शहरं
Join us  
Trending Stories
1
"हिंदू समाज संघटित आणि बलशाली होणे, या देशाच्या सुरक्षिततेची अन् विकासाची गॅरंटी; कारण...!" - मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
पहलगाम घटनेने आपल्याला शिकवले की कोण शत्रू आणि कोण मित्र: मोहन भागवत
3
पत्नीच्या नावे 'या' योजनेत १ लाख रुपये जमा करा, २ वर्षांनंतर तुम्हाला किती रिटर्न मिळेल? पटापट पाहा डिटेल्स
4
दे दणादण! रस्त्याच्या कडेला स्टॉल लावण्यावरुन भाजपाचे २ नगरसेवक भिडले, झाली हाणामारी
5
बिहार विधानसभा निवडणुकीपूर्वी भाजपाला झटका; ४ वेळा आमदार राहिलेल्या नेत्याचा पक्षाला रामराम
6
एलन मस्क बनले जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती! संपत्ती ५०० बिलियन डॉलरवर, इतकी कमाई आली कोठून?
7
हिंसा हे प्रश्नांचं उत्तर नाही, लोकशाहीतूनच आमूलाग्र बदल शक्य; सरसंघचालकांनी टोचले राजकीय पक्षांचे कान
8
Success Story: १९२९ मध्ये बनवलेलं हे क्रीम, आजही घराघरात होतो वापर; कोलकाताच्या या व्यक्तीनं उभी केली १६० कोटींची कंपनी
9
वडील करणार होते पाचव्यांदा लग्न; संपत्तीसाठी लेकाने काढला काटा, पोलिसांची केली दिशाभूल अन्...
10
'पीओके'मध्ये निदर्शने हिंसक झाली, पाकिस्तानी सुरक्षा दलांनी गोळीबार केला; १२ नागरिकांचा मृत्यू
11
ट्रम्प टॅरिफमुळे भारताच्या प्रगतीला ब्रेक लागेल? रिझर्व्ह बँकेचा इशारा, 'फक्त जीएसटी कपात पुरेशी नाही...'
12
Video: "आय लव्ह मराठी! मी मराठी शिकतोय, माझ्याशी मराठीत बोला..."; अबू आझमींना झाली उपरती
13
Post Office च्या ‘या’ स्कीममध्ये संपेल पेन्शनचं टेन्शन, दर महिन्याला मिळतील ₹२००००
14
महात्मा गांधींच्या पणतीला पाहिलंत का? दिसायला आहे खूप ग्लॅमरस, गाजवतेय हॉलिवूड
15
भारतासाठी नवीन संकट? अमेरिकेसह सात देश करत आहेत मोठी तयारी; रशियासोबत कनेक्शन
16
'मानवी इतिहासाचा मार्ग बदलला', पंतप्रधान मोदींनी राजघाटावर महात्मा गांधींना श्रद्धांजली वाहिली
17
आता चीनला जाण्यासाठी भारतातून मिळणार थेट विमान सेवा; प्रवाशांचा वेळ अन् पैसा वाचणार
18
डायबिटीज रुग्णांसाठी गुडन्यूज! ब्लड शुगर आणि लठ्ठपणा गुणकारी औषधीच्या विक्रीला केंद्राची मंजुरी
19
तृप्ती, शर्वरी की अनन्या, कोणती अभिनेत्री दिसणार 'चांदनी बार'च्या सीक्वलमध्ये मुख्य भूमिकेत?
20
चार आरोपींवर १९ वर्षांनंतर झाले आरोप निश्चित मालेगाव बॉम्बस्फोट; विशेष न्यायालयांत सुनावणी

फणसाच्या बिया खाण्याचे दुष्परीणामही; 'या' रुग्णांनी तर खाऊच नयेत...

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 26, 2021 18:57 IST

फणसाच्या बिया खाल्ल्याने कोलेस्ट्रॉलची पातळी तर कमी होतेच. शिवाय अशक्तपणा कमी होतो. मात्र, जितक्या या खायला चविष्ट,आरोग्याठी फायदेशीर तितक्याच आरोग्यासाठी धोकादायक देखील आहेत. 

उन्हाळ्यात फणस फार आवडीने खाल्ला जातो. फणस खाण्याचे भरपूर फायदेही आहेत. फणसात व्हिटॅमिन ए, सी, थाइमिन, पोटॉशियम, कॅल्‍शियम, आयरन, फॉलिक अ‍ॅसिड, मॅग्नेशियम असतं. हे सर्व घटक उत्तम आरोग्यासाठी अत्यंत आवश्यक असतात. या फणसामध्ये आणखी एक गोष्ट दडलेली असते जी फणसाच्या गऱ्यांइतकीच चवदार लागते. ती सुकवतात. त्या उकडूनही खाल्ल्या जातात आणि त्याची भाजीही केली जाते. इतर भाज्यांमध्ये चव वाढवण्यासाठीही त्याचा उपयोग केला जातो.  त्या म्हणजे फणसाच्या बिया. या खाल्ल्याने कोलेस्ट्रॉलची पातळी तर कमी होतेच. शिवाय अशक्तपणा कमी होतो. मात्र, जितक्या या खायला चविष्ट  तसंच आरोग्याठी फायदेशीर तितक्याच आरोग्यासाठी धोकादायक देखील आहेत. 

ब्लडप्रेशर कमी होण्याची शक्यताफणसाच्या बिया खाल्ल्याने आपल्या शरीरातील रक्तदाब कमी होतो. लो बीपी असणाऱ्यांनी फणसाच्या बिया खाणे टाळावे. तर ज्या लोकांना हाय बीपी आहे ते रक्तदाब कमी करण्यासाठी औषध खातात. त्यांनी फणसाच्या बिया खाल्ल्या पाहिजेत. या बिया खाल्ल्याने त्यांचा रक्तदाब कमी होईल

साखरेची पातळी कमी होतेफणसाच्या बिया खाल्ल्याने शरीरातील साखरेचे प्रमाण कमी होते. जर एखाद्या व्यक्तीला हायपोग्लाइसीमिया असेल तर त्यांनी डॉक्टरांच्या सल्ल्यानुसारच फणसाच्या बिया आहारात घ्याव्यात. 

रक्त पातळ होतेरक्त गोठल्यामुळे बरेच लोक रक्त पातळ करण्यासाठी औषधे घेतात. अशा लोकांनी चुकूनही आहारात फणसाच्या बिया घेऊ नयेत. कारण जे आधीच रक्त पातळ होण्याच्या गोळ्या खात आहेत त्यांनी फणसाच्या बिया खाल्ल्याने रक्त आणखी पातळ होण्याची शक्यता असते. ज्या लोकांना चयापचयची समस्या आहे अशांनी तर फणसाच्या बिया खाणे टाळावेच.

फणसाच्या बिया खाण्याचे फायदे

  • व्हिटॅमिन ए डोळ्यांसाठी आवश्यक पोषक आहे. व्हिटॅमिन ए असल्याने आपले केसही चांगले राहतात. फणसामध्ये व्हिटॅमिन-ए, बी ६, सी असते. व्हिटॅमिन-ए आपल्या डोळ्यांसाठी, व्हिटॅमिन बी 6 मेंदूसाठी आणि व्हिटॅमिन-सी रोगप्रतिकारक शक्ती वाढविण्यासाठी उपयुक्त आहे.
  • चेहऱ्यावरील सुरकुत्या कमी करण्यासाठी फणसाच्या बियांचा वापर करावा. सर्वात अगोदर या बिया दूधात भिजवून ठेवाव्यात आणि नंतर बारीक पेस्ट करून चेहऱ्याला दररोज लावावी. किमान २५ मिनिटे तरी ही पेस्ट आपल्या चेहऱ्यावर तशीच ठेवावी आणि नंतर पाण्याने धूवून टाकावी. त्यामुळे आपल्या चेहऱ्यावरील सुरकुत्या कमी होतात.
टॅग्स :Healthआरोग्यHealth Tipsहेल्थ टिप्सfoodअन्नfruitsफळे