाडू
9
Travel : भारताचे १०००० रुपये घेऊन जा आणि मनसोक्त फिरा 'हा' देश! संस्कृती, शॉपिंग सगळ्यासाठी बेस्ट
10
'नितीश कुमार पुन्हा मुख्यमंत्री होतील, मला पूर्ण विश्वास', चिराग पासवान यांचे सूचक विधान
11
पाकिस्तानच्या मंत्र्याने केले मोठे विधान; चीनचे अब्जावधी डॉलर्स वाया गेले? ड्रॅगनचे टेन्शन वाढले
12
Bihar Election 2020 vs 2025: बिहारमध्ये कोणत्या पक्षाला सर्वाधिक फटका, कोणाला पक्षाला मिळाला 'बुस्टर डोज'
13
हा बिहार नाही...! निवडणूक निकालाने उत्साहित भाजपच्या बंगालसंदर्भातील विधानावर टीएमसीची प्रतिक्रिया
14
आयुष्यमान कार्डचे हे काम लगेच करा; नाहीतर ५ लाखांचा लाभ मिळणार नाही
15
CM उमर अब्दुल्लांना मोठा धक्का; J-K पोटनिवडणुकीत दोन्ही जागांवर पराभव, भाजपचा विजय...
16
राहुल गांधी आतापर्यंत किती निवडणुका हरले? भाजपनं थेट आकडाच सांगितला, उडवली खिल्ली! 
17
बायकोचा महागड्या क्रिम्सवर खर्च, नवरा कंगाल होताच गेली सोडून; आता झाला डिलिव्हरी ड्रायव्हर
18
बिहारमध्ये सुशासन आणि विकासचा विजय; निवडणूक निकालावर पंतप्रधान मोदींच पहिली प्रतिक्रिया, आणखी काय म्हणाले?
19
बिबट्याने घेतला नरडीचा घोट; पाच वर्षाच्या रियांकाचा शाळेच्या पाठीमागे मिळाला मृतदेह
20
Bihar Election Result: जसा सांगितला, तसाच निकाल लागला; मराठी माणसाचा एक्झिट पोल तंतोतंत खरा ठरला 
Daily Top 2Weekly Top 5

अपघातात वर्षभरात १२२१५ जणांचा मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 21, 2018 00:41 IST

परिणामी अपघाताच्या घटनांत वाढ होत असून अनेकांना जीव गमवावा लागत आहे. डिसेंबर २०१७ अखेर अपघातात राज्यात मृत्यू झालेल्यांची संख्या १२ हजार २१५ आहे. तर हिंगोली जिल्ह्यात अपघातात जीव गमावलेल्यांचा आकडा ११८ आहे.

ठळक मुद्देहिंगोली : रस्त्यावरील अपघात टाळण्यासाठी प्रयत्न

दयाशिल इंगोले ।हिंगोली : दिवसेंदिवस अपघाताचा आकडा फुगत चालला आहे. रस्त्यावरील अपघात कमी करण्यासाठी विविध उपाय-योजना केल्या जातात. मात्र वाहतूक नियमांचे सर्रासपणे उल्लंघन केले जाते. परिणामी अपघाताच्या घटनांत वाढ होत असून अनेकांना जीव गमवावा लागत आहे. डिसेंबर २०१७ अखेर अपघातात राज्यात मृत्यू झालेल्यांची संख्या १२ हजार २१५ आहे. तर हिंगोली जिल्ह्यात अपघातात जीव गमावलेल्यांचा आकडा ११८ आहे.हिंगोली जिल्ह्यात माहे डिसेंबर २०१७ अखेर एकूण २९४ अपघाताच्या घटना घडल्या आहेत. या अपघातात ११८ जणांचा मृत्यू झाला. तर माहे सप्टेंबर २०१८ मध्ये रस्त्यावरील २२५ अपघातात ८६ जणांचा मृत्यू झाला आहे.रस्ते अपघात कमी करण्यासाठी उप-प्रादेशिक परिवहन कार्यालयाच्या वायुवेग पथकामार्फत माहे नोव्हेंबर २०१८ या महिन्यात वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्या ६५ वाहनांवर कारवाई करून २ लाख ५७ हजार ५०० रूपये दंड वसूल केला आहे. वाहन चालविताना वाहतूक नियमांचे पालन केले जात नाही. शिवाय रस्तेही खराब असल्याने अपघाताच्या घटनांत दिवसेंदिवस वाढ होत चालली आहे. उप-प्रादेशिक परिवहन विभाग कार्यालयाच्या वायुवेग पथकाने धडक कारवाई करून वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाºयांना दंड ठोठावला आहे.यामध्ये हेल्मेट न वापराणाºया ३२ चालकांवर कारवाई करून ८ हजार रूपये दंड वसूल केला. तर सिटबेल्टचा वापर न करणाºया दोघांकडून १ हजार रूपये, ईन्शुरन्स नसलेल्या १५ वाहनांवर कारवाई करून ३० हजार ५०० रूपये, माल वाहतूक व प्रवासी वाहतूक दोघांकडून १५ हजार ४०० रूपये, अतिरिक्त भार असलेल्या १४ वाहनांवर कारवाई करून २ लाख २ हजार ६०० रूपये एकूण २ लाख ५७ हजार ५०० रूपयांचा दंड वसूल केला आहे.मागील चार वर्षांतील अपघाताची आकडेवारीमागील चार वर्षांत जिल्ह्यात २०१४ मध्ये अपघाताच्या २७७ घटना घडल्या असून या अपघातात १०२ जणांचा मृत्यू झाला. तर ४७८ जण जखमी झाले होते. २०१५ मध्ये अपघाताच्या २८८ घटना असून १०९ जणांचा मृत्यू, तर ११६ जखमी. २०१६ मध्ये ३१६ अपघाताच्या घटना घडल्या. तर १२२ जणांचा मृत्यू झाला असून ३३५ जखमी झाले होते. २०१७ या वर्षांत २९४ अपघाताच्या घटना घडल्या होत्या. यामध्ये ११८ जणांचा मृत्यू झाला तर ३४२ जण जखमी झाले होते. सदर आकडेवारी उप-प्रादेशिक परिवहन अधिकारी कार्यालयातून प्राप्त आहे.उपप्रादेशिक परिवहन अधिका-यांचे आवाहन...दुचाकी चालविताना हेल्मेटचा वापर करावा. कार चालविताना सीटबेल्ट वापरावा. दारू पिऊन तसेच विनापरवाना व विमाविना वाहने चालवू नयेत. दोषी आढळल्यास चालकाचे लायसन ९० दिवसांसाठी निलंबित केले जाईल. त्यामुळे वाहतूक नियमांचे पालन करण्याचे आवाहन आरटीओ अशोक पवार यांनी केले.७० वाहनचालकांचे परवाने केले निलंबितउप प्रादेशिक परिवहन विभागाने माहे आॅक्टोबर व नोव्हेंबर २०१८ मध्ये कारवाई करून वाहन चालविताना दोषी आढळलेल्या ७० वाहन चालकांचे परवाने निलंबित केले आहेत. आक्टोबर महिन्यात ५२ तर नोव्हेंबर महिन्यात १८ एकूण ७० वाहनचालक वाहने चालविताना दोषी आढळून आले होते.

टॅग्स :HingoliहिंगोलीAccidentअपघातDeathमृत्यू