शहरं
Join us  
Trending Stories
1
'PM मोदी आणि ट्रम्प यांच्यात फोनवरून कसलीही चर्चा झाली नाही'; भारताने दावा फेटाळला, अमेरिकेच्या अध्यक्षांची 'पंचाईत'
2
'स्वतःच्या अपयशांसाठी शेजाऱ्यांना दोष देणे पाकिस्तानची जुनी सवय', अफगाण-पाक संघर्षावरुन भारताचे टीकास्त्र
3
सलग दुसऱ्या सेंच्युरीसह एलिसा हीलीनं पाडला बांगलादेशचा बुक्का! ऑस्ट्रेलियाला मिळालं सेमीचं पहिलं तिकीट
4
Gujarat Cabinet Resignation: भाजपने गुजरातमधील सर्व मंत्र्यांचे राजीनामे का घेतले, आता पुढे काय घडणार?
5
टी-२० विश्वचषक २०२६ साठी पात्र ठरलेले सर्व २० संघ कोणते? येथे पाहा संपूर्ण यादी
6
वापरली अशी ट्रिक आणि दोन वर्षे फ्रीमध्ये ऑनलाइन ऑर्डर केलं जेवण, बिंग फुटताच...   
7
"इज्जत गेली गावाची, मग आठवण आली भावाची" एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरेंना टोला
8
कुंभमेळा आयोजनाची कामं नियोजित वेळेत पूर्ण झाली पाहिजेत; मुख्य सचिव राजेश कुमारांचे निर्देश
9
VIDEO: बापरे !! महाकाय अजगराने महिलेच्या पायाला घातला विळखा, महिलेचे धाडस पाहून सारे थक्क
10
Kaps Cafe Firing: कपिल शर्माच्या कॅफेवर पुन्हा गोळीबार; बिश्नोई टोळीच्या गोल्डी-सिद्धूने घेतली हल्ल्याची जबाबदारी
11
‘गर्भवती असाल तर सुट्टी घ्या, पैसे कमावण्यासाठी येता आणि बैठकीला अनुपस्थित राहता” महिला अधिकाऱ्यावर काँग्रेसचे आमदार भडकले
12
Bogus Voter: 'त्या' घरात ८०० नव्हे, पाचच सदस्यांचे वास्तव्य; जयंत पाटील यांच्या आरोपात किती सत्यता? काय आढळलं?
13
Video - ऑनलाईन ऑर्डर केलं फूड; डिलिव्हरी बॉयची अवस्था पाहून डोकंच फिरेल, दारू पिऊन...
14
RCB फॅन्स... सावधान!! विराट कोहली IPL मधून निवृत्त होणार? 'या' घटनेमुळे चर्चांना उधाण
15
खेडेगावातील लोकांसाठी परवडणाऱ्या बाईक्स, किंमत ५५ हजारांपासून सुरू; येथे पाहा संपूर्ण लिस्ट
16
Gujarat Cabinet: मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल यांच्या मंत्रिमंडळातील १६ मंत्र्यांनी दिला राजीनामा, गुजरातमध्ये मोठी राजकीय घडामोड
17
"मला सुटी नको, WFH द्या..."; आईच्या अपघातानंतर तरुणीची विनंती, कंपनीचा पुरावे मागत नकार
18
Laxmi Pujan 2025: दिवाळी उंबरठ्यावर, तरी लक्ष्मी पूजेच्या तारखेचा गोंधळ; पंचांग काय सांगतं?
19
Maithili Thakur News: मैथिली ठाकूर यांच्या उमेदवारीला भाजप नेत्यांचाच विरोध, अलीनगरमध्ये राजकारण का तापलं?
20
"ठाण्यात महापौर भाजपाचा बसेल, आम्ही गाफील नाही; स्वबळावर लढण्याची वेळ आली तर..."

भारतीय तज्ज्ञांनी सांगितलं कोरोनाची लस कधी येणार?, लसीकरणाबाबत व्यक्त केली चिंता

By manali.bagul | Updated: October 4, 2020 12:59 IST

CoronaVirus News & Latest Updates : दिल्लीतील अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्थान म्हणजचे एम्सचे संचालक डॉ. रणदीप गुलेरिया यांनी कोरोनाच्या लसीबाबत महत्वाची माहिती दिली आहे.

कोरोना व्हायरसचा कहर संपूर्ण जगभरात वाढत आहे. अशा स्थितीत जगभरातील लोकांना कोरोना विषाणूंचा खात्मा करणारी लस कधी येणार याची प्रतिक्षा आहे. कोरोनाची सुरक्षित आणि प्रभावी लस तयार केल्याचा दावा आतापर्यंत चीन आणि रशियाने केला आहे. भारत, अमेरिकेसह अनेक देश कोरोनाची लस तयार करण्याचे काम वेगाने करत आहेत. दरम्यान दिल्लीतील अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्थान म्हणजचे एम्सचे संचालक डॉ. रणदीप गुलेरिया यांनी कोरोनाच्या लसीबाबत महत्वाची माहिती दिली आहे.

भारतीय बाजारात कोरोनाची लस कधीपर्यंत उपलब्ध होऊ शकते हे सांगताना त्यांनी लसीकरणाबाबत चिंता व्यक्त केली आहे. एका टेलिव्हिजन कार्यक्रमात बोलताना एम्सचे संचालक डॉ. गुलेरिया यांनी सांगितले की, ''कोरोनाची लस आता प्रगतीपथावर आहे. सर्व चाचण्या व्यवस्थित पार पडल्यास २०२१ च्या सुरूवातीला कोरोनाची लस बाजारात उपलब्ध होऊ शकते. सुरूवातीला लस उपलब्ध झाल्यास सर्व लोकसंख्येला पुरेल इतक्या प्रमाणात असेलच असं नाही. मोठ्या प्रमाणावर लोकांपर्यंत लस पुरवण्यासाठी वेळ लागू शकतो.

पुढे त्यांनी सांगितले की, ''कोरोना व्हायरसचं औषध कधी येणार याची शाश्वती देणं कठीण आहे. कारण कोरोनाची लस किंवा औषध तयार करायचं असल्यास अनेक टप्प्यामधून जावं लागतं. सुरूवातीपासून ते शेवटच्या  टप्प्यापर्यंत सर्वकाही व्यस्थित असेल तर कोरोनाची लस किंवा औषध  लवकरता लवकर उपलब्ध होऊ शकते. लस विकसित  झाल्यानंतर कोणत्या पद्धतीने लस बाजारात उतरवायची याचीही समस्या उभी राहू शकते. अनेक संस्थानांनी औषधांचे प्राथमिक वितरणाच्या आधारावर म्हणजेच ज्यांना संक्रमणाचा धोका सगळ्यात जास्त आहे. अशा लोकांना लस देण्याचा विचार केला आहे. रशियातील मॉस्कोमध्ये सामान्य लोकांसाठी लसीकरण सुरू केलं आहे. ''

देशात कोरोनाचा  हाहाकार

दरम्यान  जगभरात कोरोनाचा हाहाकार पाहायला मिळत आहे. जगभरातील कोरोनाग्रस्ताची संख्या ही तब्बल तीन कोटींच्या वर गेली आहे. तर लाखो लोकांना कोरोनामुळे आपला जीव गमवावा लागला आहे. देशातही कोरोनाचा धोका वाढला असून रुग्णांच्या संख्येत दिवसागणिक वाढ होत आहे. रुग्णांचा आकडा 65 लाखांवर गेला असून कोरोनाने देशातील तब्बल 1 लाख लोकांचा बळी घेतला आहे. 

रविवारी (4 ऑक्टोबर) केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, देशात 24 तासांत कोरोनाचे 75,829 नवे रुग्ण आढळून आले होते. तर 940 जणांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे देशातील कोरोनाग्रस्त रुग्णांची संख्या 65 लाख 49 हजारांवर पोहोचली. कोरोनामुळे मृत्यू झालेल्यांचा आकडा हा तब्बल एक लाखांवर पोहोचला आहे. सर्वाधिक रुग्णसंख्या असलेल्या देशांच्या यादीत भारत दुसऱ्या स्थानी आहे. कोरोनाग्रस्तांची संख्या सातत्याने वाढत असल्याने चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे.

टॅग्स :Health Tipsहेल्थ टिप्सcorona virusकोरोना वायरस बातम्याHealthआरोग्यdocterडॉक्टरAIIMS hospitalएम्स रुग्णालय