शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्ताननं अखेर मानली हार; ऑपरेशन सिंदूरमध्ये लष्करी तळ उद्ध्वस्त झाल्याची दिली कबुली!
2
VIDEO: बांगलादेशात आणखी एका हिंदूची हत्या; घरात कोंडून जाळले, अमित मालवीयंचा दावा...
3
BMC Elections: 'आप'ची १५ उमेदवारांची तिसरी यादी जाहीर; आतापर्यंत ५१ शिलेदार मैदानात!
4
Amit Shah: "राहुल बाबा, इतक्यात थकू नका! अजून बंगाल- तामिळनाडूतही पराभव बघायचा आहे" अमित शहांचा टोला
5
Mumbai: मुंबईत अजित पवारांच्या राष्ट्रवादीची पहिली डरकाळी; ३७ उमेदवारांची यादी जाहीर!
6
INDW vs SLW: Smriti Mandhana चा ऐतिहासिक पराक्रम! Team India ची लेक बनली '१० हजारी' मनसबदार
7
Chhatrapati Sambhajinagar: छ. संभाजीनगरमध्ये अजित पवारांची राष्ट्रवादी स्वबळावर; १८ उमेदवारांची पहिली यादी जाहीर!
8
मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीसाठी महायुतीबाबत मुख्यमंत्र्यांशी चर्चा- प्रताप सरनाईक
9
Video: पाकिस्तानच्या हॅरिस रौफने कॅच पकडण्यासाठी उडी घेतली, समोरून कार्टराईटही आला अन् मग...
10
रीलची हौस महागात! Video बनवण्याच्या नादात सत्यानाश; गॅस सुरू, किचनच्या ओट्यावर चढली अन्...
11
दिग्विजय सिंह यांच्या 'त्या' पोस्टमुळे काँग्रेस खासदार संतापले; RSS ची थेट अल-कायदाशी केली तुलना
12
'शरद पवार माझे मार्गदर्शक..' गौतम अदानींकडून बारामतीत पवारांच्या कार्याचे भरभरून कौतुक
13
PMC Elections : अदानी बारामतीत, मंचावर बसलेल्या साहेब अन् दादांची चर्चा..! एकत्र येण्याच्या चर्चांना पुन्हा बळ
14
Mumbai: तरुणींना अर्ध्या रस्त्यातच उतरवलं आणि...; वाद्र्यांत रिक्षाचालकाचं लज्जास्पद कृत्य!
15
भारतीय आजारी असण्याला आई-वडील जबाबदार, डॉक्टरांचं विधान; तुम्हीच ठरवा कोण बरोबर?
16
गौतम गंभीरमुळे टीम इंडियाच्या ड्रेसिंग रूममध्ये भीतीचे वातावरण? खेळाडू तणावात असल्याची चर्चा
17
भयानक! गहू साफ करायला सांगताच सून भडकली, सासूवर वीट फेकली; पतीवरही जीवघेणा हल्ला
18
IAS प्रेमकथा: IIT मधून शिकलेला IAS नवरदेव अन् IRS अधिकारी वधू; कोण आहेत विकास आणि प्रिया?
19
संरक्षण क्षेत्रात अदानी समूहाचा मोठा डाव! १.८ लाख कोटींची गुंतवणूक करणार; काय आहे मेगा प्लॅन?
20
"काँग्रेसकडे सत्ता नसली, तरीही आमचा पाठीचा कणा अजून ताठ आहे," मल्लिकार्जुन खरगेंची टीका
Daily Top 2Weekly Top 5

कोणत्या कारणांमुळे लग्नानंतर वाढतं महिलांचं वजन?

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 18, 2019 10:50 IST

सामान्यपणे असं पाहिलं जातं की, लग्नानंतर पुरूषांच्या तुलनेत महिलांमध्ये लठ्ठपणा अधिक वाढतो.

लठ्ठपणा हा सगळ्यांसाठीच एक मोठी समस्या ठरतो मग ते पुरूष असो वा महिला. सामान्यपणे असं पाहिलं जातं की, लग्नानंतर पुरूषांच्या तुलनेत महिलांमध्ये लठ्ठपणा अधिक वाढतो. हे सर्वांनाच माहीत आहे की, लग्नाआधी तरूणी स्वत:ला फिट आणि स्लिम ठेवण्याचा प्रयत्न करतात. पण लग्नानंतर त्यांचं वजन वाढू लागतं. हे वाढलेलं वजन त्यांच्यासाठी समस्या बनलेलं असतं. पण लग्नानंतर महिलांचं वजन वाढण्याची कारणे काय आहेत? चला जाणून घेऊ या प्रश्नाचं उत्तर...

हार्मोन्समध्ये बदल

लग्नानंतर अनेक गोष्टी बदलत असल्याने महिलांमध्ये हार्मोनल बदल होतात. त्यासोबतच महिला सेक्शुअल लाइफमध्येही अॅक्टिव्ह होतात. या कारणानेही वजन वाढू लागतं. तसेच गर्भनिरोधक गोळ्यांच्या सेवनामुळेही वजन वाढू लागतं. 

पुरेशी झोप न मिळणे

(Image Credit : Medical News Today)

लग्नानंतर जास्तीत जास्त महिलांच्या झोपण्याच्या वेळेत बदल होतात. वेगवेगळी कामे उरकून त्यांना झोप घ्यावी लागते. अशावेळी त्यांना पुरेशी झोप मिळत नाही. आणि पुरेशी झोप न मिळाल्यानेच त्यांचं वजन वाढू लागतं. 

बदलत्या प्राथमिकता

(Image Credit : Respect Women)

लग्नानंतर मुलींच्या प्राथमिकता बदलतात. त्यांना त्यांच्या पतीनुसार आणि घरातील सदस्यांनुसार दिनचर्या ठेवावी लागते. त्यामुळे त्या स्वत:ची काळजी घेण्यासाठी पुरेसा वेळ देऊ शकत नाहीत. त्यामुळेही त्यांचं वजन वाढतं. 

तणाव

(Image Credit : AskDrManny)

लग्नानंतर तरूणींना आपलं आई-वडिलांचं घर सोडून पतीच्या घरी जावं लागतं. दुसऱ्या लोकांसोबत आणि दुसऱ्या घरात अ‍ॅडजस्ट होणं हे सोपं नसतं. यासाठी बराच वेळ लागतो. दरम्यान तरूणींना तणावाचा सामना करावा लागतो आणि त्यामुळेही वजन वाढतं. 

सामाजिक दबाव

लग्नाआधी तरूणी बऱ्यापैकी मोकळ्या वातावरणात असतात. तेच लग्नानंतर सासुरवाडीत अनेकप्रकारच्या जबाबदाऱ्या आणि सामाजिक दबाव यामुळे त्यांचं त्यांच्या आरोग्याकडे दुर्लक्ष करतात. हेच दुर्लक्ष करणं त्यांचं वजन वाढण्याला कारण ठरतं. 

गर्भधारणा

(Image Credit : Live Science)

गर्भवती असल्यावर महिलांचं वजन वाढणं स्वाभाविक आहे. पण असं बघितलं जातं की, बाळाच्या जन्मानंतर महिला आपलं वजन कमी करण्यासाठी फारसे प्रयत्न करताना दिसत नाहीत. किंवा असे म्हणूया की, त्यांना तशी संधी मिळत नाही. तसेच शरीरात अनेक बदल होतात, यामुळे त्यांचं वजन वाढतं. 

फिटनेसबाबत निष्काळजीपणा

(Image Credit : Eat This, Not That!)

लग्नाआधी फिटनेसबाबत जागृत असणाऱ्या महिला लग्नानंतर मात्र फिटनेसकडे फार दुर्लक्ष करताना दिसतात. त्यांना यासाठी पुरेसा वेळ न मिळणे हेही कारण असतं. तसेच त्या घर परिवारात अधिक बिझी होतात.  

खाण्या-पिण्यात बदल

(Image Credit : Healthline)

घरातील कामामुळे खाण्या-पिण्यावर व्यवस्थित लक्ष न देणं आणि शिळं अन्न खाणं यामुळेही महिलांमध्ये लग्नानंतर जाडेपणा वाढतो. तसेच बाहेरूनही अधिक मागवून खाल्लं जातं. त्यामुळे शरीरात कॅल्शिअम आणि व्हिटॅमिन्सची कमतरता होऊ लागते. 

टॅग्स :Health Tipsहेल्थ टिप्सHealthआरोग्यFitness Tipsफिटनेस टिप्स