शहरं
Join us  
Trending Stories
1
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
2
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
3
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
4
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
5
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
6
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
7
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
8
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
9
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
10
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
11
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
12
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
13
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
14
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
15
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
16
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
17
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
18
Mumbai Fire: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
19
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
20
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'

'या' लोकांनी तुप खाल्ल्यास उद्भवु शकतात गंभीर धोके, समजल्यावर तुपाला शिवणारही नाहीत

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 24, 2022 17:00 IST

तुपाचे इतके फायदे असूनही काही जणांना तूप खाण्याचा त्रास होऊ शकतो.

भारतीय आहारपद्धतीत तुपाला (Ghee) विशेष महत्त्व आहे. आरोग्यासाठी उपयुक्त असणाऱ्या तुपात घालून आयुर्वेदातील अनेक औषधं घेतली जातात. शिरा, खिचडी, पुरणपोळी, वरण-भात, पराठे अशा अनेक पदार्थांबरोबर भरपूर तूप खायला आवडणारी अनेक मंडळी असतात. इतकंच काय आमरस बाधू नये म्हणून त्यातही तूप घालून खाण्याची पद्धत आहे. तुपाचे इतके फायदे असूनही काही जणांना तूप खाण्याचा त्रास होऊ शकतो. तूप खाणं कोणासाठी हितकारक असतं व कोणाला त्याचा त्रास (Side Effects Of Ghee) होऊ शकतो, याबाबत एनडीटीव्ही इंडियानं एक वृत्त दिलं आहे.

आयुर्वेदात तूप खाण्याबाबत काही नियम सांगितले आहेत. दररोज जेवणात योग्य प्रमाणात तूप खाणं गरजेचं असल्याचं यात म्हटलंय. तूप इतकं आरोग्यकारक असूनही सरसकट सर्वांसाठी तूप खाणं योग्य ठरत नाही. तूप पचनासाठी जड असतं. काही जणांना रेचक म्हणून तूप खायला सांगितलं जातं. मात्र ज्यांना अपचनाची (Digestion Problem) समस्या आहे, त्यांच्या शरीरावर तुपाचं सेवन विपरित परिणाम करतं. तुम्हाला अपचनाची आणि पोटाची जुनाट समस्या असेल, तर तुपाचं सेवन जास्त करू नका. गरोदरपणात पोट फुगणं, अपचन अशा समस्या महिलांना जाणवतात. त्या काळात सर्दी किंवा पोट खराब झालं, तर तूप खाण्यावर नियंत्रण ठेवण्याचा सल्ला दिला जातो.

आयुर्वेदानुसार तूप कफ वाढवणारा पदार्थ आहे. त्यामुळे सर्दी, खोकल्यामुळे ताप आला असेल, तर तूप खाणं योग्य ठरत नाही. पावसाळ्यात लगेच घसा धरतो व सर्दी होते. अशावेळी काही काळासाठी तुपाचं सेवन कमी करावं. तसंच यकृत आणि प्लिहासंबंधी (Liver And Spleen Diseases) काही आजार असतील, तर आहारातून तूप पूर्णपणे वर्ज्य करण्याचा सल्ला दिला जातो.

तुपामुळे चरबी वाढत नाही हे खरं असलं तरी तुपाचं अतिरेकी सेवन केल्यानं वजन वाढून लठ्ठपणाचा त्रास होऊ शकतो. ज्यांना हृदयाशी संबंधित आजार आहेत, त्यांनीही तूप खाण्यापूर्वी डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. जास्त तूप खाल्ल्यामुळे रक्तातील कोलेस्ट्रॉलची पातळी वाढू शकते. परिणामी, हृदयावर ताण येऊ शकतो. विकतच्या तुपापेक्षा घरगुती तूप अधिक चांगलं असतं. मात्र तूप खाताना ते प्रमाणातच खाणं गरजेचं असतं.

खरं तर तूप आहारात असावंच. त्यामुळे पचन नीट होतं. तूप त्वचेला उजाळा देण्यासाठी, मेंदूसाठी, स्मरणशक्तीसाठी, केसांच्या आरोग्यासाठी अगदी उत्तम असतं. तुपाला सुपरफूड म्हटलं गेलं आहे. कारण विविध पदार्थांसोबत याचं सेवन केलं असता, त्याचे चांगले परिणाम शरीरावर दिसले आहेत. मात्र काही अपवादात्मक परिस्थितीत तुपाचा शरीरावर वाईट परिणामही होऊ शकतो. अशा व्यक्तींनी आहारातील तुपाचा वापर कमी केल्यास ते आरोग्यदायी ठरेल.

टॅग्स :Healthआरोग्यHealth Tipsहेल्थ टिप्स