शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

सकाळच्या नाश्त्याकडे दुर्लक्ष करताय? तुम्ही होऊ शकता टाइप 2 डायबिटीजचे शिकार!

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 5, 2018 11:45 IST

शरीरात एनर्जी लेव्हल टिकवून ठेवण्यासाठी आणि शरीरातील सर्व क्रिया सुरळीत पार पडण्यासाठी जास्तीत जास्त लोक दिवसातून 2 ते 3 वेळा जेवतात. परंतु यामध्ये सर्वात महत्त्वाचा असतो तो म्हणजे सकाळचा नाश्ता.

शरीरात एनर्जी लेव्हल टिकवून ठेवण्यासाठी आणि शरीरातील सर्व क्रिया सुरळीत पार पडण्यासाठी जास्तीत जास्त लोक दिवसातून 2 ते 3 वेळा जेवतात. परंतु यामध्ये सर्वात महत्त्वाचा असतो तो म्हणजे सकाळचा नाश्ता. कारण रात्रीच्या जेवणातून मिळाणारी ऊर्जा आणि पोषक तत्व सकाळपर्यंत शरीराच्या इतर क्रियांमध्ये खर्च होऊन जातात. ज्यामुळे सकाळी फार भूक लागते. ऑफिसला जाणं असो किंवा शाळेत जाणं, नाहीतर घरातील कामच असली तरिही सकाळच्या धावपळीमुळे आपल्यापैकी अनेकजण सकाळच्या नाश्त्याकडे दुर्लक्ष करतात. याचा शरीरावर लगेच कोणता प्रभाव दिसून येत नाही परंतु, कालांतराने शरीराला अनेक समस्यांचा सामना करावा लागतो. जाणून घेऊया नाश्त्याकेडे दुर्लक्ष केल्यामुळे शरीराला होणारे नुकसान...

डोकेदुखीने त्रस्त

जर तुम्ही नेहमी सकाळच्या नाश्त्याकडे दुर्लक्ष करत असाल तर तुमच्या रक्तातील साखरेची पातळी फार कमी होते. कारण त्यावेळी तुम्ही 8 ते 10 तास काही खात नाही. त्यामुळे डोक्यामध्ये असे काही हार्मोन्सचे उत्सर्जन सुरु होते जे डोकेदुखीसाठी जबाबदार ठरतात. 

टाइप 2 डायबिटीज होण्याचा धोका अधिक

ज्या व्यक्ती नेहमी सकाळच्या नाश्त्याकडे दुर्लक्ष करतात किंवा धावपळीमध्ये अर्धवट नाश्ता करून निघून जातात, त्यांना टाइप 2 डायबिटीज होण्याचा धोका अधिक असतो. यामुळे ब्लड शुगर लेव्हलवर परिणाम होतो आणि डिप्रेशन, टेन्शन, अस्वस्थपणा यांसारख्या समस्यांचाही सामना करावा लागू शकतो. ब्लड शुगरची लेव्हल सतत असंतुलित राहिल्यामुळे शरीरातील एनर्जी लेव्हलवरही परिणाम होतो. याचे परिणाम शरीरासाठी घातक ठरू शकतात. 

दिवसभर सुस्ती आणि थकवा

जर तुम्ही सकाळचा नाश्ता अर्धवट सोडून जात असाल तर तुम्हाला सतत थकवा जाणवतो. जरी तुम्ही रात्री भरपेट जेवण केलं असेल तरिही सकाळी पोट नव्याने पोषक तत्वांसाठी तयार असते. नाश्त्याकडे दुर्लक्ष केल्यामुळे दिवसभरासाठी कमी ऊर्जा मिळते. परिणामी आपल्याला दिवसभर थकवा जाणवतो. 

स्थुलपणा वाढतो

अनेक लोकांचा हा समज असतो की, कमी जेवल्यामुळे वजन कमी होण्यास मदत होते. त्यामुळे अनेक लोकं खाण टाळतात. परंतु तुम्हाला माहीत आहे का? नाश्त्याकडे दुर्लक्ष केल्यामुळे तुमचा स्तुलपणा वाढण्याचीही शक्यता अधिक असते. हे लठ्ठपणापेक्षाही फार गंभीर आहे. कारण लठ्ठपणामध्ये तुमचं पोट आणि चरबी वाढते. परंतु स्थुलपणामध्ये तुमचं शरीर आतून कमजोर होतं. 

रोगप्रतिकारक शक्ती कमी होते

आहार तज्ज्ञांनी सांगितलं की, पोटभर नाश्ता करणं फार गरजेचं असतं. यामुळे शरीरामध्ये पूर्ण दिवस एनर्जी राहते. परंतु नाश्ता न केल्यामुळे एनर्जीसोबतच शरीराची रोगप्रतिकारक शक्तीदेखील कमी होते. कारण उपाशी राहिल्यामुळे तुमच्या शरीरातील सेल्स डॅमेज होऊ लागतात. त्यामुळे शरीरावर वायरस, बॅक्टेरिया, फंगल इन्फेक्शन यांसारख्या अनेक समस्या उद्भवण्याचा धोका असतो. 

टॅग्स :diabetesमधुमेहHealthआरोग्यHealth Tipsहेल्थ टिप्स