शहरं
Join us  
Trending Stories
1
‘दोन शून्यां’ची बेरीज केली, त्यावर कितीही शून्य जोडले तरी…; भाजपाचा ठाकरे बंधूंना खोचक टोला
2
CM रेखा गुप्तांवर हल्ला करणाऱ्या व्यक्तीचा फोटो आला समोर, आरोपी गुजरातचा रहिवासी
3
India China Talks: व्यापारापासून ते थेट उड्डाणांपर्यंत; भारत-चीन यांच्यातील चर्चेत अनेक समस्यांवर निघाला तोडगा
4
BMC: पावसाळ्यात कुठे अडकलात तर काय कराल? मुंबई महानगरपालिकेची महत्त्वाची पोस्ट!
5
'हिला भुतांनी पछाडलेले आहे'; तांत्रिक गरम सळीने चटके देत राहिला, वेदनेने मुलीचा मृत्यू झाला
6
खळबळजनक! बीडमधील कोर्टात सरकारी वकिलाने स्वतःला संपवलं; कारण काय?
7
"चहलने तो टीशर्ट स्टंट खरंच केला? माझा विश्वासच बसत नव्हता..", धनश्री वर्माने व्यक्त केल्या भावना
8
पंतप्रधान अन् मुख्यमंत्र्यांनाही पदावरुन हटवण्याची तरतूद; केंद्र सरकारच्या नवीन विधेयकात नेमकं काय?
9
BEST Election Results: ना ठाकरे बंधू, ना भाजपा; शशांक राव यांच्या पॅनलला १४ जागा, आकडेवारी पाहाच
10
आधी बोलत होता, अचानक हात खेचला, धक्का दिला; रेखा गुप्ता यांच्यावर कसा हल्ला झाला? प्रत्यक्षदर्शी म्हणाले...
11
Toll: खराब रस्त्यांवर टोल नाही; सर्वोच्च न्यायालयाचा ऐतिहासिक निर्णय!
12
दिल्लीच्या मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांच्यावर हल्ला; जनसुनावणीदरम्यान कागद हातात दिला, केस ओढले अन्....
13
रात्रीच्या वेळी शेतामध्ये प्रियकरासोबत आक्षेपार्ह अवस्थेत होती मुलगी; मागून गेलेल्या वडिलांनी बघितलं, उचललं टोकाचं पाऊल अन्...
14
फक्त ३ वर्षात पैसे दुप्पट! FD पेक्षाही जास्त परतावा देणारे टॉप ५ म्युच्युअल फंड, १० वर्षांत कोट्यधीश
15
व्हाट्सॲप युजर्ससाठी महत्त्वाची बातमी: 'Meta AI' मुळे ग्रुप चॅट्सची प्रायव्हसी धोक्यात? पेटीएम संस्थापकांचा दावा
16
बेस्ट निवडणूक २०२५: शशांक राव-महायुती पॅनलची बाजी, ठाकरे बंधू चितपट; विजयी उमेदवारांची यादी
17
HDFC बँकेच्या ग्राहकांसाठी महत्त्वाची बातमी! २२-२३ ऑगस्टला 'या' ऑनलाईन सेवा राहणार बंद
18
BEST Election Results: 'ब्रँडचे बॉस एकही जागा जिंकले नाहीत'; बेस्ट निवडणुकीतील पराभवावरुन ठाकरे बंधूंना भाजपचा टोला
19
India-China Trade: भारत की चीन.. या मैत्रीचा सर्वाधिक फायदा कोणाला होणार? काय सांगते आकडेवारी
20
महाराष्ट्र जलमय... पिके खरडली, घरे बुडाली; मराठवाड्यात ११ जीव गेले, ४९८ जनावरे दगावली

उन्हाळ्यात द्राक्षे खाण्याचे खूप होतात फायदे; वाचून विश्वास बसणार नाही

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 24, 2021 20:44 IST

उन्हाळ्यात सर्वात जास्त मिळणाऱ्या फळांपैकी एक म्हणजे द्राक्ष. द्राक्ष खाण्याचे अगणित फायदे आहेत.  द्राक्षात देखील पुष्कळ पोषक घटक असतात.

प्रत्येक ऋतूत फळे खाणे फायदेशीर असते. बदलत्या  ऋतुंप्रमाणे अनेक फळे बाजारात उपलब्ध असतात. ही फळे खाणे आपल्या आरोग्यासाठी उत्तम असते. विशेषत: उन्हाळ्यात फळे आपल्याला हायड्रेटेड तसेच ताजेतवाने ठेवतात. या काळामध्ये सर्वात जास्त मिळणाऱ्या फळांपैकी एक म्हणजे द्राक्ष. द्राक्ष खाण्याचे अगणित फायदे आहेत.  द्राक्षात देखील पुष्कळ पोषक घटक असतात. द्राक्षात फायबर, प्रथिने, लोह, तांबे, फोलेट, व्हिटॅमिन सी, ए, के आणि बी इत्यादी घटक असतात. 

रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठीकोरोनाकाळात रोगप्रतिकारक शक्ती वाढवणे किती गरजेचे आहे हे आपल्या सर्वांना माहितच असेल. द्राक्षांमध्ये व्हिटॅमिन सी, व्हिटॅमिन बी ६ आणि लोह असते. ही पोषकतत्वे रोगप्रतिकारक शक्ती वाढविण्याचे काम करतात. त्यामुळे द्राक्षाचा समावेश आपल्या आहारात केला पाहिजे.

रक्तदाब नियंत्रणात राहतो द्राक्ष खाल्यामुळे रक्तदाब नियंत्रणात राहण्यास मदत होते. ज्यांना उच्च रक्तदाबाचा त्रास आहे, त्यांनी आठवड्यातून तीन ते चारवेळा द्राक्ष खाणे फायद्याचे आहे.

अनेक रोगांवर उपाय प्रामुख्याने टीबी, कर्करोग आणि रक्त संसर्ग यासारख्या आजारांमध्ये द्राक्ष खाणे फायद्याचे आहे. द्राक्षात ग्लूकोज, मॅग्नेशियम सारखी पोषकतत्वे असतात. द्राक्षे अनेक रोगांवर उपयुक्त आहेत. त्यामुळे त्यांचे सेवन करणे खूप फायदेशीर आहे. 

थकवा दूर होतोद्राक्षामध्ये व्हिटॅमिन, मॅग्नेशियम, फॉस्फरस, लोह आणि तांबे असतात. हे आपल्या शरीराला ऊर्जा देण्याचे कार्य करते. यामुळे थकवा दूर होतो.

हृदयरोगाशी संबधित समस्या दूर ठेवतेहृदयाशी संबंधित रोगांवर उपचार म्हणून द्राक्षे खाल्ली पाहिजेत. काही संशोधनातून असेही समोर आले आहे की, स्तनाच्या कर्करोगाच्या प्रतिबंधासाठी द्राक्षे खाणे खूप फायदेशीर आहे.

रक्ताची कमतरता दूर करतेद्राक्षात भरपूर प्रमाणात लोह असते. त्यामुळे शरीरातील रक्ताची कमतरता भरून निघते. शरीरात रक्ताची कमतरता असल्यास एक ग्लास द्राक्षांच्या रसात २ चमचे मध घालून प्यावे.

माइग्रेनच्या समस्या कमी होतात सद्य काळात आपल्या जीवनशैलीत खूप मोठ्या प्रमाणात बदल झाले आहेत. त्यामुळे माइग्रेनच्या समस्येत वाढ झालेली आहे. आपल्यालाही मायग्रेनची समस्या असल्यास, आपण त्वरित द्राक्षे खाण्यास सुरवात केली पाहिजे. द्राक्षाचा रस पिणे आपल्यासाठी खूप फायदेशीर ठरेल. काही दिवस तुम्ही द्राक्षाचा रस घेतल्यास तुम्हाला मायग्रेनच्या समस्येपासून मोठा दिलासा मिळू शकेल.

डोळ्यांसाठी फायदेशीरद्राक्षातील पॉलीफेनोल्स आणि रेझेवॅटरॉल डोळ्यांच्या समस्या दूर करते. यात मॅक्युलर डीजनरेसन, ऑक्सिडेटिव्ह ताण, जळजळ आणि मोतीबिंदू इत्यादी डोळ्यांच्या समस्या दूर राहतात. 

टॅग्स :Healthआरोग्यHealth Tipsहेल्थ टिप्सfoodअन्नfruitsफळे