शहरं
Join us  
Trending Stories
1
“७५ वर्षांचा नियम RSSला लागू करायचा असेल, म्हणून मोहन भागवत तसे म्हणाले असतील”: शंकराचार्य
2
"जयंत पाटलांच्या राजीनाम्याची बातमी खोडसाळपणा...", प्रदेशाध्यक्षपदावरुन जितेंद्र आव्हाड यांनी स्पष्टच सांगितलं
3
'तो मला बायको म्हणायचा', मुंबईतील शिक्षिकेचा विद्यार्थ्यासोबतच्या संबंधाबद्दल चक्रावून टाकणारा खुलासा
4
१८० प्रवाशांऐवजी केवळ १५५ जणांनाच घेऊन उडाले एअर इंडियाचे विमान! विमानतळावर गोंधळ,नेमके झाले काय?
5
पतीचा भर रस्त्यात तमाशा; पत्नीवर केले सपासप वार, जांघेत अडकली तलवार! कशावरून झाला वाद?
6
“२० देशांनी भारताच्या बाजूने मतदान केले, १२ किल्ले जागतिक वारसा स्थळ घोषित झाले”: CM फडणवीस
7
CHYD च्या नवीन पर्वात निलेश साबळेंना मिस करशील का? गौरव मोरे म्हणाला, "मी त्यांच्यासोबत..."
8
लव्ह जिहादवरील 'पुस्तका'द्वारे लोकांना भडकवायचा छांगूर बाबा, आणखी ४ सहकाऱ्यांचाही खुलासा; या जिल्ह्यांत सुरू होता धर्मांतराचा खेळ
9
ट्रम्प सरकारची नोकरदारांवरच कुऱ्हाड! १३०० कर्मचाऱ्यांना कामावरून काढणार, लवकरच पाठवणार नोटीस
10
"पैशांची एखादी बॅग देऊ...आजकल हमारा नाम बहुत चल रहा है"; शिरसाटांची मिश्कील टिप्पणी
11
राज ठाकरेंचा मुद्दा, आशिष शेलारांनी दिले उत्तर; आभार मानत म्हणाले, 'त्यांनी उपस्थित केलेल्या मुद्द्याबद्दल...'
12
“महायुतीच्या अपयशावर बोट ठेवणार, पक्षाची प्रतिष्ठा वाढवणार”; शशिकांत शिंदेंची पहिली प्रतिक्रिया
13
IPO पूर्वी Flipkart चं मोठं गिफ्ट, ७५०० पेक्षा अधिक कर्मचाऱ्यांना होणार फायदा
14
स्वीडिश अभिनेत्रीच्या प्रेमात पडला आशिष चंचलानी? मराठी सिनेमातही दिसली; डेटिंगच्या चर्चा
15
छांगूर बाबाने मालमत्तेत भरपूर पैसे गुंतवले; पण स्वत:च्या नावावर एकही जमीन ठेवली नाही
16
सकाळ, दुपार, रात्र... दिवसातून ३ वेळा पराठा खाल्ला तर काय होईल, आरोग्यावर कसा होतो परिणाम?
17
'माझा व्हिडीओ मॉर्फ करून बनवला,अब्रुनुकसानीची नोटीस पाठवणार'; संजय शिरसाटांचा इशारा
18
८ व्या वेतन आयोगाच्या शिफारसी केव्हापर्यंत लागू होणार, केंद्रीय कर्मचाऱ्यांना माहीत करुन घेणं गरजेचं
19
भलं करायच्या नादात, ट्रम्प कापताहेत आपल्याच लोकांचे खिसे; आकडेवारी पाहून डोक्यावर हात माराल
20
१२ किल्ल्यांचा युनेस्कोच्या जागतिक वारसा यादीत समावेश; शरद पवारांनी मानले मोदी सरकारचे आभार

वजन कमी करण्यासाठी अत्यंत फायदेशीर ठरतं नारळ पाणी; जाणून घ्या नेमकं कधी प्यावं?

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 3, 2024 11:59 IST

नारळ पाणी हे आपल्या शरीरासाठी खूप फायदेशीर मानलं जातं.

वाढत्या वजनामुळे आपल्यापैकी अनेकांना त्रास होतो आणि ते आरोग्यासाठीही चांगलं नाही, कारण त्यामुळे हाय कोलेस्टेरॉल, मधुमेह, हाय ब्लड प्रेशर आणि हार्ट अटॅक येण्याचा धोका निर्माण होऊ शकतो. जेव्हा पोट आणि कंबरेभोवती चरबी जमा होऊ लागते, तेव्हा शरीराचा आकार बिघडतो, त्यावेळी आत्मविश्वासाचा कमी होतो. तसेच इतर आरोग्यविषयक समस्या देखील निर्माण होतात. 

नारळ पाणी हे एक नैसर्गिक पेय आहे जे आपल्या शरीरासाठी खूप फायदेशीर मानलं जातं. खेड्यापासून शहरापर्यंत सर्वत्र ते उपलब्ध असतं. जेव्हा आपण समुद्राच्या किनाऱ्यावर सुट्टी एन्जॉय करायला जातो तेव्हा आपल्याला ते प्यायला जास्त आवडतं. नारळ पाण्याचे नियमित सेवन केल्यास वजन कमी करता येतं.

नारळाच्या पाण्यात आढळणारे पोषक घटक

प्रसिद्ध डाएटीशियन आयुषी यादव यांनी दिलेल्या माहितीनुसार, जर आपण नारळ पाणी पिण्याची सवय लावली तर शरीराला व्हिटॅमिन्स, मिनरल्स आणि नैसर्गिक पोषक घटक मिळतील ज्यामुळे शरीर हायड्रेटेड राहील आणि फ्रेश वाटेल.

वजन कसं होतं कमी?

नारळ पाण्यात नैसर्गिक साखर असते आणि त्यामध्ये कॅलरीज देखील कमी प्रमाणात आढळतात, तसेच कार्बोहाइड्रेट्सचे प्रमाण देखील कमी असते, ज्यामुळे मेटाबॉलिज्म वाढतं आणि पचनक्रिया सुधारते. नारळ पाणी एकदा प्यायल्यावर तुम्हाला बराच वेळ पोट भरल्यासारखं वाटतं. अशा परिस्थितीत तुमचं वजन हळूहळू कमी होतं. फळांचा रस पिण्यापेक्षा नारळ पाणी पिण्याचे जास्त फायदे आहेत कारण त्यात जास्त मिनरल्स असतात.

कधी प्यावं नारळ पाणी?

नारळाचे पाणी आरोग्यासाठी फायदेशीर असून ते सकाळी रिकाम्या पोटी प्यावं, तर त्याचा परिणाम दिवसभर दिसून येईल. तुम्हाला ताजेतवाने आणि उत्साही वाटेल. 

टॅग्स :Healthआरोग्यHealth Tipsहेल्थ टिप्सWeight Loss Tipsवेट लॉस टिप्स