शहरं
Join us  
Trending Stories
1
Bihar CM: मुख्यमंत्री कोण? एनडीएमध्ये चर्चा सुरूच; बिहारच्या नेतृत्वाबाबत गूढ कायम!
2
आजचे राशीभविष्य, १६ नोव्हेेंबर २०२५: आर्थिक लाभ होतील, मित्र व स्नेह्यांची भेट आनंददायी राहील.
3
पाकिस्तानची सौदी अरेबियानंतर आता आणखी एका मुस्लिम देशाशी हातमिळवणी? नवा 'प्लॅन' काय?
4
Kalyan: रेल्वेतून पडून जखमी; डॉक्टरांनी घरी पाठवले, काही तासांत मृत्यू!
5
ड्रायव्हिंग टेस्ट फक्त नावापुरती! मुंबई RTO मध्ये स्टिअरिंगवर हात ठेवताच मिळतंय लायसन्स
6
JJ Hospital: जेजे रुग्णालयाची कॅन्सर रुग्णांसाठी ११ एकर जागेची मागणी!
7
Mumbai: मुंबईत मोठी दुर्घटना! भायखळा येथे बांधकाम सुरू असताना माती कोसळली; २ ठार, ३ जखमी
8
Court: राजकारण्यांवरील खटल्यांचा निपटारा करा! महाराष्ट्र, गोव्यातील ४७८ प्रकरणांवर हायकोर्टाचे आदेश
9
Congress: ठाकरेंना मोठा धक्का! काँग्रेसची 'एकला चलो'ची घोषणा; मुंबई महानगरपालिका स्वबळावर लढणार
10
Akasa Air: नवी मुंबई विमानतळामुळे प्रवाशांना दिलासा; ख्रिसमसपासून दिल्ली, गोवासह ४ शहरांसाठी थेट सेवा
11
Vasai: बालदिनीच क्रूर शिक्षा! शाळेत उशिरा आली म्हणून १०० उठाबशा, विद्यार्थिनीचा दुर्दैवी मृत्यू
12
अमेरिकेत महागाई वाढली, डोनाल्ड ट्रम्प यांनी टॅरिफवर घेतला यू-टर्न; भारताला मोठा फायदा होणार
13
लालू प्रसाद यादवांच्या मुलीचा खळबळजनक आरोप! रोहिणी म्हणाल्या "तेजस्वीने मला घरातून बाहेर..."
14
Rohini Aacharya: लालू प्रसाद यादवांच्या घरात ज्यांच्यामुळे सुरू झालं 'महाभारत', ते संजय यादव कोण?
15
एका वर्षात तिसरी वेळ! भारताच्या शेजारी देशात सापडली तब्बल १००० टन सोन्याची खाण, कोणता आहे देश?
16
माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण आज कराडात! सातारा जिल्ह्यामधील महाविकास आघाडी बाबत होणार निर्णय?
17
मुंबईत मोठी दुर्घटना! भायखळ्यातील बांधकाम सुरू असलेल्या इमारतीजवळ मातीचा ढिगारा कोसळला; २ मजुरांचा मृत्यू, ३ जखमी
18
IPL 2026 : अय्यरसह मसल पॉवर रसेल OUT! मिनी लिलावासाठी शाहरुखच्या KKR च्या पर्समध्ये सर्वाधिक पैसा
19
इराण देशभरातील लोकांच्या मोबाईल फोनवर 'इमरजन्सी अलर्ट' का पाठवत आहे?
20
IPL 2026: प्रितीच्या पंजाबनं ग्लेन मॅक्सवेलला दाखवला ठेंगा! कोच रिकी पाँटिंगनं सांगितली आतली गोष्ट
Daily Top 2Weekly Top 5

सकाळच्या नाश्त्याकडे दुर्लक्ष करताय? तुम्ही होऊ शकता टाइप 2 डायबिटीजचे शिकार!

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 5, 2018 11:45 IST

शरीरात एनर्जी लेव्हल टिकवून ठेवण्यासाठी आणि शरीरातील सर्व क्रिया सुरळीत पार पडण्यासाठी जास्तीत जास्त लोक दिवसातून 2 ते 3 वेळा जेवतात. परंतु यामध्ये सर्वात महत्त्वाचा असतो तो म्हणजे सकाळचा नाश्ता.

शरीरात एनर्जी लेव्हल टिकवून ठेवण्यासाठी आणि शरीरातील सर्व क्रिया सुरळीत पार पडण्यासाठी जास्तीत जास्त लोक दिवसातून 2 ते 3 वेळा जेवतात. परंतु यामध्ये सर्वात महत्त्वाचा असतो तो म्हणजे सकाळचा नाश्ता. कारण रात्रीच्या जेवणातून मिळाणारी ऊर्जा आणि पोषक तत्व सकाळपर्यंत शरीराच्या इतर क्रियांमध्ये खर्च होऊन जातात. ज्यामुळे सकाळी फार भूक लागते. ऑफिसला जाणं असो किंवा शाळेत जाणं, नाहीतर घरातील कामच असली तरिही सकाळच्या धावपळीमुळे आपल्यापैकी अनेकजण सकाळच्या नाश्त्याकडे दुर्लक्ष करतात. याचा शरीरावर लगेच कोणता प्रभाव दिसून येत नाही परंतु, कालांतराने शरीराला अनेक समस्यांचा सामना करावा लागतो. जाणून घेऊया नाश्त्याकेडे दुर्लक्ष केल्यामुळे शरीराला होणारे नुकसान...

डोकेदुखीने त्रस्त

जर तुम्ही नेहमी सकाळच्या नाश्त्याकडे दुर्लक्ष करत असाल तर तुमच्या रक्तातील साखरेची पातळी फार कमी होते. कारण त्यावेळी तुम्ही 8 ते 10 तास काही खात नाही. त्यामुळे डोक्यामध्ये असे काही हार्मोन्सचे उत्सर्जन सुरु होते जे डोकेदुखीसाठी जबाबदार ठरतात. 

टाइप 2 डायबिटीज होण्याचा धोका अधिक

ज्या व्यक्ती नेहमी सकाळच्या नाश्त्याकडे दुर्लक्ष करतात किंवा धावपळीमध्ये अर्धवट नाश्ता करून निघून जातात, त्यांना टाइप 2 डायबिटीज होण्याचा धोका अधिक असतो. यामुळे ब्लड शुगर लेव्हलवर परिणाम होतो आणि डिप्रेशन, टेन्शन, अस्वस्थपणा यांसारख्या समस्यांचाही सामना करावा लागू शकतो. ब्लड शुगरची लेव्हल सतत असंतुलित राहिल्यामुळे शरीरातील एनर्जी लेव्हलवरही परिणाम होतो. याचे परिणाम शरीरासाठी घातक ठरू शकतात. 

दिवसभर सुस्ती आणि थकवा

जर तुम्ही सकाळचा नाश्ता अर्धवट सोडून जात असाल तर तुम्हाला सतत थकवा जाणवतो. जरी तुम्ही रात्री भरपेट जेवण केलं असेल तरिही सकाळी पोट नव्याने पोषक तत्वांसाठी तयार असते. नाश्त्याकडे दुर्लक्ष केल्यामुळे दिवसभरासाठी कमी ऊर्जा मिळते. परिणामी आपल्याला दिवसभर थकवा जाणवतो. 

स्थुलपणा वाढतो

अनेक लोकांचा हा समज असतो की, कमी जेवल्यामुळे वजन कमी होण्यास मदत होते. त्यामुळे अनेक लोकं खाण टाळतात. परंतु तुम्हाला माहीत आहे का? नाश्त्याकडे दुर्लक्ष केल्यामुळे तुमचा स्तुलपणा वाढण्याचीही शक्यता अधिक असते. हे लठ्ठपणापेक्षाही फार गंभीर आहे. कारण लठ्ठपणामध्ये तुमचं पोट आणि चरबी वाढते. परंतु स्थुलपणामध्ये तुमचं शरीर आतून कमजोर होतं. 

रोगप्रतिकारक शक्ती कमी होते

आहार तज्ज्ञांनी सांगितलं की, पोटभर नाश्ता करणं फार गरजेचं असतं. यामुळे शरीरामध्ये पूर्ण दिवस एनर्जी राहते. परंतु नाश्ता न केल्यामुळे एनर्जीसोबतच शरीराची रोगप्रतिकारक शक्तीदेखील कमी होते. कारण उपाशी राहिल्यामुळे तुमच्या शरीरातील सेल्स डॅमेज होऊ लागतात. त्यामुळे शरीरावर वायरस, बॅक्टेरिया, फंगल इन्फेक्शन यांसारख्या अनेक समस्या उद्भवण्याचा धोका असतो. 

टॅग्स :diabetesमधुमेहHealthआरोग्यHealth Tipsहेल्थ टिप्स