शहरं
Join us  
Trending Stories
1
इस्राइलकडून इराणवर मोठा हवाई हल्ला, तेहरानवर डागली क्षेपणास्त्रे आणि ड्रोन 
2
भयावह! विमानातील प्रवाशांपेक्षाही मृतांचा आकडा २४ ने जास्त; पोलीस उपायुक्तांची पुष्टी, इंटर्न डॉक्टरांनीही जीव गमावला  
3
अहमदाबादनंतर मुंबईत दुर्घटना घडण्याची वाट बघायची का? मुंबई विमानतळ परिसरातील झोपड्या, फनेल झाेनमधील इमारतींचे पुनर्वसन रखडले
4
प्रभाग रचना सप्टेंबरमध्ये पूर्ण होणार; पालिका निवडणुका ऑक्टोबरनंतरच! ९ टप्प्यांमध्ये प्रक्रिया पूर्ण होणार; २९ ऑगस्ट ते ४ सप्टेंबरदरम्यान होणार शिक्कामोर्तब
5
मुंब्रा स्टेशनजवळील रुळांचे ‘ते’ वळण तसेच राहणार ! मध्य रेल्वेनं सांगितलं कारण; जमिनीच्या अधिग्रहणाची मोठी अडचण
6
ग्रुप बुकिंग केल्यास एसटीने थेट पंढरपूरला जाता येणार, ‘आषाढी’साठी ५ हजार विशेष बसेस : सरनाईक
7
राज ठाकरेंनी घेतला 'ड्रीमलाईनर'वर आक्षेप; एवढ्या तक्रारी असूनसुद्धा का वापरतोय? डीजीसीएला सवाल 
8
लंडनला कायमचेच निघालेले डॉक्टरचे कुटुंब; महिन्या पूर्वीच दिलेला राजीनामा, चेहऱ्यावर हसूही होते...
9
Air India plane crash: अहमदाबाद विमान दुर्घटनेत विक्रांत मेस्सीच्या वैमानिक मित्राचा मृत्यू, अभिनेत्याने लिहिली पोस्ट
10
Sunjay Kapur Death: करिश्मा कपूरचा Ex पती संजय कपूर यांचं निधन, पोलो गेम खेळताना आला हृदयविकाराचा झटका
11
...त्यामुळे कोणालाच वाचविण्याची संधी मिळाली नाही; अमित शाह यांनी सांगितले मृतांचा आकडा कधी जाहीर होणार
12
क्रू मेंबर रोशनी सोनघरे हिचे एअर होस्टेस व्हायचे स्वप्न अधुरे राहिले; एअर इंडियाच्या विमानात होती...
13
एअर इंडियाच्या विमानाचे दोन्ही को-पायलट मुंबई, बदलापूरचे; दोघांनीही निघताना घरच्यांना फोन केलेला, पण... 
14
एअर इंडियाच्या विमानात दोन प्रसिद्ध उद्योगपती देखील होते; एकाचे अख्खे कुटुंबच...
15
अल्पवयीन कबड्डीपटूवर बलात्कार; दोन क्रीडा प्रशिक्षकांची तुरुंगात रवानगी
16
काय तो चमत्कार! तो प्रवासी विमानात सापडला नाही, तर कोसळत असताना ४२५ फुटांवरून खाली पडला
17
Air India plane crash: उड्डाण केले अन् ३० सेंकदानंतरच जळून खाक! बघा विमान अपघाताचा नवा व्हिडीओ
18
Plane Crash: मृतांच्या कुटुंबीयांना 'टाटा'चा आर्थिक आधार! प्रत्येकी एक कोटी देणार, चंद्रशेखरन काय म्हणाले?
19
मोठी बातमी! अहमदाबादच्या विमान दुर्घटनेत महाराष्ट्रातील दोघांचा मृत्यू; पती-पत्नी मुलाला भेटायला निघालेले...
20
Air India Plane Crash: विजय रुपाणींचा हा खरंच अपघातापूर्वीचा फोटो आहे का? जाणून घ्या सत्य

नांदेड पाटबंधारे मंडळाअंतर्गत चार जिल्ह्यांतील १४४ पैकी १०९ तलाव तुडुंब

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 8, 2024 13:44 IST

दरवर्षी पावसाळ्यात तलावांमध्ये होणाऱ्या पाणीसाठ्याच्या भरोशावर उन्हाळ्यातील पिण्याच्या पाण्याचे नियोजन केले जाते.

हिंगोली : नांदेड पाटबंधारे मंडळाअंतर्गत येणाऱ्या चार जिल्ह्यांमधील १४४ तलावांपैकी १०९ तलाव सद्य:स्थितीला तुडुंब भरले आहेत. परतीचा पाऊसही आता थांबला असून, हेच पाणी उन्हाळ्यासाठी वापरावे लागणार आहे.

दरवर्षी पावसाळ्यात तलावांमध्ये होणाऱ्या पाणीसाठ्याच्या भरोशावर उन्हाळ्यातील पिण्याच्या पाण्याचे नियोजन केले जाते. त्यामुळे पावसाळ्यात प्रकल्पांमध्ये होणारा जलसाठा महत्त्वपूर्ण ठरतो. यावर्षीच्या पावसाळ्यात सुरुवातीला अल्पसा पाऊस झाला. त्यानंतर अनेक भागांमध्ये परतीचा जोरदार पाऊस बरसला. त्यामुळे प्रकल्पांमध्ये बऱ्यापैकी पाणीसाठा झाला आहे. या प्रकल्पातील पाणी आता रब्बी हंगामातील सिंचनासह उन्हाळ्यामधील पिण्याच्या पाण्यासाठी वापरले जाणार आहे.

नांदेड पाटबंधारे मंडळाअंतर्गत नांदेड जिल्ह्यात १०४ तलाव आहेत. त्यामध्ये दोन मोठे प्रकल्प, नऊ मध्यम प्रकल्प, नऊ उच्च पातळी बंधारे, ८० लघुप्रकल्प आणि चार कोल्हापुरी बंधाऱ्यांचा समावेश आहे. दोन्ही मोठे प्रकल्प १०० टक्के भरले आहेत. आठ मध्यम प्रकल्प आणि एक उच्चपातळी बंधारा, तर ८० पैकी ७० तलावांमध्ये शंभर टक्के पाणीसाठा झाला आहे.

हिंगोली जिल्ह्यातील एक मोठा प्रकल्प, २५ लघुप्रकल्प १०० टक्के भरले आहेत. परभणी जिल्ह्यात एकूण ९ प्रकल्प आहेत. त्यापैकी एक उच्च पातळी बंधारा आणि एक लघुप्रकल्प अशा दोनच प्रकल्पांमध्ये शंभर टक्के पाणीसाठा झाला आहे. तर यवतमाळ जिल्ह्यात एक मोठा प्रकल्प असून, त्यातही ७६ ते १०० टक्क्यांपर्यंतचा पाणीसाठा आहे.

१४४ पैकी १०९ प्रकल्पांमध्ये शंभर टक्के पाणीसाठा झाल्याने जिल्हावासीयांची उन्हाळ्यातील संभाव्य पाणीटंचाईची चिंता काही प्रमाणात दूर झाली आहे. परतीचा पाऊसही आता थांबला असून, या प्रकल्पाच्या पाणीसाठ्यात वाढ होण्याची शक्यताही आता उरली नाही. त्यामुळे झालेला पाणीसाठा उन्हाळ्यापर्यंत पुरविण्याची कसरत पाटबंधारे मंडळाला करावी लागणार आहे.

सात प्रकल्प अजूनही ज्योत्याखालीपरभणी जिल्ह्यातील एक, हिंगोली जिल्ह्यातील दोन, नांदेड जिल्ह्यातील चार अशा सात प्रकल्पांमध्ये अजूनही पाणीसाठा झाला नाही. या प्रकल्पातील पाणीसाठा सध्या जोत्याखाली आहे.कोणत्या जिल्ह्यात किती प्रकल्प १०० टक्के

नांदेड : ८१हिंगोली : २६परभणी : २यवतमाळ : १

टॅग्स :NandedनांदेडRainपाऊसDamधरणHingoliहिंगोली