शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs SA 5th T20I : तिलक वर्मा- हार्दिक पांड्यानं धु धु धुतलं! भारतीय संघानं उभारला धावांचा डोंगर
2
रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
3
सायबर फ्रॉड करणाऱ्यांना आता चक्क मारले जाणार चाबकाचे फटके; कुठल्या देशात झाला निर्णय?
4
"She was Lo, plain Lo"; अल्पवयीन मुलींच्या शरीरावर एपस्टीनने लिहिलेल्या ओळींमागे भयानक अर्थ, अमेरिकेचे डार्क सिक्रेट उघड
5
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
6
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
7
IND vs SA 5th T20I : वर्ल्ड कप संघ निवडीआधी गिल 'आउट'; संजूला पुन्हा मिळाली ओपनिंगची संधी अन्...
8
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
9
नालासोपारा: जमिनीवर पाडलं, लाथाबुक्क्यांनी मारलं... सख्ख्या भावाचा खून करणाऱ्या आरोपीला अटक
10
२०२५ मधील शेवटची अंगारकी चतुर्थी: वर्षभर कृपा-लाभाची सुवर्ण संधी; ‘अशी’ करा गणेश उपासना
11
सावधान! तुम्हीही घाईघाईत जेवताय? आताच बदला सवय; स्वत:च देताय अनेक आजारांना आमंत्रण
12
लाडात वाढवलं, खूप शिकवलं, पण मुलीनं पळून जाऊन लग्न केलं, संतप्त कुटुंबानं जिवंतपणी काढली अंत्ययात्रा 
13
अंगठी घातल्याने अथवा नाव बदलल्याने नशीब बदलतं का? प्रेमानंद महाराजांनी दिलं असं उत्तर
14
NCP नेत्यांची अजितदादांसोबत बैठक, CM फडणवीसांशीही चर्चा अपेक्षित; २९ मनपात महायुती म्हणून…
15
U19 Asia Cup 2025 : ठरलं! आशिया कप स्पर्धेत पुन्हा भारत-पाक यांच्यात रंगणार फायनल!
16
“भगवान ऋषभदेवांचे विचार भारताच्या प्राचीन व महान संस्कृतीचे प्रतीक”: CM देवेंद्र फडणवीस
17
IPL 2026: प्रिती झिंटाचा मास्टरस्ट्रोक! लिलावात बोली लावली, तिकडे पठ्ठ्याने केली तुफानी खेळी
18
"मी हरियाणामध्ये हिंदू महिलेचे 'घूंघट' खेचले असते तर...", नीतीश कुमारांच्या हिजाब वादावर काय म्हणाले उमर अब्दुल्ला?
19
७१ व्या वर्षी रेखा यांनी केलं लग्न? भर कार्यक्रमात स्वतःच केला मोठा खुलासा; म्हणाल्या, "प्रेम आहे तर..."
20
प्यारवाली लव्हस्टोरी! ब्रेकअपनंतर शोधला डिजिटल पार्टनर; चक्क AI बॉयफ्रेंडसोबत बांधली लग्नगाठ
Daily Top 2Weekly Top 5

उन्हाळ्यात द्राक्षे खाण्याचे खूप होतात फायदे; वाचून विश्वास बसणार नाही

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 24, 2021 20:44 IST

उन्हाळ्यात सर्वात जास्त मिळणाऱ्या फळांपैकी एक म्हणजे द्राक्ष. द्राक्ष खाण्याचे अगणित फायदे आहेत.  द्राक्षात देखील पुष्कळ पोषक घटक असतात.

प्रत्येक ऋतूत फळे खाणे फायदेशीर असते. बदलत्या  ऋतुंप्रमाणे अनेक फळे बाजारात उपलब्ध असतात. ही फळे खाणे आपल्या आरोग्यासाठी उत्तम असते. विशेषत: उन्हाळ्यात फळे आपल्याला हायड्रेटेड तसेच ताजेतवाने ठेवतात. या काळामध्ये सर्वात जास्त मिळणाऱ्या फळांपैकी एक म्हणजे द्राक्ष. द्राक्ष खाण्याचे अगणित फायदे आहेत.  द्राक्षात देखील पुष्कळ पोषक घटक असतात. द्राक्षात फायबर, प्रथिने, लोह, तांबे, फोलेट, व्हिटॅमिन सी, ए, के आणि बी इत्यादी घटक असतात. 

रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठीकोरोनाकाळात रोगप्रतिकारक शक्ती वाढवणे किती गरजेचे आहे हे आपल्या सर्वांना माहितच असेल. द्राक्षांमध्ये व्हिटॅमिन सी, व्हिटॅमिन बी ६ आणि लोह असते. ही पोषकतत्वे रोगप्रतिकारक शक्ती वाढविण्याचे काम करतात. त्यामुळे द्राक्षाचा समावेश आपल्या आहारात केला पाहिजे.

रक्तदाब नियंत्रणात राहतो द्राक्ष खाल्यामुळे रक्तदाब नियंत्रणात राहण्यास मदत होते. ज्यांना उच्च रक्तदाबाचा त्रास आहे, त्यांनी आठवड्यातून तीन ते चारवेळा द्राक्ष खाणे फायद्याचे आहे.

अनेक रोगांवर उपाय प्रामुख्याने टीबी, कर्करोग आणि रक्त संसर्ग यासारख्या आजारांमध्ये द्राक्ष खाणे फायद्याचे आहे. द्राक्षात ग्लूकोज, मॅग्नेशियम सारखी पोषकतत्वे असतात. द्राक्षे अनेक रोगांवर उपयुक्त आहेत. त्यामुळे त्यांचे सेवन करणे खूप फायदेशीर आहे. 

थकवा दूर होतोद्राक्षामध्ये व्हिटॅमिन, मॅग्नेशियम, फॉस्फरस, लोह आणि तांबे असतात. हे आपल्या शरीराला ऊर्जा देण्याचे कार्य करते. यामुळे थकवा दूर होतो.

हृदयरोगाशी संबधित समस्या दूर ठेवतेहृदयाशी संबंधित रोगांवर उपचार म्हणून द्राक्षे खाल्ली पाहिजेत. काही संशोधनातून असेही समोर आले आहे की, स्तनाच्या कर्करोगाच्या प्रतिबंधासाठी द्राक्षे खाणे खूप फायदेशीर आहे.

रक्ताची कमतरता दूर करतेद्राक्षात भरपूर प्रमाणात लोह असते. त्यामुळे शरीरातील रक्ताची कमतरता भरून निघते. शरीरात रक्ताची कमतरता असल्यास एक ग्लास द्राक्षांच्या रसात २ चमचे मध घालून प्यावे.

माइग्रेनच्या समस्या कमी होतात सद्य काळात आपल्या जीवनशैलीत खूप मोठ्या प्रमाणात बदल झाले आहेत. त्यामुळे माइग्रेनच्या समस्येत वाढ झालेली आहे. आपल्यालाही मायग्रेनची समस्या असल्यास, आपण त्वरित द्राक्षे खाण्यास सुरवात केली पाहिजे. द्राक्षाचा रस पिणे आपल्यासाठी खूप फायदेशीर ठरेल. काही दिवस तुम्ही द्राक्षाचा रस घेतल्यास तुम्हाला मायग्रेनच्या समस्येपासून मोठा दिलासा मिळू शकेल.

डोळ्यांसाठी फायदेशीरद्राक्षातील पॉलीफेनोल्स आणि रेझेवॅटरॉल डोळ्यांच्या समस्या दूर करते. यात मॅक्युलर डीजनरेसन, ऑक्सिडेटिव्ह ताण, जळजळ आणि मोतीबिंदू इत्यादी डोळ्यांच्या समस्या दूर राहतात. 

टॅग्स :Healthआरोग्यHealth Tipsहेल्थ टिप्सfoodअन्नfruitsफळे