शहरं
Join us  
Trending Stories
1
बीड जिल्ह्यात मुसळधार पाऊस, नद्या-नाले तुडुंब; जीप वाहून सहा जण अडकल्याची भीषण घटना
2
कावड-पालखी सोहळ्यातील ट्रॅक्टरचा अकोला दगडीपुलाजवळ अपघात, २२ भाविक जखमी
3
सी.पी राधाकृष्णन यांना उपराष्ट्रपतिपदाचे उमेदवार बनवण्यामागे भाजपाची खेळी काय? जाणून घ्या
4
कोल्हापूर सर्किट बेंच झाले, आता खंडपीठाचा प्रस्ताव द्या; सरन्यायाधीश भूषण गवईंची सूचना
5
जलसमाधी आंदोलनावेळी नदीत उडी घेणाऱ्या 'त्या' आंदोलनकर्त्याचा मृतदेह १५ किमी अंतरावर सापडला
6
दहीहंडीला २४ तासांत तब्बल १.१३ कोटी दंड वसूल; वाहतूक पोलिसांनी बेशिस्त गोविंदांना लावला चाप
7
मोठी बातमी! महाराष्ट्राचे राज्यपाल सीपी राधाकृष्णन उपराष्ट्रपती पदाची निवडणूक लढणार; भाजपाची घोषणा
8
योगींच्या गोटात खळबळ! १०० हून अधिक आमदारांचा पत्ता कट होण्याची शक्यता; सपाही टेन्शनमध्ये...
9
लग्नानंतर ४५ दिवसांत असं काय घडलं, २७ वर्ष युवकानं स्वत:ला संपवलं?; आईला केला होता शेवटचा कॉल
10
पावसाळ्यात बेडूक येतात तसं निवडणूक आल्यावर जरांगे बाहेर पडतात; भाजपा आमदाराची बोचरी टीका
11
न्यायालयात लेखी स्वरुपात देणार का? निवडणूक आयोगाच्या 'त्या' वक्तव्यावर काँग्रेसचा पलटवार
12
'आता तरी उठा' या पुण्यातील बॅनरवरून अण्णा हजारेंनी मौन सोडलं, म्हणाले, "हे माझं दुर्दैव..."
13
महाराष्ट्रातील मतदानावर आरोप, ECI नं राहुल गांधींना सुनावलं; "निकालानंतर आरोप केले, पण आजपर्यंत एकही..."
14
जिथे नवीन मतदार, तिथे BJP चा विजय; महाराष्ट्रात जादूने १ कोटी मतदार निर्माण झाले- राहुल गांधी
15
दावा जगाची युद्धे थांबविल्याचा, ट्रम्पना वॉशिंग्टन डीसीतील परिस्थिती आवरेना...; दुसऱ्या राज्यातून सुरक्षा मागविली
16
आई-पत्नी आणि मुलीसमोर तरुणावर तलवारीने हल्ला; एका व्हॉट्सअॅप फॉरवर्डमुळे गेला जीव
17
७ दिवसांत प्रतिज्ञापत्र द्या अन्यथा देशाची माफी मागा; निवडणूक आयोगाचं राहुल गांधींना चॅलेंज
18
उतावीळ...! नोबेल द्या नाहीतर प्रचंड टेरिफ लावू...; ट्रम्प यांची नॉर्वेच्या अर्थमंत्र्यांना धमकी
19
'मत चोरी'च्या आरोपांना आम्ही घाबरत नाही; राहुल गांधींना निवडणूक आयोगाचे उत्तर
20
तुमचं पॅन कार्ड हरवलंय? काळजी करू नका, घरबसल्या फक्त ५ मिनिटांत मिळेल डुप्लिकेट ई-पॅन

दर महिन्याला पाळी येण्याची वेळ चुकते का? जाणून घ्या असं का होतं

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 28, 2019 15:56 IST

बऱ्याच मुलींना पाळी दर महिन्याला वेळेवर येत नाही. तारखेच्या आधी किंवा तारखेच्या नंतर येते.

बऱ्याच मुलींना पाळी दर महिन्याला वेळेवर येत नाही. तारखेच्या आधी किंवा तारखेच्या नंतर येते. तर कधी पंधरा दिवसातून सुद्धा येते.  आणि यामुळे अनेकदा समस्यांचा सामना करावा लागतो.  काही प्लॅन्स असतील तर पाळी आल्यामुळे कॅन्सल करावे लागतात. आणि चिडचिड होते. तर मग जाणून घ्या पाळी वेळेवर न यायला कारण काय आहेत. 

(image credit-Medilife.com)

१) बर्थ कंट्रोल पिल्स बर्थ कंट्रोल पिल्सच्या साईड इफेक्टमुळे हार्मोन्सचे संतूलन बिघडते. यामुळे मासिक पाळी वेळेवर येत नाही. सध्याच्या काळात  कमी वयातच गर्भनीरोधक गोळ्या घेतल्या जातात. त्या शरीरासाठी नुकसानकारक ठरु शकतात. त्यामुळे पाळी लांबणीवर जाते.

(Image credit- Complete health guide)

२) मध्यमवयीन स्त्रियांना सुध्दा हा त्रास होतो. यात स्तन हळवे होणे, पोट फुगल्यासारखे वाटणे, डोकेदुखी, झोप न लागणे, चिडचिड, थकवा, थोडे वजन वाढणे, इ. त्रास होतात. ही सर्व लक्षणे शरीरात संप्रेरकांमुळे होणा-या बदलांमुळे असतात. पाळीच्या आधी १-२ आठवडे हा त्रास होतो. पाळीची तारीख जवळ येईल तसे मानसिक त्रास वाढतात. शारीरिक त्रासही थोडेफार वाढतात.

(Image credit-Practo)

३) दीर्घकाळ तणावात राहिल्याने शरीरात एस्ट्रोजन नावाचे हार्मोन रिलिज होतो. शरीरातील याचे प्रमाण वाढल्याने मासिक पाळी वेळेवर येत नाही. प्रमाणापेक्षा जास्त शारीरिक कष्ट झाल्यास किंवा अति प्रमाणात काम करणे व खूप कमी खाणे.  ह्यामुळे मासिक पाळीच्या नियमिततेवर परिणाम होतो. जास्तीच्या व्यायामामुळे आणि श्रमामुळे थायरॉईड आणि ‘पिट्युटरी’ ग्रंथींवर परिणाम होऊन पाळी चुकू शकते. 

(Image credit- Digital Gate It)

४)शरीरातील थायरॉइड या हार्मेनसचे संतुलन बिघडल्यामुळे अनियमित पाळीचा त्रास उद्भवू शकतो. यात अचानक काही महिन्यांत वजन वाढते, थकल्यासारखं वाटतं. तसेच पाळीच्या वेळी रक्तस्राव कमी होतो. अशी लक्षणं दिसल्यास त्वरीत शरीराची तपासणी करणे गरजेचं आहे. 

(image credit- healthwantcare)

५) खाण्यापिण्याच्या सवयींचा आरोग्याशी जवळचा संबंध असतो. शरीराशी निगडीत अनेक गोष्टी या आहाराशी निगडीत असतात. तुमच्या आहारात फायबरचे प्रमाण जास्त असेल, तर त्याचा मासिक पाळीशी संबंध येतो. याशिवाय खाण्याच्या चुकीच्या सवयी, लठ्ठपणा आणि खूप बारीक असणे, अशी पाळी चुकण्याची अनेक कारणे असू शकतात.

टॅग्स :WomenमहिलाHealthआरोग्य