शहरं
Join us  
Trending Stories
1
मतदार याद्यांचा घोळ कायम, बिहारच्या उपमुख्यमंत्र्यांच्याच नावे २ व्होटर कार्ड; तेजस्वी यादव यांनी केली पोलखोल
2
आजचे राशीभविष्य, ११ ऑगस्ट २०२५: विविध लाभ, मान-सन्मानाचा दिवस; संयम राखा, शांत राहा
3
नेत्यांना घेऊन जाणाऱ्या एअर इंडियाच्या विमानाचे आपत्कालीन लँडिंग; खासदार म्हणाले - आम्ही थोडक्यात बचावलो!
4
भारत जगात सर्वांत वेगाने वाढणारी अर्थव्यवस्था; ट्रम्प यांच्या 'डेड इकॉनॉमी'ला अप्रत्यक्ष उत्तर
5
शरद पवारांनी निवडणूक आयोग-पोलिसांकडे तक्रार का केली नाही? : फडणवीस
6
श्रावण संकष्ट चतुर्थी: यशोदामातेने केले होते व्रत, इच्छा होतील पूर्ण; यंदा विशेष अंगारक योग
7
गरज पडल्यास कबुतरखान्यासाठी शस्त्र उचलणार; जैन मुनी नीलेशचंद्र विजय यांच्या वक्तव्याने नवा वाद
8
लोकसभेच्या ४८ जागा, ५० हजारांपेक्षा कमी फरक; २०१९ च्या सार्वत्रिक निवडणुकीवर काँग्रेसचा मोठा दावा
9
'ओबीसी समाज श्रीमंत मराठ्यांविरोधात जाऊ नये, हाच शरद पवारांच्या मंडळ यात्रेचा हेतू'; प्रकाश आंबेडकरांचा टोला
10
'मतचोरी' विरोधात इंडिया आघाडीचे उद्या शक्तिप्रदर्शन, राहुल गांधींच्या नेतृत्वाखाली खासदार संसदेपासून निवडणूक आयोगाच्या कार्यालयापर्यंत मोर्चा काढणार
11
Rahul Gandhi : राहुल गांधींसमोरील अडचणी वाढणार? शकुन राणीला 'डबल व्होटर' म्हणून फसले; आयोगाने बजावली नोटीस
12
'बुडायला लागलो तर अर्धे जग सोबत घेऊन जाणार'; पाकिस्तानची भारताला पुन्हा अणु हल्ल्याची धमकी!
13
रामदास आठवले महाराष्ट्र भाजपवर नाराज; थेट पीएम मोदींकडे केली तक्रार, कारण काय?
14
ब्रिटनच्या F-35B विमानामागचं शुक्लकाष्ठ सुटेना, आता या देशात करावं लागलं आपातकालीन लँडिंग
15
मनी लॉंड्रिंगप्रकरणी रॉबर्ट वाड्रांच्या अडचणीत वाढ; दोन कंपन्यांद्वारे ५८ कोटी रुपये कमावल्याचा आरोप
16
"जेव्हा देशासाठी निवड होते, तेव्हा..."; मराठमोळ्या 'वर्ल्ड चॅम्पियन'ने जसप्रीत बुमराहला सुनावलं
17
मासे खरेदी करण्यावरून दोन गटांमध्ये तुफान राडा, एकमेकांना लाथा-बुक्क्यांनी मारले
18
टस्कर हत्तीने भिंत फाेडून घरात केला प्रवेश; जीवनावश्यक साहित्याची नासधूस, छत्तीसगड सीमेलगतच्या मंजिगड टाेला येथील घटना
19
फक्त १२७९ रुपयांत करा हवाई प्रवास; Air India ने आणली खास ऑफर, जाणून घ्या डिटेल...
20
मत चोरीच्या मुद्यावरुन लक्ष वळवण्याचा प्रयत्न; हवाई दल प्रमुखांच्या वक्तव्यावर काँग्रेस नेत्याची टीका

भारतीय तज्ज्ञांनी सांगितलं कोरोनाची लस कधी येणार?, लसीकरणाबाबत व्यक्त केली चिंता

By manali.bagul | Updated: October 4, 2020 12:59 IST

CoronaVirus News & Latest Updates : दिल्लीतील अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्थान म्हणजचे एम्सचे संचालक डॉ. रणदीप गुलेरिया यांनी कोरोनाच्या लसीबाबत महत्वाची माहिती दिली आहे.

कोरोना व्हायरसचा कहर संपूर्ण जगभरात वाढत आहे. अशा स्थितीत जगभरातील लोकांना कोरोना विषाणूंचा खात्मा करणारी लस कधी येणार याची प्रतिक्षा आहे. कोरोनाची सुरक्षित आणि प्रभावी लस तयार केल्याचा दावा आतापर्यंत चीन आणि रशियाने केला आहे. भारत, अमेरिकेसह अनेक देश कोरोनाची लस तयार करण्याचे काम वेगाने करत आहेत. दरम्यान दिल्लीतील अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्थान म्हणजचे एम्सचे संचालक डॉ. रणदीप गुलेरिया यांनी कोरोनाच्या लसीबाबत महत्वाची माहिती दिली आहे.

भारतीय बाजारात कोरोनाची लस कधीपर्यंत उपलब्ध होऊ शकते हे सांगताना त्यांनी लसीकरणाबाबत चिंता व्यक्त केली आहे. एका टेलिव्हिजन कार्यक्रमात बोलताना एम्सचे संचालक डॉ. गुलेरिया यांनी सांगितले की, ''कोरोनाची लस आता प्रगतीपथावर आहे. सर्व चाचण्या व्यवस्थित पार पडल्यास २०२१ च्या सुरूवातीला कोरोनाची लस बाजारात उपलब्ध होऊ शकते. सुरूवातीला लस उपलब्ध झाल्यास सर्व लोकसंख्येला पुरेल इतक्या प्रमाणात असेलच असं नाही. मोठ्या प्रमाणावर लोकांपर्यंत लस पुरवण्यासाठी वेळ लागू शकतो.

पुढे त्यांनी सांगितले की, ''कोरोना व्हायरसचं औषध कधी येणार याची शाश्वती देणं कठीण आहे. कारण कोरोनाची लस किंवा औषध तयार करायचं असल्यास अनेक टप्प्यामधून जावं लागतं. सुरूवातीपासून ते शेवटच्या  टप्प्यापर्यंत सर्वकाही व्यस्थित असेल तर कोरोनाची लस किंवा औषध  लवकरता लवकर उपलब्ध होऊ शकते. लस विकसित  झाल्यानंतर कोणत्या पद्धतीने लस बाजारात उतरवायची याचीही समस्या उभी राहू शकते. अनेक संस्थानांनी औषधांचे प्राथमिक वितरणाच्या आधारावर म्हणजेच ज्यांना संक्रमणाचा धोका सगळ्यात जास्त आहे. अशा लोकांना लस देण्याचा विचार केला आहे. रशियातील मॉस्कोमध्ये सामान्य लोकांसाठी लसीकरण सुरू केलं आहे. ''

देशात कोरोनाचा  हाहाकार

दरम्यान  जगभरात कोरोनाचा हाहाकार पाहायला मिळत आहे. जगभरातील कोरोनाग्रस्ताची संख्या ही तब्बल तीन कोटींच्या वर गेली आहे. तर लाखो लोकांना कोरोनामुळे आपला जीव गमवावा लागला आहे. देशातही कोरोनाचा धोका वाढला असून रुग्णांच्या संख्येत दिवसागणिक वाढ होत आहे. रुग्णांचा आकडा 65 लाखांवर गेला असून कोरोनाने देशातील तब्बल 1 लाख लोकांचा बळी घेतला आहे. 

रविवारी (4 ऑक्टोबर) केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, देशात 24 तासांत कोरोनाचे 75,829 नवे रुग्ण आढळून आले होते. तर 940 जणांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे देशातील कोरोनाग्रस्त रुग्णांची संख्या 65 लाख 49 हजारांवर पोहोचली. कोरोनामुळे मृत्यू झालेल्यांचा आकडा हा तब्बल एक लाखांवर पोहोचला आहे. सर्वाधिक रुग्णसंख्या असलेल्या देशांच्या यादीत भारत दुसऱ्या स्थानी आहे. कोरोनाग्रस्तांची संख्या सातत्याने वाढत असल्याने चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे.

टॅग्स :Health Tipsहेल्थ टिप्सcorona virusकोरोना वायरस बातम्याHealthआरोग्यdocterडॉक्टरAIIMS hospitalएम्स रुग्णालय