शहरं
Join us  
Trending Stories
1
बिहारमध्ये प्रशांत किशोर यांची जनसुराज्य खाते उघडणार? ८ एक्झिट पोलमध्ये तेजस्वी यादवांचे गणित बिघडले
2
लग्नाला नऊ वर्षे पूर्ण झाली, पतीने आपल्याच मित्रासोबत पत्नीचे लग्न लावून दिले; धक्कादायक कारण आले समोर
3
शेख हसीनानंतर आता युनूस सरकारविरोधात विद्यार्थी रस्त्यावर; बांगलादेशात पुन्हा चळवळ सक्रिय
4
बिहारमध्ये काँग्रेसला मोठा धक्का! दुसऱ्या टप्प्यातील निवडणूक संपताच मोठ्या नेत्याने दिला राजीनामा
5
Bihar Exit Poll : बिहारमध्ये उत्सुकता शिगेला! पहिला एक्झिट पोल आला, नितीश की तेजस्वी?
6
'तो शांत होता, त्याचे जास्त मित्र नव्हते'; दिल्ली बॉम्बस्फोटातील संशयित डॉक्टरच्या कुटुंबीयांची प्रतिक्रिया
7
राहुल द्रविडच्या लेकाची भारतीय U19 संघात वर्णी ; वैभव सूर्यवंशीचं नाव 'गायब' कारण...
8
छत्तीसगडच्या बीजापूरमध्ये मोठी चकमक, 6 नक्षलवादी ठार; मोठ्या प्रमाणात शस्त्रसाठा जप्त...
9
बॉसनं नोकरीवरून काढलं, पठ्ठ्यानं असं काही केलं की आता कंपनीला बसणार मोठा दंड!
10
फरीदाबाद मॉड्यूलचा खरा मास्टरमाईंड आला समोर; डॉक्टरांना कट्टरपंथी बनवणारा मौलवी इरफान अहमद कोण?
11
Travel : भारताशी कनेक्शन, 'या' देशात जाताच करोडपती व्हाल! परदेशवारीचा प्लॅन करताय तर नक्की विचार करा
12
ती चूक यामाहा नाही करणार...! पहिली वहिली इलेक्ट्रीक स्कूटर आली!  Aerox लूक; इतकी रेंज देणार की...
13
Delhi Red Fort Blast : जैश-ए-मोहम्मदच्या दहशतवाद्याचे कॉल डिटेल्स उघड; दिल्ली स्फोटाचं रहस्य उलगडलं, उमरने ‘तारिक’ नावाने घेतलं सिम कार्ड
14
Yamaha ची नव्या जमान्याची RX100...! स्टायलिश बाईक लाँच; किंमत फक्त ₹ १.** लाख!
15
IND vs SA : ईडन गार्डन्सच्या खेळपट्टीवर गंभीर नाराज; गांगुलीनं असं दिलं उत्तर
16
संत्र्याच्या साली कचरा समजून फेकून देता, थोडं थांबा... त्वचेसह घरालाही होईल मोठा फायदा
17
दिल्ली स्फोट प्रकरणात नवा खुलासा; डॉ. शाहीन अन् डॉ. परवेज सख्खे भाऊ बहीण, तपासात काय सापडलं?
18
मुख्य आरोपीचा 'खास' दोस्त अटकेत; दिल्ली स्फोटप्रकरणात वैद्यकीय क्षेत्रातील सहावी व्यक्ती ताब्यात!
19
एकनाथ शिंदेंनी संजय राऊतांच्या तब्येतीची चौकशी केली; भावाला फोन करून प्रकृतीची विचारपूस
20
'सरकारने निर्दोषांना शिक्षा करू नये; पण...', दिल्ली बॉम्बस्फोटांवर अबू आझमींचे मोठे विधान

जर तुम्ही ३० दिवस साखर खाणे बंद केले तर काय होईल? जाणून घ्या याचे परिणाम चांगले की वाईट?

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 8, 2021 17:32 IST

जर एखादी व्यक्ती ३० दिवस मिठाई किंवा काहीच गोड खात नसेल तर? तर ते त्या व्यक्तीसाठी चांगले की, वाईट? याचा त्यांच्यावरती काय परिणाम होईल? अशा प्रश्नांची उत्तरे आम्ही तुम्हाला आज देणार आहोत.

जर तुम्हाला डायबिटीस असेल किंवा तुम्ही डायबिटीस पेशंट होण्याच्या दिशेने वाटचाल करत असाल तर या दोन्ही बाबतीत तुम्हाला मिठाई न खाण्याचा सल्ला दिला जातो. पण गोड अन्न पूर्णपणे सोडून द्यावे का? जर एखादी व्यक्ती ३० दिवस मिठाई किंवा काहीच गोड खात नसेल तर? तर ते त्या व्यक्तीसाठी चांगले की, वाईट? याचा त्यांच्यावरती काय परिणाम होईल? अशा प्रश्नांची उत्तरे आम्ही तुम्हाला आज देणार आहोत.

एका सर्वेक्षणातून खुलासा२०१९ मध्ये अमेरिकेत एक सर्वेक्षण करण्यात आले. त्यादरम्यान असे आढळून आले की, एक व्यक्ती दरवर्षी सरासरी २८ किलो साखर वापरते. इतकी साखर शरीरासाठी घातक आहे. जागतिक आरोग्य संघटनेच्या मते, एका व्यक्तीने एका दिवसात ६-७ चमचे साखर खाल्ली पाहिजे.

जर तुम्ही ते ग्रॅममध्ये पाहिले तर त्याचा सरळ अर्थ असा आहे की, एका दिवसात फक्त २५-३० ग्रॅम साखर खावी, जर तुम्ही यापेक्षा जास्त खाल्ले तर तुम्हाला त्याचा अपाय होईल. त्याचवेळी अमेरिकन हार्ट असोसिएशनचे असे म्हणणे आहे की, महिलांनी पुरुषांपेक्षा कमी साखर खावी. यांच्या म्हणण्यानुसार, पुरुषांनी एका दिवसात १५०कॅलरीज साखरेचा वापर करावा तर महिलांनी फक्त १०० कॅलरीज साखरेचा वापर करावा.

आपण ३० दिवस गोड न खाल्ल्यास काय होईल?अनेक पदार्थांमधून गोड आपल्या पोटात जातं. जवळजवळ प्रत्येक गोड पदार्थांमध्ये साखर वापरली जाते.  साखर गोड असते, आणि ती आरोग्यासाठी विषापेक्षा कमी नाही. गोड काही काळ तुमच्यासाठी चांगले असू शकते परंतु नंतर ते तुम्हाला अनेक आजार देऊ शकते. अशा परिस्थितीत जर ३० दिवस जर एखाद्या व्यक्तीने साखरं खाणं सोडून दिलं तर त्याच्या शरीरासाठी ते फायद्याचं ठरु शकतं आणि ती व्यक्ती एनर्जेटीक फील करते. तसेच यामुळे चिडचिडेपणा कमी होतो आणि यामुळे थकावट देखील होते.

गोड सोडण्याचा योग्य मार्ग कोणता?जर तुम्ही अचानक साखर खाणे बंद केले तर तुम्हाला अशक्तपणा जाणवू लागेल. हे टाळण्यासाठी साखरेचे प्रमाण हळूहळू कमी करा. उदाहरणार्थ, जर तुम्ही तुमच्या सकाळच्या चहामध्ये २ चमचे साखर घेत असाल, तर आधी ते एक आणि नंतर अर्धा चमचा इतके प्रमाण करा आणि नंतर हळू हळू सोडा.

परंतु आपण फळे, धान्ये इत्यादी गोड गोष्टी खाणे चालू ठेवले पाहिजे. जर तुम्ही गोड पदार्थ खाणे पूर्णपणे बंद केले तर ते तुमच्या शरीरासाठी ते घातक ठरू शकते. गोड पदार्थ खाणे पूर्णपणे सोडून दिल्यानंतर, तुमचे शरीर चरबीपासून ग्लुकोज बनवण्यासाठी केटोन्स तयार करण्यास सुरुवात करते आणि हे केटोन्स शरीरात साठवलेल्या चरबीचे ग्लुकोजमध्ये रूपांतर करतात, ज्यामुळे तुमची चरबी वितळण्यास सुरुवात होते. या प्रक्रियेला केटोसिस म्हणतात.

टॅग्स :Healthआरोग्यHealth Tipsहेल्थ टिप्सdiabetesमधुमेह