शहरं
Join us  
Trending Stories
1
'सिंधूतून आमचे पाणी वाहणार, नाहीतर भारताचे रक्त'; पाणी रोखताच पाकचे माजी मंत्री बिलावल भुत्तोंचा थटथयाट
2
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
3
पाकिस्तानचे लज्जास्पद कृत्य! उच्चायुक्तालयाबाहेर निदर्शने, अधिकाऱ्याचा हातवारे करुन इशारा; पाहून तुम्हालाही राग येईल
4
आस्ताद काळेने सांगितली 'छावा'मधली मोठी चूक, म्हणाला- "छत्रपती संभाजी महाराजांचा राज्याभिषेक..."
5
ड्रीम कारसाठी दहा वर्षे वाट पाहिली, शोरूममधून बाहेर पडताच तासाभरात जळून खाक झाली
6
'पाकिस्तानचे दोन तुकडे करा, पाकव्याप्त काश्मीर भारतात घ्या', काँग्रेसच्या मुख्यमंत्र्याची PM मोदींकडे मागणी
7
इंडियन बँक, महिंद्राच्या NBFC वर आरबीआयची मोठी कारवाई; लावला कोट्यवधींचा दंड, कारण काय?
8
मालेगावमध्ये ईडीचे छापे; जप्त केली बांगलादेशी रोहिंग्यांची बनावट कागदपत्रे आणि दाखले
9
Tarot Card: लहान मुलांप्रमाणे क्षणार्धात राग सोडून द्या, आनंदात राहाल; वाचा टॅरो भविष्य!
10
अनंत अंबानींकडे रिलायन्स इंडस्ट्रिजच्या एक्झिक्युटिव्ह डायरेक्टरपदाची जबाबदारी, कधीपासून सांभाळणार पदभार?
11
Pahalgam Terror Attack: लष्कराची मोठी कारवाई! आणखी दोन दहशतवाद्यांची घरे स्फोटके लावून पाडली
12
पाकिस्तानच्या नापाक कारवाया थांबत नाहीत, २४ तासांत दुसऱ्यांदा नियंत्रण रेषेवर गोळीबार, भारतीय सैन्याने दिले चोख प्रत्युत्तर
13
"विकी कौशलमुळे 'छावा' चालला असं नाही, तर...", महेश मांजरेकर स्पष्टच बोलले
14
"हे काही टीव्ही शोज नाहीयेत...", अभिनेत्री शिवानी सुर्वेनं प्रसारमाध्यमांना फटकारलं
15
EPFO नं केला मोठा बदल, जॉब बदल्यावर PF ट्रान्सफर करणं होणार सोपं; १.२५ कोटी लोकांना फायदा
16
अक्षय शिंदे प्रकरणी आदेश देऊनही पोलिसांविरोधात गुन्हा दाखल न केल्याने हायकोर्टाचा संताप
17
PPF ची 'ही' ट्रिक अनेकांना माहीत नाही, बनेल १ कोटींचा फंड, वर्षाला मिळू शकतं ७ लाखांपेक्षा अधिक व्याज
18
मोठी बातमी: एल्फिन्स्टन ब्रिज सोमवारपर्यंत बंद होणार नाही; नागरिकांच्या आंदोलनाची थेट मुख्यमंत्र्यांनी घेतली दखल!
19
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
20
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती

तुम्ही जास्त आल्याचा चहा पिता का?; आजचं करा कंट्रोल, 'या' समस्यांचा मोठा धोका

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 19, 2024 11:52 IST

Ginger Tea : आल्याचे जसे फायदे आहेत. तसे काही तोटे देखील आहेत. आल्याचा जास्त वापर तुमच्या आरोग्यासाठी घातक ठरू शकतो.

भाज्यांची चव वाढवण्यासाठी खासकरून भारतीय जेवणात आल्याचा वापर केला जातो. परंतु केवळ खाण्यासाठीच नाही तर घसा खवखवत असेल तर उपचार करण्यासाठी आणि इतरही काही गोष्टींसाठी आलं वापरलं जातं. आल्याचे जसे फायदे आहेत. तसे काही तोटे देखील आहेत. आल्याचा जास्त वापर तुमच्या आरोग्यासाठी घातक ठरू शकतो.

बहुतेक लोक सकाळी, दुपारी किंवा संध्याकाळी कधीही चहाला नाही म्हणत नाहीत. त्यात आल्याचा चहाही मिळत असेल तर मस्तच. आल्याचा चहा आरोग्यासाठी खूप चांगला आहे. पण काही लोकांनी आल्याचा चहा अजिबात पिऊ नये किंवा तुम्ही जर पित असाल तर तो कमी प्रमाणात प्यायला हवा. जास्त प्रमाणात आल्याचा वापर केल्यास काय परिणाम होऊ शकतो ते जाणून घेऊया...

उष्ण वातावरणात गरम चहा प्यायल्याने शरीरात उष्णता निर्माण होते. आलं उष्ण असतं, त्यामुळे उन्हाळ्यात ते खाल्ल्याने अनेक शारीरिक समस्या उद्भवू शकतात.

आल्याच्या अतिसेवनाचे तोटे

पोटात जळजळ होणे

आलं शरीराला ऊब देत असलं तरी त्याचं जास्त सेवन केल्यास पोटात जळजळ होते, एसिड तयार होते, गॅस आणि बद्धकोष्ठता यांसारख्या समस्या उद्भवू शकतात. मात्र, कमी प्रमाणात सेवन केल्यास पोटासंबंधीत समस्या कमी होऊ शकतात.

ब्लड क्लॉटिंगवर परिणाम

आल्यामध्ये रक्त पातळ करणारे गुणधर्म असतात. त्याचं जास्त सेवन केल्यास रक्त पातळ होऊ शकतं. रक्त पातळ करणारी औषधे घेत असलेल्या लोकांच्या समस्या यामुळे वाढू शकतात.

ब्लड शुगर लेव्हल होते कमी

जास्त प्रमाणात आल्याचा वापर केल्यास इन्सुलिनच्या पातळीमध्ये व्यत्यय येऊ शकतो. त्यामुळे रक्तातील साखरेची पातळी अचानक कमी होऊ शकते.

तोंड येणं

आल्याचं जास्त प्रमाणात सेवन केल्यास तोंड येऊ शकतं. त्यामुळे योग्य प्रमाणात आहारात आल्याचा वापर करणं गरजेचं आहे.  

टॅग्स :Health Tipsहेल्थ टिप्सHealthआरोग्य