शहरं
Join us  
Trending Stories
1
वाघ समोरून हल्ला करतो, झुडपात बसून कारस्थान करत नाही; राऊतांचा विश्वजित कदमांना खोचक टोला
2
Lalu Prasad Yadav : "पाकिस्तान, स्मशानभूमी, हिंदू-मुस्लिम..."; लालू प्रसाद यादव यांचा नरेंद्र मोदींना खोचक टोला
3
Kangana Ranaut : "राजपुत्र पत्नीसोबत चांगलं वागत नाही, छळ करतात"; कंगनाचा विक्रमादित्य सिंह यांच्यावर पलटवार
4
Maharashtra Lok Sabha Election 2024 Live Updates : ठाण्यात नरेश म्हस्के आज उमेदवारी अर्ज भरणार
5
तनिष्क प्रस्तुत करत आहे 'ग्लॅमडेज' - रोज वापरण्याजोग्या दागिन्यांची श्रेणी 
6
सुषमा अंधारेंना नेण्यासाठी आलेले हेलिकॉप्टर क्रॅश, पायलट सुखरूप
7
"उद्धव ठाकरे माझे शत्रू नाहीत, उद्या त्यांच्यावर संकट आलं तर..."; नरेंद्र मोदींचं मोठं विधान
8
KL Sharma : स्मृती इराणींच्या विरोधात निवडणुकीच्या रिंगणात काँग्रेसने उतरवलेले केएल शर्मा कोण आहेत?
9
मोबाईल फेकला, एकानंतर एक रिक्षा बदलल्या अन्...; 'तारक मेहता' फेम सोढीने स्वतःच बनवला अपहरणाचा प्लॅन?
10
RBI ने निर्बंध हटवले; Bajaj Finance च्या शेअर्समध्ये मोठी तेजी, ब्रोकरेजचा विश्वास वाढला
11
रायगडात ठाकरे गटाच्या जिल्हाप्रमुखावर हल्ला; चालकाच्या प्रसंगावधान राखल्याने सारे बचावले
12
Adani Enterprises ला SEBI नं पाठवली कारणे दाखवा नोटीस, हिंडेनबर्गच्या तपासाशी निगडीत प्रकरण 
13
हाताला दुखापत अन्...; अंकिता लोखंडेला काय झालं? हॉस्पिटलमधील फोटो शेअर करत म्हणते...
14
"कृष्ण आहेत रेवण्णा...",  प्रज्वल यांच्याबाबत काँग्रेस मंत्र्याचं वादग्रस्त वक्तव्य, भाजपाचा हल्लाबोल
15
KL Sharma : "स्मृती इराणींपेक्षा मला अमेठी जास्त माहीत"; तिकीट मिळताच केएल शर्मा यांनी स्पष्टच सांगितलं
16
Lok Sabha 2024 Rahul Gandhi :सस्पेन्स संपला! अखेर राहुल गांधींच्या नावाची घोषणा, पाहा कुठून लढणार लोकसभा, अमेठीत कोण?
17
सूर्य पश्चिमेला उगवेल मात्र उद्धव ठाकरे निर्णय बदलत नाहीत; जयंत पाटील थेट बोलले
18
Post Office ची 'ही' स्कीम बनवेल कोट्यधीश, वाचवावे लागतील ४१७ रुपये; जाणून घ्या माहिती
19
भाजप v/s काँग्रेस; उद्धवसेना v/s शिंदेसेना; शरद पवार गट विरुद्ध शिंदेसेनेत एकही लढत नाही
20
एकेकाळी मोबाइल फोन क्षेत्र गाजवलं, आता त्यांचं वर्कप्लेस अपग्रेड करणार Wipro; मिळाली मेगा डील!

'या' व्हिटॅमिन्सची भारतीयांमध्ये सर्वात जास्त कमतरता, जाणून घ्या कारण!

By ऑनलाइन लोकमत | Published: May 27, 2019 11:14 AM

आपण नेहमीच बोलताना असं म्हणतो की, आताच्या भाज्यांमध्ये, फळांमध्ये केमिकल्स असतात त्यामुळे पुरेसे व्हिटॅमिन्स किंवा पौष्टिक तत्त्व शरीराला मिळत नाहीत.

(Image Credit : The Kewl Shop)

आपण नेहमीच बोलताना असं म्हणतो की, आताच्या भाज्यांमध्ये, फळांमध्ये केमिकल्स असतात त्यामुळे पुरेसे व्हिटॅमिन्स किंवा पौष्टिक तत्त्व शरीराला मिळत नाहीत. पण व्हिटॅमिनची शरीरात कमतरता झाली तर याची लक्षणे सहजपणे समजून येत नाहीत. काही लोक दिसायला फिट आणि निरोगी वाटतात, पण त्यांच्यातही व्हिटॅमिन्सची कमतरता असते. गेल्या वर्षांपासून मोठ्या प्रमाणात लोकांच्या शरीरात व्हिटॅमिन्सची कमतरता आढळत आहे. भारतात तर ही समस्या अधिक बघायला मिळते.

(Image Credit : Vitamins - LoveToKnow)

नुकत्याच झालेल्या एका रिसर्चमध्ये असं आढळलं की, ३० ते ७० वयोगटातील लोक व्हिटॅमिनच्या कमतरतेचे शिकार होत आहेत. इंडिया सायन्स वायरमध्ये प्रकाशित एका रिपोर्टनुसार, भारतात व्हिटॅमिन्सच्या कमतरतेचे शिकार झालेले लोक खूज जास्त आहेत. जास्तीत जास्त केसेसमध्ये लोक निरोगी दिसतात. त्यामुळे याची लक्षणे आढळून येत नाहीत.

(Image Credit : Medical News Today)

या रिसर्चमध्ये २७० लोकांना सहभागी करून घेण्यात आले होते. रिसर्चमध्ये सहभागी जास्तीत जास्त लोक कोणत्या ना कोणत्या व्हिटॅमिन्सच्या कमतरतेचे शिकार होते. रिसर्चमध्ये १४७ पुरूष आणि १२३ महिलांचा समावेश करण्यात आला होता.

(Image Credit : Dr. Weil)

सर्वात जास्त व्हिटॅमिन्स बी १२ ची कमतरता आढळली. याचं मुख्य कारण हेही आहे की, शाकाहारी भोजनांमध्ये Vitamin B12 फार कमी आढळतं. हे व्हिटॅमिन जास्त मासे, अंडी आणि समुद्रात असणाऱ्या जीवांमध्ये असतं. भारतात Vitamin B12 ची समस्या सर्वात जास्त आहे. कारण भारतात जास्तीत जास्त लोक शाकाहारी असतात.

कोणत्या व्हिटॅमिन्सची सर्वात जास्त कमतरता

रिसर्चमधील आकडेवारीनुसार, ४६ टक्के लोकांमध्ये Vitamin B12 ची कमतरता आढळली. ३२ टक्के लोकांमध्ये फॉलेट अर्थात बी ९ ची कमतरता आढळली. त्यासोबतच २९ टक्के लोकांमद्ये व्हिटॅमिन डी ची कमतरता आढळली. शहरात राहणारे जास्तीत जास्त लोक उन्हात बाहेर निघत नाहीत. ज्यामुळे त्यांना पुरेसं व्हिटॅमिन डी मिळत नाही. 

आयर्नचं प्रमाण आणि एनीमिया

(Image Credit : Westchester Health)

शहरी लाइफस्टाइलमध्ये राहणाऱ्या महिला एनीमियाने ग्रस्त असतात. महिलांच्या शरीरात आयर्नची कमतरता असल्या कारणाने हीमोग्लोबिन तयार होत नाही. हीमोग्लोबिन कमी असल्याने एनीमिया रोग होतो. भारतात ६५ टक्क्यांपेक्षा अधिक महिला एनीमियाच्या शिकार आहेत.

व्हिटॅमिनची गरज कशी भागवाल?

जर तुम्हीही बाहेरून निरोगी दिसत असाल, पण लवकर थकवा येत असेल तर वेळीच टेस्ट करावी. व्हिटॅमिनची कमतरता जर सतत कमी होत गेली तर तुम्ही वेगवेगळ्या आजारांचे शिकार होऊ शकता. कॅन्सरसारख्या जीवघेण्या आजाराचा धोकाही यामुळे वाढतो.

१) जास्तीत जास्त चांगल्या पदार्थांचा आहारात समावेश करावा. जर तुम्ही शाकाहारी असाल तर Vitamin B12 साठी मोड आलेली कडधान्य, दूध, पनीर सारख्या पदार्थांचं सेवन करू शकता. हिरव्या भाज्यांसोबतच वेगवेगळी फळंही खावीत. याने शरीरातील वेगवेगळ्या व्हिटॅमिनचा गरज पूर्ण होते.

२) ड्रायफ्रूट्सचा आहारात समावेश करावा. जर तुम्ही चिकन किंवा मासे खात असाल तर आठवड्यातून कमीत कमी दोन दिवस खा.

३) सकाळचा नाश्ता आणि दुपारच्या जेवणाची वेळ पाळा. नाश्त्यात मोड आलेली धान्य आणि दूध घ्या. याने जास्तीत जास्त व्हिटॅनिन्स मिळतात.

टॅग्स :Fitness Tipsफिटनेस टिप्सHealth Tipsहेल्थ टिप्स