शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्धविराम म्हणजे सुटका नाही! पाकवर दबाव कायम; भारताचे ‘ते’ ६ मोठे निर्णय अद्यापही लागू
2
“आमचे काम लक्ष्य साधणे, किती जण मारले गेले याची मोजदाद ठेवणे नाही”; एके भारतींचा थेट प्रहार
3
Operation Sindoor : "ऑपरेशन सिंदूरमध्ये IC-814 प्लेन हायजॅक आणि पुलवामा हल्ल्यातील मास्टरमाइंडचा खात्मा"
4
एनआयएची मोठी कारवाई, खलिस्तानी दहशतवादी बलबीर सिंगच्या मुसक्या आवळल्या
5
छत्रपती शिवरायांच्या कर्तृत्वाला साजेसा पुतळा; राजकोट किल्ल्यावर मुख्यमंत्री फडणवीस यांनी केलं पूजन
6
Vikram Misri: भारत- पाकिस्तान युद्धविरामानंतर परराष्ट्र सचिव मिस्री ट्रोल, मुलीबद्दल आक्षेपार्ह कमेंट
7
'भारतीय सैन्याने 35-40 पाकिस्तानी सैनिक मारले', ऑपरेशन सिंदूरबाबत DGMO यांची मोठी माहिती
8
India Pakistan Latest Update: भारत पाकिस्तानातील दहशतवादी अड्डे उडवणार, अमेरिकेला आठ दिवस आधीच होती माहिती
9
Eknath Shinde: ...तर जगाच्या नकाशातून पाकिस्तानचं नाव कायमचं गायब केलं जाईल, एकनाथ शिंदे पेटले
10
Operation Sindoor : "दहशतवाद्यांचा खात्मा करणं हे 'ऑपरेशन सिंदूर'चं उद्दिष्ट, १०० हून अधिक दहशतवाद्यांना केलं ठार"
11
...तर पाकिस्तानची खैर नाही, आणखी टेन्शन वाढणार; आता दरवर्षी 100 ब्रह्मोस तयार होणार! 
12
पन्हाळगडावर पावसाची जोरदार हजेरी, पहिल्याच पावसात मुख्य रस्त्यावर २ मोठ्या शिळा कोसळल्या
13
"वहां से गोली चलेगी, यहां से गोला चलेगा"; PM मोदींचा उच्चस्तरीय बैठकीत लष्कराला स्पष्ट मेसेज
14
"२६ जणांच्या मृत्यूचा बदला घेतला, आम्हाला मोदींचा अभिमान..."; आदिल हुसेनच्या भावाचं विधान
15
Operation Sindoor Live Updates: दहशतवाद्यांचा खात्मा करण्यासाठी भारत कोणत्याही थराला जाऊ शकतो
16
कर्जावर जगणारा पाकिस्तान लढाऊ विमानं, ड्रोन अन् बॉम्ब खरेदीसाठी एवढा पैसा आणतो कुठूण? सैन्याचे उद्योगधंदे जाणून थक्क व्हाल!
17
"गर्व वाटतो... जे मी करू शकलो नाही, ते मुलानं करून दाखवलं...!"; हुतात्मा मेजर पवन यांच्या वडिलांचे शब्द वाचून तुमचेही डोळे पाणावतील
18
'...तर पाकिस्तानला विनाशकारी उत्तर दिलं जाईल', अमेरिकेच्या उपराष्ट्राध्यक्षांसोबत PM मोदींची चर्चा
19
लोणावळ्यात गुलाबी सुटकेसमध्ये आढळलेल्या मृतदेहाचे गूढ उकलले, दोघांना अटक, हत्येचे कारण...
20
दहशतवाद्यांना स्थानिकांची मदत; काश्मीरमध्ये 20 ठिकाणी छापे, स्लीपर सेल मॉड्यूलचा पर्दाफाश

वजन कमी करण्यासाठी अत्यंत फायदेशीर ठरतं नारळ पाणी; जाणून घ्या नेमकं कधी प्यावं?

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 3, 2024 11:59 IST

नारळ पाणी हे आपल्या शरीरासाठी खूप फायदेशीर मानलं जातं.

वाढत्या वजनामुळे आपल्यापैकी अनेकांना त्रास होतो आणि ते आरोग्यासाठीही चांगलं नाही, कारण त्यामुळे हाय कोलेस्टेरॉल, मधुमेह, हाय ब्लड प्रेशर आणि हार्ट अटॅक येण्याचा धोका निर्माण होऊ शकतो. जेव्हा पोट आणि कंबरेभोवती चरबी जमा होऊ लागते, तेव्हा शरीराचा आकार बिघडतो, त्यावेळी आत्मविश्वासाचा कमी होतो. तसेच इतर आरोग्यविषयक समस्या देखील निर्माण होतात. 

नारळ पाणी हे एक नैसर्गिक पेय आहे जे आपल्या शरीरासाठी खूप फायदेशीर मानलं जातं. खेड्यापासून शहरापर्यंत सर्वत्र ते उपलब्ध असतं. जेव्हा आपण समुद्राच्या किनाऱ्यावर सुट्टी एन्जॉय करायला जातो तेव्हा आपल्याला ते प्यायला जास्त आवडतं. नारळ पाण्याचे नियमित सेवन केल्यास वजन कमी करता येतं.

नारळाच्या पाण्यात आढळणारे पोषक घटक

प्रसिद्ध डाएटीशियन आयुषी यादव यांनी दिलेल्या माहितीनुसार, जर आपण नारळ पाणी पिण्याची सवय लावली तर शरीराला व्हिटॅमिन्स, मिनरल्स आणि नैसर्गिक पोषक घटक मिळतील ज्यामुळे शरीर हायड्रेटेड राहील आणि फ्रेश वाटेल.

वजन कसं होतं कमी?

नारळ पाण्यात नैसर्गिक साखर असते आणि त्यामध्ये कॅलरीज देखील कमी प्रमाणात आढळतात, तसेच कार्बोहाइड्रेट्सचे प्रमाण देखील कमी असते, ज्यामुळे मेटाबॉलिज्म वाढतं आणि पचनक्रिया सुधारते. नारळ पाणी एकदा प्यायल्यावर तुम्हाला बराच वेळ पोट भरल्यासारखं वाटतं. अशा परिस्थितीत तुमचं वजन हळूहळू कमी होतं. फळांचा रस पिण्यापेक्षा नारळ पाणी पिण्याचे जास्त फायदे आहेत कारण त्यात जास्त मिनरल्स असतात.

कधी प्यावं नारळ पाणी?

नारळाचे पाणी आरोग्यासाठी फायदेशीर असून ते सकाळी रिकाम्या पोटी प्यावं, तर त्याचा परिणाम दिवसभर दिसून येईल. तुम्हाला ताजेतवाने आणि उत्साही वाटेल. 

टॅग्स :Healthआरोग्यHealth Tipsहेल्थ टिप्सWeight Loss Tipsवेट लॉस टिप्स