शहरं
Join us  
Trending Stories
1
पंजाब किंग्सच्या विजयाने वाढली चेन्नई सुपर किंग्सची डोकेदुखी; Play off साठी ठोकली दावेदारी
2
"हिम्मत असेल, तर घोषणा करा..."! पंतप्रधान मोदींनी राहुल गांधींना दिली 3 आव्हानं; बघा VIDEO
3
"पोलिसांनी त्याची हत्या केली..."! सलमान खान गोळीबार प्रकरणातील आरोपीच्या आत्महत्येला नवं वळण
4
MS Dhoni ने केला डॅरिल मिचेलचा अपमान? खवळला इरफान पठाण, Video Viral 
5
100 शाळा अन् 143 कॉल…; बॉम्बच्या धमकीनंतर दिल्ली सरकार अ‍ॅक्शन मोडवर, अ‍ॅडव्हायजरी जारी
6
जय श्रीराम! राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू अयोध्येत; रामलला चरणी नतमस्तक, शरयू नदीचे केले पूजन
7
“शरद पवारच माझे मुख्य प्रचारक, यशवंत चव्हाणांना भारतरत्न देण्याचे का सुचले नाही”: उदयनराजे
8
शरद पवारांनंतर उद्धव ठाकरेंनी भरसभेत मागितली माफी; PM मोदींवर केली टीका, म्हणाले...
9
"अडीच हजार फोन केले तेव्हा..., सगळे लफडे काढतो त्याचे"; चंद्रकांत खैरे संजय शिरसाटांवर एवढं का संतापले?
10
“नरेंद्र मोदींचा भटकत आहे आत्मा, कारण आम्हाला मविआचा करायचा आहे खात्मा”: रामदास आठवले
11
T20 World Cup 2024 साठी टीम इंडियाची पहिली बॅच ठरली; पाहा कोण कोण अमेरिकेला आधी जाणार
12
"ज्यांचे स्वतःचे मत या मतदारसंघात नाही, त्यांना लोकांच्या मताची किंमत काय कळणार?"
13
"तू माझ्या आयुष्यात नसतीस तर..."; विराट कोहलीची पत्नी अनुष्का शर्मासाठी खास रोमँटिक पोस्ट
14
"केंद्र सरकारच्या धोरणांमुळे शेतकरी संकटात, पण PM मोदी याकडे ढुंकूनही पाहायला तयार नाहीत"
15
ऋतुराज गायकवाडने इतिहास घडविला! MS Dhoni चा ११ वर्षांपूर्वीचा मोठा विक्रम मोडला 
16
T20 World Cup साठी टीम इंडियात निवड झाली अन् आयपीएलमध्ये घसरली कामगिरी
17
“लोकशाही, संविधान वाचवण्यासाठी केंद्रात इंडिया आघाडीची सत्ता आणा”; नाना पटोलेंचे आवाहन
18
महायुतीच्या जागावाटपाच्या तहात अजितदादा फसले; CM शिंदे मात्र वरचढ ठरले? चर्चांना उधाण
19
“माझा लोकांशी चांगला संपर्क, स्थानिक असल्याचा नक्कीच फायदा होईल”; भूषण पाटील स्पष्टच बोलले
20
सलमान गोळीबार प्रकरण: चौकशी अर्धवट असताना आरोपीची कोठडीत आत्महत्या; दुसऱ्या कैद्याने सांगितला घटनाक्रम

आळशी लोक आळशी असण्याचे 'हे' फायदे वाचतील तर नाचत सुटतील! 

By ऑनलाइन लोकमत | Published: January 04, 2020 10:02 AM

आपण नेहमीच ऐकत असतो की आळस फारच वाईट असतो. यात काही प्रमाणात सत्य असलं तरी १०० टक्के खरं नाही.

(Image Credit : mirror.co.uk)

आपण नेहमीच ऐकत असतो की आळस फारच वाईट असतो. यात काही प्रमाणात सत्य असलं तरी १०० टक्के खरं नाही. कारण सायन्सचा विचार कराल तर आळशी असणं काही प्रमाणात मेंदूसाठी आणि आरोग्यासाठी चांगलं असतं. काही रिसर्चही यावर करण्यात आले आहेत. चला जाणून घेऊ आळशी असण्याच्या काही फायद्यांबाबत. मात्र, आळशी असण्याचे काही फायदे आहेत म्हणून याचा अर्थ हा होत नाही की, तुम्ही आणखी जास्त आळशी व्हावं. कारण कोणत्याही गोष्टीची अति ही वाईटच असते, हा निसर्गाचा नियम आहे.

बर्नआउट स्थितीपासून दूर

(Image Credit : betanews.com)

बर्नआउट ही ती स्थिती असते ज्यात व्यक्ती मानसिक आणि शारीरिक रूपाने इतका थकलेला असतो की, त्यांच्याकडे आणखी काही करण्याची ताकदच राहत नाही. आळशी लोकांना अशा स्थितीचा सामना कमी करावा लागतो. कारण ते सतत रिलॅक्स होण्यासाठी पर्याय शोधत राहतात.

स्ट्रेस मॅनेजमेंट

(Image Credit : parentingchaos.com)

बर्नआउटसोबत आळस स्ट्रेस मॅनेज करण्यासही मदत करतो. मुळात जे लोक आळशी लोकांच्या कॅटेगरीत येतात ते गोष्टी जास्त आरामात करतात, याने त्यांना तणाव किंवा एग्जांयटीची समस्या होण्याचा धोका कमीच असतो.

झोप न येण्याची समस्या राहते दूर

(Image Credit : mnn.com)

आळशी लोक डोक्यांने रिलॅक्स असतात, ज्याने त्यांना झोपण्यात काहीच अडचण येत नाही. त्यांना झोप चांगली येत असल्याने झोप न येण्याची समस्या आणि त्यामुळे होणाऱ्या इतर समस्याही होत नाहीत. याने त्यांच्या शरीराचं इम्यून सिस्टीम चांगलं राहतं. 

पचनक्रिया सुधारते

(Image Credit : santacruzayurveda.com)

झोप न होणे आणि स्ट्रेस याने खाण्याची इच्छा मारण्यासोबतच पचनक्रियेवरही वाईट प्रभाव पडतो. तेच आळशी लोक प्रॉपर झोप घेतात आणि स्ट्रेसपासून दूर राहतात यामुळे ते या समस्येपासून दूर राहतात.

चांगलं कॉन्सन्ट्रेशन आणि क्रिएटिविटी

(Image Credit : useoftechnology.com)

रिसर्चनुसार, आराम न करता सतत कामात असणाऱ्या लोकांच्या तुलनेत आळशी लोक जास्त फोकस असतात. इतकंच नाही तर असे लोक जास्त क्रिएटिव्हही असतात. असं डोकं शांत, रिलॅक्स असल्याकारणाने होतं. त्यामुळे त्यांचा फोकस क्लिअर असतो आणि त्यांना नविन आयडिया सुद्धा येतात.

भावनिक संतुलन

(Image Credit : increasingselfworth.com)

झोप पूर्ण होणे, स्ट्रेसपासून दूर राहणे, शरीर रिलॅक्स्ड असणे याने व्यक्तीच्या भावनाही स्टेबल राहण्यास मदत मिळते. हे वेगवेगळ्या रिसर्चमधूनही समोर आलं आहे की, ज्या लोकांना स्ट्रेस किंवा झोप कमी येण्याची समस्या असते ते लोक भावनांशी संबंधित समस्यांनीही पीडित असतात.

चांगलं रिलेशनशिप

(Image Credit : bustle.com)

इमोशनली स्टेबल असल्याकारणाने आळशी लोक रिलेशनशिपमध्येही चांगले राहतात. असं यामुळे होतं कारण आळसामुळे हे लोक नकळत का होईना आपल्या पार्टनरला स्वत:साठी पुरेसा वेळ काढण्याची संधी देतात. सोबतच एकाच जागेवर बसून तासंतास बोलणंही आळशी लोकांसाठी मोठी बाब नाही. याने त्यांना पार्टनरच्या गोष्टी लक्ष देऊन ऐकणे आणि त्यांच्यासोबत चांगल्याप्रकारे इमोशनली कनेक्ट होण्यास मदत मिळते.

टॅग्स :Personalityव्यक्तिमत्वHealth Tipsहेल्थ टिप्सMental Health Tipsमानसिक आरोग्य