शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणने अशी कोणती मिसाईल डागली? इस्रायलमध्ये ना अलर्ट आला ना सायरन वाजला; हायफावर कोसळली...
2
Maharashtra Election : महापालिका, जिल्हा परिषदांच्या निवडणुका कधी होणार? समोर आली मोठी अपडेट
3
गोव्याला जायचा प्लान करताय? ‘मुंबई-गोवा वंदे भारत’ट्रेनच्या शेकडो फेऱ्या रद्द; कारण आले समोर
4
Iran Israel War : 'पुतिन आमची मदत करा...', इस्रायलने बॉम्ब टाकल्यावर खामेनींना रशियाची आठवण झाली, परराष्ट्रमंत्र्यांना दूत म्हणून पाठवले
5
जगाच्या नकाशावर नाहीसा होऊ लागलाय 'हा' सुंदर देश; शास्त्रज्ञांनाही फुटलाय घाम!
6
युद्धातही श्रीमंतीचा डंका! इस्रायलची सर्वात श्रीमंत महिला चर्चेत! कसं उभं केलं ५.१६ लाख कोटींचं साम्राज्य?
7
तीन वेळा पतीचा जीव घेण्याचा केला प्रयत्न; चौथ्यांदा चिकन भात खायला देत कायमचा संपवला
8
डोनाल्ड ट्रम्प यांनी स्वतःच अमेरिकेच्या अर्थव्यवस्थेवर कुऱ्हाड मारली, आता 'चावी' इराणकडे!
9
Nag Panchami 2025: यंदा नागपंचमी कधी? कालसर्प दोष निवारणासाठी 'हा' दिवस राखीव ठेवाच!
10
अर्धशतकासह KL राहुलनं ८ वर्षांनी साधला हा डाव; शतकी दुष्काळ संपवण्याचीही संधी
11
स्वामींच्या मठात गेल्यावर तुम्हालाही ‘या’ २ गोष्टींचा अनुभव आला आहे का? उत्तर हो असेल तर...
12
युद्ध आणि मंदीचं सावट! दिग्गज IT शेअर्स कोसळले, पण 'या' सेक्टर्सने वाचवला बाजार; आज काय घडलं?
13
डबल लॉटरी...! आपने पंजाब पोटनिवडणूक जिंकली अन् राज्यसभेची एक जागा रिक्त झाली
14
रशियाने इराणला का मदत केली नाही? राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांनी सांगितले कारण! म्हणाले...
15
Samudra Shastra: व्यक्तीच्या नाकाची ठेवण सांगते, तिला 'राजयोग' मिळणार की 'संसार भोग'!
16
१०६ मुलांचा बाप आहे 'हा' व्यवसायिक, प्रत्येकाला दिले ११०० कोटी; परंतु ठेवलीये एक अट
17
युद्धाच्या मैदानात आता 'मच्छर' उतरवणार चीन?; असं तंत्रज्ञान ज्याचा अमेरिकेने विचारही केला नसेल
18
IND vs ENG: भारत- इंग्लंड कसोटी मालिकेला 'अँडरसन- तेंडुलकर ट्रॉफी' नाव दिल्यानं गावस्कर भडकले, म्हणाले...
19
ना पाकिस्तान, ना अफगाणिस्तान, मग इराणपर्यंत कसे पोहोचले B-2 बॉम्बर? खुद्द अमेरिकेनेच केला खुलासा
20
हे काय चाललंय? गोविंदाने लहान मुलीच्या खांद्यावर ठेवलं डोकं; नेटकरी म्हणाले, 'विचित्र माणूस...'

आरोग्यासाठी जीवनसत्त्व सी

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 28, 2019 02:00 IST

एका प्रसिद्ध जर्नलमध्ये असे संशोधन झाले आहे कीं चायनीज पदार्थ सतत खाण्यात ठेवले तर चायनीज रेस्टॉरंट सिंड्रोम होऊ शकतो.

- डॉ. कांचन खैराटकरसध्या भारतात चायनीज पदार्थ खाण्याचे प्रमाण वाढते आहे. एका प्रसिद्ध जर्नलमध्ये असे संशोधन झाले आहे कीं चायनीज पदार्थ सतत खाण्यात ठेवले तर चायनीज रेस्टॉरंट सिंड्रोम होऊ शकतो. कधी भारतीय रेस्टॉरंट सिंड्रोम ऐकले आहे का हो !काय आहे हा सिंड्रोम? यामध्ये घशास अचानक सूज येणे , चक्कर येणे, पोटात दुखणे आणि वारंवार खाज येणे अशी लक्षणे चायनीज पदार्थांच्या सेवनोत्तर होतात. त्याचे कारण त्यातील घटक मोनोसोडियम ग्लुटामेट हा आहे. त्याला टेस्ट मेकर म्हणजे उत्कृष्ट चव निर्माण करणारा आहे, बर मान्य ! मग जे चवीसाठी उत्कृष्ट ते आरोग्यासाठी घातक कसे? कारण फक्त चवीचा विचार करून आहार बनविणे ही भारतीय संस्कृती नाही. आपली आहार संस्कृती ही वय, काल, देश, संस्कार आणि शारीरिक आणि मानसिक आरोग्याचा विचार करून बनलेली आहे मग वसंत ऋतूत सुंठवडा असेल, कडक उन्हात खजुराचे सरबत असेल किंवा वेगवेगळे मुरांबे असतील, चातुर्मास आणि वर्षा ऋतुत हिंग तूप असेल, ऋतु, सण, वार आणि आहार अगदी आखीव -रेखीव!मला अनेकदा हा प्रश्न स्वत:ला पडतो की, इतके वैविध्य असताना वेगळीकडे का आस धरावी? ‘वेगळी चव’ इतपत ठीक पण तो आयुष्याचा भाग कसा काय व्हावा? असो ! आपला आजचा विषय आहे पुढील जीवनसत्त्व सी...जीवनसत्त्व सी हे बहुधा सर्व फळांत आणि भाज्यांत आढळते. हे पाण्यात विरघळणारे असल्याने शरीरातील पाण्याची पातळी कमी झाली की याचेही प्रमाण कमी होते. मानवी शरीरात हे आपोआप निर्माण केले जात नाही, त्यामुळे शरीरात बाहेरून पूरक प्रमाणात घेणे आवश्यक आहे. पूर्वी दमूनभागून, उन्हातान्हात फिरुन आल्यानंतर, खेळ खेळून आल्यानंतर लिंबू सरबत दिले जायचे. आईचा आवाजच असायचा ‘चला, सरबत प्यायला.’ आज असे चित्र खूपच कमी पाहायला मिळते. लिंबू सरबत ही अतिशय उत्तम परंपरा आहे.भाज्या जास्त वेळ साठवून ठेवणे, चिरून खूप वेळाने वापरणे, खूप शिजविणे या प्रक्रियेने हे जीवनसत्त्व कमी होते तेव्हा बाजारातून चिरून ठेवलेल्या भाज्या आणताना विचार करणे अत्यावश्यक आहे शिवाय फ्रिजमध्ये किती दिवस ठेवायच्या याचाही विचार करायला हवाच ना! फळे आणि भाज्याचा हवेशी संपर्क आला की सी जीवनसत्त्व कमी होते.आपल्या शरीराची प्रतिकारशक्ती, कोलॅजन निर्मिती, हृदयसंस्था, रक्ताभिसरण संस्था, श्वसन संस्था यांच्या उत्तम कार्यासाठी याची आवश्यकता असते. सध्याच्या नवीन संशोधनानुसार हे कर्करोगप्रतिबंधक आहे. डोळ्यांच्या आरोग्यासाठी आवश्यक आहे. मुख्यत्वे इ जीवनसत्त्वाला याचे पूरक कार्य आहे. उत्तम अ‍ँटी आॅक्सिडंट आहे. धूम्रपान करणारे, धावपळ, ताणतणाव असणाऱ्या व्यक्तींनी हे जीवनसत्त्व घेणे अत्यावश्यक आहे.आता आपण पुढील जीवनसत्त्व पाहूया ते म्हणजे बी जीवनसत्त्व. या जीवनसत्त्वात अनेक जीवनसत्त्वांचा समावेश होतो. विटॅॅमिन बी १, रिबोफ्लेव्हिन बी २, निअ‍ॅसिन बी ३, पँटोथेनिक अ‍ॅसिड बी ५, पायरिडॉक्सिन बी ६, बायोटीन बी ७, फॉलिक अ‍ॅसिड बी ९, आणि कोबॅलॅमिन बी १२, यालाच बी कॉम्प्लेक्स म्हणतात.आपल्याकडे पूर्वी विरजण लावण्याची पद्धत होती. शेजारील काकू, मावशी, आजी अशी अनेक नाती या निमित्ताने निर्माण व्हायची. विरजण लावणे म्हणजे दही लावणे आणि अगदी नैसर्गिकरीतीने बर का ! या दह्यात ब १२ तयार होते! ताजे दही, ताक यापासून ब १२ मिळते.दही भात, दही पोहे, दही बुंदी, दही चकली, अहो दही आणि मस्त लसूणदाण्याची चटणी आणि कडक भाकरी! अहाहा!चला, मग मस्त दही लावायला आजपासूनच सुरुवात करुयात का! अहो सगळ्या जीवनसत्त्वांनी युक्त असा हा आपला पारंपरिक आहार आहे. आजपर्यंत आपण जीवनसत्त्व अ, ड, इ,के,सी आणि बी पाहिले आणि त्या सर्वांनी युक्त विविधरंगी पारंपरिक आहार पाहिला. चला, तर मग नवीन सुरुवात करूयात आणि आरोग्यासाठी पोषणयुक्त पारंपरिक आहाराचा स्वीकार करूयात !शरीरातील चयापचय क्रिया, अनेक पेशींची वाढ , ऊर्जा, पचनसंस्था, मेंदूचे कार्य, हॉर्मोन आणि त्यांचे सुरळीत कार्य, पेशीचे संघटन आणि कार्य (स्नायू पेशी), मज्जासंस्था कार्य यासाठी या जीवनसत्त्वाची मदत होते. नैराश्याला प्रतिबंध होतो.पूर्ण धान्य, बदाम, कारळे, शेंगदाणे, पालक, सर्व हिरव्या भाज्या, अंडी, मासे, ताजी फळे, दूध आणि दुग्धजन्य पदार्थ यामध्ये बी जीवनसत्त्व असते.लिंबू वर्ग, संत्रे, मोसंबी, लिंबू, द्राक्षे, कोबी, फ्लॉवर, पालक आणि सर्व फळे आणि भाज्या यात विटामीन सी असते .

(लेखिका आयुर्वेदतज्ज्ञ आहेत) 

टॅग्स :Healthआरोग्यHealth Tipsहेल्थ टिप्स