शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
2
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
3
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
4
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
5
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
6
इराणसोबत युद्धविराम करून ट्रम्प यांनी युद्धातून अंग काढले; आता इस्रायलला चुकवावी लागणार किंमत
7
Health Tips: लघवीची दुर्गंधी म्हणजे केवळ उष्णता नव्हे, तुमच्या शरीराने दिलेला 'हा' गंभीर इशारा असू शकतो!
8
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
9
'स्ट्रेट ऑफ होर्मुझ'मध्ये ट्रॅफिकजाम; युद्धविरामानंतरही १०००+ जहाजे अडकून पडली...
10
इराण-अमेरिका युद्धबंदीने जग सुखावलं, पण 'हा' देश भडकला! पाकिस्तानच्या 'त्या' खेळीमुळे मित्रराष्ट्र नाराज
11
Summer Special: भेळ तर नेहमीच खाता, पण 'हा' सिक्रेट' मसाला वाढवेल सुकी भेळेची लज्जत
12
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
13
‘तुमच्या बापात दम असेल तर आमच्याकडून वंदे मातरम् वदवून दाखवा’, काँग्रेस नगरसेविकेचं भाजपाला अव्हान, इंदूर महानगरपालिकेत गदारोळ
14
अवघ्या १५ वर्षांचा मुलगा जगाला नडतोय; मुंबई-राजस्थान सामन्यात भज्जीचा वैभव सूर्यवंशीला सॅल्यूट
15
सीजफायर लागू होताच पहिल्या देशाने आपली एअरस्पेस खुली केली, विमानतळही सुरु झाले...
16
Latest Marathi News Live: डहाणूला जाणाऱ्या लोकलची म्हशीला धडक; उपनगरीय रेल्वे सेवा विस्कळीत, गाड्या १५ मिनिटे उशिराने
17
IndiGo, Air India ला संजीवनी; 'या' शुल्कात मोठी कपात, तिकिटांचे दर कमी होणार?
18
'धुरंधर'साठी गौरव गेराचं असं झालं ऑडिशन, 'त्या' सीननंतर मिळाली आलम भाईची भूमिका
19
Akshaya Tritiya 2026 Date: यंदा अक्षय तृतीया कधी आहे? १९ की २० एप्रिल? 'या' शुभ मुहूर्तावर करा सोने खरेदी; वाचा सविस्तर
20
Car Gift: बक्षीस असावं तर असं...! चेन्नईतील कंपनीने १२ मेहनती कर्मचाऱ्यांना दिली लग्झरी AUDI भेट
Daily Top 2Weekly Top 5

लस घेतल्यानंतरही कोरोना संसर्गाचा धोका उद्भवणार? जाणून घ्या लसीबाबत महत्वाच्या गोष्टी

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 8, 2021 11:58 IST

CoronaVaccine News & latest Updates : या संपूर्ण प्रक्रियेत विषाणू कमकुवत होईल आणि तो शरीरातील रोग प्रतिकारक यंत्रणेला कोणताही धोका पोहोचवू शकणार नाही. यामुळं पुन्हा संसर्ग होण्याची शक्यता नाही.

कोरोना लसीची संपूर्ण जगभरातील लोक प्रतिक्षा  करत आहेत. कोरोनाची लस तयार  झाल्यानंतर सगळ्यात आधी कोणाला मिळणार किंवा आपल्यापर्यंत लस कधी पोहोचणार असे अनेक प्रश्न लोकांना पडले आहेत. एकदा लस घेतल्यानंतर पुन्हा कोरोना संसर्गाची भीती असणार का? असा प्रश्न सगळ्यानाच पडत आहे.  लस टोचल्यानंतर शरीरात काय काय होतं, त्याचे कसे परिणाम होतात याबाबत न्यूयॉर्क टाईम्समध्ये वैज्ञानिकांनी अधिक माहिती दिली आहे.

लस घेतल्यानंतर नक्की काय होतं?

इंजेक्शनद्वारे ही लस शरीरात टोचली जाते. शरीरात गेल्यावर ही लस शरीरातील बी पेशींना सक्रीय करते आणि शरीरातील रोग प्रतिकारक पेशी अधिक चांगल्या पद्धतीनं आपलं काम करू लागतात.  रोग प्रतिकारक यंत्रणा मजबूत केल्यानंतर ही लस स्पाईक प्रोटीन ओळखून त्याविरुद्ध वेगानं काम सुरू करते आणि या व्हायरसला पेशींमध्ये पोहोचण्यापासून रोखते. त्याचवेळी पेशी अँटीबॉडीज बनवून पॅथोजनला रोखण्याचं काम करतील. या संपूर्ण प्रक्रियेत विषाणू कमकुवत होईल आणि तो शरीरातील रोग प्रतिकारक यंत्रणेला कोणताही धोका पोहोचवू शकणार नाही. यामुळं पुन्हा संसर्ग होण्याची शक्यता नाही. 

एंटीबॉडीज कशा तयार होतात

लस शरीरात गेल्यावर ही लस शरीरातील बी पेशींना सक्रीय करते आणि त्या पेशी व्हायरसविरुद्ध लढा देतात. विषाणूच्या स्पाईक प्रोटीनवर हल्ला करतात. त्याचवेळी बी पेशी अँटीबॉडीज तयार करू लागतात. त्यामुळे शरीरात असलेला विषाणू काही करू शकत नाही, कारण आता शरीर त्याचा सामना करण्यास सज्ज झालेलं आहे.

लसी सुरक्षित आहे का?

लस शरीरातील रोगप्रतिकारक पेशींना सक्रीय करते आणि त्या पेशी व्हायरसविरुद्ध लढण्यास तयार होतात. व्हायरसच्या स्पाईक प्रोटीनवर हल्ला करतात. त्याचवेळी बी पेशी अँटीबॉडीज तयार करू लागतात. त्यामुळे शरीरात असलेला विषाणू आक्रमण करू शकत नाही, कारण आता शरीर त्याचा सामना करण्यास तयार झालेलं आहे. 

४ राज्यात बर्ड फ्लूचा कहर; चिकन आणि अंडी खाणं कितपत सुरक्षित? जाणून घ्या फॅक्ट्स

लसीचे दोन डोस घेणं गरजेचं 

कोरोना लशीचे दोन डोस घेणं आवश्यक आहेत. २८  दिवस म्हणजे साधारण महिन्याभराच्या अंतरानं दिले जातात. पहिला डोस शरीराला विषाणू विरुद्ध लढण्यासाठी तयार करतो, तर दुसरा डोस त्याला आणखी मजबूत करतो. त्यामुळे पहिला डोस दिल्यानंतरही मास्क लावणं आणि सुरक्षित शारीरिक अंतर राखणं महत्त्वाचं आहे. दोन डोस घेतल्यानंतर याचा अधिक प्रभाव पडतो. 'या' लोकांना इतक्यात मिळणार नाही कोरोनाची लस; एम्सच्या तज्ज्ञांची महत्वाची माहिती

टॅग्स :Corona vaccineकोरोनाची लसHealth Tipsहेल्थ टिप्सHealthआरोग्यExpert Opinionतज्ज्ञांचा सल्लाCoronaVirus Positive Newsकोरोना सकारात्मक बातम्या