शहरं
Join us  
Trending Stories
1
राहुल गांधींचा दावा फॅक्ट चेकमध्ये निघाला खरा, एकच व्यक्ती ४ ठिकाणी मतदार, नंबर सारखाच
2
ओबीसी क्रिमिलेअर उत्पन्न मर्यादेचा, दर ३ वर्षांनी आढावा घ्या; इतर मागासवर्गीयांसाठी नियुक्त समितीची शिफारस
3
जिथे-जिथे नवीन मतदार तिथे-तिथे भाजपचा विजय! राहुल गांधी यांची टीका; प्रियांका गांधी म्हणाल्या...
4
रागाने गेलेला मुलगा आठ वर्षांनी परतला, पोलिसांकडून ‘सरप्राईज गिफ्ट’; आई-वडिलांचे डोळे अश्रूंनी डबडबले 
5
अमेरिकेकडून शस्त्रास्त्रं खरेदी थांबविल्याच्या वृत्ताचे भारताकडून जोरदार खंडन; संरक्षण मंत्रालयानं स्पष्टच सांगितलं 
6
८० एकरांत २५ फूट गाळ, अजूनही दबलेत १५० जण; आधुनिक मशिन धरालीत येण्यास लागणार ४ दिवस
7
निवडणूक आयोग शपथपत्र द्यायला सांगतोय; पण मी आधीच संसदेत शपथ घेतली आहे : राहुल गांधी
8
महादेवी हत्तीणीसाठी सोमवारी सर्वाेच्च न्यायालयाला साकडे, राज्य सरकार, वनतारा, नांदणी मठ देणार एकत्रित विनंतीअर्ज
9
इंडिया आघाडीच्या बैठकीत उद्धव ठाकरे शेवटच्या रांगेत; शिंदेसेनेचे आंदोलन, तर भाजपची टीका
10
एकाच वेळी चार विद्यार्थ्यांची अंत्ययात्रा, हमसून-हमसून धाय मोकलून रडले गाव...
11
पडळकर समर्थकाचे अपहरण, पाच तासांत आरोपी ताब्यात; रोहित पवार मास्टरमाइंड असल्याचा आरोप
12
"पुणे तर ‘फ्युचर सिटी’; १० वर्षांत कायापालट; शहरासाठी आणखी पाच पोलिस ठाणी" 
13
कावडयात्रेत घुसला भरधाव ट्रक; दोन शिवभक्तांचा मृत्यू
14
उद्योगांची एक्स्प्रेस सुस्साट, प्रक्रिया सुलभ आणि वेगवान; गुंतवणूकदारांना मोठा दिलासा
15
ठाण्यात कैद्यांच्या बंदोबस्तामध्ये हलगर्जीपणा, नऊ पोलिस कर्मचाऱ्यांवर निलंबनाची कारवाई
16
महादेवीसाठी महाराष्ट्रात तोडीच्या सुविधा नाहीत; पेटाच्या नव्या भूमिकेवर मठाचे स्पष्टीकरण
17
जोपर्यंत टॅरिफचा प्रश्न सुटत नाही, तोपर्यंत भारतासोबत व्यापार चर्चा होणार नाही - ट्रम्प
18
'भारत आता कुणासमोरही झुकणार नाही', 'ट्रम्प टॅरिफ बॉम्ब'वर केंद्रीय मंत्री पीयुष गोयल काय बोलले?
19
'कुठून मी या पुण्याचा पालकमंत्री झालो, जो तो उठतो अन्...'; अजित पवारांनी जोडले हात, असं काय घडलं?
20
'एकाच घराच्या पत्त्यावर 80 मतदार आहेत, कारण..."; राहुल गांधींचा आरोप, बूथ लेव्हल ऑफिसरने केला खुलासा 

आरोग्यासाठी जीवनसत्त्व सी

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 28, 2019 02:00 IST

एका प्रसिद्ध जर्नलमध्ये असे संशोधन झाले आहे कीं चायनीज पदार्थ सतत खाण्यात ठेवले तर चायनीज रेस्टॉरंट सिंड्रोम होऊ शकतो.

- डॉ. कांचन खैराटकरसध्या भारतात चायनीज पदार्थ खाण्याचे प्रमाण वाढते आहे. एका प्रसिद्ध जर्नलमध्ये असे संशोधन झाले आहे कीं चायनीज पदार्थ सतत खाण्यात ठेवले तर चायनीज रेस्टॉरंट सिंड्रोम होऊ शकतो. कधी भारतीय रेस्टॉरंट सिंड्रोम ऐकले आहे का हो !काय आहे हा सिंड्रोम? यामध्ये घशास अचानक सूज येणे , चक्कर येणे, पोटात दुखणे आणि वारंवार खाज येणे अशी लक्षणे चायनीज पदार्थांच्या सेवनोत्तर होतात. त्याचे कारण त्यातील घटक मोनोसोडियम ग्लुटामेट हा आहे. त्याला टेस्ट मेकर म्हणजे उत्कृष्ट चव निर्माण करणारा आहे, बर मान्य ! मग जे चवीसाठी उत्कृष्ट ते आरोग्यासाठी घातक कसे? कारण फक्त चवीचा विचार करून आहार बनविणे ही भारतीय संस्कृती नाही. आपली आहार संस्कृती ही वय, काल, देश, संस्कार आणि शारीरिक आणि मानसिक आरोग्याचा विचार करून बनलेली आहे मग वसंत ऋतूत सुंठवडा असेल, कडक उन्हात खजुराचे सरबत असेल किंवा वेगवेगळे मुरांबे असतील, चातुर्मास आणि वर्षा ऋतुत हिंग तूप असेल, ऋतु, सण, वार आणि आहार अगदी आखीव -रेखीव!मला अनेकदा हा प्रश्न स्वत:ला पडतो की, इतके वैविध्य असताना वेगळीकडे का आस धरावी? ‘वेगळी चव’ इतपत ठीक पण तो आयुष्याचा भाग कसा काय व्हावा? असो ! आपला आजचा विषय आहे पुढील जीवनसत्त्व सी...जीवनसत्त्व सी हे बहुधा सर्व फळांत आणि भाज्यांत आढळते. हे पाण्यात विरघळणारे असल्याने शरीरातील पाण्याची पातळी कमी झाली की याचेही प्रमाण कमी होते. मानवी शरीरात हे आपोआप निर्माण केले जात नाही, त्यामुळे शरीरात बाहेरून पूरक प्रमाणात घेणे आवश्यक आहे. पूर्वी दमूनभागून, उन्हातान्हात फिरुन आल्यानंतर, खेळ खेळून आल्यानंतर लिंबू सरबत दिले जायचे. आईचा आवाजच असायचा ‘चला, सरबत प्यायला.’ आज असे चित्र खूपच कमी पाहायला मिळते. लिंबू सरबत ही अतिशय उत्तम परंपरा आहे.भाज्या जास्त वेळ साठवून ठेवणे, चिरून खूप वेळाने वापरणे, खूप शिजविणे या प्रक्रियेने हे जीवनसत्त्व कमी होते तेव्हा बाजारातून चिरून ठेवलेल्या भाज्या आणताना विचार करणे अत्यावश्यक आहे शिवाय फ्रिजमध्ये किती दिवस ठेवायच्या याचाही विचार करायला हवाच ना! फळे आणि भाज्याचा हवेशी संपर्क आला की सी जीवनसत्त्व कमी होते.आपल्या शरीराची प्रतिकारशक्ती, कोलॅजन निर्मिती, हृदयसंस्था, रक्ताभिसरण संस्था, श्वसन संस्था यांच्या उत्तम कार्यासाठी याची आवश्यकता असते. सध्याच्या नवीन संशोधनानुसार हे कर्करोगप्रतिबंधक आहे. डोळ्यांच्या आरोग्यासाठी आवश्यक आहे. मुख्यत्वे इ जीवनसत्त्वाला याचे पूरक कार्य आहे. उत्तम अ‍ँटी आॅक्सिडंट आहे. धूम्रपान करणारे, धावपळ, ताणतणाव असणाऱ्या व्यक्तींनी हे जीवनसत्त्व घेणे अत्यावश्यक आहे.आता आपण पुढील जीवनसत्त्व पाहूया ते म्हणजे बी जीवनसत्त्व. या जीवनसत्त्वात अनेक जीवनसत्त्वांचा समावेश होतो. विटॅॅमिन बी १, रिबोफ्लेव्हिन बी २, निअ‍ॅसिन बी ३, पँटोथेनिक अ‍ॅसिड बी ५, पायरिडॉक्सिन बी ६, बायोटीन बी ७, फॉलिक अ‍ॅसिड बी ९, आणि कोबॅलॅमिन बी १२, यालाच बी कॉम्प्लेक्स म्हणतात.आपल्याकडे पूर्वी विरजण लावण्याची पद्धत होती. शेजारील काकू, मावशी, आजी अशी अनेक नाती या निमित्ताने निर्माण व्हायची. विरजण लावणे म्हणजे दही लावणे आणि अगदी नैसर्गिकरीतीने बर का ! या दह्यात ब १२ तयार होते! ताजे दही, ताक यापासून ब १२ मिळते.दही भात, दही पोहे, दही बुंदी, दही चकली, अहो दही आणि मस्त लसूणदाण्याची चटणी आणि कडक भाकरी! अहाहा!चला, मग मस्त दही लावायला आजपासूनच सुरुवात करुयात का! अहो सगळ्या जीवनसत्त्वांनी युक्त असा हा आपला पारंपरिक आहार आहे. आजपर्यंत आपण जीवनसत्त्व अ, ड, इ,के,सी आणि बी पाहिले आणि त्या सर्वांनी युक्त विविधरंगी पारंपरिक आहार पाहिला. चला, तर मग नवीन सुरुवात करूयात आणि आरोग्यासाठी पोषणयुक्त पारंपरिक आहाराचा स्वीकार करूयात !शरीरातील चयापचय क्रिया, अनेक पेशींची वाढ , ऊर्जा, पचनसंस्था, मेंदूचे कार्य, हॉर्मोन आणि त्यांचे सुरळीत कार्य, पेशीचे संघटन आणि कार्य (स्नायू पेशी), मज्जासंस्था कार्य यासाठी या जीवनसत्त्वाची मदत होते. नैराश्याला प्रतिबंध होतो.पूर्ण धान्य, बदाम, कारळे, शेंगदाणे, पालक, सर्व हिरव्या भाज्या, अंडी, मासे, ताजी फळे, दूध आणि दुग्धजन्य पदार्थ यामध्ये बी जीवनसत्त्व असते.लिंबू वर्ग, संत्रे, मोसंबी, लिंबू, द्राक्षे, कोबी, फ्लॉवर, पालक आणि सर्व फळे आणि भाज्या यात विटामीन सी असते .

(लेखिका आयुर्वेदतज्ज्ञ आहेत) 

टॅग्स :Healthआरोग्यHealth Tipsहेल्थ टिप्स