शहरं
Join us  
Trending Stories
1
MNS Shiv Sena UBT Alliance: ऐनवेळी ठाकरे बंधूंच्या युतीची घोषणा टळली, संजय राऊतांनी सांगितली नवी वेळ
2
"...तर मग ऑपरेशन सिंदूर तरी कुठे चुकीचे होते?" मुनीर यांच्यावर पाकिस्तानी मौलानांचा कडाडून हल्ला
3
सोन्या-चांदीचे दर गगनाला भिडले, आज सर्व जुने रेकॉर्ड मोडले! पटापट चेक करा १४ ते २४ कॅरेटपर्यंतचे 'लेटेस्ट रेट'
4
मृत्यूच्या खोलीतलं 'ते' भयंकर 'सत्य'! अभिषेकने भिंतीवर का चिटकवले सोनमचे फोटो आणि चॅट्स?
5
सुधीर मुनगंटीवारांनी 'राज्यभर दौरा गुंडाळला', भाजप नेत्यांसोबत आज चर्चा; ठाकरे बंधूंबद्दलही बरंच बोलले
6
IND W vs SL W 2nd T20I Live Streaming : कॅप्टन हरमनप्रीतची नाराजी दूर करण्यासाठी मैदानात उतरणार टीम इंडिया!
7
इराणमध्ये नवीन संकट येणार! ७ लाख वर्षांपासून निष्क्रिय असलेला ज्वालामुखी उद्रेकाच्या तयारीत
8
“आमचा लढा भाजपाशी नाही, तर...”; जर्मनीत राहुल गांधींचे मोठे विधान, मतचोरीवरही स्पष्ट भाष्य
9
ना मंदिर, ना मूर्तिपूजा; संपूर्ण शरीराव फक्त 'रामनाम', या आदिवासी समाजाची अनोखी परंपरा
10
'प्रियंका गांधींना पंतप्रधान बनवा', काँग्रेस नेत्याची मागणी; राहुल गांधींचे काय होणार? म्हणाले...
11
"माझाही फोटो आहे, सर्वांचेच...!"; एपस्टीन फाइल्सवर ट्रम्प स्पष्टच बोलले, बिल क्लिंटन यांच्यासंदर्भात काय म्हणाले?
12
WhatsApp: नव्या पद्धतीने हॅक जात आहे व्हॉट्सॲप, सरकारने दिला काळजी घेण्याचा सल्ला
13
बांगलादेशमधील दीपूच्या मृत्यूप्रकरणी दिल्लीत VHP चे निदर्शने; बांगलादेश परराष्ट्र मंत्रालयाने भारतीय उच्चायुक्तांना बोलावले
14
ज्ञानदा रामतीर्थकरचं लग्न ठरलं! अभिनेत्रीने गुपचूप साखरपुडाही केला, आता लवकरच होणार शुभमंगल सावधान
15
Astrology: नावात बरंच काही आहे! बाळाचे नाव ठेवताना 'ही' काळजी घ्या, नाहीतर लोक नावं ठेवतील
16
अखेर चीनने आयडिया चोरलीच! भारताच्या UPI सोबत स्पर्धा करण्यासाठी ॲप लाँच केले... 'Nihao China'
17
Video - हृदयद्रावक! डीजेवर नाचताना आक्रित घडलं, २३ वर्षीय तरुण खाली कोसळला अन्...
18
"तिथं मी बुलेटप्रूफ कारशिवाय बाहेर पडू शकत नाही!"; कारण... अफगाणिस्तान स्टार क्रिकेटर राशीद खानचा खुलासा
19
“१०० टक्के ठाकरे बंधूंना १०० जागा मिळतील, युतीची केवळ घोषणा बाकी, जागावाटप पूर्ण”: संजय राऊत
20
“काँग्रेसचा विषय नक्कीच संपलेला आहे, पण निकालानंतर गरज लागली तर…”; संजय राऊतांचे मोठे विधान
Daily Top 2Weekly Top 5

किमान साडे सात तास न झोपल्यास बळावतो 'हा' कायमस्वरुपी जीवघेणा आजार, आयुष्य येतं धोक्यात

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 4, 2021 17:31 IST

अपूर्ण झोप किंवा नीट झोप न लागल्यामुळे त्याचा थेट परिणाम मेंदूवर होतो. मेंदूवरील हा परिणाम तुमच्या विचार आणि समजण्याच्या क्षमतेवर आणि स्मरणशक्तीवर दिसून येतो.

निरोगी राहण्यासाठी झोप खूप (Sleeping) महत्त्वाची आहे. गरजेपेक्षा कमी झोपणे किंवा जास्त झोप घेणं हे देखील शरीरासाठी हानिकारक आहे. जे लोक साडेसात तासांपेक्षा कमी झोपतात, त्यांची स्मरणशक्ती कमी होऊ शकते. वॉशिंग्टन विद्यापीठाच्या संशोधकांनी त्यांच्या संशोधनात हा दावा केला आहे. संशोधक आणि न्यूरोलॉजिस्ट डॉ. ब्रेंडन लुसी सांगतात की, अपूर्ण झोप किंवा नीट झोप न लागल्यामुळे त्याचा थेट परिणाम मेंदूवर होतो. मेंदूवरील हा परिणाम तुमच्या विचार आणि समजण्याच्या क्षमतेवर आणि स्मरणशक्तीवर दिसून येतो.

संशोधक म्हणतात, 'जर तुम्हाला ८ तासांची झोप मिळत असेल. जर तुम्ही ३० मिनिटे आधी अलार्म लावला तर साडेसात तासांच्या झोपेचा मेंदूवर सकारात्मक परिणाम होतो. अल्झायमर रोगाचा धोका कमी होतो म्हणजेच गोष्टी विसरणार नाहीत.

मेंदूमध्ये अल्झायमर कसा वाढतो?खरं तर, झोपताना आपल्या शरीरात काही सकारात्मक बदल होतात. यामध्ये आपली वाढ, सुधारणा, पेशींची विश्रांती आणि मानसिक विकास यांचा समावेश होतो. जर आपण पुरेशी झोप घेतली नाही तर आपल्याला हे फायदे मिळत नाहीत. पुरेशी झोप न मिळणे हे मानसिक क्षमता आणि स्मरणशक्तीसाठी खूप धोकादायक आहे. तुमची स्मरणशक्ती कमी होऊ शकते, स्मृतिभ्रंश देखील होऊ शकतो. ज्यांना पुरेशी झोप मिळत नाही ते अनेकदा तणाव आणि मानसिक समस्यांना बळी पडतात. पुरेशी झोप न मिळाल्याने मेंदूला योग्य प्रमाणात विश्रांती मिळत नाही.

सरासरी ७५ वर्षे वय असलेल्या १०० वृद्धांवर केलेल्या संशोधनातही याची खात्री झाली आहे. संशोधनासाठी या ज्येष्ठांच्या कपाळावर एक छोटा मॉनिटर बांधण्यात आला होता. झोपेच्या वेळी मेंदूमध्ये कोणत्या प्रकारची क्रिया घडते, हे मॉनिटरद्वारे तपासले गेले. सरासरी साडेचार वर्षे चाललेल्या संशोधनात याचा मेंदूच्या क्रियाकलापांवर परिणाम होत असल्याचे समोर आले.

शास्त्रज्ञांच्या मते, रुग्णांमध्ये अल्झायमर रोगासाठी एक विशेष प्रकारची प्रथिने जबाबदार असतात. संशोधनात सहभागी असलेल्या वृद्धांच्या मेंदूच्या सेरेब्रोस्पाइनल फ्लुइडमध्ये त्या प्रोटीनची पातळी काय आहे. दररोज रात्री सुमारे ७.५ तास झोपलेल्या रुग्णांचे संज्ञानात्मक गुण चांगले होते. जे लोक दिवसातून ५ किंवा साडेपाच तास झोपतात त्यांच्यात हे गुण कमी आढळले.

झोपेच्या कमतरतेचा परिणाम तुमच्या पचनसंस्थेवरही होतो. पुरेशी झोप न मिळाल्याने पचनशक्ती कमकुवत होते, त्यामुळे तुम्हाला पोटदुखी किंवा बद्धकोष्ठतेची समस्या देखील होऊ शकते. झोपेच्या कमतरतेमुळे शरीर आणि मनाला पूर्ण विश्रांती मिळत नाही, त्यामुळे शारीरिक दुखणे, जडपणा, डोके जड होणे, चिडचिड होणे अशा समस्या उद्भवतात.

टॅग्स :Healthआरोग्यHealth Tipsहेल्थ टिप्स