शहरं
Join us  
Trending Stories
1
Vaibhav Suryavanshi Fastest Fifty :..अन् वैभव सूर्यंवशीनं रचला नवा इतिहास
2
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
3
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
4
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
5
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
6
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
7
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
8
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय
9
मुलगी आयएएस अधिकारी झाली, आनंदोत्सवात वडिलांना ह्रदयविकाराचा झटका
10
युरोपात ब्लॅकआउट! फ्रान्स, स्पेनसह अनेक देशांमध्ये वीजपुरवठा खंडित; विमान, मेट्रोसेवा ठप्प
11
पहलगाम हल्यानंतर जम्मू-काश्मीरमध्ये ट्रेकिंगवर बंदी; पर्यटकांसाठी सूचना जारी...
12
मुंबईकरांचे जगणेच कठीण व्हावे, असाच सत्ताधाऱ्यांचा विचार; बेस्ट दरवाढीवरून आदित्य ठाकरे संतापले
13
आयपॅडमुळे विमानात उडाला गोंधळ, आणीबाणीची परिस्थिती, करावं लागलं एमर्जन्सी लँडिंग, कारण काय? 
14
कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धारामैय्या भर सभेत पोलीस अधिकाऱ्यावर भडकले, मारण्यासाठी उगारला हात, त्यानंतर...  
15
दिल्ली बिहारपासून लांब आहे का? सर्वपक्षीय बैठकीला उपस्थित न राहिल्याने खरगेंचा PM मोदींवर निशाणा
16
भाजपने अध्यक्षपदाची निवडणूक पुढे ढकलली; पहलगाम हल्ल्यामुळे घेतला निर्णय
17
ही खिंड आहे पाकिस्तानचं ‘चिकन नेक’, PoKमधील या एंट्री पॉईंटवर भारताने कब्जा केल्यास होईल जबर कोंडी, कारवायांना लागेल लगाम
18
स्टायलिश लूकसह रॉयल एनफील्ड हंटर ३५० बाजारात; बघताच प्रेमात पडाल!
19
'आता चर्चा नाही, पाकिस्तानशी अखेरची लढाई...', पहलगाम हल्ल्यावरुन फारुख अब्दुल्ला संतापले
20
पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेस नेत्यांच्या विधानांवर राहुल गांधी नाराज; मल्लिकार्जुन खरगे समज देणार

कोणत्या कारणांमुळे लग्नानंतर वाढतं महिलांचं वजन?

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 18, 2019 10:50 IST

सामान्यपणे असं पाहिलं जातं की, लग्नानंतर पुरूषांच्या तुलनेत महिलांमध्ये लठ्ठपणा अधिक वाढतो.

लठ्ठपणा हा सगळ्यांसाठीच एक मोठी समस्या ठरतो मग ते पुरूष असो वा महिला. सामान्यपणे असं पाहिलं जातं की, लग्नानंतर पुरूषांच्या तुलनेत महिलांमध्ये लठ्ठपणा अधिक वाढतो. हे सर्वांनाच माहीत आहे की, लग्नाआधी तरूणी स्वत:ला फिट आणि स्लिम ठेवण्याचा प्रयत्न करतात. पण लग्नानंतर त्यांचं वजन वाढू लागतं. हे वाढलेलं वजन त्यांच्यासाठी समस्या बनलेलं असतं. पण लग्नानंतर महिलांचं वजन वाढण्याची कारणे काय आहेत? चला जाणून घेऊ या प्रश्नाचं उत्तर...

हार्मोन्समध्ये बदल

लग्नानंतर अनेक गोष्टी बदलत असल्याने महिलांमध्ये हार्मोनल बदल होतात. त्यासोबतच महिला सेक्शुअल लाइफमध्येही अॅक्टिव्ह होतात. या कारणानेही वजन वाढू लागतं. तसेच गर्भनिरोधक गोळ्यांच्या सेवनामुळेही वजन वाढू लागतं. 

पुरेशी झोप न मिळणे

(Image Credit : Medical News Today)

लग्नानंतर जास्तीत जास्त महिलांच्या झोपण्याच्या वेळेत बदल होतात. वेगवेगळी कामे उरकून त्यांना झोप घ्यावी लागते. अशावेळी त्यांना पुरेशी झोप मिळत नाही. आणि पुरेशी झोप न मिळाल्यानेच त्यांचं वजन वाढू लागतं. 

बदलत्या प्राथमिकता

(Image Credit : Respect Women)

लग्नानंतर मुलींच्या प्राथमिकता बदलतात. त्यांना त्यांच्या पतीनुसार आणि घरातील सदस्यांनुसार दिनचर्या ठेवावी लागते. त्यामुळे त्या स्वत:ची काळजी घेण्यासाठी पुरेसा वेळ देऊ शकत नाहीत. त्यामुळेही त्यांचं वजन वाढतं. 

तणाव

(Image Credit : AskDrManny)

लग्नानंतर तरूणींना आपलं आई-वडिलांचं घर सोडून पतीच्या घरी जावं लागतं. दुसऱ्या लोकांसोबत आणि दुसऱ्या घरात अ‍ॅडजस्ट होणं हे सोपं नसतं. यासाठी बराच वेळ लागतो. दरम्यान तरूणींना तणावाचा सामना करावा लागतो आणि त्यामुळेही वजन वाढतं. 

सामाजिक दबाव

लग्नाआधी तरूणी बऱ्यापैकी मोकळ्या वातावरणात असतात. तेच लग्नानंतर सासुरवाडीत अनेकप्रकारच्या जबाबदाऱ्या आणि सामाजिक दबाव यामुळे त्यांचं त्यांच्या आरोग्याकडे दुर्लक्ष करतात. हेच दुर्लक्ष करणं त्यांचं वजन वाढण्याला कारण ठरतं. 

गर्भधारणा

(Image Credit : Live Science)

गर्भवती असल्यावर महिलांचं वजन वाढणं स्वाभाविक आहे. पण असं बघितलं जातं की, बाळाच्या जन्मानंतर महिला आपलं वजन कमी करण्यासाठी फारसे प्रयत्न करताना दिसत नाहीत. किंवा असे म्हणूया की, त्यांना तशी संधी मिळत नाही. तसेच शरीरात अनेक बदल होतात, यामुळे त्यांचं वजन वाढतं. 

फिटनेसबाबत निष्काळजीपणा

(Image Credit : Eat This, Not That!)

लग्नाआधी फिटनेसबाबत जागृत असणाऱ्या महिला लग्नानंतर मात्र फिटनेसकडे फार दुर्लक्ष करताना दिसतात. त्यांना यासाठी पुरेसा वेळ न मिळणे हेही कारण असतं. तसेच त्या घर परिवारात अधिक बिझी होतात.  

खाण्या-पिण्यात बदल

(Image Credit : Healthline)

घरातील कामामुळे खाण्या-पिण्यावर व्यवस्थित लक्ष न देणं आणि शिळं अन्न खाणं यामुळेही महिलांमध्ये लग्नानंतर जाडेपणा वाढतो. तसेच बाहेरूनही अधिक मागवून खाल्लं जातं. त्यामुळे शरीरात कॅल्शिअम आणि व्हिटॅमिन्सची कमतरता होऊ लागते. 

टॅग्स :Health Tipsहेल्थ टिप्सHealthआरोग्यFitness Tipsफिटनेस टिप्स