शहरं
Join us  
Trending Stories
1
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
2
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
3
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
4
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
5
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
6
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
7
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
8
Mumbai: वांद्र्यात जलवाहिनी फुटल्यानं रस्ते जलमय; वाहतूक विस्कळीत, नागरिकांचेही हाल!
9
RR vs RCB : 'छोटा पॅक बडा धमाका' की, स्विंगचा किंग पुन्हा ठरणार भारी! वैभव पलटवार करणार?
10
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...
11
रात्री WiFi चालू ठेवून झोपल्याने खरंच कॅन्सर होतो? रिसर्चमधून मोठा खुलासा
12
४ वर्षांनंतर Bajaj Pulsur 180 बाजारात दाखल; मस्क्युलर लूक आणि तगड्या फीचर्ससह कमबॅक!
13
मला बी नोबेल मिळू द्या की...! पाकिस्तानात शांततेच्या नोबेलचा तिसरा दावेदारही तयार; पक्षाने प्रस्तावच ठेवला
14
"आज ऑफिसला येऊ शकणार नाही", म्हणताच त्याला नोकरीवरूनच काढले; गुरुग्राममधील प्रकरण काय?
15
घालमेल...! पाकिस्तानची JF-17, F-16 लढाऊ विमाने सौदी, इराणच्या दिशेने उडाली; 'ऑपरेशन आयर्न एस्कॉर्ट' ठेवले नाव
16
Viral Video: बाईकवरून जात होती तरुणी, पाठीमागून आले अन् नको तिथं...; तरुणांचं घाणेरडं कृत्य कॅमेऱ्यात कैद
17
भाजपचा मास्टरस्ट्रोक! बंगालमध्ये ममतांच्या 'लक्ष्मी भंडार'ला तगडा ठोसा; सत्तेत आल्यास महिला अन् बेरेजगारांना लॉटरी लागणार!
18
Latest Marathi News LIVE Updates: ओवेसींचा मोठा निर्णय! हुमायू कबीरच्या पक्षासोबतची आघाडी तोडली
19
खळबळजनक! ४० जणांच्या ग्रुपसोबत फिरायला गेली अन् गायब झाली; ३ दिवसांनी सापडला मृतदेह
20
Chanakya Niti: गरिबी येण्यापूर्वी घरात दिसतात 'ही' ५ लक्षणे; आचार्य चाणक्यांनी दिलेला इशारा वेळीच ओळखा!
Daily Top 2Weekly Top 5

जर तुम्ही ३० दिवस साखर खाणे बंद केले तर काय होईल? जाणून घ्या याचे परिणाम चांगले की वाईट?

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 8, 2021 17:32 IST

जर एखादी व्यक्ती ३० दिवस मिठाई किंवा काहीच गोड खात नसेल तर? तर ते त्या व्यक्तीसाठी चांगले की, वाईट? याचा त्यांच्यावरती काय परिणाम होईल? अशा प्रश्नांची उत्तरे आम्ही तुम्हाला आज देणार आहोत.

जर तुम्हाला डायबिटीस असेल किंवा तुम्ही डायबिटीस पेशंट होण्याच्या दिशेने वाटचाल करत असाल तर या दोन्ही बाबतीत तुम्हाला मिठाई न खाण्याचा सल्ला दिला जातो. पण गोड अन्न पूर्णपणे सोडून द्यावे का? जर एखादी व्यक्ती ३० दिवस मिठाई किंवा काहीच गोड खात नसेल तर? तर ते त्या व्यक्तीसाठी चांगले की, वाईट? याचा त्यांच्यावरती काय परिणाम होईल? अशा प्रश्नांची उत्तरे आम्ही तुम्हाला आज देणार आहोत.

एका सर्वेक्षणातून खुलासा२०१९ मध्ये अमेरिकेत एक सर्वेक्षण करण्यात आले. त्यादरम्यान असे आढळून आले की, एक व्यक्ती दरवर्षी सरासरी २८ किलो साखर वापरते. इतकी साखर शरीरासाठी घातक आहे. जागतिक आरोग्य संघटनेच्या मते, एका व्यक्तीने एका दिवसात ६-७ चमचे साखर खाल्ली पाहिजे.

जर तुम्ही ते ग्रॅममध्ये पाहिले तर त्याचा सरळ अर्थ असा आहे की, एका दिवसात फक्त २५-३० ग्रॅम साखर खावी, जर तुम्ही यापेक्षा जास्त खाल्ले तर तुम्हाला त्याचा अपाय होईल. त्याचवेळी अमेरिकन हार्ट असोसिएशनचे असे म्हणणे आहे की, महिलांनी पुरुषांपेक्षा कमी साखर खावी. यांच्या म्हणण्यानुसार, पुरुषांनी एका दिवसात १५०कॅलरीज साखरेचा वापर करावा तर महिलांनी फक्त १०० कॅलरीज साखरेचा वापर करावा.

आपण ३० दिवस गोड न खाल्ल्यास काय होईल?अनेक पदार्थांमधून गोड आपल्या पोटात जातं. जवळजवळ प्रत्येक गोड पदार्थांमध्ये साखर वापरली जाते.  साखर गोड असते, आणि ती आरोग्यासाठी विषापेक्षा कमी नाही. गोड काही काळ तुमच्यासाठी चांगले असू शकते परंतु नंतर ते तुम्हाला अनेक आजार देऊ शकते. अशा परिस्थितीत जर ३० दिवस जर एखाद्या व्यक्तीने साखरं खाणं सोडून दिलं तर त्याच्या शरीरासाठी ते फायद्याचं ठरु शकतं आणि ती व्यक्ती एनर्जेटीक फील करते. तसेच यामुळे चिडचिडेपणा कमी होतो आणि यामुळे थकावट देखील होते.

गोड सोडण्याचा योग्य मार्ग कोणता?जर तुम्ही अचानक साखर खाणे बंद केले तर तुम्हाला अशक्तपणा जाणवू लागेल. हे टाळण्यासाठी साखरेचे प्रमाण हळूहळू कमी करा. उदाहरणार्थ, जर तुम्ही तुमच्या सकाळच्या चहामध्ये २ चमचे साखर घेत असाल, तर आधी ते एक आणि नंतर अर्धा चमचा इतके प्रमाण करा आणि नंतर हळू हळू सोडा.

परंतु आपण फळे, धान्ये इत्यादी गोड गोष्टी खाणे चालू ठेवले पाहिजे. जर तुम्ही गोड पदार्थ खाणे पूर्णपणे बंद केले तर ते तुमच्या शरीरासाठी ते घातक ठरू शकते. गोड पदार्थ खाणे पूर्णपणे सोडून दिल्यानंतर, तुमचे शरीर चरबीपासून ग्लुकोज बनवण्यासाठी केटोन्स तयार करण्यास सुरुवात करते आणि हे केटोन्स शरीरात साठवलेल्या चरबीचे ग्लुकोजमध्ये रूपांतर करतात, ज्यामुळे तुमची चरबी वितळण्यास सुरुवात होते. या प्रक्रियेला केटोसिस म्हणतात.

टॅग्स :Healthआरोग्यHealth Tipsहेल्थ टिप्सdiabetesमधुमेह