शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
3
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
4
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
5
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
6
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
7
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
8
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
9
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
10
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
11
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
12
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
13
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
14
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
15
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
16
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
17
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
18
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
19
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
20
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  

भारतीय तज्ज्ञांनी सांगितलं कोरोनाची लस कधी येणार?, लसीकरणाबाबत व्यक्त केली चिंता

By manali.bagul | Updated: October 4, 2020 12:59 IST

CoronaVirus News & Latest Updates : दिल्लीतील अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्थान म्हणजचे एम्सचे संचालक डॉ. रणदीप गुलेरिया यांनी कोरोनाच्या लसीबाबत महत्वाची माहिती दिली आहे.

कोरोना व्हायरसचा कहर संपूर्ण जगभरात वाढत आहे. अशा स्थितीत जगभरातील लोकांना कोरोना विषाणूंचा खात्मा करणारी लस कधी येणार याची प्रतिक्षा आहे. कोरोनाची सुरक्षित आणि प्रभावी लस तयार केल्याचा दावा आतापर्यंत चीन आणि रशियाने केला आहे. भारत, अमेरिकेसह अनेक देश कोरोनाची लस तयार करण्याचे काम वेगाने करत आहेत. दरम्यान दिल्लीतील अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्थान म्हणजचे एम्सचे संचालक डॉ. रणदीप गुलेरिया यांनी कोरोनाच्या लसीबाबत महत्वाची माहिती दिली आहे.

भारतीय बाजारात कोरोनाची लस कधीपर्यंत उपलब्ध होऊ शकते हे सांगताना त्यांनी लसीकरणाबाबत चिंता व्यक्त केली आहे. एका टेलिव्हिजन कार्यक्रमात बोलताना एम्सचे संचालक डॉ. गुलेरिया यांनी सांगितले की, ''कोरोनाची लस आता प्रगतीपथावर आहे. सर्व चाचण्या व्यवस्थित पार पडल्यास २०२१ च्या सुरूवातीला कोरोनाची लस बाजारात उपलब्ध होऊ शकते. सुरूवातीला लस उपलब्ध झाल्यास सर्व लोकसंख्येला पुरेल इतक्या प्रमाणात असेलच असं नाही. मोठ्या प्रमाणावर लोकांपर्यंत लस पुरवण्यासाठी वेळ लागू शकतो.

पुढे त्यांनी सांगितले की, ''कोरोना व्हायरसचं औषध कधी येणार याची शाश्वती देणं कठीण आहे. कारण कोरोनाची लस किंवा औषध तयार करायचं असल्यास अनेक टप्प्यामधून जावं लागतं. सुरूवातीपासून ते शेवटच्या  टप्प्यापर्यंत सर्वकाही व्यस्थित असेल तर कोरोनाची लस किंवा औषध  लवकरता लवकर उपलब्ध होऊ शकते. लस विकसित  झाल्यानंतर कोणत्या पद्धतीने लस बाजारात उतरवायची याचीही समस्या उभी राहू शकते. अनेक संस्थानांनी औषधांचे प्राथमिक वितरणाच्या आधारावर म्हणजेच ज्यांना संक्रमणाचा धोका सगळ्यात जास्त आहे. अशा लोकांना लस देण्याचा विचार केला आहे. रशियातील मॉस्कोमध्ये सामान्य लोकांसाठी लसीकरण सुरू केलं आहे. ''

देशात कोरोनाचा  हाहाकार

दरम्यान  जगभरात कोरोनाचा हाहाकार पाहायला मिळत आहे. जगभरातील कोरोनाग्रस्ताची संख्या ही तब्बल तीन कोटींच्या वर गेली आहे. तर लाखो लोकांना कोरोनामुळे आपला जीव गमवावा लागला आहे. देशातही कोरोनाचा धोका वाढला असून रुग्णांच्या संख्येत दिवसागणिक वाढ होत आहे. रुग्णांचा आकडा 65 लाखांवर गेला असून कोरोनाने देशातील तब्बल 1 लाख लोकांचा बळी घेतला आहे. 

रविवारी (4 ऑक्टोबर) केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, देशात 24 तासांत कोरोनाचे 75,829 नवे रुग्ण आढळून आले होते. तर 940 जणांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे देशातील कोरोनाग्रस्त रुग्णांची संख्या 65 लाख 49 हजारांवर पोहोचली. कोरोनामुळे मृत्यू झालेल्यांचा आकडा हा तब्बल एक लाखांवर पोहोचला आहे. सर्वाधिक रुग्णसंख्या असलेल्या देशांच्या यादीत भारत दुसऱ्या स्थानी आहे. कोरोनाग्रस्तांची संख्या सातत्याने वाढत असल्याने चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे.

टॅग्स :Health Tipsहेल्थ टिप्सcorona virusकोरोना वायरस बातम्याHealthआरोग्यdocterडॉक्टरAIIMS hospitalएम्स रुग्णालय