शहरं
Join us  
Trending Stories
1
आता पाण्याच्या थेंबा-थेंबासाठी तरसणार पाकिस्तान! पहलगामनंतर भारताचे 'वॉटर स्ट्राइक'; सिंधू जल करार स्थगित
2
अटारी चेकपोस्ट बंद, पाक नागरिकांचे व्हिसा रद्द, ४८ तासात देश सोडण्याचे आदेश; भारताची कठोर भूमिका
3
"तुम्ही हर-हर महादेव म्हणत संघटित तर होऊ शकत नाही, मग अल्लाह हू अकबर म्हणत..."; मनोज मुंतशिर भडकले
4
पहलगाम हल्ल्यातील दहशतवाद्यांची माहिती देणाऱ्यांना 'इतक्या' लाखांचे बक्षीस; काश्मीर पोलिसांची घोषणा
5
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारताच्या बाजूने उभे राहिले हे मुस्लीम देश, काय म्हणतोय पाकिस्तान?
6
दुर्गम भाग, सुरक्षा व्यवस्था नाही...दहशतवाद्यांनी हल्ल्यासाठी पहलगाम का निवडले?
7
पहलगाम हल्ल्यानंतर PM मोदींच्या नेतृत्वात CCSची अडीच तास बैठक, पाकिस्तानला मोठा दणका
8
पहलगाम हल्ला: पाकिस्तानी क्रिकेटरनेच काढली पाकिस्तानची लक्तरं, म्हणाला- लाज वाटते...
9
"तू बाहर आ..."; दहशतवाद्यांनी आयत म्हणायला सांगितली, मग व्यावसायिकावर गोळ्या झाडल्या, मुलीनं सांगितला भयावह प्रसंग
10
पहलगाम हल्ल्यानंतर काश्मीरमध्ये मोठी कारवाई; 1500 लोकांना घेतले ताब्यात, चौकशी सुरू...
11
Pahalgam Terror Attack: मॅच आधी खेळाडूंनी दहशतवादी हल्ल्यातील मृत पर्यटकांना वाहिली श्रद्धांजली
12
बिल क्लिंटन भारतात येण्यापूर्वी झाली होती ३६ शीखांची हत्या; २५ वर्षांनी पहलगाममध्येही तेच घडलं
13
Pahalgam Terror Attack : सुट्टी घेऊन अमेरिकेहून काश्मीर फिरण्यासाठी आला अन् दहशतवादी हल्ल्यात जीव गमावला
14
पहलगाम हल्यामुळे काश्मीरच्या अर्थव्यवस्थेला फटका; पर्यटकांनी रद्द केल्या बुकिंग्स...
15
पहलगाम हल्ला: २४ तासांनंतर बांगलादेशची पहिली प्रतिक्रिया आली; मोहम्मद युनूस म्हणाले...
16
कुलगाममध्ये मोठी चकमक सुरु; पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या टीआरएफच्या कमांडरला घेरले
17
"निष्पाप भारतीयांना मारणं हाच पाकिस्तानचा राष्ट्रीय खेळ, आता..."; भारतीय क्रिकेटरला राग अनावर
18
“पंतप्रधानांनी खंबीर भूमिका घ्यावी, २६चा बदला २६०ने घेतला पाहिजे”; शिंदेसेनेचे नेते संतापले
19
"हे सरकार हिंदुत्वाबद्दल बोलतंय, त्यामुळे मुस्लिमांना कमकुवत झाल्यासारखं वाटतंय"; 'पहलगाम'बाबत रॉबर्ट वाड्रा यांचं विधान चर्चेत
20
"यांचा सामना कसा करायचा? भारताला चांगलं ठाऊक, आम्हीही सोबत...!"; पहलगाम हल्ल्यानंतर भारताच्या खास मित्राचं आश्वासन

जंक फूड म्हणजे आजारांना आमंत्रण

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 26, 2022 06:21 IST

आजकाल जंक फूड खाणे म्हणजे ‘स्टेटस सिम्बॉल’ होत चालले आहे. विशेषत: शालेय विद्यार्थी आणि तरुणांमध्ये फास्ट फूडची विशेष क्रेझ आहे.

डॉ. अमित मायदेव पोटविकार तज्ज्ञ

आजकाल जंक फूड खाणे म्हणजे ‘स्टेटस सिम्बॉल’ होत चालले आहे. विशेषत: शालेय विद्यार्थी आणि तरुणांमध्ये फास्ट फूडची विशेष क्रेझ आहे. बर्गर, पिझ्झा, पास्ता, फ्रेंच फ्राइज, केक, हॉट डॉग, डोनट्स आणि चायनीज हे शब्द सगळ्यांच्याच घरी एखादी पार्टी असेल तर ठरलेले असतात. त्यात पालकांकडून आणि मित्रमंडळींतून या सगळ्या पदार्थांचे स्वागतच होत असते. मात्र, हे खाद्यपदार्थ आपल्या आरोग्यासाठी हानिकारक आहेत, हा विचारही आपल्या डोक्यात कधी येत नाही. कारण जंक फूड खाताना जिभेचे चोचले पुरविले जातात. कालांतराने या जंक फूडचे दुष्परिणाम शरीरावर दिसण्यास सुरुवात होते.

जंक फूडमध्ये शरीराला पोषक अशा गोष्टी कमी आणि घातक ठरू शकणाऱ्या पदार्थांचे प्रमाण अधिक असते. फॅट्स, मीठ, साखर आणि विविध प्रकारची रसायने जंक फूडमध्ये असतात. तसेच पदार्थ अधिक लज्जतदार बनविण्यासाठी त्यात सर्रासपणे रंगांचा वापर केला जातो. या सर्व गोष्टी मानवी शरीरासाठी चांगल्या नसतात. या सर्व गोष्टींचा परिणाम थेट पचनसंस्थेवर होत असतो. जंक वा फास्ट फूडमुळे वजन वाढते. सतत जंक फूड खाल्ल्याने लठ्ठपणा वाढतो. एकदा का स्थूलपणा आला की सर्व व्याधी शरीराला जडू लागतात. त्यात मधुमेह, रक्तदाब, धाप लागणे, सांधेदुखी, हृदयविकार, इत्यादींचा समावेश असतो. लठ्ठपणामुळे कर्करोग होण्याचा धोका असतो. एरव्ही साधे अन्न पचविण्यासाठी आवश्यक जिवाणू पोटात असतात; परंतु जंक फूडमुळे वाईट जिवाणूंचे प्रमाण वाढते आणि पंचनसंस्थेत बिघाड निर्माण होऊन पोटाचे विकार बळावतात. 

  • तेव्हा जंक फूड खाताना संयम हेच मुख्य पथ्य आहे. कुठे थांबायचे हे समजले तर जंक फूडमुळे होणारे पोटाचे विकार जवळपासही भटकणार नाहीत. ताजी फळे खाणे केव्हाही उत्तम. त्यामुळे प्रतिकार शक्ती वाढण्यास मदत होते. 
  • प्रदूषणाची पातळी आपल्याकडे अधिक आहे. त्यात जंक फूडमुळे विविध आजारांना आपण स्वत:हून निमंत्रण देत असतो. या सर्व पार्श्वभूमीवर आपल्याकडे चौरस आहाराला असलेले महत्त्व ठळकपणे अधोरेखित होते. चौरस आहारातून सर्व प्रकारची जीवनसत्त्वे प्राप्त होतात. 
  • पूर्वीच्या काळी शारीरिक कष्टाची कामे मोठ्या प्रमाणात केली जायची. मात्र, आता त्या स्वरूपाची कामे नसली तरी आपण व्यायाम करून शरीर तंदुरुस्त ठेवू शकतो. व्यायाम शरीराला झेपेल इतकाच आणि प्रशिक्षकाच्या निरीक्षणाखाली करावा. 
  • आपल्याला पीळदार शरीरापेक्षा शरीर निरोगी ठेवायचे आहे, हे कायम लक्षात ठेवावे. जंक फूड एक-दोनदा वा कधी तरी खाल्ले तर ठीक आहे. मात्र, त्याचे सेवन नियमितपणे केल्यास शरीराची मोठ्या प्रमाणात हानी होते, हे नक्की.
टॅग्स :foodअन्न